फॉलोअर

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

विनाअनुदानित शिक्षकांची नेमकी ऊर्जा तरी काय...? -किरण सुभाष चव्हाण

 


विनाअनुदानित शिक्षकांची नेमकी ऊर्जा तरी काय...?


                           जगाच्या पाठीवर असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये माणूस वीस वर्षांपासून विनापगार काम करतो.महिन्याचा पगार जरी मागे पुढे झाला तरी आपण कासावीस होतो,आपले नियोजन बिघडून जाते.मग इथं तर वीस वीस वर्षे झाली पगार नाही तर ही माणसं कशी रहाताहेत.? कशी काय तग धरून आहेत..? कसा संयम ठेवला..? यामागची मग प्रेरणा काय..? .. आहे की नाही संशोधनाचा विषय..चला शेवटी नियम,कायदे थोडं बाजूला ठेवूया आणि माणूसपणाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांकडे आपण बघूया. माणसाला जगण्यासाठी किमान मूलभूत गरजा भागणं गरजेचं आहे ना.याचसाठी तर  त्याला धडपड करावी लागते आणि प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतो. पण गेली वीस वर्षे विनावेतन काम करताना या विनाअनुदानित शिक्षकांनी निदान या मूलभूत गरजांची तजवीज कशी केली असेल किंवा करत असतील. पण शेवटी जगण्याच्या लढाईत कारणं सांगून चालत नाहीत.हातपाय हलवावे तर लागतातच. तर या मूलभूत गरजांची तजवीज करण्यासाठी त्याला आज तारेवरची कसरत करावी लागतेय आपणास माहिती आहे की शेवटी शाळेत दिवसभर अध्यापन केल्यानंतर पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला कोण कोणती कामे करावी लागतात. मग काही असेही प्रश्न उपस्थित होतात पगारच नाही तर कशाला उगाच अशा शाळेत काम करायचं..? कुणी सांगितलाय एवढा संघर्ष करायला किंवा एखादा व्यवसाय पहायचा दुसरी नोकरी शोधायची..?

                          मला वाटतं हे प्रश्न विचारणे वरून सोपे वाटतात पण हे विचारणं म्हणजे असे की, एखाद्या नांदायला गेलेल्या मुलगीला सासरी प्रतिकूल परिस्थितीत रहावं लागत असेल किंवा सासुरवास आहे म्हणून काडीमोड घ्यायला सांगणं. एका जातिवंत मुलगीसाठी तिला कितीही त्रास असला तरी तिथं नांदणं, आपला संसार जिद्दीनं करून दाखवणं महत्वाचं वाटतं. या विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था ही अशीच आहे नोकरी करायची असती तर कोणतीही करता आली असती.एखादा व्यवसाय करता आला असता परंतु शिक्षकी पेशा म्हणून जी नोकरी स्वीकारली आहे ती फक्त एक नोकरी नाही तर ते एक स्वप्न आहे. ते एक व्रत आहे, तो एक वसा आहे, आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं,त्यांना घडवायचं एक सक्षम पिढी निर्माण करण्याची महत्वकांक्षा या लोकांच्या मनामध्ये असते आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते या जिद्दीने काम करत असतात. भलेही आपल्याला पगार असो -नसो, आपल्यावर कितीही वाईट वेळ आलेली असो परंतु समोरच्या विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या यशामध्ये आपले यश पाहणं,त्यांना मोठं होताना पाहणं यातलं सुख ते अनुभवत असतात. खरंतर लोकं एक संसार करतात परंतु या लोकांचे दोन संसार असतात एक घरचा आणि दुसरा शाळेचा संसार. आज पगाराविना घरच्या संसाराची फरफट होत असेल परंतु ज्ञानाविना शाळेच्या संसाराची फरपट त्यांनी आजपर्यंत कधीही होऊ दिली नाही. तिकडे घरच्या संसाराच वाळवंट झालं पण शाळेच्या संसारात ज्ञानाचे बीज पेरून हिरवागार बनवलाय.आणि म्हणून जरी आज त्याच्या घरच्या संसारावरती वाईट वेळ आली असेल तरी वीस वर्ष विनावेतन काम करत काहीजण निवृत्तही झाले तरीदेखील या शाळेचा संसार अखंडपणे फुलत राहिलाय,बहरत राहिलाय.                            

                         एक ना एकदिवस पगार सुरू होईल ही आशा आहेच परंतु त्या दिशेने चालण्याची प्रेरणा देतात ते त्यांचे विद्यार्थी.भलेही पगार नसेल पण या विद्यार्थ्यांच्याकरता शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचा आहे आज मला पाया होऊ द्या.परंतु माझ्या यशाचा कळस हे माझे विद्यार्थी आहेत हे त्याचं तत्व आहे.खरंतर कुणीतरी पाया म्हणून स्वतःला गाडून घ्यावे लागते त्याच वेळी त्या इमारतीचा कळस उभा राहतो म्हणून आज ज्ञान,संस्कार, मूल्यांनी भरलेले हे शिक्षक आज पाया आहेत म्हणून तर देशाच्या इमारतीचा कळस आज सक्षमपणे जगामध्ये डोलतो आहे. खरतर आज प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे,त्याच्या कर्तुत्वाच्या मागे त्याचे आई-वडील आणि त्यांचे गुरुचे योगदान असते. माणूस कितीही मोठा झाला तरी तो गुरूच्या पायावर माथा टेकवतात. इतके मोठे त्याला घडवण्यात गुरुचे योगदान असते. हे इतकं सोपं नाही कारण त्यासाठी त्याला पाया व्हावं लागतं तेव्हा तर आभाळाला टेकलेली माणसं देखील या पायावर नतमस्तक होतात.

                                आज सर्वचं क्षेत्रांमध्ये काम करणारी जी कर्तुत्ववान मंडळी आहेत सातासमुद्रापार गेली अंतराळात झेपावली या सर्वांच्या मागे त्यांच्या गुरूंचे योगदान महत्त्वाचे आहे.आणि माणूस कितीही मोठा झाला तरी हे त्याला विसरून चालत नाही.कारण त्यांच्या गुरुने ते स्वप्नं,ते ज्ञान,ते संस्कार,ती जिद्द, ती महत्वकांक्षा त्यांच्या मनामध्ये रुजवलेलं असतं.त्यांना यशाची कर्तुत्वाची भव्यदिव्य वाट दाखवलेली असते. आणि तो गुरूच असतो जो निरपेक्ष भावनेने त्यांच्या मनात ती संस्कार पेरत असतो. आई-वडिलांना आपलं लेकरू मोठं होताना पाहण्याचं स्वप्न मनात असतं तेच स्वप्न ठेवून तो आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो आणि नव्हे नव्हे त्याला घडवावंचं लागतं. तोच त्याचा वसा आहे व्रत आहे. मला पगार नाही म्हणून कोणत्याही शिक्षकांना शिकवण्याचा सोडून दिलं नाही त्याच्या विद्यार्थ्यांच्या संस्कारावर त्याचा कुठला परिणाम होऊ दिला नाही.  त्याचा पगार या विद्यार्थी हिताच्या आड कुठेही आणला नाही. 

                              आई आणि मुलाचं नातं जसं तसं या नात्याचं प्रतिरुप नातं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं. म्हणजे संसारात कितीही वाईट परिस्थिती असली तरी एखाद्या आईची जगण्याची मूळ प्रेरणा असते तिचं मूल तसं आज कितीही वाईट परिस्थिती असेल,कितीही मोठा संघर्ष असेल तर या शिक्षकांच्या जगण्याचं काम करण्याची मूळ प्रेरणा आहेत त्यांचे विद्यार्थी. विद्यार्थी हा त्यांचा स्पिरीट आहे.आमच्या पाचवीच्या विद्यार्थ्याला कळतं की, आपल्या शिक्षकांना पगार नाही आणि कधीतरी वर्गात ते प्रश्न करतात की, सर तुम्हाला पगार का नाही..? तर दहावी झालेला आमचा ओम कांबळे हा विद्यार्थी सरांना भेटायला म्हणून येतो आणि गंभीर होऊन प्रश्न विचारतो. आम्हाला पाचवीला असल्यापासून तुम्ही शिकवत होता सर झाला का हो तुमचा पगार सुरु..? नाही असं म्हटल्यानंतर तो हिरमुसतो.थोडा वेळ निशब्द होतो. मोठा झालेला आहे आता विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे. आता तो त्याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारतो.  सर मग पगार नाही तर घरचा खर्च कसा चालता हो..? आणि आता तर मीच निशब्द होतो..काय द्यायचं या प्रश्नाला उत्तर. आता काय काय करावं लागतं म्हणून सांगायचं.शेवटी मी निरूत्तर. पण समाधान या गोष्टीचं वाटतं की माझ्या हातून घडलेली मुलं ही संवेदनशील विचार करणारी आहेत. आज माझ्या शिक्षकांचा पगार नाही आणि पगार नसतानादेखील त्यांनी मला घडवलेला आहे एवढी तरी संवेदनशीलता या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे याचं समाधान आहे. कुठलीच मुलं सरांना पगार किती आहे हे विचारत नाहीत. तर सर पगार का नाही तुम्हाला..? हे विचारतात. पगार किती आहे याला महत्व नाही पण पगार आहे का..? हे महत्वाचं वाटतं. पगार आहे म्हणजे याचा अर्थ एक जगण्याचे साधन आहे. खरंतर या चिमुकल्यांच्या त्या निरागस प्रश्नांमध्ये खूप मोठे तत्त्वज्ञान लपलेलं आहे. आणि हे तत्त्वज्ञान आहे संवेदनशीलतेचं. या व्यवस्थेतल्या भल्या भल्या माणसांच्या डोक्यात का येत नसावं. सर पगार आहे का सुरू..? हा वरून जरी साधा प्रश्न वाटत असला तरी पगार सुरू आहे का म्हणजे..?  पगार आहे तर सर तुम्ही व्यवस्थित जगू शकाल,तुमच्या गरजा नीट भागल्या जाऊ शकतील, पैसे असेल तर ठरवलेलं एखादं काम होऊ शकतं. पगार असेल तर मूलभूत गरजा भागू शकतात. या प्रश्नाच्या मागे हे उपजत ज्ञान लपलेलं आहे. हे ज्ञान ते छोटे छोट्या मुलांना आहे. परंतु या व्यवस्थेवर अधिराज्य गाजवणाऱ्या माणसांना या प्रश्नांशी देणेघेणे नाही.  माणसं स्वतःला प्रश्नांपेक्षा मोठी समजायला लागली की समोरचे प्रश्न त्याला छोटे वाटायला लागतात.  

                            जळगाव जिल्ह्यातील किशोर पाटील नावाचे एक प्राध्यापक.दोन्ही किडन्या निकामी झाल्या.उपचारांचा खर्च १३ लाखांचा.  एक रुपये पगार नाही,स्वमालकीचा जमिनीचा तुकडा नाही.काय करणार तो शिक्षक .?  अशावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये झोळी घेऊन समाजामध्ये भीक मागून त्यांच्या उपचारांचा निधी जमवला. काय आश्चर्य आहे बघा ना एका शिक्षकाला जगवण्यासाठी त्यांचे विद्यार्थी हातामध्ये कटोरा घेतात आणि भीक मागून आपल्या शिक्षकांना जगवतात. जगवण्याचं केवढं मोठं तत्वज्ञान या विद्यार्थ्यांना कळाले आहे. एक शिक्षक स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या शेतात कामाला जातो,एका विद्यार्थ्याचं शेत त्याच्या जगण्याचा साधन बनतं. जे विद्यार्थी मोठे होतात नोकरीवर जातात त्यावेळी म्हणतात सर तुम्हाला पगार नाही पण आम्हाला पगार सुरू आहे कधीही आपल्याला मदत लागली, कुठेही अडचण आली तर सर हक्काने सांगा. हा पगार तुमचाच आहे असं समजा. काय हव आहे आणखीन यापेक्षा वेगळं. पगारापेक्षा मिळणार हे समाधान एका शिक्षकाला किती तरी पटीने महत्वाचं वाटतं.

            पगार नव्हता, पगार नाही, भविष्यात कधी सुरू होईल माहिती नाही परंतु इतिहास याची नोंद जरूर घेईल की, विनावेतन उपाशीपोटी घडवलेला प्रत्येक विद्यार्थी या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षाचा एक साक्षीदार आहे, घडवलेला प्रत्येक विद्यार्थी या शिक्षकांच्या संघर्षाचं पान आहे, कष्टाचे योगदान आहे.घडवलेला प्रत्येक विद्यार्थी या शिक्षकांच्या यशाचे उदाहरण आहे... आज पगार नसणारे, पगाराविना निवृत्त झालेले जे शिक्षक आहेत त्यांच्या मनामध्ये एक असेही समाधान आहे की, मी घडवलेला प्रत्येक विद्यार्थी हा आज यशशिखरावर विराजमान आहे.

                        पगार असताना काम करणारे सगळेच आहेत पण पगार नसतानादेखील उद्याची सक्षम पिढी घडवणारे एकमेव मात्र हे विनाअनुदानित शिक्षक आहेत.आणि याची जाणीव कोणी ठेवो अथवा न ठेवो पण त्यांचे विद्यार्थीचं या घटनेची जाणीव अवश्य ठेवतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे उद्देशून सांगतील की, एकेकाळी आमच्या शिक्षकांना पगार नव्हता तरी देखील त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे.विनाअनुदानितच्या संघर्षमयी उद्विग्न काळात शिक्षक- विद्यार्थी या नात्याने या शिक्षकांच्या आयुष्यातलं चैतन्य चिरंतन ठेवलं आहे.सध्याच्या कठीण काळात शिक्षक- विद्यार्थी हे नातं एका कसोटीवर उतरलेलं आहे. कारण केवळ पैशांवर जीवन यशस्वी होत नसतं. तर आपल्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध करणं यातच जीवनाच यश सामावलेलं असतं. .या विनाअनुदानित शिक्षकांनी स्वतःच आयुष्य समृध्द नसताना त्यांनी त्याग,समर्पण,ज्ञान देऊन विद्यार्थी हित जपलं आहे त्यांचं आयुष्य समृद्ध केलं आहे. या तत्त्वज्ञानाने विनावेतन काम करताना त्यांची मूळ प्रेरणा हे त्यांचे विद्यार्थी आहेत.विद्यार्थी ही त्यांच्या जगण्याची ऊर्जा आहे. याचं संशोधन जरुर व्हावं...पगारापुरता हा प्रश्न मर्यादित न करता व्यापक अंगाने या संघर्षाकडे पाहिलं तर अनेक पैलू आपल्यासमोर येतील.यातून एक नवं ज्ञान...जगण्याचं नवं तत्वज्ञान..आपल्यासमोर येईल. गरज आहे ती संवेदनशीलपणाचा चष्मा घालून या प्रश्नाकडे निकोप दृष्टीने बघण्याची. आणि गरज आहे ती विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत मानवतेच्या दृष्टिकोनातून संशोधन करून माणूसपणाची भूमिका घेण्याची.


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८


विनाअनुदानित शिक्षकांच्यावर आधारित विनाअनुदानितांची संघर्षगाथा हे पुस्तक जरूर वाचा.



बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे निबंध लेखन



 आजच्या समाजातील 'स्त्री' चे स्थान ?

                              

                              आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान काय..? या प्रश्नाकडे वळताना आईच्या उदरापासूनचं सुरुवात करावी लागेल.. आईच्या गर्भात खुडणाऱ्या स्त्रीचं स्थान सांगावं की, अंतराळात जाणाऱ्या स्त्रीचं ? उंबरठ्याच्या आत घुटमळलेल्या स्त्रीचं सांगावं की, सातासमुद्रापार गेलेल्या स्त्रीचं स्थान सांगावं..?  मणिपूर मध्ये विवस्त्र अवस्थेत नग्न धिंड काढणाऱ्या स्त्रीचं सांगावं की,...देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या नारीच सांगावं... घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीचं सांगावं की, राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या राष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्री सांगावं...नेमकं स्त्री चं समाजातील कोणतं स्थान सांगावं..?.एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणारी आमची स्त्री...घराच्या उंबरठ्यात स्थानबद्ध असणारी स्त्री आज सातासमुद्रापार जाते...अवकाशात मजल मारते. जिच्या शिक्षणाची दारे एकेकाळी बंद होती...आज ती शिकते सवरते आणि आपलं करिअर घडवते.. आज असं कोणतंही क्षेत्र नाही की,तिथे स्त्रीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले नाही...

                                पण तरी देखील हा प्रश्न का उपस्थित करावा लागतोय..?  उपस्थित करावा लागतोय कारण तशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसते आहे..आणि या प्रश्नाला भिडताना त्याच्या उत्तरांच्या मुळाशी शिरताना... आजच्या समाजातील स्त्री चं स्थान शोधताना त्या स्त्रीविषयी पहिल्यांदा आपल्या मनातील स्थान नेमकं कसं आहे...स्त्री कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नेमका कसा आहे..? हा मूलभूत प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. नाही तरी स्त्रीला आदिशक्ती ,आदिमाता, दुर्गामाता म्हणायचं म्हणजे तिला एकीकडे मातेचं स्थान द्यायचं परंतु त्याच मातेला भररस्त्यात विवस्त्र करून तिची धिंड काढायची आणि लोकांनी बघ्याची भूमिका घ्यायची, त्या नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडायचे आणि समाजाने ते शांतपणे पहायचे इतकी घोर विटंबना आपल्या समाजात स्त्री ची होत असेल तर..? स्त्रीच्या स्थानाबद्दल कसा विचार करायचा...?

                              एकीकडे मातेचे स्थान देणाऱ्या समाजात दुसऱ्या बाजूला इतकी पातळी कशी घसरते..? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यपर्व आपण साजरे करतो आहोत. पण स्त्री स्वातंत्र्याची पायमल्ली होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत..? म्हणजे आजही या देशात तिचे स्थान कोणत्या अवस्थेत आहे हे आज घडणाऱ्या अशा घटनांतून लक्षात येत असेल. अहो जिथं मुळात गर्भातलं स्त्रीचं स्थान नष्ट करण्याचं महापाप खुद्द जन्मदात्या मातापित्यांकडून केलं जातं..?. कित्येक निरागस कळ्या गर्भात खुडल्या जाताहेत. फांदीवर उमलण्याचं, फुलण्याचं,बहरण्याचं स्वच्छदी जीवन काढून घेतलं जातंय... मुळात तिच्या अंकुरण्याच्या भूमीतलं तिचं स्थान आज सुरक्षित नाही..? मग तिच्या भविष्यातल्या समाजातील स्थानाचा विचार ही तर लांबची गोष्ट आहे... आमच्या लेकीबाळी रात्री- अपरात्री आमच्या गावाघरात, शहरात रस्त्यावर आहेत का सुखरुप..? आज कोणतीही मुलगी रात्रीअपरात्री निर्धास्तपणे वावरू शकते का आपल्या समाजात..? नाही तरी दिल्ली, कोपर्डी तल्या सारखे हैवान आहेतच खुले तिच्या शरीराचे लचके तोडायला. आणि मग प्रश्न पडतो आजच्या समाजात स्त्रीचं स्थान आहे सुरक्षित...?

              एका जागतिक निरीक्षणाच्या अभ्यासातून एक निष्कर्ष मांडण्यात आला आहे तो असा की, जगातील महिलांच्यासाठी असे (Top 10 Dangerous Country for women) महिलांच्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने 10 धोकादायक देश आहेत ज्यामध्ये दुर्दैवाने आपल्या देशाचे नांव आहे..ही किती महिलांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे..

                आज आपल्या स्रीनें अंतराळात झेप घेतली हो..पण आमच्या रस्त्यावर आजची स्त्री सुरक्षित नाही त्याचं काय..? इतिहासापासून आपण पाहत आलोय.. स्त्री ला किती बंधनात ठेवण्यात आलं,तिच्यावर अन्याय, अत्याचार केले.. तिला तिचं कोणतंही वैयक्तिक स्वातंत्र्य आपण दिल नाही पण आज या सर्वांतून मुक्त होत.. आता कुठे तिला स्वातंत्र्य मिळतंय, आज ती शिक्षण घेते आहे आणि अगदी काही काळातच तिने आपली बुद्धीमता,कौशल्य सिद्ध करून अनेक क्षेत्रांत तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं...आणि स्त्री पुन्हा उभा राहिली... अर्थातच समाजातील तिने पुरुषांच्या बरोबरीच आपलं स्थान सिद्ध करून दाखवलंय, एवढेच नव्हे तर आजच जे तिचं स्थान आहे तिला ते सहजासहजी मिळालेलं नाही तर खूप मोठ्या दिव्यातून जाऊन तिने आपलं हे स्थान दृढ केलंआहे..तरीही एवढं सगळं कर्तृत्व संपादन करूनही स्त्रीच्या बाबतीत आपल्याला अजूनही या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.

                   इतिहासामध्ये हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात येण्यासाठी शिवबा सारखा तेजस्वी कर्तृत्ववान पुत्र घडवणाऱ्या जिजामाता, मुघलांशी निकराची झुंज देऊन आपलं मराठी साम्राज्य टिकवून ठेवणाऱ्या महाराणी ताराबाई,झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर अशा कर्तृत्वा महिलांनी इथला समाज रक्षिला, वाढवला टिकवून ठेवला हा स्त्री कर्तृत्वाचा आपल्या समाजाला लाभलेला इतिहास आहे... समाजातील तिचे स्थान शोधताना इतिहासात डोकावले तर एका अर्थाने या समाजाला दिशा द्यायचे व समाजाची दशा बदलायचे काम पुढे येऊन स्त्रीने केले आहे...मग पुन्हा पुन्हा आजच्या समाजात स्त्री स्वातंत्र्य, समता आणि स्त्री मुक्ती अशा बाबतीत स्त्रीचे स्थान शोधण्याचा सायास आपल्याला का करावा लागतो हा चिंतनाचा विषय आहे. आज राष्ट्राची राष्ट्रपती पदाची सर्वोच्च धुरा सांभाळणारी ही एक स्त्री आहे...एखादं घर सांभाळणारी असो किंवा देश सांभाळणारी स्त्री असो सामाजिक स्तरावर तिचा विचार करताना तिचे स्थान हे समतोल आहे. सर्वांच्या बरोबरीचे आहे. किंबहुना ते सरस आहेच. पण समाजातील स्त्रीचे स्थान ठरवताना प्रत्येकांनी तिला आपल्या मनात कोणते स्थान दिले आहे. हे फार महत्वाचे आहे. कारण स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन, तिच्याविषयी मनातील सन्मान आणि समता हे जर आतून सकारात्मक असेल तर समाजमनातील तिचे स्थान ही नक्कीच सकारात्मक पातळीवरचे असणार आहे.

                      मुळात प्रत्येक घरात स्त्री ला कोणते स्थान मिळते आहे.यावरून तिचे समाजातील स्थान ठरते कारण आजच्या समाजव्यवस्थेत पुरुषसत्ताक संस्कृती दिसून येते. आणि परंपरागत चालत आलेल्या रूढी, प्रथा ,परंपरा यांनी स्त्रीला अनेक बंधनात अडकवून ठेवले. नेहमीच तिला दुय्यम आणि कमीपणाचे स्थान देण्यात आले. घरातील कामे ही स्त्रीने करावयाची किंबहुना असा एक पूर्वपार अलिखित नियमच चालत आलेला आहे. पण  स्त्रीने कधीही हे काम नाकारले नाही तर तिने आपले कर्तव्यचं मानले. 

                  जिने आपल्या गर्भातून जन्म दिला तिला आजही काही मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला जातो. अशी इथल्या समाजाची मानसिकता आहे. अजूनही स्त्रीयांच्या बाबतीतला भेद कमी झालेला दिसून येत नाही. समाजात स्त्रीला सन्मानाचे स्थान द्यायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनात दिले पाहिजे..आपल्या विचारांत दिले पाहिजे, आपल्या डोळ्यांत दिले पाहिजे तरंच स्त्री कडे बघण्याचा आपला दृष्टीकोण बदलू शकेल. नाही तर  स्त्री-पुरुष समानतेचा डंका वरवर पिटायचा आणि आतून स्त्री विषयक संकुचीत विचार ठेवायचा तर स्त्रीचे समाजातील स्थान बदलणार कसे..? म्हणून प्रत्येकाने आपल्या आचार विचार,संस्कार आणि संस्कृती मध्ये स्त्रीचा सन्मान राखला  तरंच समाजातील तिचे स्थान बदलणार आहे. आजची स्त्री खऱ्या अर्थाने सन्मानाने जगू शकणार आहे. कारण ज्या समाजात स्त्रीचा सन्मान केला जातो.. तोच पोषक आणि सुसंस्कृत समाज म्हणून ओळखला जातो. आणि ज्या समाजात स्त्रीला योग्य सन्मान राखला जात नाही तो समाज अधोगतीकडे जाणारा असतो. 

