गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे पुस्तक - दिवाकर दुर्गे
मी श्री .दिवाकर दुर्गे,गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम,नक्षलग्रस्त , आदिवासीबहुल ,विकासापासून ,आधुनिक झगमगाटापासून कोसोदूर अशा भागात सहायक शिक्षक म्हणून मागील 17 वर्षापासून सेवा देत आहे .
मी मागील काही दिवसापासून कायम विनाअनुदानित , विनाअनुदानित ,अंशत : अनुदानित अशा शाळांमधील शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. विशेषकरून गडचिरोली जिल्हयातील विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या . कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी अशा पुस्तकाच्या शोधातच होतो .व योगयोगाने यू -ट्यूबवर मा. किरण चव्हाण सर यांच्या ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री महोदय वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्याचा व्हिडीओ बघितला व लगेच श्री.किरण चव्हाण सरांशी संपर्क साधून पुस्तकाची मागणी केली .
मी ज्या शाळेत काम करतो त्या लोकमान्य टिळक विद्यालय ,गणपूर रै. तालुका –चामोरशी ,जिल्हा- गडचिरोली येथील शिक्षकांनी राम वनवासाप्रमाणे 14 वर्ष विनाअनुदानित सेवा केलेली आहे. त्यामुळे विनाअनूदानितांचा संघर्ष अगदी जवळून पाहीला आहे. मा.किरण चव्हाण सर यांचे पुस्तक हातात पडताच तेच चित्र पुनः जीवंत झाल्यासारखं वाटलं , जुने दिवस आठवले व सहजच डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या .वाटत होतं हे भोग आपल्याच नशिबी का आले आहेत, पण जस–जस एक एक पान वाचत गेलो, तस –तस यांच्यापुढे आपला संघर्ष काहीच नाही अस वाटलं .पण समाधान होत आपणही या संघर्षाचे भागीदार आहोत.
खरोखरच चव्हाण सरांनी जी मांडणी ,क्रमबधता ,भाषाशैली , सहजता यांचा सुरेख संगम साधून विनाअनुदानितांचा संघर्ष म्हणजे ‘ व्यक्ति जिवंत पेटत आहे ,स्वतःच्या सरणावर स्वतःची चिता जळत आहे.' असच चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होतं .वेदना विरहित समाज सुद्धा किती निष्ठुर पद्धतीने चेस्टा करतो, तसेच काही समाजहितेशी सुद्धा अगदी संकटात कशी मदत करतात, हे वाचताना मन हेलावून जात होत .
संघर्षाच एक- एक पान वाचताना ते कित्येकदा परत परत वाचावसं वाटत होत . हा संघर्ष प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध , निष्ठुर प्रशासनाविरुद्ध ,अमानवतेविरुद्ध पुकारलेल बंड आहे, याची जागोजागी प्रचिती येत होती . जगाच्या इतिहासात 20-20 वर्ष सेवा देणे, काम करणे पण त्या मो बदल्यात काहीही न मिळता उलट आपलं सर्वस्व गमावून बसने जसे -आई,वडील,भाऊ ,बहीण,मुलगा ,मुलगी आणि स्वत : सुद्धा ! चव्हाण सरांनी जी संघर्षगाथा पुस्तक रूपाने सांगितलेली आहे ,मला वाटत हा दुर्मिळातील दुर्मिळ संघर्ष आहे . परंतु या संघर्षाला पुस्तक रूपाने वाचकांसमोर आणून शासन, प्रशासन, व्यवस्था यांना नकीच विचार करायला भाग पाडणारी ताकद यामध्ये आहे , असे मला वाटते,देशाचे भविष्य घडविण्याऱ्या शिल्पकारांवर आलेली ही वेळ देश हितासाठी चिंतनाचा विषय आहे. तसेच स्वत: शिक्षकांसाठी सुद्धा चिंतनाचा विषय आहे.
“गुलामाला गुलामीची जाणीव करूण द्या ,म्हणजे तो बंड करूण उठेल ” हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्रिवार सत्य आहेत. मा. चव्हाण सरांनी या संघर्षगाथेतून शिक्षकांना गुलामीची जाणीव करून दिलेली आहे. वेळ आहे ती पेटून उठण्याची ,व्यवस्था परिवर्तनाची,समतेची, न्याय हकांची , पूर्ण स्वातंत्र्याची ,बंधुतेची !
मा. चव्हाण सर .यापुढे ही आपल्या लेखणीची धार अशीच चमकत राहावी यासाठी खूप- खूप शुभेच्छा !!!
पुढील वाटचालीसाठी मंगल कामना ...........!!!
वाचक -
श्री. दिवाकर ऋषि दुर्गे,सहा.शिक्षक
मोबा -97635 82234 लोकमान्य टिळक विद्यालय , गणपूर रै . ता- चामोरशी,जि –गडचिरोली - 442707
------------------------------------------------
विनाअनुदानितची संघर्षगाथा
पुस्तकासाठी संपर्क :
किरण चव्हाण.
८८०६७३७५२८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा