फॉलोअर

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

श्री.जनार्दन बोटे यांच्या जीवनकार्याचा आढावा...

'बँकिंग क्षेत्रातील ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आदरणीय श्री.जनार्दन बोटे साहेब आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...'
            

                      
                         कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पांगिरे या छोट्याशा गावी श्री. महादेव जोतिबा बोटे व सोनाबाई उर्फ गयाबाई महादेव बोटे या पुण्याशील दांपत्याच्या पोटी जनार्दन बोटे यांचा १५ जुलै १९६२ रोजी पांगिरे येथे जन्म झाला.एक भाऊ व बहीण अशी ही मिळून तीन भावंडं. वडील मुबंईला गिरणी कामगार म्हणून कामाला.तुटपुंजा पगार.आई गावी शेतमजूरी करायची.घरची हालाखीची परिस्थिती. गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.जनार्दन बोटे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी पर्यंत पांगिरे या गावी झाले.आणि मग त्यानंतर ४ थी इयत्तेपासून मुंबईत शिक्षण सुरू झाले.उपजतच हुशार,चुणचुणीत असलेले बोटे साहेब प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.त्यानंतर ८ पासून १० पर्यंत नावाजलेल्या शारदा आश्रम विद्या मंदिर दादर या शाळेत शिक्षणासाठी दाखल झाले.कुशाग्र बुद्धिमत्ता,अभ्यासातली आवड,सुदंर हस्ताक्षर असा हा गुणी मुलगा आपसूकच शिक्षकांच्या हृदयात भरला. म्हणून तर शाळेतील कोणत्याही कार्यक्रमानिमित्त सुदंर हस्ताक्षरात फलकलेखन करण्यास हक्काने शिक्षक त्यांनाच सांगायचे.या शाळेत शिकत असताना शेवटपर्यंत अगदी आवडीने हे काम करीत राहिले.शिक्षकांचा असा हा आवडता विद्यार्थी शाळेतील तब्बल ३००० विद्यार्थ्यांमधुन त्या काळी आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला गेला.विशेषतः शाळेत ब्राम्हण विद्यार्थ्यांची संख्या अधिक त्यातून एखाद्या सामान्य घरातील विद्यार्थ्याला हा मान मिळणे ही असामान्य गोष्ट होती.
                दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीच्या असहायतेमुळे शिकण्याची इच्छा असताना  नाईलाजास्तव जि.टी. पारसिक बँक ठाणे इथे १९७९ साली शिपाई या पदावर काम करण्यास सुरुवात केली.पण शिकण्याची प्रखर जिद्द उर्मी मनात काही स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ११ व १२ वीचे शिक्षण रात्रीच्या (नाईट कॉलेज)मधून पूर्ण केले.त्यानंतर (बी.कॉम) पदवीचे तीन वर्षांचे शिक्षण मॉर्निंग कॉलेजमधून पूर्ण केले.शिकण्याची ही तळमळ पाहून आईवडिलांचे प्रोत्साहन तर होतेच पण पारसिक बँकेचे चेअरमन कैलासवासी गोपीनाथ शिवराम पाटील व्हा.चेअरमन श्री. नारायण गजानन गावण यांनी पुढे शिकण्यासाठी प्रेरणा दिली ,सहकार्य केले.म्हणून तर ही ऊर्जा घेऊन बँकिंग क्षेत्रातील विविध पदव्या ते घेत गेले.
             पंखात बळ भरलं की भरारी घ्यायला आकाश ठेंगनं पडतं तसं जिद्दीने पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या बळावर एक उदात्त ध्येय...एक मोठं स्वप्न..साकारायचं होतं.आणि मग सुरू झाला त्या ध्येयाप्रद प्रवास.. शिपाई या पदावरून झेप घेत पहिल्यांदा  .ज्युनि.क्लार्क, सिनि.क्लार्क..ज्युनि.ऑफिसर..सिनि. ऑफिसर,पुढे चीफ मॅनेजर, असि. जनरल मॅनेजर,डेप्युुडी जनरल मॅनेजर आणि शेवटी मग जनरल मॅनेजर अशी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द बहरत गेली.
                आपल्या सेवेच्या काळात त्यांनी अतिशय प्रमाणिकपणे आपल्या कार्याप्रति स्वतःला वाहून घेऊन काम केले. विशेषतः ते सरकारमान्य वसुली अधिकारी म्हणून आपले कर्तव्य उत्तमप्रकारे पार पाडत राहिले.याचा परिणाम म्हणजे त्यांच्या काळात बँकेचा रिकव्हरी रेट उत्तम राहिला.पारसिक बँकेला जनार्दन बोटेंच्या माध्यमातून असा सारथी लाभला ज्यामुळे त्यांच्या काळात बँकेची डेव्हलपमेंट चांगल्याप्रकारे होत राहिली.महाराष्ट्रभर तसेच गोव्यापर्यंत या बँकेच्या शाखा विखुरल्या आहेत.बँकेचे हे सारथ्य पार पाडत असताना  आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत रात्रंदिवस फक्त एकच ध्यास आपल्या बँकेची वाढ..वृद्धी..विकास आणि विस्तार..आणि हे करत असताना त्यांनी नेहमी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन टीम वर्क पद्धतीने काम करीत राहिले.बँकेतील कर्मचाऱ्यांशी त्यांचे असे नाते म्हणजे की बँक म्हणजे एकप्रकारे आपले कुटुंबच.तिथला प्रत्येक कर्मचारी हा आपला जिवाभावाचा सोबती सहकारी..प्रत्येकाशी प्रेमाने आदराने वागून प्रत्येकाला प्रेरणा प्रोत्साहन देत पुढे जात त्यांनी आपल्या कारकिर्दीत अधिकारी..सहकारी..कर्मचारी.. ग्राहक यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे वलय निर्माण केले..हे सर्व करत असताना त्यांनी एक तत्व प्रमाण मानले की,बँकेने आपल्याला मोठे केले त्या बँकेला आपण मोठे करणार आणि या जाणिवेतून ते अव्याहतपणे काम करीत राहिले.आज पारसिक बँक एक नावाजलेली विश्वासार्ह अशी अग्रणी बँक आहे.
'इवलेसे रोप लावियेलें दारी त्याचा वेलू गेला उंच गगनावरी.'
श्री.जनार्दन बोटे व पारसिक बँक कधी काळी हे छोटं असणारं नाव आज खूप मोठं झालंय.नावारूपाला आलंय.
आज ते ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून जनरल मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त होत असताना
एखाद्या आईला आपलं लेकरू पारख व्हावं तसा या मायलेकरांच्या ताटातुटीचा आजचा दिवस आहे.तस कोवळ्या वयात तिच्या पदरात दाखल झालेलं हे लेकरू तिच्याच पदरात मोठं झालं तिची सेवा करू लागलं... आणि सेवा करता करता या आईचा उपकाराची परतफेड म्हणून तिला नावारूपाला आणलं.या मायरुपी पारसिक बँकेनेही बोटे साहेबांना खूप काही दिलं.. जन्माची भाकरी दिली मान,सन्मान, प्रतिष्ठा...जे काही नव्हतं ते सारं काही दिलं.आज आपल्या कर्तव्याच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं.कधी काळी हक्काचं घर नव्हतं आज मुंबईसारख्या शहरात आणि कोल्हापूर या ठिकाणी दोन फ्लॅट आहेत.मुलगा आज डिप्लोमा इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करून मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो.आणि हे सर्व करत असताना जसं म्हटलं जातं एखाद्या कर्तबगार पुरुषामागे एक स्त्री उभी असते तशी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रंजना बोटे यांची त्यांना मोलाची साथ मिळत गेली.
                     नोकरीच्या निमित्ताने जरी बोटेसाहेब बाहेर असले तरी गावच्या मातीशी त्यांची नाळ अजूनही अतुट आहे.अशी बरीच मंडळी हवेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून गेली आणि शेवटी गावच विसरून गेली पण बोटे साहेब त्याला अपवाद आहेत.गावच्या मातीशी..माणसांशी अजूनही त्यांचे मायेचे नाते कटिबद्ध आहे खरं तर या संस्कारांची प्रेरणा त्यांना वडिलांपासून मिळाली.वडिलांना गावच्या मातीची प्रचंड ओढ..गावची माणसं म्हणजे त्यांच्या मनातील हळवा कोपरा.सतत त्यांचे मन गावाकडे धाव घेई.वडील दत्तगुरुंचे निस्सीम भक्त त्यामुळे बोटे साहेबानी २०१० सालापासून गावात दत्त जयंतीची प्रथा पुनर्जीवित केली.आजही दरवर्षीच्या दत्तजयंतीला जतिनिशी हजर राहून आपली सेवा बजावत असतात.संपूर्ण गावाला महाप्रसाद देतात.
                       आपल्या गावातील नवीन पिढी शिकावी मोठी व्हावी यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी त्यांना प्रेरणा द्यावी,गावातील हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद सारख्या विभूतींची पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करणे ही संकल्पना त्यांनी गावी रुजवायला सुरुवात केली.
अजूनही गावचा विकास..प्रगती यासाठी काही करण्याची त्यांची मनिच्छा आहे. १९९३ साली स्वप्रयत्नातुन पतसंस्था काढली आहे.आज त्याच्या दोन शाखा आणि वार्षिक ८ ते १० कोटींची उलाढाल आहे.
एका गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेऊन या तिन्हीं भावंडांनी आपल्या मायबापाची कुस उजवली आहे.
आज जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त होणारे जनार्दन बोटे साहेब त्यांची. एक बहीण मुंबईतील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून तर भाऊ व्यावसायिक आहे.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा.
कन्या व्हावी ऐसी संत मीरा,मुक्ताबाई जैसी.
                        पोटाला अशी लेकरं जन्माला यावीत आज ते पुण्यवंत आईवडील हयात नाहीत पण हयात असताना याची देही याची डोळा आपल्या लेकरांची ही कर्तबगारी त्यांनी पाहिली आहे.मातृपितृभक्त या मुलांनी त्यांची अखेरपर्यंत चांगली सेवा केली.जन्माचे पांग फिटलेल्या त्या मातापित्यानि अपार समाधानाने डोळे मिटले.धन्य...धन्य ते माता पिता.
                 एखाद्या गावखेड्यात गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेऊन शिक्षणाच्या बळावर प्रचंड जिद्द चिकाटी मेहनत घेऊन एखाद्या शिपाई पदावरून एका प्रतिष्ठित बँकेचा जनरल या बँकेचा जनरल मॅनेजर या पदापर्यंत खूप मोठी भरारी घेणं.. ही खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.आपल्या कर्तबगारीने बोटे साहेब खरंच आपण आईवडीलांचे,गावचे आपल्या बँकेचे नाव रोशन केले... 'याची केला होता हट्टाहास.' याप्रमाणे जीवनातले असे एक भव्य दिव्य उज्वल उदात्त ध्येय..एक स्वप्न साकार केलात.आणि आज आपण ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून मुक्त होता आहात पण.. आज असंख्य जणांची आपण प्रेरणा आहात... कसं शिकावं कसं जगावं..आणि कसं मोठं व्हावं याचं प्रत्येकासाठी मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपण आहात...आज जरी बँकिंग क्षेत्रातील सेवेतून निवृत्त होणार असला तरी समाजसेवारुपी कार्यात प्रवृत्त होणार हे निश्चित..एक आदर्शवत..निष्कलंक..निर्विवाद..कार्यसेवेतून निवृत्त होत आहात याबद्दल प्रथमतः आपले आपल्याला मोलाची साथ देणारे आपले कुटूंब व आपला सहकारी परिवार आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन... आपले पुढील आयुष्य सुख शांती समाधान..भरभराटीचे जावो... तुमच्या संपूर्ण ईच्छा सफल होवो.. जे जे तुम्हांस हवे ते ते मिळो...
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...जय गुरुदेव दत्त.

जय हो... मंगल हो..
----------------------------------------------- 
                       - किरण चव्हाण.(पांगिरे)
                        ८८०६७३७५२८.

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

जात्यावरच्या ओव्या...किरण चव्हाण.


पहाटेच्या शांत समयी...दिव्याच्या मंद तांबूस उजेडात... जात्यावर दळण दळणारी माय... जात्याची कर्णमधुर घरघर...आणि मायेच्या गोड गळ्यातील मंजुळ ओव्या...नितांत सुंदर.



                             'जात्यावरच्या ओव्या'


पहाटंच्या ओव्या गात जात्यावं दळीते |
रामाधरमाच्या गं पारी गणगोत मांडीते ||
कीर्ती जगी बाई त्यांची  सांगिते |
ऐकायाला ये रं बा तू पंढरीच्या विठ्ठला ||


पहिली माझी ओवी गं प्रभू रामचंद्राला |
सीतामाई शोधासाठी वणवण फिरला ||
घेऊनिया वानरसेना सेतू सागरी बांधीला |
माथा टेकवितो बाई ऐशा पतिराजाला ||


दुसरी माझी ओवी गं किती गुण गाऊ गं |
पती सत्यवानाचा जीव घेऊन आली गं ||
पत्नीधर्म पाळावा कसा गं बाईन |
पतिव्रता सावित्री जशी गेली होऊन ||


तिसरे माझे वंदन थोर आई बापाला |
पुण्याईचे फळ आले संत त्यांच्या पोटाला ||
निवृत्ती-ज्ञानेश्वर...सोपान-मुक्ताई |
भक्तिभाव ज्ञान अवघ्या जगाची माऊली ||


चौथे माझे नमन जिजाऊ बाईला |
पुत्र असा घडविला शोभे राजा प्रजेला ||
शूरवीर घेऊन शत्रुसंगे लढून |
शिवबाने बांधले गं स्वराज्याचे तोरण ||


सावित्रीबाई माझी सरस्वती ज्ञानाची |
शिक्षणाची गंगा तिने घरोघरी आणिली ||
तिच्यामुळे बाई माझ्या लेकीबाळी शिकल्या |थोरमोठ्या जाहल्या नावारूपाला आल्या ||


गांधी जैशा महात्म्यांनी शहाणे केले देशाला |
फुले,शाहू,आंबेडकर समानतेचा मंत्र दिला ||
किती ज्ञानी किती गुणी काय कीर्ती वर्णू मी |
अशा संत,विभूतींनी पावन झाली गं भूमी. ||


शेवटची ओवी माझी स्वातंत्र्याच्या लढ्याला |
देऊनिया बलिदान मुक्त केले देशाला ||
लढले झगडले स्वातंत्र्य मिळाया |
नमस्कार सदा माझा त्यांच्या वीर स्मृतीला ||
  
                                    - किरण चव्हाण.
                                   

शुक्रवार, १० जुलै, २०२०

बायोडाटा.-किरण सुभाष चव्हाण.

  !!श्री. गणेशाय नमः!!


नाव - किरण सुभाष चव्हाण.

जन्म - १०/०९/१९९०

जन्मस्थळ - पांगिरे.

जन्मवेळ - सोमवारी पहाटे ५ वाजता 

जात - हिंदू-चांभार.

शिक्षण - MA.D.Ed.B.Ed (English)

नोकरी - सहायक शिक्षक.(पर्मनंट)
शाळा - माध्यमिक विद्यालय आरदाळ
ता- आजरा, जि- कोल्हापूर.

आवड - लेखन,वाचन,संगीत.
---------------------------------------------------
                          कौटुंबिक माहिती.

वडील - कै.श्री.सुभाष रामचंद्र चव्हाण.

आई - श्रीमती. फुलाबाई सुभाष चव्हाण.

बहिणी - दोन (विवाहित.)

भाऊ - नाही.

पाहू
णे - जाधव,यादव,सूर्यवंशी,माने.

घरचा पत्ता - रा-पांगिरे, ता-भुदरगड, जि-कोल्हापूर.

संपर्क : ८८०६७३७५२८,९२७१७७५४७७.

Kiran Chavan Follow on : Facebook 

/ You tube Channel  - Search by Kiran Chavan

अधिक माहितीसाठी : https://kiranchavanpangire.blogspot.com/2020/07/blog-post_9.html
------------------------------------------------------
संपर्क : ८८०६७३७५२८,९२७१७७५४७७.

गुरुवार, ९ जुलै, २०२०

किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात......

        

               किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात...
---------------------------------------------------------------------

                          आई                बाबा
                                    
                                             


           जन्मासी घातलें तुम्हीं मायबापा |
           जपिले फोडाप्रमाणे तळहाता ||
                अपार कष्टसायास झेलीले |
 तरी जीवन ऐसें घडविले  ||
शब्दे अपुरेच पडतील |
काय सांगू तुमची गाथा  ||
चरणांवरी आपुल्या सदैव  |
टेकवितो माझा माथा ||
नाही ऋणातूनी या उतराई  |
अवघे जीवन हे तुमचे ठायी ||

गुरुदेव

                 धन्य झालो बा पांडुरंगा |
     भेट झाली तुझिया स्वरूपा||
अद्वैतची झालो ठायी |
ही सारी तुझीच कृपा ||
भाग्य उदयास आले  |
सुखाचे सुख लाभले ||
जन्मींचे पुण्य फळले
सार्थक झाला हा जन्म पुरता||
शोध नाही गा आता |
मज माझा गुरू भेटला ||
हृदयाचा गाभारा उजळला |
परमेश्वररुपी इंद्र मज सापडला ||


नाव - किरण सुभाष चव्हाण.
        रा - पांगिरे ता- भुदरगड जि-कोल्हापूर.
नोकरी - सहा.शिक्षक माध्यमिक विद्यालय आर्दाळ.
            ता - आजरा, जि-कोल्हापूर.
   मोबा - ८८०६७३७५२८.

Kiran chavan you tube channel .

--------------------------------------------

                           साहित्य

गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) व गुरुवर्य श्री.सदानंद पुंडपाळ सर यांच्याहस्ते २५ ऑगस्ट २०१७ ला 'नदीकाठचा संसार ' आणि 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन.





पुस्तक प्रकाशनाची बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा.

तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन :

आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.




पुस्तक प्रकाशनाची Tv9 वर आलेली बातमी.





'साहित्य चळवळ -गांवशिवार साहित्य परिवार गारगोटी या संस्थेचा 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या साहित्यकृतीस विशेष पुरस्कार.'



ग्रामीण कथासंग्रह 'नदीकाठचा संसार आणि बालकादंबरी 'लढा...दोन कर्तृत्ववान मुलींचा' या पुस्तकांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ समितीच्या शासनमान्य ग्रंथ यादीत निवड.



लेखक शिक्षकांच्या संवेदनशील अनुभवातून साकारलेल्या कथांचा विश्वास सुतार संपादित नाळ कथासंग्रहात समाविष्ट माझी कथा 'चित्र पुसलं आणि...' याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते लेखक सन्मान स्वीकारताना..



'मुलांच्या लेखन वाचन विकासातील शिक्षकांची भूमिका: या विषयावर मराठी बालकुमार साहित्य सभा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेत दुसरा क्रमांक.



कॉ. गोविंद पानसरे विचारमंच कोल्हापूर आयोजित सामाजिक कविता- काव्यवाचन स्पर्धा 'लई काय नाही थोडं सांगावसं वाटतं.' या कवितेस द्वितीय क्रमांक. साल - २०१५


'न्याय मिळालाचं पाहिजे' या कवितेस प्रथम क्रमांक.साल-२०१८



विविध काव्यवाचन कार्यक्रमात कविता सादरीकरण.



कविता सादरीकरणाचा व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/PaX6AaZFavQ

कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरवरून कविता प्रसारित.


'नागोबाच्या नावानं चांगभलं' या ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटसाठी सहा गाण्यांचे गीतलेखन.

शालेय नाट्यलेखन :
१) माणूस.
२) नुसती धमाल विनोदी नाटक
३) संस्काराचा परिसस्पर्श.

माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या  संस्काराचा परिसस्पर्श नाटकातील काही क्षणचित्रे.




तीन माहितीपटांचे लेखन :
१) 'माझा गांव माझी माणसं'
२) नागनाथ पाठीराखा.
३) वीर जवान तुझे सलाम.

वृत्तपत्र,मासिक,दिवाळी अंक यातून लेख प्रसिद्ध.

माझे व्यासपीठ - ब्लॉग,फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लेखन.

माझ्या ब्लॉगवरील 'अनाथांचा नाथ मायबाप संतोष गर्जे' हा लेख आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी वाचला त्या धरतीवर माईंशी साधलेला दूरध्वनीवरून संवाद.


खालील लिंकवर क्लिक करून संवाद ध्वनिफित ऐका.
https://youtu.be/aelgWSoVKTU

--------------------------------------------------------

'विनाअनुदानितच्या लढ्यातील माझे योगदान.' विनाअनुदानित प्रश्नांवर लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रकाशझोत.
'मोदीजी क्या आप हमे न्याय दे सकते हैं' या मथळ्याखाली हिंदीतून लिहिलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवलेल्या पत्राची ध्वनिफिती ऐका खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/unyWQ1NwwuA

मा.मुख्यमंत्री/मा.शिक्षणमंत्री यांच्याकडे पत्रातून विनाअनुदानितची मांडली व्यथा.


राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची पगाराविना झालेली फरफट त्यांची मांडलेली व्यथा याची दखल महाराष्ट्र टाईम्सने घेतली दखल...दि.२०/११/१८
महाराष्ट्र टाईम्स बातमी.


माझ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने विनाअनुदानित प्रश्नांसंदर्भात शिक्षक आमदार दत्ता सावंत यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत.तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे व ना.गो.गाणार यांच्याशी दूरध्वनीवरून मुलाखत.


शिक्षण क्षेत्रातील माझे मार्गदर्शक गुरू आणि विनाअनुदानित पुस्तकाच्या वाटचालीतील मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत हेरंब कुलकर्णी सर.




'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तकाच्या अनुषंगाने माननीय शिक्षणमंत्री महोदया वर्षाताई गायकवाड मॅडम ,पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, नूतन शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर.. यांच्या घेतलेल्या भेटीची क्षणचित्रे.






आगामी प्रकाशनाच्या वाटेवर पुस्तके...
१) विनाअनुदानितची संघर्षगाथा.
२) ग्रामीण कथासंग्रह.
३) प्रवास ध्येयवेड्यांचा.
४) कादंबरी 'शानु'

आवड : चित्रकला, संगीत,शेतीकाम.

चित्रकला :



संगीत :



व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.

संगीत 'गीत प्रथमा' परीक्षेत गारगोटी व कुडाळ केंद्रात प्रथम क्रमांक.


शेती :    


"जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं तसा गुरूमाऊलींचा स्पर्श जीवनाला झाला नि माझ्याही जीवनाचे सोने झाले....जीवनार्थ कळाला...धन्य हो गुरुदेवा...जय हो..मंगल हो."
 'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक...'
'साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा...माझे गुरुदेव माझ्या घरी आले तो आमच्या भाग्याचा क्षण'



सामाजिक कार्य .

माय- भू सेवा शिबिरांतर्गत गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) सोबत शिंदी खुर्द तालुका-मान जि- सातारा या दुष्काळग्रस्त गावात श्रमदान शिबिरात सहभाग.




पूरग्रस्त चंदूर ता-हातकणंगले जि-कोल्हापूर येथे गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या मार्गदर्शनाखाली शिवम परिवाराने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग.




व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.

शिवम परिवार घारेवाडी 'युवा हृदय संमेलन' दरवर्षीच्या शिबिरात रक्तदानाचा संकल्प.







पांगिरे गावची पूरग्रस्त माहेरवाशीण सौ.उर्मिला पाटील यांना मदतीसाठी लेखनातून आवाहन करून बेळगुंदी येथे जाऊन जीवनाश्यक वस्तूंची मदत.



शैक्षणिक व्यासपीठच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.


भुदरगड तालुक्यातील आपाचीवाडी या दुर्गम वस्तीतील कु.राधिका गुरव इ ४ थी व गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.


व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/Sa19f--CMGU

बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा.

भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द या दुर्गम वस्तीतील कु.परीट इ ८ वी तील गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.


भुदरगड तालुक्यातील पाल या गावी राहत असलेली सौ.मंगला गुरव व त्यांचा अपंग मुलगा कृष्णात गुरव यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मदतीसाठी लेखनाच्या माध्यमातून आवाहन.



व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/x8_NCrk05dA
नसीमा हुरजूक यांनी लेख वाचून अपंग कृष्णात गुरव याची दखल घेऊन त्याचे अपंग पुनर्वसन केंद्र येथे रवानगी केली.. आज कृष्णात सिंधुदुर्ग येथील अपंग पुनर्वसन संस्थेत कामाला आहे.


पांगिरे गावातील निराधार श्रीमती बायक्का पाटील यांची जबाबदारी घेऊन चंद्रमोळी झोपडीत शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची अनोख्या पद्धतीने स्थापनेची संकल्पना.



गावपातळीवर शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची स्थापना..

शिवम परिवार पांगिरे.
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या वाढदिवसानिमित्त शिवम परिवाराचा संकल्प...चिक्केवाडी या दुर्गम वस्तीत जाऊन दिवाळी फराळाचे वाटप.



बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा

सलग दुसऱ्या वर्षी (२०२०) चिक्केवाडी या दुर्गम वस्तीतील लोकांना शिवम परिवाराच्या माध्यमातून दिवाळी फराळाची भेट




कोरोनाच्या संकटकाळात नाम फाउंडेशन आणि शिवम परिवार पांगिरे यांच्या मार्फत गावातील २० गरजू,गरीब कुटुंबांना व लमाण तांड्यावर जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.





'अवयवदानाचा संकल्प'
 कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कोमल गोडसे पवार (कोमलदिदीने) स्वतः मला अवयवदान प्रमाणपत्र  सुपूर्द केले.



शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर संस्थेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील माझ्या उल्लेखनीय  कार्याबद्दल ५ सप्टेंबर २०२० शिक्षकदिनानिमित्त 'उपक्रमशील शिक्षक' सन्मानपत्र प्रदान करून गुणगौरव केला.



महाराष्ट्र शासनाच्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत कोविड योद्धा म्हणून ५०० घरांचे कोविड सर्वेक्षणाचे काम.




कोविड सर्वेक्षणाचा व्हिडिओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.


ज्ञानसंवाद सार्वजनिक वाचनालय वेळूक, ता.मुरबाड, जि. ठाणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.

विषय -  'कोरोना,माध्यमे व मी.'


'कोरोनाविरुद्धची लढाई आपणच जिंकायची आहे.' या विषयावर कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत झालेले माझे विचार.


खालील लिंकवर क्लिक करून ऐका.

अखिल भारतीय शिक्षक साहित्य,कला-क्रीडा मंच,कोल्हापूर यांच्यावतीने 'गुणवंत साहित्यिक' पुरस्कार प्रदान.


ग्रामपंचायत कळंबा तर्फे ठाणे यांच्यावतीने कोरोना काळात योगदान दिलेल्या कोरोना योध्यांच्या सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.लोकनियुक्त सरपंच मा.सागर भोगम दादा व ग्रामविकास अधिकारी मा.दिलीप तेलवी यांच्या हस्ते माझा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला..


त्रिवेणी साहीत्य संमेलन उतूर या ठिकाणी कविता सादर करताना








माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर मा.श्री.एकनाथ आंबोकर साहेब यांची सस्नेह गृहभेट.



सृजन वाचन वसमाज प्रबोधन सांस्कृतिक मंच सरवडेद्वारा कोल्हापूर आयोजित कराओके गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.




एक गाडी उभी करायची आहे...या आशयाची पोस्ट करून मदतीला धावलेल्या गिरीश प्रकाश कुंभार या युवकाला गाडी समाजाच्या योगदानातून गाडी प्रदान करण्यात आली.



ज्या ठिकाणी गाडी जळाली त्याच ठिकाणी नवीन गाडी उभा केली.








बातम्या - 




गाडी प्रदान कार्यक्रम व सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून पाहा.

https://youtu.be/gjGiBspRs_Y


आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावच्या चौगले कुटुंबाला यु ट्युब चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला समाजातून मिळालेला प्रतिसाद.





सविस्तर पाहा.



दान हेचि दे गा देवा |
घडो हाती अखंड सेवा ||

                   जय हो ! मंगल हो!!

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...