              म्हणून आजच्या समाजात स्त्रीचे स्थान  या प्रश्नाच्या मुळाशी शिरून विचार करताना इथल्या प्रत्येक माणसाने जरूर हे चिंतन करावे की, जिच्या उदरात आपण नऊ महिने वाढलो, आपल्या अंगावर तिने पोसलं आहे, पालन पोषण केलं आहे..एकंदरीत जशी या मातीने आपल्याला स्थान दिलं आणि तिच्या जीवावर जगतो आहोत. तशीच स्त्री ही एक विश्वातील अशी माता आहे..जी आपल्या उदरात स्थान देते,ती आपल्याला जन्म देते अशा स्त्री ला समाजाच्या उदरात सन्मानाचे स्थान देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

                        समाजात स्त्रीचे ठेवूया योग्य स्थान,

                        स्त्रीचे अस्तित्व जगात आहे महान.

                        देऊया मान राखुया तिचा सन्मान,

                       तरंच स्त्री होईल सर्वार्थाने बलवान.





शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

The story of a cricket team

 



Friday, September 29, 2023

A story of a cricket team.


 "Go ahead, what are you afraid of, who are you worried about..."


            ? But having said that it takes all this...what to do now..? Who says it's like having a whole load of lightning on your body... wear it and start running in the field...

                               What used to happen in our time... we used to remove the baton from the garden and someone would prepare the bat for an hour.. when the baton went 'N', our bat was ready... the boys started going to the villages... if we cut the rice in the village, then the field is our right... the matter of rice. Yegali... now it is going on.... so... when did our boys wear this kit.... our village boys... on the open floor... hey$$ it's the army of monkeys who play with open arms. .. I came to play hooky or to take a bat from Sandaritali... I was running on the floor.. (First of all Xsize) What is there? As soon as the wind entered the ears, they jumped unconsciously... If two teams were recruited, it was not good, then they had to jump the bat and then draw lines on the soil to determine the number...Tanwar put his hand on his shoulder and took a walk around the field to get his number.

                             Then we started..the soil that was smoothed by the barns and the strong and hard runway smoothed by the plane runway was our pitch....then we used to throw three sticks...we took the bat in our hand.... The boys' cricket innings...hitting and hitting..running and running. ...Here the bowler is facing the time....with both hands on his waist like Vitthal crying..."Aar gaotoi kay nhai.." .gaotoi where..? Half of the teams are there to find the ball went to the intrusion... and then Tendulkar appeared on the batsman's face.

How do you feel now..??? The batsman is energetic...and the bowler is in a coma...he is there eating thick wood because he is beating you in his mind...our fake bowler will bowl on his mood.

"Aar straight hit,....Aar then you hit straight...ye run...ye adive...how did the ball re$$ roll and how did it go...doing that...in the game color. ..Josh Angat....a cartoon cart on Tanwar Boundary is dancing in the grass....he is listening to his own tune...he feels that no one is paying attention to us..

                     Whether the boots are high or not...it doesn't matter if your boys are running...they are running in the wind...the ball is jumping on Teja like the ball is going to the boundary...the fielding is awesome...don't watch the riot after you win...someone is on someone's shoulder. ... Who is on whose neck... Such is the cricket game of our boys on Malrana...

But the Patths have won in the taluk, but now they want to go to the district. Even if the sole of the shoe wears out, we don't have to buy a shoe...our common household child who is fed on the life of farming and on the stomach of our hands...the desire to play is high...the rug is high...the skill of production is high...the village cries out that it is not in Ajra taluka. Agalpagal field of open fields adjacent to Hamrastya... Ardal village has a tradition of cricket. Well, let's break the will of the boys... If you see the light of their victory that day, if you see the enthusiasm, everything else fades away... What forced them to do that joy.... and that's it.. A parent met him in the market of Uttur and said, "Look at the history of our village. Our children used to go to the district for cricket." This sentence was to increase my enthusiasm.

                   Again, one night after the aarti of the village Ganapati Mandal, while discussing the issue with the Yuvraj Tippe Sir of the village, some of the young people of the village also participated in this discussion...they also encouraged..because the cricket game was already part of the team...Mumbaikar youth said chukchuka. "Sir, if you had told us a little earlier, we would have brought the kit while coming from Mumbai...but we let our children go to the district." In this Yuvraj Pawar promised to give the leather ball to the children.

               And then I made a firm thought in my mind.. I don't want to think about big money... That Sangram in the Devyani serial is saying to Devyani 'What for you?'.. I decided that 'What for the boys...'

                Once we came to school on a Sunday holiday and were studying in a class.. until then a bunch of our girls from class 10 came to meet us.. and while talking, the topic of the children's cricket kit came up.. At that time one of our sisters said how... a few hundred worried expressions on her face... Sir. You will spend so much..?

When it comes to expenses, my mother has the same expression on her face..my mother also asks the same question at home...my students who ask the question about expenses like my mother. .

                     ...the day was fixed.. To tell Tippe sir, he took out his Grand i10 and on a pleasant Friday morning, Mandar sir, Tippe sir, Dayanand sir and Vidyadhar sir, our ride started towards Kolhapur...Ganpati festival in the village and we walked to the outer village. ..reached Gandhinagar within an hour.. spent hours and a half in the shop there but could not find any kit at the right price. Finally we reached the sports center in Kolhapur and after an hour and a half of checking and testing each and every one of the materials, we bought three kits to our heart's content. I used to throw ball...and today I was buying a cricket kit worth 20 thousand...it is for children. But of course the joy of giving something today is greater than receiving it back then...

                    That sentence filled my heart with even more pride...our boy playing on the floor without a kit...now I can see him in that kit...I want to say two words for these goal-mad people who came along...Hey, three words sir, Mandar sir. Friend Dayanand Sir and Vidyadhar Sir took time for our children..No, who has time for anyone these days. These people spent the whole day...These people have no sense of food and drink...? After work I say to yes...let's see a nice hotel and eat...someone will say no...let's go yathechch taav maruya Veg non-veg..red-white....how come these people say "no sir No hotel...let's go where you can get a rice plate for 60-70 rupees...it will cost you nothing...let's eat here somewhere..." and the poor people started looking for a simple hotel at a cheap price...

                          These people who save my money by giving their valuable time...look where big people don't have to go to look for it, they are all around us...we went to a nice hotel and had a delicious meal and returned in the evening...

                  Next day at seven o'clock in the morning in the cold wind, the boys on the soft floor soaked with the dew point of Ardal, after which Mandar sir arrived in a few moments with the kit, Tippe sir's car also entered... Mandar sir took the responsibility of the cricket coach on his shoulders. ..so that eliminated one concern. So see how noble minded people are attached to a noble cause...

Mandar sir is going to come every morning at 6:30 and guide the children... Mandar sir also has a school and he is going to take care of it.

                     After doing the basic practice of the children in the pleasant atmosphere of the morning, which the children were waiting for.. we handed over the cricket kit to the team of the children from the hands of Mandar sir, Tippe sir... and I think their happiness went straight to the upper sky... Excitement doubled..BASS.$$ what more.. our kids dream come true..Finally Aditya thanked everyone on behalf of the team.

                   The purpose of telling all this is that the talent is hidden in the soil of our village..Irfan Khan, Mohammad Shami, Mohammad Siraj, Bumrah are not born with some golden spoon in their mouth... these players come from ordinary families and grew up in similar soil. ..our boys should play...cross the village boundaries..taluka, district, state, national and international levels...as Mandar sir said in his mind "from this one of our diamonds will shine at the national and international level.." .who knows tomorrow Sachin Tendulkar will be taking shape among these children today...

                         Finally, I am very thankful to Yuvraj Tippe sir, Mandar sir, Dayanand sir and Vidyadhar sir who have given and are giving their valuable time... School principal Sharad Patil sir and all teaching and non-teaching staff who have been encouraging us since watching the preparation of our cricket team. Our children are getting support and inspiration from all the students, parents as well as the villagers of Ardal village and especially the cricket loving youth, Mumbaikars and with the same strength our team is now going to play at the district level.. It is very exciting.

                      So let's talk to the congregation, look, mya... May our blessings be upon our children... May we be by their side.

            I'm just saying this as I go

Put your hand on the back of the laker and just say fight..

Lose or win, whatever happens, just call it a game.


"You go ahead, what are you afraid of, who cares..."


Ram Ram Mandali... Thank you...!


- Kiran Subhash Chavan.

     8806737528.

एका क्रिकेट टीमची कहाणी...

 


 "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची,पर्वाबी कुणाची..."


            नमस्कार मंडळी... आता आपल्या गावची पोरं जातील बघा जिल्ह्याला क्रिकेट खेळाया...तालुकापातळीवर क्रिकेट स्पर्धेमधी आपल्या माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेच्या पठ्ठयांनी तालुक्यात पयला नंबर पटकावला नी आपल्या संघाची जिल्ह्यासाठी निवड झाली...माहिती आसलंच नव्ह तुमास्नी.. हे सगळं इथपर्यंत ठीक व्हतं.. पण जिल्ह्याला जायचं म्हंजी...जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा लेदर बॉलवरती आसतीया म्हंत्यात..पण आमची पोरं कवा खेळल्यात लेदर आणि बिदर वरती...आता लेदर बॉलवर खेळायचं म्हंजी सुरक्षेसाठी सगळं सामान लागतंय... डोक्याला हेल्मेट, छातीला पट्ट्या, हातात ग्लोज,पायाला पॅड, हाय फॅड - फाय फॅड...काय काय नवच फॅड आलंय म्हणायचं हे...पायात म्हणं स्टडचं बूट..इथं साधं बूट धड मिळना आणि म्हणं स्टडचं... आता आमच्या पोरास्नी हे फक्त ऐकून आणि बघूनचं माहिती हो.. टी.व्ही मधी वल्डकपच्या आणि आय.पी.एल च्या मॅच बघताना तर आम्हीं हे सगळं बघतोयाच पण कशाला काय म्हंत्यात कुणाला ठावं हाय...? पण हे सगळं लागतंयचं म्हटल्यावर...आता काय करायचं..? कोण म्हणतंय आंगावर गाडाभर वज्ज असल्यावाणीचं हाय ते...ते घालून मैदानात पळायला लागतंय...

                               आमच्यायेळी काय व्हतं... माळ्यावरची बॅटन काढायची आणि कोयत्यानं तासून बॅट तयार करायची.. बॅटन मधलं 'न' गेलं की आमची बॅट तयार...लागली पोरं गावंदरीच्या वाटंला...गांवरीतलं भात कापल्याल वाफ्फ म्हंजी आमच्या हक्काचं मैदान...तवाची गोष्ट येगळी... आता सांगून चालतंय....तर... आमच्या पोरांनी कधी घालून बघितलय हे असलं किट....आवं गावाकडची पोरं आमची...उघड्या माळावर.. हे$$ दे दणादण मोकळ्या आंगानं हुदोड्या घालणारी वानर सेनाच ती.. आली खेळायची हुक्की की घ्यायची बॅट सांदरीतली...दणाट पळत यायचं माळावर.. (सर्वप्रथम एक्ससाईज) आसली काय भानगड नाही गड्या... हे.. इकडन एक पळतंय, तिकडन एक पळतय...मधीच कुणाच्या मागं लागतंय...कानात वारं शिरल्यागत बेभान होऊन आपुल्याआपण उड्या मारत्यात... दोन टीमची भरती झाली तर ठीक नाही तर मग बॅट उपडी घालून मग मातीवर रेघोट्या काढून नंबर ठरवायचं... तंवर खांद्यावर हात टाकून मैदानावर फेरफटका मारून आपला नंबर पकडायला येत्यात गडी..मग पब्बा.. दुब्बा... तिब्बा...असं नंबर..

                             मग सुरू..गोठ्यातल्या बडवण्यांनं चापूचोपून बसवलेली माती आणि मस्तपैकी विमानाच्या धावपट्टीगत गुळगुळीत केल्याली मजबूत दणकट धावपट्टी हे आमचं पीच....मागं तीन दांड्या रवायच्या... बॅट हातात घेतली... टकाटक बॉल तर कवा लबरी बॉल.. सुरू झाला बघा आमच्या पोरांचा क्रिकेटचा डाव...हाणत्यातच हाणत्यात.. पळत्यातच पळत्यात....त्या धोनीचा 'हेलिकाप्टर' शॉट फेमस तसा आमच्यात 'गावठी' शॉट फेमस... ये हाणला बघ...बॉल गेला बघ...पार लायटीच्या डांबाची बॉण्डरी वलांडून...इकडं बॉलर काळ तोंड करून....विठ्ठलासारखं कंबरवर दोन्हीं हात ठेवून वरडत आसतंय..."आरं गावतोय काय न्हाई.."  .गावतोय कुठला..? बॉल गेला घुसपात त्यो शोधायला निम्मी टीमंचं तिकडं... आणि इकडं मग बॅट्समनच्या चेहऱ्यावर तेंडुलकरचा आविर्भाव..जरा मुद्दामच छाती पुढं काढून बॅट्समन मनातल्या मनात म्हणतंय.. कसा हाणला..!!

