'स्वप्नंही मरतात...'
माणसं मरतातच....
पण माहिती आहे
स्वप्नंही मरतात.
..नाही माहिती
स्वतःचा गळा घोटून
स्वप्नं आत्महत्याही करतात.
हे तर खूपच मामुली..
स्वप्नांच्यावर अन्याय,अत्याचार होतो.
स्वप्नांच्या पाठीतही निर्दयपणे
खंजीर खुपसला जातो..
.... स्वप्नांचाही खून केला जातो.
त्यांचीही खांडोळी केली जाते.
स्वप्नं...
तुडवली जातात..
कुस्करली जातात..
भरडली जातात..
चिरडली जातात...
गाडली जातात...
जाळली जातात..
मनाच्या स्मशानात
स्वप्नांचीही राख होते...
आणि मग शेवटी
मागे उरतात फक्त..
मेलेल्या स्वप्नांचे स्मारक
म्हणून माणसांचे जिवंत सांगाडे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा