'गड्यानों आपला गाव वाचवूया'.
बघताईसा नवं जगामधी काय चाललंया.
आपल्या देशातबी कोरुनानं थैमान घातलया.
परमुलखातनं आता ह्यो आपल्याकडं येतूया.
...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.
दिवसाला हजारानं लाखामधी माणसं मरत्याती.
मोठ्या देशांनीबी या रोगापुढं हात टेकल्याती.
इचार करुन प्रत्येकानं काळजी घेऊया.
...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.
तोंडाला मुसकं घालावंच लागल.
चारचौघात अंतर ठेवावच लागल.
इनाकारण कुठबी फिरायला नगं.
कुठल्याबी गावाला जायला नगं.
जवळच्या पाहुण्यालाबी लांबनच रामराम करूया.
...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.
पोलीसपाटील, सरपंच, कोरोनासमिती.
गावची बघा किती काळजी घेती.
गावच्या येशी साऱ्या बंद केल्याती.
कोण येतंय जातंय त्यांवर पाळत ठेवत्याती.
आपणबी त्यास्नी पुरेपूर सहकार्य करूया.
...तवा गड्यानों आपण आपला गाव वाचवूया.
आता गावाकडं येतील मुबंईपुण्याची लेकरं-बाळं.
तवा त्यास्नी लांबच ठेवावं लागल कोरोनाच्या धोक्यामुळं.
खाण्यापिण्याची,ऱ्हाण्याची येवस्था बाहीरच करावी लागल.
जीवाच्या काळजीसाठी थोडं कठोर व्हावं लागल.
पुन्हा जवळ येण्यासाठी आता लांबच ऱ्हाऊया.
...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.
लई मोठं संकट हाय खबरदारी घ्यावीच लागल.
बेफिकिरी चालणार न्हाई,न्हाई तर मोठी किंमत मोजावी लागल.
कुणा एकाच्या चुकीमुळं सारं गांव दानीला जायला नगो.
म्हणून एकांनही बिलकुल बेसावध ऱ्हायाला नगो.
पुढचा धोका वळखून आपण आताच सावध होऊया.
...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.
----------------------------------------------------- -किरण सुभाष चव्हाण.
मोबा- ८८०६७३७५२८.