फॉलोअर

गुरुवार, ९ जुलै, २०२०

किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात......

        

               किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात...
---------------------------------------------------------------------

                          आई                बाबा
                                    
                                             


           जन्मासी घातलें तुम्हीं मायबापा |
           जपिले फोडाप्रमाणे तळहाता ||
                अपार कष्टसायास झेलीले |
 तरी जीवन ऐसें घडविले  ||
शब्दे अपुरेच पडतील |
काय सांगू तुमची गाथा  ||
चरणांवरी आपुल्या सदैव  |
टेकवितो माझा माथा ||
नाही ऋणातूनी या उतराई  |
अवघे जीवन हे तुमचे ठायी ||

गुरुदेव

                 धन्य झालो बा पांडुरंगा |
     भेट झाली तुझिया स्वरूपा||
अद्वैतची झालो ठायी |
ही सारी तुझीच कृपा ||
भाग्य उदयास आले  |
सुखाचे सुख लाभले ||
जन्मींचे पुण्य फळले
सार्थक झाला हा जन्म पुरता||
शोध नाही गा आता |
मज माझा गुरू भेटला ||
हृदयाचा गाभारा उजळला |
परमेश्वररुपी इंद्र मज सापडला ||


नाव - किरण सुभाष चव्हाण.
        रा - पांगिरे ता- भुदरगड जि-कोल्हापूर.
नोकरी - सहा.शिक्षक माध्यमिक विद्यालय आर्दाळ.
            ता - आजरा, जि-कोल्हापूर.
   मोबा - ८८०६७३७५२८.

Kiran chavan you tube channel .

--------------------------------------------

                           साहित्य

गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) व गुरुवर्य श्री.सदानंद पुंडपाळ सर यांच्याहस्ते २५ ऑगस्ट २०१७ ला 'नदीकाठचा संसार ' आणि 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन.





पुस्तक प्रकाशनाची बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा.

तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन :

आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.




पुस्तक प्रकाशनाची Tv9 वर आलेली बातमी.





'साहित्य चळवळ -गांवशिवार साहित्य परिवार गारगोटी या संस्थेचा 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या साहित्यकृतीस विशेष पुरस्कार.'



ग्रामीण कथासंग्रह 'नदीकाठचा संसार आणि बालकादंबरी 'लढा...दोन कर्तृत्ववान मुलींचा' या पुस्तकांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ समितीच्या शासनमान्य ग्रंथ यादीत निवड.



लेखक शिक्षकांच्या संवेदनशील अनुभवातून साकारलेल्या कथांचा विश्वास सुतार संपादित नाळ कथासंग्रहात समाविष्ट माझी कथा 'चित्र पुसलं आणि...' याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते लेखक सन्मान स्वीकारताना..



'मुलांच्या लेखन वाचन विकासातील शिक्षकांची भूमिका: या विषयावर मराठी बालकुमार साहित्य सभा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेत दुसरा क्रमांक.



कॉ. गोविंद पानसरे विचारमंच कोल्हापूर आयोजित सामाजिक कविता- काव्यवाचन स्पर्धा 'लई काय नाही थोडं सांगावसं वाटतं.' या कवितेस द्वितीय क्रमांक. साल - २०१५


'न्याय मिळालाचं पाहिजे' या कवितेस प्रथम क्रमांक.साल-२०१८



विविध काव्यवाचन कार्यक्रमात कविता सादरीकरण.



कविता सादरीकरणाचा व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/PaX6AaZFavQ

कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरवरून कविता प्रसारित.


'नागोबाच्या नावानं चांगभलं' या ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटसाठी सहा गाण्यांचे गीतलेखन.

शालेय नाट्यलेखन :
१) माणूस.
२) नुसती धमाल विनोदी नाटक
३) संस्काराचा परिसस्पर्श.

माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या  संस्काराचा परिसस्पर्श नाटकातील काही क्षणचित्रे.




तीन माहितीपटांचे लेखन :
१) 'माझा गांव माझी माणसं'
२) नागनाथ पाठीराखा.
३) वीर जवान तुझे सलाम.

