पोस्ट्स

बाप गेला आणि... "बापाची प्रेरणा: अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल"

इमेज
                                          बाप गेला आणि...                                        आज मी जेंव्हा कधी मुद्दामहून डोळे मिटून, रस्त्याने चालावयाचा प्रयत्न करतो.तेंव्हा दहा पाऊलेही नीट धाडसाने टाकू शकत नाही...मनात भीती वाटते. वाट चुकेल की काय..? मी कुठे भलतीकडेच जाईन का काय..? आणि मग माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात..माझा बाबा कसा चालत होता..? माझा बाबा अंधारल्या डोळ्यांनी प्रत्येक पाऊल कसा टाकत होता.?  अंधाऱ्या डोळ्यांनी आयुष्याची लढाई लढणारा माझा बाप खरंच माझ्यासाठी जगातला एक ग्रेट माणूस आहे. ज्या बापाच्या पुढची वाट सदा अंधाराची होती, त्या बापानं मी इवलासा असताना माझं बोट धरून मला शाळेत पाठवलं होतं. कारण त्याला माहित होतं, स्वतःचं आयुष्य जरी अंधारान दाटलं असलं तरी पोराच्या आयुष्यात प्रकाश येईल तो शिक्षणामुळचं. बाबाला माहिती होतं की, पाचवीला पूजलेल्या या गरि...

"शांत, शिस्तप्रिय आणि विद्यार्थिप्रेमी शिक्षक श्री. विनायक पाटील सरांचा सन्मान"

इमेज
  शांत शिस्तप्रिय,मायाळू  विद्यार्थीप्रिय गुरू श्री. विनायक पाटील सर..               काही माणसं शांत, संयमी आणि आपल्या नेमून दिलेल्या कार्याकडे प्रामाणिक पणे वाटचाल करणारी असतात. ती बोलकी नसतीलही पण त्यांचे काम मात्र बोलके असते. त्यांच्या मनाची ऊर्जा, एकाग्रता ही त्यांनी सातत्याने आपल्या कामाप्रतिचं व्यतीत केलेली असते. असेच एक शांत, संयमी,मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुवर्य विनायक पाटील सर आज ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.                    अगदी भर उन्हात स्वतःच सेवानिवृत्त समारंभाची पत्रिका घेऊन सर माझ्या घरी आले.पत्रिका हातात देत आग्रहाचं निमंत्रण दिलं तेंव्हा सहजच माझे हात सरांच्या पायाशी गेले. सरांचे चरणस्पर्श केले. सरांना बसण्याची विनंती केली पण घाईगडबडीत उभ्या उभ्याच सर आमंत्रण देऊन घरातून बाहेर पडले. सर निघून गेले आणि हातात निमंत्रण पत्रिका घेत..न्याहाळू लागलो ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत.. त्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील विद्या मंदिर पांगि...

एक चित्तथरारक अनुभव."धाडसी तरुणाचा प्रयत्न: नेट हाऊस वाचवताना गाडी जळून गेली"

इमेज
  एक गाडी उभी करायचीय कारण...                ही गोष्ट आहे एका जिगरबाज तरुणाची आणि पेटलेल्या त्याच्या गाडीची. त्या दुपारच्या चित्तथरारक घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आज आपण आजूबाजूला पाहतो डोंगराला आग लागण्याचे किंवा मुद्दामहून लावण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहेत.म्हणजे आग लावतो कोण आणि त्याच्या झळा सोसतो कोण अशी परिस्थिती..   असाच एक भर दुपारचा प्रसंग होता तो. उतुरकडून पिंपळगावच्या दिशेने येताना नवकृष्णा व्हॅली स्कुल जवळचा.कडकडीत उन्हात  खालून डोंगर पेटत येऊन नेट हाऊसच्या खालच्या बांधला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. एक तर कडाक्याचे ऊन आणि वारा त्यामुळे आग जलद गतीने पसरत होती. गवत पेटून आगीचे लोळ उठत होते. आणि जवळजवळ ही आग आता त्या नेट हाऊसला लागणार अशीच सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. पण हातात पाल्याचे डहाळे घेऊन मिळेल ते साधन घेऊन नवकृष्णा व्हॅली स्कुलचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम आणि त्यांचे सहकारी शिक्षक,कर्मचारी तसेच  रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू आपली गाडी थांबवून ती आग ...

"शाळेतील शेवटचा दिवस: मित्र, बेंच आणि आठवणींचा प्रवास" दहावी सदिच्छा समारंभ | आकाशी झेप घे रे पाखरा.

