पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..? - किरण चव्हाण.

इमेज
  महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..?                                कुणी घर देता का रे घर ? भिंती वाचून, छपरा वाचून माणसांच्या मायेपासून ,देवाच्या दयेपासून वंचित आहे.कुणी घर देता का रे घर..?  महाराष्ट्रातल्या आमदारांची आज अशी अवस्था झाली आहे का..? आमदार इतके बेघर झालेत का.? म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत मोफत घरं बांधून देण्याची घोषणा करावी लागते. आता आमदार सुद्धा बेघरांच्या यादीत आले म्हणायचे ? मग दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबाना व बेघरांना मोफत घर हवे असेल तर त्यात आणखीन एक अट घालावी लागेल की आपण आमदार असायला हवे. म्हणजे हा विरोधाभासचं काही कळत नाही की आपला महाराष्ट्र इतका दयनीय झाला आहे की इतका समृद्ध,संपन्नशाली झाला आहे.की जो लोकप्रतिनिधीनाचं आता मोफत घरे बांधून देऊ शकतो.                                  किती संतापजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. ज्या लोकांना आपण विकासाच्...

पुस्तक वाचन - डॉ.सुनिलकुमार लवटे संपादित डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर.

इमेज
डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे मनात विवेकशीलता निर्माण करणारे पुस्तक.                                  एका बैठकीत वाचून होण्याएवढं हे पुस्तक आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे सरांनी संपादित केलेले डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे पुस्तक वाचलं.हे पुस्तक म्हणजे दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे अज्ञात मारेकऱ्यांकडून डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. त्यानंतर काहीच महिन्यात मासिक स्मृती जागर व्याखान उपक्रम राबविण्यात येऊ लागला, त्या उपक्रमातील पाच व्याख्यानांचा संग्रह म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे.यामध्ये सुरेश द्वादशीवार,डॉ.सुनीलकुमार लवटे,लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.सदानंद मोरे, संजय जोशी अशा डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचार कृतीशी व चळवळीशी प्रत्यक्ष जोडलेल्या व त्यांच्या सोबत कार्य केलेल्या महनीय व्यक्तींच्या विचारांचा सार आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो. डॉ.दाभोलकर यांच्या कार्याचे योगदान, वैचारिकता, व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडताना दाभोलकर एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे.आणि त्यांच...

'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे.

इमेज
  'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.' - ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे.                                                           किरण चव्हाण लिखित विनाअनुदानितची संघर्षगाथा हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विनाअनुदानित हा विषय ग्रंथरूपाने समोर आला आहे प्रथम मला हे आवडलं. पण आता त्याच्यापुढे अजून कशाप्रकारे या प्रश्नाकडे पाहता येईल याचादेखील विचार करायला पाहिजे. कारण आता हा न संपणारा प्रश्न तयार झाला आहे. खूप लोक या प्रश्नाशी जोडले गेलेले आहेत.मग याच्यापुढे काय करायचं ? नवीन आर्थिक व्यवस्था, नवीन खाजगीकरण आणि त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त समाज जोडला गेलेला आहे.आणखीन दहा वर्षाने सगळा समाजच जोडला जाईल.खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली की जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये असे लोक दिसतील.कॉन्ट्रॅक्ट, प्रायव्हेट, नॉनग्रँट हे आता परवलीचे शब्द होणार आहेत. म्हणून याचा मूलभूत विचार करण्याची वेळ आलेली आहे.काय झाल्यानंतर हे दूर होण...