वृत्तपत्र,मासिक,दिवाळी अंक यातून लेख प्रसिद्ध.

माझे व्यासपीठ - ब्लॉग,फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लेखन.

माझ्या ब्लॉगवरील 'अनाथांचा नाथ मायबाप संतोष गर्जे' हा लेख आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी वाचला त्या धरतीवर माईंशी साधलेला दूरध्वनीवरून संवाद.


खालील लिंकवर क्लिक करून संवाद ध्वनिफित ऐका.
https://youtu.be/aelgWSoVKTU

--------------------------------------------------------

'विनाअनुदानितच्या लढ्यातील माझे योगदान.' विनाअनुदानित प्रश्नांवर लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रकाशझोत.
'मोदीजी क्या आप हमे न्याय दे सकते हैं' या मथळ्याखाली हिंदीतून लिहिलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवलेल्या पत्राची ध्वनिफिती ऐका खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/unyWQ1NwwuA

मा.मुख्यमंत्री/मा.शिक्षणमंत्री यांच्याकडे पत्रातून विनाअनुदानितची मांडली व्यथा.


राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची पगाराविना झालेली फरफट त्यांची मांडलेली व्यथा याची दखल महाराष्ट्र टाईम्सने घेतली दखल...दि.२०/११/१८
महाराष्ट्र टाईम्स बातमी.


माझ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने विनाअनुदानित प्रश्नांसंदर्भात शिक्षक आमदार दत्ता सावंत यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत.तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे व ना.गो.गाणार यांच्याशी दूरध्वनीवरून मुलाखत.


शिक्षण क्षेत्रातील माझे मार्गदर्शक गुरू आणि विनाअनुदानित पुस्तकाच्या वाटचालीतील मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत हेरंब कुलकर्णी सर.




'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तकाच्या अनुषंगाने माननीय शिक्षणमंत्री महोदया वर्षाताई गायकवाड मॅडम ,पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, नूतन शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर.. यांच्या घेतलेल्या भेटीची क्षणचित्रे.






आगामी प्रकाशनाच्या वाटेवर पुस्तके...
१) विनाअनुदानितची संघर्षगाथा.
२) ग्रामीण कथासंग्रह.
३) प्रवास ध्येयवेड्यांचा.
४) कादंबरी 'शानु'

आवड : चित्रकला, संगीत,शेतीकाम.

चित्रकला :



संगीत :



व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.

संगीत 'गीत प्रथमा' परीक्षेत गारगोटी व कुडाळ केंद्रात प्रथम क्रमांक.


शेती :    


"जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं तसा गुरूमाऊलींचा स्पर्श जीवनाला झाला नि माझ्याही जीवनाचे सोने झाले....जीवनार्थ कळाला...धन्य हो गुरुदेवा...जय हो..मंगल हो."
 'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक...'
'साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा...माझे गुरुदेव माझ्या घरी आले तो आमच्या भाग्याचा क्षण'



सामाजिक कार्य .

माय- भू सेवा शिबिरांतर्गत गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) सोबत शिंदी खुर्द तालुका-मान जि- सातारा या दुष्काळग्रस्त गावात श्रमदान शिबिरात सहभाग.




पूरग्रस्त चंदूर ता-हातकणंगले जि-कोल्हापूर येथे गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या मार्गदर्शनाखाली शिवम परिवाराने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग.




व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.

शिवम परिवार घारेवाडी 'युवा हृदय संमेलन' दरवर्षीच्या शिबिरात रक्तदानाचा संकल्प.







पांगिरे गावची पूरग्रस्त माहेरवाशीण सौ.उर्मिला पाटील यांना मदतीसाठी लेखनातून आवाहन करून बेळगुंदी येथे जाऊन जीवनाश्यक वस्तूंची मदत.



शैक्षणिक व्यासपीठच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.


भुदरगड तालुक्यातील आपाचीवाडी या दुर्गम वस्तीतील कु.राधिका गुरव इ ४ थी व गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.


व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/Sa19f--CMGU

बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा.

भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द या दुर्गम वस्तीतील कु.परीट इ ८ वी तील गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.


भुदरगड तालुक्यातील पाल या गावी राहत असलेली सौ.मंगला गुरव व त्यांचा अपंग मुलगा कृष्णात गुरव यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मदतीसाठी लेखनाच्या माध्यमातून आवाहन.



व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/x8_NCrk05dA
नसीमा हुरजूक यांनी लेख वाचून अपंग कृष्णात गुरव याची दखल घेऊन त्याचे अपंग पुनर्वसन केंद्र येथे रवानगी केली.. आज कृष्णात सिंधुदुर्ग येथील अपंग पुनर्वसन संस्थेत कामाला आहे.


पांगिरे गावातील निराधार श्रीमती बायक्का पाटील यांची जबाबदारी घेऊन चंद्रमोळी झोपडीत शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची अनोख्या पद्धतीने स्थापनेची संकल्पना.



गावपातळीवर शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची स्थापना..

शिवम परिवार पांगिरे.
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या वाढदिवसानिमित्त शिवम परिवाराचा संकल्प...चिक्केवाडी या दुर्गम वस्तीत जाऊन दिवाळी फराळाचे वाटप.



बातमी पहा खालील लिंकवर क्लिक करा

सलग दुसऱ्या वर्षी (२०२०) चिक्केवाडी या दुर्गम वस्तीतील लोकांना शिवम परिवाराच्या माध्यमातून दिवाळी फराळाची भेट




कोरोनाच्या संकटकाळात नाम फाउंडेशन आणि शिवम परिवार पांगिरे यांच्या मार्फत गावातील २० गरजू,गरीब कुटुंबांना व लमाण तांड्यावर जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.





'अवयवदानाचा संकल्प'
 कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कोमल गोडसे पवार (कोमलदिदीने) स्वतः मला अवयवदान प्रमाणपत्र  सुपूर्द केले.



शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर संस्थेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील माझ्या उल्लेखनीय  कार्याबद्दल ५ सप्टेंबर २०२० शिक्षकदिनानिमित्त 'उपक्रमशील शिक्षक' सन्मानपत्र प्रदान करून गुणगौरव केला.



महाराष्ट्र शासनाच्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत कोविड योद्धा म्हणून ५०० घरांचे कोविड सर्वेक्षणाचे काम.




कोविड सर्वेक्षणाचा व्हिडिओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.


ज्ञानसंवाद सार्वजनिक वाचनालय वेळूक, ता.मुरबाड, जि. ठाणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.

विषय -  'कोरोना,माध्यमे व मी.'


'कोरोनाविरुद्धची लढाई आपणच जिंकायची आहे.' या विषयावर कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत झालेले माझे विचार.


खालील लिंकवर क्लिक करून ऐका.

अखिल भारतीय शिक्षक साहित्य,कला-क्रीडा मंच,कोल्हापूर यांच्यावतीने 'गुणवंत साहित्यिक' पुरस्कार प्रदान.


ग्रामपंचायत कळंबा तर्फे ठाणे यांच्यावतीने कोरोना काळात योगदान दिलेल्या कोरोना योध्यांच्या सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.लोकनियुक्त सरपंच मा.सागर भोगम दादा व ग्रामविकास अधिकारी मा.दिलीप तेलवी यांच्या हस्ते माझा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला..


त्रिवेणी साहीत्य संमेलन उतूर या ठिकाणी कविता सादर करताना








माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर मा.श्री.एकनाथ आंबोकर साहेब यांची सस्नेह गृहभेट.



सृजन वाचन वसमाज प्रबोधन सांस्कृतिक मंच सरवडेद्वारा कोल्हापूर आयोजित कराओके गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.




एक गाडी उभी करायची आहे...या आशयाची पोस्ट करून मदतीला धावलेल्या गिरीश प्रकाश कुंभार या युवकाला गाडी समाजाच्या योगदानातून गाडी प्रदान करण्यात आली.



ज्या ठिकाणी गाडी जळाली त्याच ठिकाणी नवीन गाडी उभा केली.