इमेज
  आकाशी झेप घे रे पाखरा.               अखेर तो दिवस आलाच. बाळांनो... घालमेल होत असेल ना जीवाची आतल्या आत. होणारच हो सहाजिकच आहे. आई बापाच्या घरात मायेने वाढलेली ,हसरी खेळकर, बागडणारी लेक जशी मोठी झाल्यावर सासरी जाताना, तिचा पाय घराबाहेर निघता निघत नाही. हळव्या क्षणांच्या गोड आठवणीं पायगुंता होऊन पुढे जाऊ देत नाहीत. अगदी तशी तुमच्या मनाची  आज अवस्था झाली आहे समजू शकतो बरं आम्हीं. ज्या उंबरठ्याच्या आत तुम्हीं ज्ञान घेण्यासाठी यायचात. तो उंबरठा ओलांडून ते ज्ञान घेऊन बाहेरच्या जगात तुम्हीं चाललात. आज तुम्हीं देहान इथून बाहेर जाल पण मनानं या वर्गातच रेंगाळणार आहात काही दिवस तरी. ज्या बेंचवर बसायचात, प्रत्येकाचा आपापला बेंच आणि सोबती ठरलेला असायचा. कधी कधी माझा बेंच म्हणून हुज्जत घालायचात एकमेकांच्यासोबत. तो बेंच आज तुम्हांला सोडून जावा लागणार. ज्या बेंचवर एकत्र बसायचात ते मित्र उद्या कुठल्या कुठे असतील, उद्या त्यांच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या असतील..                       सकाळची नेहमी प्रार्थ...

'जाता पंढरीशी...' इंद्रजीत देशमुख काकाजी पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.

इमेज
'जाता पंढरीशी...' पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.                   परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या लेखणीतून साकार झालेले 'जाता पंढरीशी' हे पुस्तक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाचले.परमपूज्य गुरुवर्य डॉ.श्रीकृष्ण देशमुख काकाजींचे प्रासादिक आशीर्वचन, ह.भ.प बाळकृष्ण चौगले महाराज यांची समृद्ध प्रस्तावना आणि मग गुरुवर्य काकाजींच्या सिध्दहस्तलेखणीतून प्रसवलेली शब्दवारी सुरू होते. अखंड आठरा-एकोणीस दिवसांच्या पंढरीच्या वारीचा सुखसोहळा अनुभवण्याचे भाग्य वाचावयास मिळते. एखाद्या गावी जाताना जसे आपण नटून थटून जातो तसे 'जाता पंढरीशी' या ग्रंथातील संत वचनाचे दाखले देत पुढे पुढे सरकणारी अर्थपूर्ण शब्दवारी,देखणी छायाचित्रं,माझ्या वारकऱ्यांच्या प्रसन्न भावमुद्रा,अर्थसुलभ ओघवती भाषा,भावनेने रसरसलेली-ओथंबलेली शब्दरचना असा एकंदरीत जाता पंढरीशी हा ग्रंथ नटून थटून जणू विठ्ठलाच्या भेटीला आपल्यासवे वाचकाला घेऊन जातो आहे असे वाटते. पंढरीची वाट मनाचा ठाव घेते.शब्दांच्या वारीत सकळ वैष्णवजन ,लहानथोर,विठ्ठलनामाचा गजर करत अंगावर पावसाच्या सर...

"मुख्याध्यापक श्री. शरद पाटील सर यांचा जन्मदिन – शाळेच्या बाप हृदयाचा साजरा"

इमेज
 आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांचा आज जन्मदिन त्यानिमित्त... माझिया जातीचे मज भेटो कोणी...                            शाळा म्हणजे दुसरं कुटुंब असतं आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख असतात ते म्हणजे मुख्याध्यापक. खरं तर मुख्याध्यापक हे वडीलकीची भूमिका निभावत असतो. त्यांच्यावर शाळा-विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांची जबाबदारी असते. अर्थात या सर्वांच्या बाप हृदयाची जागा त्याला घ्यावी लागते. त्यांची काळजी वहावी लागते. खरं तर अशा सर्वांच्या बापपणाचं दुसऱ्यांदा भाग्य मिळणारा मुख्याध्यापक हा जसा भाग्यवान माणूस असतो.तसा बाप मायेच्या हृदयाचा मुख्याध्यापक लाभणंहे त्या शाळेचं भाग्य असतं. आणि असाच आमच्या शाळेचे बाप हृदयाचे कुटुंबप्रमुख मुख्याध्यापक म्हणजे आमचे श्री. शरद पाटील सर.                 अगदी जून महिन्यात मी बदली होऊन या शाळेत दाखल झालो. तसा सुरुवातीपासूनचं सरांचा आणि माझा परिचय होता अनेकदा संवाद व्हायचा. पण प्रत्यक्षात ज्यावेळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले त्यावेळी...

"आजऱ्यातील रामतीर्थ: आत्मिक शांती आणि सुख-साधनाचा अनुभव"

इमेज
  आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.                                 आजरा तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण संपवून मी आणि आमचे लोहार सर सहजच एका कँटीनमध्ये शिरलो. खुर्चीवर बसताना भिंतीवरच्या एका भल्या मोठ्या डिजिटल फोटोने मन वेधून घेतले.  तो फोटो होता रामतीर्थ धबधब्याचा. त्या सुंदर धबधब्याचा फोटो न्याहाळत मी लोहार सरांना सहजच म्हणालो. "किती सुंदर वाटतो हो धबधबा आणि हे ठिकाण..मी आजवर कधीच गेलो नाही इथे..." तसे लागलीच सर किंचितसे आश्चर्याने म्हणाले, "गेलात नाही अजून...? इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.जाता जाता जाऊ आपण."  आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर लागलीच डाव्या बाजूला रामतीर्थाकडे जाणारा अरुंद पण दोन्हीं बाजुंनी झाडांनी वेढलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीं काठानी विस्तारलेली वडाची झाडे. जटाधारी ऋषिमुनी आपल्या जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसावेत तसे जागोजागी शांत उभी असलेली व...