बातम्या - 




गाडी प्रदान कार्यक्रम व सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून पाहा.

https://youtu.be/gjGiBspRs_Y


आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावच्या चौगले कुटुंबाला यु ट्युब चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला समाजातून मिळालेला प्रतिसाद.





सविस्तर पाहा.



दान हेचि दे गा देवा |
घडो हाती अखंड सेवा ||

                   जय हो ! मंगल हो!!

शनिवार, २७ जून, २०२०

'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा...समाधानाचा किनारा.'


'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा..समाधानाचा किनारा.'

 "पांडुरंगा...दुख सांगायचं तर कुणाला सांगायचं...म्या तुझा माळकरी.२२ वरसं झाली  तुझी माळ गळ्यात हाय.नेमानं तुझ्या पंढरीची वारी करतू…म्या पंढरीचा वारकरी..
"संसार पंढरी आम्हीं वारकरी... आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी.."
असा अभंगाचा सूर कधी भजनात आळीवायचो...तुझ्या हरिनामात दंग व्हवून जायाचो...पण तुझ्या पंढरीच्या वाटचा हा वारकरी कधी भिकारी झाला कळालंच न्हाई बघ...कुणाला माझं दुख सांगायचं...आता हाय का माझं तुझ्याबिगार कुणी...? कोण ऐकून घिल माझ्या येड्यागबाळ्याचं...आन ऐकून घ्यायला कुणी जवळ तर यायला पायजे नवं... कोण ईल माझ्याजवळ आता...मी तर एक म्हारोगी..."
                      हे आहेत श्री.सदाशिव रावबा सुतार भुदरगड तालुक्यातील हेदवडे हे गांव.वार्धक्याकडे झुकलेलं अंदाजे ८० पर्यंत वय.पत्नीनं अर्ध्यावर साथ सोडली. पोटाला एक मुलगा.कष्टकरी जीवन...सुतारकाम करण्यात उभी हयात गेली...टीचभर पोटासाठी आजही उतारवयात कष्ट सुरूच होतं...पण नियतीला हे मान्य नव्हतं.चार पाच वर्षांपासून थकलेल्या शरीराला कसला आजार जडला...हातापायाला जखमा झाल्या... हळूहळू चिघळल्या...रक्तस्राव
होऊ लागला...हाताची बोटे सडली...
आणि झडलीसुद्धा.तळपायाला झालेल्या मोठ्या जखमेतून  रक्त-पू गळत असायचा काही काळानंतर त्यामध्ये जंतू तयार झाले...आणि निदान झालं ही सगळी लक्षणे म्हणजे हाच तो दुर्धर रोग म्हणजे कुष्ठरोग...
कुष्ठरोग होणं म्हणजे मोठं पाप...समाजाला ताप...यावर त्याला एकच शाप.. वाळीत टाकणं.अशी या रोगाच्या गैरसमजुतीची पाळमुळं अजूनही घट्ट आहेत आपल्या समाजात म्हटल्यावर.अशा अवस्थेत कोण त्यांची काळजी वाहणार..? कोण त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणार..? कोण शुश्रुषा करणार..? उलट जे व्हायचं तेच सुरू झालं.वाळीत टाकणं आलं...समाजाची हेटाळणी आली..बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन...आणि सुरू झाली थकल्या भागल्या खंगलेल्या देहाची अवहेलना..आणि.कुडीतल्या उरल्या सुरल्या जीवाची कुचंबना...म्हणतात ना 'जन हे दिल्या घेतल्यांचे अंत काळीचे कोणी नाही...' उभ्या हयातीत कष्ट उपसलं... पण आता कोणी जवळ करेनात.
कुठल्या वळचणीला आसरा घ्यायची मुश्किल झाली. पाच वर्षे झाली या रोगाशी लढताना शेवटी  जगण्याची ही सुरू असलेली विटंबना मुकाटपणे सहन करत जगताहेत बिचारे बाबा.
                       पण सामाजिक कार्यकर्ते शिवम
साधक श्री.सागर गुरव यांच्या धडपडीमुळे C.P.R रुग्णालयामधून उपचार झालेत. चांगल्या उपचारांमुळे आज त्यांच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत.तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे.सागर गुरवच गेली वर्षभर त्यांना पोटगी देत आहेत. आज या बाबांनी काळम्मावाडी मराठी शाळेच्या व्हरांड्यात पावसापाण्याचा तात्पुरता आसरा घेतलाय...
बाहेरच्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडायची आणि डाळ भात रांधायची.तिथंच तीन दगडांच्या चुलीच्या उबीला फटकुरावर दिवसभर कलंडायचं आणि पुन्हा रात्री झोपण्यासाठी  गावातील मारुती मंदिरातल्या एका बगलेवर थंडगार फरशीवर जुनीपाणी वळकटी अंथरून झोपी जायचं.
                   ना घर ना दार...कुणी घर देता का घर...?ही याचना राहू द्या...कोणी वळचणीलाही राहू देईना...आणि राहिलं तरी हेटाळणी...आणि जिथून तिथून पिटाळणी..अशी वेळ आलीय.आम्हीं त्यांना भेटलो सागरजींनी तर त्यांना मिठीच मारली..त्यांच्या जवळ बसून विचारपूस केली नंतर त्यांना बोलतं केलं त्यावेळी त्यांचे पाणावलेले डोळेचं अधिक बोलके भासत होते..प्रत्येक शब्दागणिक उचंबळून येत होतं त्यांना..सारा इतिहास जमा होत होता त्यांच्या नजरेसमोर...अश्रूंची वाट अडवण मुश्किल झालं होतं.

                    २२ वर्षे न चुकता पंढरीची वारी..पंढरीचा वारकरी...गळ्यात तुळशीची माळ...माळकरी..भजनाची आवड..पेटी वाजवण्यात वस्ताद.रात्रंदिवस हरिनामाचा जागर मांडला.शेजारील दोन तीन गावातील पोरांना पेटी वाजवण्यात पारंगत केलं..हरीनामाच्या सेवेत राहूनही शेवटी ही वेळ...वाईट तर खूप वाटतं... शिवम साधक सागर गुरव त्यांच्यासाठी खूप धडपडताहेत...काळजी घेताहेत..जणू तोच त्यांच्या पोटचा गोळा. त्यांच्या निवाऱ्यासाठी येणाजाणाऱ्याला...पोटतिडकीन सांगत आहेत."नुसती हातपाय पसरण्यापुरती गावालगत जागा द्या हो...पाऊसवाऱ्याचं नकाडं झोपडं उभा करतों"
 पण ती साद नुसती कानापर्यंत पोहोचते त्यांच्या...अजूनतरी हृदयापर्यंत नाही पोहोचली.
               बरोबर आहे देवळातला देव कधी सांगतही नाही आम्हांला तरी गावोगावी कोटींची मंदिरं बांधतोय आम्हीं... स्वखुशीने लाखो रुपये देणग्या देतोय.. देवावरती आपली किती अढळ श्रद्धा आहे ना आपली.पण माणसातल्याच एका देवाला हातपाय पसरण्यापूरती झोपडी पाहीजे...पण आपण नाही देऊ शकत..कारण माणसांवर कुठे श्रद्धा आहे आपली..?
पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला  जाणारे आम्हीं पण गावपंढरीतल्या जित्याजागत्या विठ्ठलाला ओळखायलाच तयार नाही...पाषाणमूर्तीमध्ये देव शोधणारे आम्हीं माणसाच्या रूपातून भेटणारा देव कधी ओळखलाच नाही..'जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा'...असं म्हणतात...मग कुणी कुणी त्या बाबांच्यातला देव जाणला..?  कुष्ठरोग्यांची सेवा करायला एकट्या बाबा आमटेनांच का जन्म घ्यावा लागणार इथे...? का नाही आपल्यामध्ये असे एक बाबा आमटे निर्माण होत..? महारोग्यांना वेगळं आनंदवनच निर्माण करावं का..?.एका कुष्ठरोग्यासाठी आपलं गांव नाही का आनंदवन होऊ शकत..? आयुष्याच्या संध्याकाळी तो जीव जिवंतपणी मरणयातना भोगतोय...त्यानं आणखीन असंच भोगायच कां..? की उरले-सुरले दिवस सुखाने जगायचं...मंडळी हे आपल्या संवेदनशील समाजाच्या ईच्छाशक्तीवर अवलंबून आहे...आपलं दातृत्व घालू शकतं त्यांच्या दुःखावर फुंकर...देऊ शकतं... एक निवारा...मायेचा उबारा...दुःखाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या गलबताला मिळू दे ना पैलतीर समाधानाचा किनारा...आयुष्याच्या संध्याकाळी.

प्रत्यक्ष पहा अवस्था खालील व्हिडीओवर क्लिक करा.

  मदतीसाठी संपर्क : शिवम साधक.
श्री. सागर गुरव - 9146148904
आकाश पाटील - 9158469301
-------------------------------------------
                  - किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
                   मोबा - ८८०६७३७५२८.

शुक्रवार, २६ जून, २०२०

कविता- पैसा झाला मोठा नाती झाली खोटी....-किरण चव्हाण.


'पैसा झाला मोठा नाती झाली खोटी.'

पैशापायी माणसाला वळखू येईनात नाती.
पैशाच्या मागं मागं सारी दुनिया धावती.

आईबाप स्वतःचं स्वस्त झालं की गा याला,
पैशानच नाही का याला जलोम दिला.

भाऊ-बहीण मग तर काय लांबचीच गोष्ट,
दोघच राजाराणी कसं सुखात ऱ्हात्यात मस्त.

काय याचा मिजास काय तो तोरा कुणाचीही किंमत नाही,
वाटतं याला माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही.

रोजचा हिशोब ठेवत असशील ना? किती पैसा कमावला,
फक्त हिशोब नसेल याचा किती किती नाती गमवला.

सगळं काही भेटत पैशानं पण एकच भेटत नाही,
जीवाला जीव देणारं माणसं पैशानं मिळत नाही.

बांधशील माडी वर माडी फिरायला नवी गाडी.
सारं इथंच ऱ्हायाचं,तुझ्यासाठी पुरल शेवटी एकच काडी.

काय घेऊन आलो नी घेऊन काय जाणार कधी विचार केला?
आरं जगजेता सिकंदरही शेवटी हात हालवत गेला.

फक्त पैसाच नाही येत,येती मदतीला माणसही,
तवा जपतोस जसा पैसा तसं जपायला शिक नातीही.
                                      - किरण चव्हाण.

बुधवार, १० जून, २०२०

कविता - धरित्रीचा बाळ..---किरण चव्हाण.



धरित्रीचा बाळ.

माझी धरित्री गं माय
ओली बाळंतीण बाय
तिच्या कुशीतून कसं
अंकुरलं तान्हं बिय...

मऊ मऊ लोण्यागत
ओल्या मायेचा पदर
पिकबाळराजा तिचा
पोसतो तिच्या अंगावर

कोळ कोळ किती पात
इवलासा नाजूक देठ
दिस साजिरं गोजिरं
कुठं लावू त्याला तिटं

सुवासिनीगत बाई
झाडवेली गं सजल्या
धरित्रीच्या या लेकीबाळी 
बाळ पाहुनी नटल्या.

गडी राकट रांगडा
बाळ मायेचा आधार
उभा पाठीशी तो हाय
भाऊ पाठचा डोंगर.

वारा झुलवतो झुला 
खेळवतो बाळराजा
सवंगडी वारा करतुया
लाडक्याला गुदगुल्या.

आली नणंद काठाला
नदी धरित्रीला भेटाया
आलं तिला गं भरून
बाळराजाला बघून 

तान्हा पीकबाळ त्याला 
किती जपावं जपावं.
माया करावी तरी कशी
कोडकौतुक करावं.

बाप मेघराजा येतो
माय-लेकरांची भेट घेतो
त्यांचा बाळपिकराजा
कसा दिसामासानं वाढतो.
------------------------------------------------------
-किरण चव्हाण.
मोबा-८८०६७३७५२८.


माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...