आता कसं वाटतंय..???  बॅट्समन जोमात....आणि बॉलर कोमात...त्ये तिकडं मनातल्या मनात तुला दावतोच म्हणून खच्चून दाट व्हट खाईत आसतंय...आमचे फेकी बॉलर तर त्याच्या मुडवर बॉलिंग करणार.. बॉलर चिडला तर सरळ फेकणार डायरेक्ट थ्रो...त्रिफळाच.

"आरं सरळ टाक की,....आरं  मग तू सरळ मार की...ये पळ... ये आडीव...बॉल रे$$ कशी आडीवली आणि कशी जिरवली....असं करत... खेळ रंगात... जोश अंगात....तंवर बॉण्डरीवरचं एखादं कार्टून कार्ट नाचतय गवताच्या डंगात....ते आसतय आपल्याच नादात... त्येला वाटत आसतय आपल्याकडं कुणाचबी लक्ष नाही..

                     पायात बूट हाय काय नाय काय...काय फरक नाही पडत आपल्या पोरास्नी... सुसाट पळत्यात वाऱ्यागत... बॉण्डरीला बॉल जायच्या आदी उपडी पडतंय तेज्यावर... फिल्डींग जबरदस्त...जिकल्यावर तर दंगा बघायला नको...कोण कुणाच्या खांद्यावर... कोण कुणाच्या मानेवर... असा आमच्या पोरांचा माळरानावरचा क्रिकेटचा डाव...

पण पठ्ठ्यांनी तालुक्यात बाजी मारली खरी पण आता जिल्ह्याला जायचं म्हंजी... खर्चाचा खेळ...कसा घालायचा ताळमेळ..आमची गावाकडची पोरं.. त्यास्नी कुठलं हे सगळं साहित्य घ्यायला परवडणार..? बुटाच तळ झिजलं तरी बूट घ्यायला व्हईना...शेताबांधाच्या जीवावर आणि हातावरच्या पोटावर पोसली जाणारी आमची ही सामान्य घरची पोरं... खेळायची ईच्छा माप हाय...अंगात रग हाय...उपजत कौशल्य हाय...आजरा तालुक्यात नाही असं आरदाळ गावाला हमरस्त्याला लागून उघडया माळाचं आगळपगळ मैदान हाय...आरदाळ गावाला क्रिकेटची परंपराबी हाय...हे सगळं हाय बराबर...पण जे लागणार साहित्य हाय ते कुठून आणायचं..? बरं पोरांची ईच्छा मोडून तरी चालतीया...त्या दिवशीचा त्यांचा विजयाचा नूर बघितला, उत्साह बघितला तर बाकी सगळं फीकं पडल...त्यांचा त्यो आंनद काय बी करायला भाग पाडल.... आणि त्येच झालं.. त्यात एक पालक उत्तुरच्या बाजारात गाठ पडला तवा म्हणाला "आमच्या गावच्या इतिहास आमची पोर क्रिकेटसाठी पयल्यांदाच जिल्ह्याला जात्यात बघा."  हे वाक्य माझाबी उत्साह वाढवणारं होतं..

                   पुन्हा त्यात एका रात्री गावच्या गणपती मंडळाची आरती झाल्यावर गावातील युवराज तिप्पे सरांशी या विषयावर चर्चा करताना गावातली काही तरुण मंडळीही या चर्चेत सहभागी झाली...त्यांनी पण प्रोत्साहन दिलं..कारण क्रिकेट खेळ अगोदर पासून त्यांच्याबी अंगात भिनलेला...मंबयकर तरुण वर्ग चुकचुकत म्हणत व्हता "सर आम्हांला जरा अगोदर सांगितला असता तर मुंबईहुन येताना आम्हीं किट आणले असते...पण एकदाशी जाऊ देत आपली पोरं जिल्ह्याला.." यातील युवराज पवार यांनी आपल्याकडचा लेदर बॉल मुलांना देण्याचं आश्वासन देऊन पण टाकलं..

               आणि मग मनात विचार पक्का केला..काय नाय गड्या पैशाचा इचार करायचा नाही...देवयानी मालिकेतला तो संग्राम देवयानीला म्हणतोय कसा 'तुमच्यासाठी कायपण.'.. तसं ठरवलं 'पोरांच्यासाठी कायपण...'

                एकदा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शाळेत येऊन एका वर्गात निवांत वाचत होतो..तोपर्यंत आमच्या दहावीच्या आमच्या मुलींचा घोळका भेटायला आला..आणि  बोलता बोलता मुलांच्या क्रिकेटच्या किटचा विषय निघाला.. त्यावेळी आमची एक दिदु म्हणती कशी...चेहऱ्यावर काहीशे काळजीचा भाव...सर तुम्हीं एवढा खर्च करणार..?

खर्चाची गोष्ट असली की, माझ्या आईच्या चेहऱ्यावर पण असाच भाव असतो..माझी आईही घरात असाच प्रश्न करते...तसा खर्चाच्या काळजीचा प्रश्न मायेसारखा मायेनं विचारणारी माझी विद्यार्थीनी..जाणिवा नेणिवा दृढ झालेला तो एक आमच्यामधला भावबंध अगदी घरच्यासारखा....असो..

                     ...दिवस ठरला.. तिप्पे सरांना सांगायचा अवकाश सरांनी आपली ग्रँड i10 बाहेर काढली आणि शुक्रवारच्या प्रसन्न सकाळी मंदार सर,तिप्पे सर, दयानंद सर व विद्याधर सर आमची सवारी निघाली बघा कोल्हापूरच्या दिशेनं...गावाघरात गणपतीचा सणउत्सव आणि आम्हीं चाललो बाहेरच्या गावाला...तासाभरात गांधीनगर गाठलं.. तिथल्या दुकानात तास दिडतास घालून बी योग्य दरात काही किट मिळेना. अखेर कोल्हापूर मधील स्पोर्ट सेंटर गाठलं आणि  अगदी तास दीडतास चांगली तपासून, चाचपणी करून, एकेक साहित्य प्रत्येकांनी पारखून आम्ही मनासारखी तीन किट खरेदी केली...आयला लहानपणी २० रुपायाचा बॉल खरेदी करताना जीव खाली वर व्हायचा... एकेक रूपया वर्गणी काढून दुकानातला त्यो BRI बॉल घायचो.... आणि आज २० हजारांच्या घरातलं क्रिकेट किट घेत होतो...ते ही मुलांच्यासाठी. पण त्यावेळच्या  घेण्यातल्या पेक्षा आज काही तरी देण्यातला आनंद अर्थातच मोठा होता...मुलांच्यासाठी कमी खर्चातल्या जर्सीची पण येताना जोडणी लावून आलो...जेंव्हा किट हातात घेतलं...तेव्हा काही अंशी विजयाचा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला..खूप समाधानाने दुकानाच्या बाहेर पडलो...काचेचा दरवाजा ओलांडून बाहेर येताना हे छाती जाम अभिमानाने फुगली व्हती...बाहेर आल्यावर मंदार सर आपल्या मित्रांना एक वाक्य बोलले..."अरे..लेकांनो...किट असे काय हातात घेता गावठी कुठले...अरे पाठीला अडकवा अरे आता प्रोइफेशनल वाटू दे..."

                    त्या वाक्याने उरात आणखीन ठासून अभिमान भरला...माळावर विना किटची खेळणारी आमची पोरं...आता मला त्या किट मध्ये दिसू लागली... मला सोबत आलेल्या ह्या ध्येयवेड्या माणसांच्यासाठी दोन शब्द बोलावेसे वाटतात.. अहो एका शब्दावर तिप्पे सर,मंदार सर त्यांचे मित्र दयानंद सर व विद्याधर सर आमच्या मुलांसाठी वेळ काढून आले..नाही तरी हल्ली कुणासाठी कुणाला एवढा वेळ आहे.आख्खा दिवस या लोकांनी खर्ची घातला...खाण्यापिण्याचं भान पण नाही या लोकांना...? काम आटोपल्यावर मी म्हणतोय हां यांना... चला एखादं चांगलं हॉटेल बघून जेऊयात...कुणी तरी म्हणेल का नाही... चला चला यथेच्छ ताव मारुया व्हेज नॉनव्हेज..तांबडा-पांढरा....तर हे लोक म्हणतात कसे "सर नको नको हॉटेल..साठ सत्तर रूपयला राईसप्लेट मिळेल तिथे जाऊ...तुम्हाला उगीच खर्च...इथेच कुठे तरी लाईटली खाऊया..." आणि बिचारे शोधू लागले स्वस्तात मस्त एखादं साधंसुध हॉटेल...साधं हॉटेल शोधणारी मनानं  मोठी असणारी ही माणसं म्हणायची..

                          आपला बहुमोल वेळ देऊन उलट माझे पैसे वाचवणारी ही माणसं...मोठी माणसं कुठे शोधायला जावं लागत नाहीत ही बघा आपल्या आजूबाजूला असतात...एका छानशा हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण करून सायंकाळी आम्हीं परतलो...

                  पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गार वाऱ्यात आरदाळच्या दवबिंदूने भिजलेल्या मऊ माळावर पोरं त्यानंतर मंदार सर हजर काही क्षणांत किट घेऊन तिप्पे सरांची गाडीपण दाखल...क्रिकेट प्रशिक्षकाची जबाबदारी मंदार सरांनी आपल्या खांद्यावर घेतली..मुलांना योग्य गुरू पाहिजे होता तो मंदार सरांच्या रूपाने भेटला...त्यामुळे ती एक चिंता दूर झाली. म्हणजे एका उद्गात्त कार्याला कशी उदात्त मनाची माणसं जोडली जातात पाहा...

रोज सकाळी साडेसहाला येऊन मंदार सर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत...मंदार सरांची पण शाळा आहे ती सांभाळून वेळ देणार आहेत..

                     अशाप्रकारे सकाळच्या प्रसन्न वातावरणात मुलांचा बेसिक सराव घेतल्यानंतर ज्याची मुलांना प्रतिक्षा होती.. ते क्रिकेट किट मंदार सर, तिप्पे सरांच्या हस्ते एकदासे मुलांच्या टीमकडे आम्हीं सुपूर्द केले...आणि त्यांचा जो आनंद होता तो मला वाटतं सरळ वरच्या गगनाला जाऊन भिडला होता...त्यांचा उत्साह द्विगुणित झाला..बास.$$ आणखीन काय पाहिजे.. आमच्या मुलांचं हे स्वप्न पूर्ण झालं..शेवटी टीमच्या वतीने आदित्यने सर्वांचे आभार मानले.

                   मंडळी एवढं सगळं सांगायचा उद्देश एहाच की, आपल्या गावच्या मातीतही टॅलेंट दडलेलं आहे..इरफान खान,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज, बुमराह हे खेळाडू काही सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेली नाहीत... सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आणि अशाच मातीत घडलेले हे खेळाडू आहेत...आमच्या पोरांनी खेळावं...गावच्या सीमा ओलांडून जावं..तालुका,जिल्हा, राज्य ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर...मंदार सर आपल्या मनोगतात म्हणाले तसं "यातून आमचा एखादा हिरा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकेल.." .काय माहीत उद्याचा सचिन तेंडुलकर याच मुलांच्यात आज आकाराला घेत असेल...

                         शेवटी ज्यांनी आपला बहुमोल वेळ दिला व देत आहेत ते युवराज तिप्पे सर, मंदार सर,दयानंद सर व विद्याधर सर यांचा मी खूप खूप आभारी आहे... आमच्या क्रिकेट टीमच्या तयारीसाठी पाहिल्यापासून प्रोत्साहन देणारे शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,संपूर्ण विद्यार्थी, पालक तसेच आरदाळ गावचे ग्रामस्थ आणि विशेष करून क्रिकेटप्रेमी युवा वर्ग,मुंबईकर या सर्वांचे पाठबळ व प्रेरणा आमच्या मुलांना मिळत आहे आणि त्याच बळावर आमची टीम आता जिल्हा पातळीवर खेळायला जाणार आहे..खूप आंनद आहे.

                      तर चला मंडळी लय बोललो बघा म्या...या समद्या आपल्या लेकरांवर आपला आशीर्वाद असू द्या...आपण त्यांच्या पाठीशी असा.

            जाता जाता एवढंच सांगतु

लेकरांच्या पाठीवरती हात ठेवून तेवढं नुसतं लढ म्हणा..

हार हो या जीत हो काय व्हायचं ते होवो लेकरा नुसतं खेळ म्हणा..


"तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, पर्वाबी कुणाची.."


राम राम मंडळी... धन्यवाद...!


- किरण सुभाष चव्हाण.

     ८८०६७३७५२८.

शनिवार, ३ जून, २०२३

बाप गेला आणि...

 



                                        बाप गेला आणि...          

                             आज मी जेंव्हा कधी मुद्दामहून डोळे मिटून, रस्त्याने चालावयाचा प्रयत्न करतो.तेंव्हा दहा पाऊलेही नीट धाडसाने टाकू शकत नाही...मनात भीती वाटते. वाट चुकेल की काय..? मी कुठे भलतीकडेच जाईन का काय..? आणि मग माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात..माझा बाबा कसा चालत होता..? माझा बाबा अंधारल्या डोळ्यांनी प्रत्येक पाऊल कसा टाकत होता.?  अंधाऱ्या डोळ्यांनी आयुष्याची लढाई लढणारा माझा बाप खरंच माझ्यासाठी जगातला एक ग्रेट माणूस आहे. ज्या बापाच्या पुढची वाट सदा अंधाराची होती, त्या बापानं मी इवलासा असताना माझं बोट धरून मला शाळेत पाठवलं होतं. कारण त्याला माहित होतं, स्वतःचं आयुष्य जरी अंधारान दाटलं असलं तरी पोराच्या आयुष्यात प्रकाश येईल तो शिक्षणामुळचं. बाबाला माहिती होतं की, पाचवीला पूजलेल्या या गरिबीला उलथून टाकायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही...म्हणून बाप सारखा म्हणायचा "आमचं सगळं पावणपै नोकरदार हाईत..नोकरीच्या जीवावर प्रगती करत्यात."  त्यांनी केलेली प्रगती दाखवण्यासाठी बाप मुद्दामहून लहानपणापासून मला पाहुण्यांच्या घरी घेऊन जायचा...बाप म्हणायचा.."खूप शिकायचं..शिकत राहायचं... नोकरी करायची..

                             शिक्षणाचं महत्व लहानपणापासून माझ्या मनांवर बाबाने बिंबवलं होतं. मला आजही आठवतंय.. मी दुसरी-तिसरीला असताना अंकलपीतली बाराखडी पुढ्यात बसवून बाबा म्हणून घ्यायचा. सातवीत असताना स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासाला बाबाने मला ओढून नेऊन बसवले होते. बाबा रात्रीच्या वेळी भिंतीला तक्क्या देऊन निवांत बसत व मला जवळ घेऊन म्हणायचे " पुस्तकातला एखादा धडा मला वाचून दाखव बघू " त्यावेळी धडा वाचून दाखवण्यात मला एक प्रकारचा आनंद मिळायचा. त्याकाळात दावं, अडाणी वैगरे बाबांना वाचून दाखवलेले धडे आजही आठवतात. चित्रकला मला आवडायची. त्यामुळे चित्रकलेची वही, स्केचपेन लागेल ते साहित्य मला बाबा आणून देत असे. मला काही हवं आणि ते बाबांनी दिल नाही असं कधी झालं नाही.. खरं तर माझ्या शिकण्याच्या मागे मूळ प्रेरणा ही माझ्या बाबांची होती. त्यांच्यामुळे तर मी मनापासून शिकत गेलो. 

                             माझ्या बाबांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. बाबांना दिसायचं तरी केवढं..? तर मी एकदा बाबाला विचारलं होतं. "बाबा तुला केवढं दिसतं.." त्यावर बाबांचं हे उत्तर होतं. "उगीच धोतरातनं बघितल्यासारं. जवळच तेवढं पांढरं दिसतंय.. लांबच कायच दिसत नाही." म्हणजे माझ्या बाबाला जवळजवळ ९०% दिसतच नव्हतं. वाटेवर टाकलेलं पहिलं व प्रत्येक पाऊल हे अंदाजानं नी अदमासे टाकलेलं असायचं. आरी, रापी, हस्ती, संदन, चप्पलाचा एखादा जुना जोड अशा सामानाची पिशवी खांद्याला अडकून बाबा लवकरच घराबाहेर पडायचा. रस्त्याच्या एका बाजूनं काठ धरून अंदाजानं चालायचा. कधी खड्ड्यात पाय जायचा, कधी ठेचकाळायचा तर कधी गटारात सुद्धा जायचा.पण बाबा कधी थांबला नाही.  कधी कधी लोक सांगत "आज तुझा बाबा इथं पडला बघ...तिथं धडकला बघ.."   बाबा धडपडत पडत झडत आजूबाजूच्या खेड्यावर लोकांच्या पायातली फाटकी तुटकी चप्पल शिवायला जायचा. कुठल्या गावातल्या वेशीवरच्या झाडाच्या पाराला तर कधी कुठल्या घराच्या भिंतीचा आधार घेऊन बाप ऊन्हातान्हात चप्पलं शिवत असायचा. बाबाचा बोलका स्वभाव होता. त्यामुळे गावातल्या प्रत्येक माणसांशी बोलून चालून असायचा, चेष्टा मस्करीही करायचा. त्यामुळे गावातली काही माणसं तासघटका बाबाजवळ मुद्दाम बोलायला थांबायची. चप्पलाला ठिगळं लावत बाबा समोरच्याला अभिमानाने सांगायचा, " पोराला डी.एड केलंय, माझं पॉर मास्तर व्हणार हाय..." चार खेड्यातनी बाबा अभिमानाने सांगायचा..'माझं पॉर मास्तर व्हणार.' .. सलगीतली लोकं म्हणायची , "सुभासदाचा नाद खुळा.. आंधळा असून बिचाऱ्यानं पोराला चांगलं शिकवलं." आयाबाया म्हणायच्या..".आंधळाच्या गाई परमेश्वर राखी.." बाप जरूर आंधळा होता. त्याच्या डोळ्यांत भर दिवसाही अंधार साचलेला होता..पण लेकाला शिकवायचं.. मोठं करायचं  हा आशेचा प्रकाश किरण त्याच्या डोळ्यातल्या अंधारावर मात करायचा.

                             " आंधळ्याला कोण पोरगी दिल" अशी भावकीतली एक म्हातारी सुरुवातीला म्हणाली होती..म्हणजे लग्न होण्याची शाश्वती नाही..इथूनच माझ्या बापाच्या संसाराची सुरुवात झाली होती. पण बाबा आंधळा असला तरी हिंमतवान ,करारी आणि जिद्दी होता. बापाचा स्वाभिमानी बाणा होता..आपल्याला पटेल तेच करणार.. आपल्या तत्वाला बांधील राहणार..आपण गरीब, डोळ्यांनी दिसत नाही म्हणून कुणाच्या सहानुभूतीला बळी पडून आपला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यापैकी माझा बाप मुळीच नव्हता...आणि बाबाच्या अशाच गुणांचं बाळकडू त्यांच्यापासूनच माझ्या अंगी आलं आहे. कोणी काही म्हणो पण बापाचं लग्न झालं, संसार सुरू झाला. तीन मुलं झाली.पाण्यात पडलं की हात पाय मारावेचं लागतात. अशाप्रकारे हातात आरी,रापी असं समान घेऊन  खेड्यावर चप्पल शिवायला बाप जाऊ लागला. पुढं पुढं एक शेळी घेतली नंतर त्या शेळीपासून दहा बारा शेरडांचा खांड झाला, घरभर नुसती शेरडं होती. आरी,रापी, वादी आणि शेरडं यांच्या जीवावर संसार सुरू झाला..यातून पुढे दोन पोरींची लग्न आणि माझं शिक्षण बापानं पूर्ण केलं..मला शिक्षक करायचं बाबांचं स्वप्न होतं..

                   

२०१० साली डी.एड होऊन मी बाहेर पडलो आणि दुर्दैव म्हणजे पुढे शिक्षक भरती बंद झाली. आणि मग मी बेकारीपणाच्या जाळ्यात कसा गुरफटत गेलो फरफटत गेलो माझं मलाही कळाल नाही. मग काय..? इथूनच खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. शिक्षक होण्याच्या स्वप्नामागे धावताना वाट्याला काय येणार होते माहिती नव्हतं. इथून पुढची वाट कशी असेल याबद्दल अनभिज्ञ होतो. पोरगा आज शिक्षक होईल उद्या होईल या आशेवर बाप पडत झडत खेड्यावर चप्पल शिवायला जायचा. डी. एड करून नोकरी नाही तरी बाबा म्हणायचा आता बी.एड करायचं... मी बाबाला म्हणायचो.." डी. एड करून नोकरी नाही आणि म्हण बी. एड कर...मी अजिबात करणार नाही.." मी असं म्हणताना बाबांनी माझं काही एक ऐकलं नाही.. ते म्हणत.."काही पण होऊ दे शिक्षण थांबवायचं नाही..पुढे शिकत राहायचं...बी. एड करायचंच..." मला बळजबरीने त्यांनी बी.एड ला प्रवेश घ्यायला लावला आणि मग पुढे इंग्रजी विषयातून मी बी. एड पूर्ण केलं.बाबा खेड्यावर ,आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला आणि मी एखादं पुस्तक घेऊन शेरडांच्या मागे डोंगरात जात असे. नाही म्हणायला एखाद्या शाळेत तात्पुरते शिकवायला जायचे व सायंकाळी गावच्या मराठी शाळेच्या वर्गात गावातील मुलांचा क्लास घ्यायचा असे चालले होते. अशीच वर्षे निघून जात होती. मला काही नोकरी लागत नव्हती आणि इकडे आई- बाबांचं राबणं सुरूच होतं..

                बाबांना डोळ्यांनी तर दिसत नव्हतेच पण सततच्या आजारीपणाचा सामना त्यांना दरवेळी करावा लागायचा.  पूर्वीपासून बाबा वरचेवर आजारी पडत..एकदा का आजारी पडले तर त्यातून ते लवकर बरे होत नसत.  मूळचा मूळव्याध्येचा त्रास होता. शुगर होती. पथ्य पाणी काही पाळत नसत. कधी शुगर वाढून आजार बळावायचा तर कधी मूळव्याधाचे दुखणे डोके वर काढायचे. काही ना काही त्रास असायचाचं. दुखणे कमी आले की त्यातून उठून खेड्यावर जायचे..  हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो..हातात कोणतीच नोकरी नव्हती शिक्षक होणे तर दूरच..

                एक वर्षी बाबांना मूळव्याध्येचा त्रास अधिकच उदभवला. बाबांचा हा जुनाट आजार होता. गरिबी आणि  हातावरचं पोट या ओढाताणीत बाबाने पूर्वीपासून या आजाराकडे साफ दुर्लक्ष केले होते. हा आजार इतका भयंकर होता की, रक्ताने एकेकदा चड्डी भिजत असे, जमिनीवर सांडत गेलेली रक्ताची धार किंवा संडासात पडलेले रक्त आम्हीं अनेकदा पाहिले आहे. गुदद्वारातून मुळव्याधेचा गड्डा बाहेर यायचा. त्यावेळी उभ्या उभ्याच मोठ्या मुश्किलीने बाबा तो गड्डा बोटांनी आत सारायचे.. खेड्यावर जाताना बऱ्याच वेळा रस्त्यात थांबून अशाप्रकारे तो गड्डा आत सारून पुढे चालायचे.. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेदनेच्या खुणा आजही मला स्पष्टपणे आठवतात. मूळव्याध्येच्या दुखण्याने ते अगदीच त्रस्त झाले होते, कळा असह्य होत होत्या आणि मग बाबांना गारगोटीच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले. आठ दिवस झाले तरी त्या कळा काही थांबत नव्हत्या. बाबांना थारा होत नव्हता..ती अवस्था बघवण्यासारखी नव्हती. कळा थांबायचे नांव नाही. अखेर एके दिवशी गारगोटीतून थोरली बहिण (आक्का) व प्रवीण यांनी बाबाला ऍबुलन्सने कोल्हापूरला सी. पी.आर मध्ये हलवले. मी एका शाळेत काम करत होतो त्या संस्थापकाच्या दारी दवाखान्यासाठी लागणाऱ्या पैशाकरिता. माझ्या कामाचा चार हजार रुपये पगार घेण्यासाठी त्यांच्या दारी कित्येक तास ताटकळत आशेने उभा होतो. आणि मग ते केवळ चार हजार सोबत घेऊन मी कोल्हापूर गाठले. तेंव्हा रात्र झाली होती. 

          बाबांना सी.पी.आर मध्ये आणले त्या रात्री आक्का, मी बाबांना मिणतवाऱ्या केल्या पण एक घास देखील त्यांनी खाल्ला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत बाबांना घेऊन वार्डमध्ये मी फिरत होतो. धड बसता येत नव्हतं ना उभारता येत होतं. उपचार लवकर मिळत नव्हते. डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्या रात्री बाबा उपाशी झोपले. पहाटे चारला जाग आली. मी त्यांना लघवीला नेऊन आणलं व बेडवर बसवलं.. आक्का म्हणाली, "रात्री काहीच खाल्लं नाही निदान नकाडा शिरा तरी खातोय का बघूया" म्हणून बाबाला बोलवलं तरी काहीच प्रतिसाद नाही...नुसते शांतपणे बेडवर बसले होते. आम्हीं किती बोलावण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद शून्य.बधिर झाल्यासारखी अवस्था..ऐकायला गेलं नसल्यासारखे करून.काहीच बोलत नव्हते,  आम्हीं घाबरलो.. मी तर डॉक्टरांना बोलवण्यासाठी अक्षरशः पळत सुटलो...शिकाऊ डॉक्टर होते ते आले त्यांनी तपासले व उलट आम्हांलाचं  ते म्हणाले "त्यांचीचं बोलायची ईच्छा नाही..तुम्ही सारखे त्यांना बोलावू नका" पण या उत्तराने आमचे समाधान झाले नाही...अशा अवस्थेत बाबांना इथं जास्त वेळ ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे बाबांना खाजगी दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला आणि मग सरस्वती ऍपल मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात ऍडमिट केलं. तिथे ऍडमिट केल्यावर निदान कळाले की, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिणीत रक्ताची गुठळी झाली आहे. त्यामुळे त्यांची वाचा गेली आणि अर्धांगवायूचा झटका आला होता.  शरीराचा अर्धा भाग दुबळा झाला होता. आमच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. काय करावे सुचत नव्हते. आय.सी.यु मध्ये असणारी त्यांची अवस्था पाहवत नव्हती. मनातल्या मनात मी देवाला प्रार्थना करत होती की, बाबा यातून सुखरूप बाहेर पडोत. 

                              कोल्हापूरातील हा अगदी मोठा दवाखाना या दवाखान्याचा खर्च आमच्याने पेलवणारा नव्हता. त्यावेळी माझ्या खिशात फक्त  चार हजार रुपयेचं होते. पण अशा कठीण वेळी ज्या ज्या लोकांना मी मदतीची हाक दिली ते लोक अगदी देवासारखे धावून आले..माझ्यासाठी ते माणसातलेचं देव होते. हृदयात कोरलेल्या त्या प्रत्येकाचं नांव इथं पानांवर मांडणं शक्य नाही...पण माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात त्यांचं स्थान परमेश्वरासमान आहे.खऱ्या अर्थाने त्यांच्या मदतीवर तर बाबांचा दवाखाना आम्ही करू शकलो. बाबा जगण्या मरण्याच्या मधली झुंज देत होते. सर्वांना वाटत होतं की, बाबा आता यातून वर उठणार नाहीत. उपचारांलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.  मला एवढही सांगण्यात आलं होतं की, "बाबांना आता दवाखान्यातून घरी नेऊयात. घरी जी काही सेवा करता येईल ती करू..". इतकी बाबांची प्रकृती त्यावेळी खालावलेली होती. अशी एक वेळ आली होती की, सर्वांनी माझ्यावरच हा निर्णय सोपवला होता..की "किरण ऐक आमचं, बाबांच्यात आता सुधारणा होणार नाही... आपण घरी घेऊन जाऊयात..." माझ्या आक्काचेही म्हणणे तेच होते...      

                           त्यावेळी मी एकटाच बाजूला जाऊन एका खुर्चीत बसलो होतो.. डोळे उघडले काय आणि बंद केले काय माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार दाटला होता. काय करावे ? घरी न्यावे की नको ? नाही तरी बाबांच्या प्रकृतीत सुधारणा काहीच नव्हती.. काय घ्यावा निर्णय..? पण एका क्षणी मी ठाम निर्णय घेतला...तो क्षण फार महत्वाचा होता.  मी निर्णय घेतला की,काहीही होवो बाबांना घरी न्यायचं नाही...इथंच काय बरे वाईट व्हायचे ते होवो..शेवटी आपल्या हातात काय आहे..? तर फक्त प्रयत्न... शेवटपर्यंत तेच करायचे.आणि मग काही का असेना शेवटी प्रयत्न फळास आले म्हणायचे. बाबांच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होऊ लागली. आणि आमचा जीव भांड्यात पडला. जवळपास पंधरा दिवस दवाखान्यात ठेवून अखेर डिस्चार्ज मिळाला. लागलीच त्यांना कर्नाटकातल्या नागरमनोळीला लकव्यावरचे औषध द्यायला नेले. व तिथून मग घरी आणले.  घरी आणल्यानंतर आई,बहिणी व मी सगळ्यांनीचं बाबांची चांगली  सेवा केली. चार महिने सकाळ - संध्याकाळ मालिश करून बाबांना अंघोळ घालत असू. जेवण भरवायला लागायचं. नारळपाणी, फळं असं खायला देत असू . हळूहळू बाबांना बरं वाटू लागलं. तब्येतीत सुधारणा होऊ लागली. घरात हळूहळू हिंडू फिरू लागले पण बोलायला येत नव्हतं.. काही बोलायला बघायचे पण शब्द फुटत नव्हते. बोलायचा किंवा काही सांगायचा किती प्रयत्न करायचे पण निष्फळ...."बाबा" एवढाचं शब्द स्पष्ट बोलायचे तेवढंच एक नांव त्यांच्या ओठावर उरलं होतं.... आणि प्रयत्न करूनही मनातलं काही सांगता नाही आलं की..उद्विग्नपणे म्हणायचे..."काय करायचं बाबा.."

                     दरम्यान कोल्हापूरतल्या एका विनाअनुदानित शाळेची मुलाखत मी सकाळ पेपरमध्ये वाचली. पण त्या दिवशी कोल्हापूरला जायला माझ्याकडे पैसे नव्हते.. माझे चुलते वारून सहा दिवस झाले होते अशा वाईट प्रसंगात चुलत भाऊ सागरकडून दोनशे रुपये घेण्याची वेळ माझ्यावर आली आणि मुलाखतीला गेलो. तिथे जाऊन एका वडापावच्या गाड्यावर थांबून कसातरी गडबडीत अर्ज लिहिला .आणि शाळेत पोहोचलो. त्यावेळी शेवटची मुलाखत देणारा उमेदवार मीच होतो. मुलखातीमधून शेवटी माझी निवड झाली. संस्थेचे सचिव सदानंद पुंडपाळ सर हा एक देव माणूस भेटला म्हणायचा की, ज्यांनी आपल्या संस्थेत घेऊन माझं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.. पण शाळा होती विनाअनुदानित..अनुदान येईपर्यंत पगार काही मिळणार नव्हता. भविष्यात पगार सुरू होईल या आशेवर काम करावे लागणार होते. तरी संस्था चांगली होती इतर संस्थेसारखे पैसे वैगेरे भरावयाचे नव्हते. शेवटी मी निर्णय घेतला बिनपगारी असेना का नोकरी स्वीकारायची. बघू पुढचे पुढे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी लागल्याचे बाबांनाही तेवढेचं  समाधान. मग एक दिवस आईबाबांचा आशीर्वाद घेऊन मी कोल्हापूर गाठले. शिक्षक म्हणून रुजू  झालो..पण बिनपगारी.  शिक्षक झालो याचा एकीकडे आनंद तर पगार नाही केंव्हा सुरू होईल? याची दुसरीकडे चिंता होती. सुरुवातीला दिवसभर शाळा करत असे आणि रात्री एखाद्या हॉटेल मध्ये काम करायचो म्हणजे राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न मिटायचा. पण सकाळच्या जेवणाची अडचण व्हायची कारण हॉटेलमध्ये फक्त रात्रीचे जेवण मिळायचे. मग सकाळचे जेवण दुपारी शाळेत शालेय पोषण आहारावेळी जेवायचो. 

                पण कुठे तरी परमेश्वर पाठीशी होता म्हणायचा आणि मग कोल्हापूरमध्ये आल्यापासून माझ्या शाळेतील सहकारी रमेश गुरव सर यांना माझी परिस्थिती माहिती झालेली होती. कठीण काळात त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला. त्यांचे माझ्या व माझ्या कुटुंबावर थोर उपकार आहेत. एकदा असेच मी शाळेत असताना चारच्या दरम्यान घरून फोन आला "बाबांना जास्त झालं आहे लवकर घरी ये.".मी अचानक बाहेर पडणार पण खिशात काहीच पैसे नव्हते.. याच विवचंनेत शाळेतून बाहेर पडत असताना गुरव सरांनी विचारले, "सर असे अचानक का चाललात..? मी त्यांना घटना सांगितली तोच त्यांनी मी न मागताच खिशातून दोनशे रुपये काढून माझ्या खिशात कोंबले...मला ती घटना आठवली की आजही अचंबा वाटतो की, या माणसाला माझी अडचण न सांगताही कशी कळाली असावी.? शब्दावाचून भावना,वेदना ओळखणारी ही माणसं माझ्या त्या काळात परमेश्वरासारखी माझ्या पाठीशी होती.. दुसरे कुटूंब म्हणजे सौ.जयश्री अमित पाटील यांचे. पाटील मॅडम सध्या ए. पी. आय. आहेत त्यांचा मुलगा प्रेम याचे मी होम ट्युशन घेत असे. कोल्हापुरात गेल्यापासून शेवटपर्यंत प्रेमचा मी क्लास घेत होतो. या होम ट्युशनमधून महिना मला तीन हजार मिळत.  त्या तीन हजार मध्ये माझी सगळी गुजराण होत असे. काहीं वेळा अडीअडचणीला पैशाची मदत ते करत.  

                   मार्चपासून सकाळच्या शाळा सुरू झाल्या की, मी दुपारी एम. आय.डी. सी. मध्ये ४ ते १२ शिफ्टला कामाला जायचो तेथे हेल्परचे काम करायला लागे. एखाद्या वेळेस ओव्हर टाईम करायचो. माझा  उदरनिर्वाह, बाबांचा दवाखाना आणि औषध गोळ्यांचा खर्च यासाठी या काळात तारेवरची कसरत करावी लागली. मागे आई मजुरीला जायची ते पैसे साठवून माझ्या माघारी बाबांच्या गोळ्या औषध घेत असे. तरी सुद्धा अधेमध्ये बाबांची तब्येत जास्त खालावत व आईची नुसती ओढाताण होई..बोलता येत नसल्याने बाबांची आतल्या आत घुसमट होत होती.त्यामुळे ते सारखी चिडचिड करीत...कधी घरातून बाहेर पडून जात. आईला त्रास देत, एकेक वेळा आई रडकुंडीला येई.हतबल होई. पण या काळात पाठचा भाऊ पण  साथ देणार नाही अशी साथ मला मिळाली ती आमच्या प्रवीणची...हा माणूस म्हणजे जणू माझी सावलीच आहे. माझ्या माघारी बाबांच्या दुखण्याखुपण्याला तोच धावून जाई. 

           दिवस असेच जात होते.. शनिवारी रविवार आणि सणावाराला मी घरी जात असे.. शनिवार जवळ आला की बाबा नुसते माझ्या वाटेकडे डोळे लावून असायचे. कधी एकदा माझा ल्योक घरी येतोय असं त्यांना व्हायचं. फोन वर फोन करायचे.  फोनवर बोलता येत नव्हतं तरी मोठ्या मुश्किलीने "बरा हाईस..."  हे एवढेचं शब्द कसे तरी बोलायचे . पण ते ही उच्चारायला देखील बाबाला मोठे कष्ट पडायचे... घरी आलो की हरखून जायचे... त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जायचा...कोल्हापूरातून गावी गेल्यावर मी बाबांना एकदा घट्ट मिठी मारलेली आज मला आवर्जून आठवते आणि आता खंत वाटते की दर वेळच्या भेटीत बाबांना अशी मिठी का मारू शकलो नाही...मायेच्या स्पर्शाचं सुख बाबाला का देऊ शकलो नाही..? गावी गेलो की बाबांचा एक प्रश्न ठरलेला असायचा. पगार कधी सुरू होणार..? आता दोन वर्षे  म्हणता म्हणता चार वर्षे झाली तरी पगार सुरू झाला नव्हता.. आणि आता नेहमी एकच प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हता..तो म्हणजे पगार कधी सुरू होणार.  ? या प्रश्नावर मी निरुत्तर असायचो...काय उत्तर द्यायचे..?. बाबांना रेडिओ ऐकण्याची सवय होती. मनोरंजनाचे काय ते तेवढेच साधन. अधिवेशन काळात शाळेच्या अनुदानाच्या बातम्या रेडिओला लागायच्या... तेव्हा मी कोल्हापूरहुन कधी घरी आलो की, बाबा तोडक्या मोडक्या शब्दात ती बातमी सांगायचे.  मी ओळखून जाई... माझ्या पगाराची बाबांना किती आस लागली होती.. बाबांना आता नुसता ध्यास होता तो माझा पगार आणि दुसरे म्हणजे माझं लग्न.. कारण आता लग्नाचं वय उलटून जात होतं.... लग्नाचं पोर घरात असलं की आईबापाला जी चिंता जाळत असते.. त्याच चिंतेत सतत बाप असायचा..त्यात ही अशी सगळी परिस्थिती..

                             बाबा मला म्हणायचे "आता लग्नं करूया की," त्यावेळी मी कधी कधी चेष्टेने म्हणत असे "मला अण्णा हजारेंच्यासारखं राहायचं आहे..लग्न करणार नाही मी. "  तेंव्हा बाप मनमुराद हसायचा... आणि पुन्हा कधी लग्नाचा विषय काढला की मी म्हणायचो... "आता लग्न करायचं म्हणजे बापानं पुढं होऊन सगळं करावं लागतं.....तुम्हीं बघा की पोरगी मग मी लग्न करतो.." .एकप्रकारे मी असं बोलून त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचो. यावर बाबा उदास व्हायचा त्याला माहिती होतं.. मी बाप आहे..पण मनात असूनही आज पोरासाठी काही करू शकत नाही ही सल त्यांच्या उरात दाटायची आणि शेवटी बाप म्हणायचा...."काय करायचा बाबा..?"

                         "बाबा.." आणि ..."काय करायचं बाबा.." एवढंच बाप बोलू शकत होता. यापलीकडे काही बोलण्यासाठी त्यांची जिभचं वळत नसे....बोलायचं खूप असे, मनातलं सांगावंसं वाटत असे पण सगळं मनातच राही...आणि मग आतल्या आत बाप घुसमटत राही..

                      माझ्या माघारी बाबा अक्षता टाकण्याची मूठ दाखवून कळवळून तळतळून आक्काला सांगत असे "माझं आता काही खरं नाही पोराला मी हाय तोपर्यंत लगीन करायला सांग.." माझ्या बापाला लग्नाची हौस साजरी करायची होती..तेवढीचं काय ती ईच्छा मागे उरलेली आता तब्येत साथ देत नव्हती. तब्येत वरचेवर खालावत होती..

                   आणखीन एक वर्षी बापाची लघवी तटली.. पुन्हा कोल्हापूरला हलवलं. पुन्हा पहिल्यासारखा प्रवास. पहिल्यासारखीच परिस्थिती...ते दवाखाने ..उपचार. दोन तीन दवाखाने बदलावे लागले.  नाना तऱ्हेचे आजार उद्धवत होते... बाबांचं शरीर म्हणजे रोगाचं माहेरघर झालं होतं जणू...कोल्हापूरहून जवळपास महिनाभराने घरी आणलं आणि पुन्हा जास्त झालं तेंव्हा मग गारगोटीतील एम. डी डॉक्टर गोंजारे यांच्या दवाखान्यात आठ दहा दिवस एडमीट केलं आणि यावेळीही बाबा पुन्हा एकदा मरणाच्या दारातून परत आले. बाबांचा दवाखाना काय आमची पाठ सोडत नव्हता..तो आता नित्याचाच झालेला.

                    एक तर पगार नाही. जवळ पैसे नाहीत त्यात हा दवाखाना. लोकांच्याकडून पैसे घ्यायचे तरी किती..पण या कठीण काळात माझ्या माणसांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. सर्व बाजुंनी संकट यावीत असा हा काळ होता. अशावेळी मला एक संधी खुणावत होती. आणि या संधीमुळे मी या परिस्थितीवर मात करू शकणार होतो.  ती म्हणजे आमच्याच संस्थेतल्या अनुदानित शाळेवर इंग्रजी विषयाची जागा रिक्त झाली होती. आणि विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली या शासन निर्णयानुसार मला त्या जागी जाता येत होते.. माझ्यासाठी हीच खरी सुवर्णसंधी होती..ज्या विनाअनुदानित शाळेवर काम करत होतो. त्या शाळेला अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नव्हती ...एक तर बाबांची तब्येत खालावत जात होती...लग्नाचे वय मागे सरत होते अशावेळी मला जर ही संधी मिळाली तर माझे हे प्रश्न सुटणार होते.म्हणून मी संस्थेकडे मागणी सुरू केली. बदलीसाठी जोरकसपणे प्रयत्न करत होतो...घरात ही आता माहिती झाले होते की, माझी बदली झाली तर सगळं मार्गी लागेल. म्हणून त्यांनाही माझ्या बदलीचे आता वेध लागले होते. घरात बाबांच्या समाधानासाठी मी सांगत असे बदली झाली की, पगार सुरू होईल मग लग्न पण करू. अशी आशा त्यांना दाखवत होतो...पण माझं दुर्दैव की, वर्षामागून वर्षे निघून जात होती पण माझ्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते.. आईने तर देवाला साकडेचं घातले होते, तिचे उपास तपास तर सुरूच होते.. माझ्या आक्काने तर एकही देव सोडला नाही..जाईल त्या ठिकाणी नवस बोलायची.. "पोराची बदली होऊ दे आणि पगार सुरू होऊ दे.". मी सुद्धा देवाकडे हेच मागणे मागी. 

                              एकदा गणपतीच्या मंदिरात जाऊन मी आराधना केली होती की, माझी बदली होऊ दे...आणि नमस्कार करून झाल्यावर तिथल्या पुजाऱ्याने आपसूकच मला एक नारळ दिला..मला वाटले खरंच देवाचा आशीर्वाद मिळाला. ते देवाचे फळ म्हणून आजही देव्हाऱ्यात पुजला आहे.. रोज देवाला प्रार्थना असायचीच.तो क्षण आठवला की,आत्मविश्वास वाटायचा.माझ्या प्रयत्नांना एक दिवस नक्की यश मिळेल असे वाटत राहायचे.. पण मला ठाऊक होतं जोपर्यंत माणसातला देव प्रसन्न होणार नाही, तोपर्यंत देवळातला देव ही काही करू शकणार नाही.. कारण माझी बदली करणं एका माणसातल्या देवाच्या हाती होतं... या बदलीच्या कामी गुरुवर्य सुनीलकुमार लवटे सर,इंद्रजित देशमुख काकाजी, डी.एस.पोवार साहेब, विश्वास सुतार साहेब, नामदेव पाटील सर,आर.के.पाटील सर अशी थोर मंडळी ही माझ्यासोबत होती...माझ्यासाठी त्यांनीही त्यांच्यापरीने होईल ते कष्ट उचलले. रात्रंदिवस मी बदलीच्या विचारात असे...कारण त्याशिवाय आता आयुष्य संपूर्ण अंधकारमय आहे असं वाटत होतं. त्यामुळे काहीही करायचे पण बाबांच्या हयातीत बदली करून एकदासा पगार सुरू होईल व लग्नही करता येईल... या अपेक्षेने मी जंग जंग पछाडले होते...जळी स्थळी फक्त बदली....एवढाच विचार माझ्या डोक्यात होता..जणू मला आता वेडंच लागायचे बाकी राहिले होते. या विचाराने दोन वेळा मी डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलो होतो. पण परमेश्वर माझ्या संयमाची, माझ्या सहनशीलतेची प्रयत्नांची कसोटी पहात होता म्हणायचा..

                        दरम्यान कोरोनाचा काळ आला.जिथं जगच थांबलं तिथं.सगळंच थांबलं..तो काळ तसा निघून गेला..दुसऱ्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली. या वर्षी तर बाबांचं दुखणं जास्त वाढत गेलं. त्या वर्षीच्या सुरुवातीपासून बाबा सारखे अंथरुणाला खिळून होते. गुढीपाडव्याच्या सणावाराच्या दिवशी देखील बाबा झोपूनचं होते..तशी आता वारंवार तब्येत खालावायची..आणि आता हे नित्याचं झालं होतं. त्यामुळे विशेष काही वाटत नव्हतं. घरीच औषध पाणी सुरू होतं. मे महिना आला. शाळेला सुट्टी होतीच. मी घरी जाण्यासाठी मुख्याध्यापकांना विचारले असता, कोरोनाचा काळ सुरू असल्यामुळे मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत असे त्यांनी सांगितले. मला पुढे जावे की मागे रहावे तेच कळेना. इकडे तर बाबांची तब्येत जास्त खालावत चालली होती. बाबा झोपूनच होते. अंथरुणातंच लघवी वैगरे व्हायची आई ते अंथरून रोज धुवायची.. जेवण सोडूनच दिलेले. एखाद्या वेळेस पहाटे चार-  पाच वाजता उठायचे  त्यावेळी आई बळेच्याने तरवणी पाजायची...शेवटी मी धाडस करून घरी येण्याचा निर्णय घेतला.  

             त्या दिवशी कोल्हापूरहुन गारगोटीत आलो. कोरोना सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घेतली आणि लागलीच घरी न जाता खबरदारी म्हणून अक्काच्या गावी आडोलीला येऊन राहिलो. दहा बारा दिवसाने मी व आक्का घरी गेलो त्यावेळी फारचं उशीर झाला होता.  बाबा अंथरुणाला खिळलेले होते.. अंगाचा सापळा झाला होता. तरीही आक्काने खायला घातले की खायचे...भिंतीला तक्या देऊन बसवले की बसायचे. पण तब्येत फारच अशक्त झाली होती. घरच्या घरी जे खाईल ते घालत होतो.. आता या वातावरणात बाहेर दवाखान्यात कुठे न्यायचे हा प्रश्न होता...पण घरात तर ती अवस्था बघवत नव्हती शेवटी काय व्हायचे ते होवो.  एकदा डॉक्टरांना दाखवायचे या ठाम निर्णयनाने एका सायंकाळी बाबांना घरातून बाहेर काढले. गारगोटीतल्या गोंजारे दवाखान्यात आणले..जवळ पैसे नव्हते. सांगलीचे प्रमोद पाटील सर यांनी उपचारासाठी पैसे पाठवून दिले.. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, पेशींचे प्रमाण कमी झाले आहे. औषधोपचार केल्यानंतर कमी येईल.. आम्हांला हायसे वाटले... ऍडमिट काही करून घेतले नाही.

               दवाखान्यात पुन्हा दाखवण्यासाठी जवळ अंतर पडेल म्हणून माझी दुसरी बहिण जयश्रीच्या घरी बाबांना घेऊन गेलो. तिथे बाबांना ठेवले.. सकाळ संध्याकाळ आई आणि मी बाबांना जेवण भरवायचो.काही वेळा जबरदस्तीने भरवावे लागे. मी तोंडात बोट घालून दात स्वच्छ करायचो आणि मग आई नी मी अंघोळ घालायचो. असे दोन तीन दिवस गेले. एके सकाळी अंघोळ घालण्यासाठी बाबांना वर उचलले आणि कंबरेतला करदोरा गळून 

खाली पडला. हे कशाचे सूचक होते..?  तसेच उचलून बाहेर नेऊन बाबांना अंघोळ घातली. जेवायला घालून गोळ्या दिल्या. भिंतीला तक्क्या देऊन बसत असायचे.. सर्व काही ठीक चालले होते. म्हणून मी औषध गोळ्या कसे द्यायच्या हे बहिणीला समजून देऊन गावी आलो.. त्या संध्याकाळी बहिणीचा फोन आला बाबांना ताप आला होता.  मी सांगितल्याप्रमाणे तिने गोळ्या दिल्या. यात काही विशेष वाटले नाही कारण वरचेवर असा ताप येई...

            दुसऱ्या दिवशी मला जायचेच होते. तोपर्यंत नऊ साडेनऊ वाजल्यापासून फोन यायला सुरुवात झाली बाबांना जास्त झालंय लवकर ये.. मी गडबडीने बाहेर पडलो. दरम्यान मला आठवतेय या मनःस्थितीतही माझ्या बदलीच्या अनुषंगाने एका सरांशी मी चर्चा करीत होतो. कारण मला एक आशा होती की, यदाकदाचित बदलीचे काय झाले तर बाबांना तेवढेचं समाधान. पण आता पुढे काय वाढून ठेवले आहे तोपर्यंत तरी मला कल्पना नव्हती. लागलीच प्रवीणला घेऊन गारगोटीत पोहोचलो. सारखे फोन येत होते आणि मग मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकली की, काहीतरी अघटित घडलंय.  किंबहुना वाईट घटनेची माणसाला आपोआपच जाणीव होते की काय ..? असा तो क्षण मी त्यावेळी अनुभवला. पण मनाची मी तयारी केली. काहीही घडो आपण ठाम राहायचं... कारण माझ्या डोळ्यासमोर आई, दोन बहिणी दिसत होत्या. मनाला कणखर करूनच मग पुढची वाट धरली. 

बहिणीच्या घराजवळ जायला रडारड ऐकायला आली. सरळच आत गेलो.. बाबांना निजवलेलं वर चादर टाकलेली, बाजूला आई रडत होती, पायाशी बहीण आक्रोश मांडत होती. मी बाबांच्या जवळ गेलो चादर मागे ओढली. अर्धउघडे असलेले डोळे आणि निष्प्राण चेहरा पाहून मी स्तब्ध झालो..पहिल्यांदाचं असा निपचित पडलेला बाप पाहात होतो. बापाचे ते निर्जीव अचेतन मुख पाहताना माझ्या मनाची झालेली अवस्था शब्दांत नाही व्यक्त करता येणार. वेदनेने ठसठसणाऱ्या कुडीतून बापानं सुटका करून घेतली होती. आम्हांला पोरकं करून बापानं कुठल्या कुठं पलांग मारली होती. आई आकांत मांडत बोलत होती.. "देवानं तोंडं काढून घेतलं काही बोलला नाही.. मनातलं सांगता आलं नाही.."

पायस्थ्याशी बहीण .".मला बाबा पाहिजे...मला माझा बाबा आणून दे.." म्हणत टाचा घासत होती. एका बाजूला आई...दुसऱ्या बाजूला बहीण... आणि खाली बाप निपचित पडलेला...माझी अवस्था मी कुणाला सांगायची..? मला अश्रू ढाळण्याचा अधिकार नव्हता...बापपणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवून बाप निघून गेला होता.  एकदा आईला जवळ घेत होतो तर एकदा बहिणीला जवळ घेत होतो... कसा बसा आधार देत होतो.  पुढ्यात आमच्या आधाराचा वड खाली कोसळला होता.

         बाप गेला शेवटपर्यंत..बोलता आलं नाही..मनातलं काही सांगता आलं नाही...मनातलं सगळं मनात राहून गेलं... मनातली घुसमट मनातचं ठेवून बाप गेला...पण बापाच्या मनातल्या दोन अपूर्ण ईच्छा होत्या त्या बाप मागे ठेऊन गेला होता..एक माझा पगार आणि दुसरं लग्न...ज्या लेकासाठी संपूर्ण हयात बापानं कष्टत घालवली.. डोळ्यांनी दिसत नसताना लोकांच्या पायातली चप्पलं शिवून मला शाळा शिकविली..अंधारलेल्या डोळ्यांत बापानं मी शिक्षक होण्याचं  स्वप्न सजवलं..ते डोळ्यांतचं मुजलं.. ती नियती तरी इतकी क्रूर कशी.?.ज्या बापाच्या वाट्याला सुरुवातीपासून आंधळेपणा आला...डोळ्यांनी हे जग नीट धड पाहू शकला नाही..त्या बापाची अखेर वाचाही काढून घेतली.. शेवटपर्यंत माझा बाप बोलू शकला नाही....नीट ऐकू शकला नाही.. एवढा कसला भोग माझ्या बापाच्या वाट्याला नियतीनं दिला....जो बाप पंढरीचा वारकरी होता, धडपडत वारी करायचा..शेवटी त्या पांडुरंगालाही माझ्या बापाची दया आली नाही...मला आजही प्रश्न पडतो जर परमेश्वर असेलच या जगात तर माझ्या भोळ्याभाबड्या ,दीनदुबळ्या गरीब, प्रामाणिक कष्टकरी बापाच्या वाट्याला इतकी घोर विटंबना,यातना,वेदना का दिली असावी..?

                   बाप गेला.... माझा आधारवडचं गेला...बाप गेल्याचं दुःख उरात ठेवून पंधराव्या दिवसापासून बोडक्या डुईनं मी बाहेर पडलो ते एका निर्धारानं. ते म्हणजे बदली. पुन्हा बदलीच्या प्रयत्नांचा प्रयास सुरू झाला. दिवस मागे पडत होते.  बाप गेल्यानंतरचा काळ तर माझ्यासाठी अधिकच कठीणाईचा होता. मागे आई एकटीच गावी असे. मी इकडे असा. शनिवारी कधी गावी निघालो की आपोआपच डोळे भरून येई.. या अगोदर माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला बाप होता.. आता बापसारखी वाट कोण बघेल माझी..? माझ्यासाठी घालमेल कोण करून घेईल..? मी खोलीतच रडून मोकळा होई आणि मग घरी जाण्यास बाहेर पडे. 

या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते माझे गुरुवर्य थोर साहित्यिक सुनीलकुमार लवटे सर. सरांच्या घरी मी वरचेवर जात असे, माझं दुःख मी व्यक्त करीत असे. सरांना माझी सगळी परिस्थिती ठाऊक होती. एकीकडे बाप गेल्याचं दुःख तर दुसरीकडे पोटाच्या भाकरीचा हा संघर्ष. मी पूर्णतः खचून गेलो होतो. आणि या काळात मला सर्वात मोठा आधार होता तो म्हणजे लवटे सरांचा.अखेरच्या काळात लवटे सरांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांनाही मर्यादा होत्या. एक दिवस याबाबत चर्चा करताना लवटे सर निर्वाणीचे बोलले, "किरण तू आता काही तरी पर्याय बघ...तुझी बदली होईलच ह्या विश्वासावर थांबू नकोस." सर असे म्हणाले आणि माझं अवसानच गळालं. सर बोलले आणि माझा धीरच चेपला. काय करावं कळत नव्हतं. सगळी सैरभैर अवस्था झालेली.मी त्यांच्या बोलण्यावर विचार केला. सरांचे अगदी बरोबर होते.. आता किती दिवस अधांतरी दिवस काढायचे. आणि मग मी कळंबा परिसरात क्लासेस सुरू करण्याचे ठरविले. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. क्लासेसाठी जागा ही बघितली. पण मूळचा बदलीचा विषय काही मनातून जात नव्हता. वाटायचं आता पर्यंत बदलीसाठी एवढी धडपड केली, एवढे प्रयत्न केले ते असेच सोडून द्यायचे का..? प्रयत्न सोडून देणे मला चुकीचे वाटायचे...आपल्या हातात काय आहे...शेवटी प्रयत्न. मग सगळंच सोडून देण्यापेक्षा आपण तेवढे तरी करू शकतो.. आपली हार निश्चितच दिसत होती.  अशावेळी आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं मी ठरवलं होतं. आणि मग दोन पर्याय घेऊन प्रयत्न करू लागलो.. एकबाजूला क्लासेसचा विचार आणि दुसऱ्या बाजूला बदलीचा. 

 मी त्या काळात पहाटे पावणेपाचला व्यायामासाठी बाहेर पडत असे. तेव्हां त्या वेळेपासून बदलीच्या विचारांचे चक्र मनात फिरत असे. रणनीती आखीत असे. एकीकडे आठवणीतला बाप आठवत असे आणि दुसरीकडे बदलीचे  विचार सोबत घेऊनचं चालत असे. कळंबा तलावाच्या भिंतीवरून पळत जाताना त्या पहाटेच्या गर्भात बाप मनात जिवंत होई..बाप मला काहीतरी सांगतोय असे वाटे....बाप मला म्हणतोय.."लेका आता रडायचं नाही..लढायचं." आणि हेच वाक्य माझ्या मनात पक्कं ठसलं.. पुन्हा नव्याने लढण्याची मला ऊर्जा मिळे. आणि आता बाप आठवून रडायचं नाही तर आता लढायचं.. बापच माझ्या लढण्याची आता प्रेरणा झाला होता...भलेही मेलेली माणसं बाहेरच्या जगातून जात असतील पण आतल्या जगात ती जिवंत असतात...माझा बाप माझ्या मनात जिवंत होता.. माझ्याशी बोलत होता. मला आधार देत होता. मला लढ म्हणत होता.

  ....शेवटी हारण्याची शक्यता वाटत असताना मी आणखीन एक पाऊल टाकलं होतं.. आणि अखेर अखेरच्या प्रयत्नांनी माझी यशाची वाट मोकळी केली म्हणायला हरकत नाही...यश मिळो अथवा न मिळो शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे माझ्या हातात होतं.... शेवटी  माझा माझ्या प्रयत्नांवर विश्वास होता आणि शेवटपर्यंत चिकाटी न सोडल्यामुळे यशाची पहिली पायरी मी चढलो.  ज्या क्षणांसाठी दिवस आणि रात्र एक झाली होती. त्या क्षणांची मला चाहूल लागली. बदलीचे संकेत दिसू लागले. यश मला खुणावू लागलं. इतक्या वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळाला. बदलीच्या हालचालींना वेग आला आणि ३१ मे २०२१ रोजी बाप गेला..त्याच्या बरोबर एक वर्षाने माझी बदली झाली. आणि १ जून २०२२ रोजी मी अनुदानित शाळेत हजर झालो. बाप जाण्याच्या आणि बदली होण्याच्या या घटना किती जवळच्या होत्या. बाप जाताना मला हा आशीर्वाद देऊन गेला....

         एका बापाकडे कसा दूर दृष्टीकोन असतो त्याचे हे उदाहरण...माझा बाबा अडाणी होता तरी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. डी. एड केल्यानंतर मी बी.एड केल्याचा फायदा म्हणून त्या पदवीच्या आधारावर माझी अनुदानित शाळेत माध्यमिककडे बदली झाली. आज बाप माझा जिवंत नाही पण आज बाप नसताना त्यावेळचा बापाचा तो दृष्टीकोन आज माझ्या जीवनाची दिशा बदलून गेला. मी शिक्षण घेऊनही शिक्षणाचं महत्व ओळखलं नव्हतं. मी बी.एड करायचे नाकारत होतो.. आणि बाप माझा काही शिकलेला नव्हता तरी शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी मला बी एड करायला लावलं...म्हणून तर माझी बदली मला करून घेता आली. याचा अर्थ  बाप नेहमी आपल्या लेकराचा  चार पाऊले पुढे जाऊन विचार करीत असतो. आज माझी बदली झाली माझा पगार सुरू झाला याच्या मुळाशी बापाने त्यावेळी करून ठेवलेला तो विचार होता. 

       माझ्यासाठी मागे सुखाची वाट दाखवून बाप पुढे कष्टत निघून गेला. बाप जिवंत असताना बदलीसाठी खूप धडपड केली पण बाप गेल्यावर ती फळाला आली. माझा पगार बघणं त्याच्या नशिबात नव्हतं माझ्या बदलीच्या अगोदरचं बापाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.. शेवटी हेच प्रारब्ध असावं. 

               बाप धडपडत त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला जायचा. बापाच्या अंतसमयी मी त्या पांडुरंगाला फार बोल लावले...अरे विठ्ठला कसला न्याय दिलास माझ्या बापाला.? तुझी माळ गळ्यात घातली. पंढरीचा वारकरी बाप झाला. पडत झडत तुझी वारी केली..तुझ्या त्या भक्ताचा माझ्या बापाचा असा का शेवट केलास...? हाच सवाल मी त्याला आजही विचारतो....पण एकीकडे आता वाटतं. त्यानं एका बापाची पुण्याई एका लेकाच्या वाट्याला दिली असावी... कुणाच्या रूपातून परमेश्वर आपला साक्षात्कार घडवून आणेल कोण जाणे..? कारण माझ्या बदलीच्या काळात असा एक परमेश्वर मला भेटला. पंढरपूरच्या विठ्ठलाने आपल्या आंधळ्या भक्ताच्या लेकरासाठी संत एकनाथाला पाठवून द्यावा तसा एकनाथ आंबोकर साहेबांसारखा सज्जन माणूस शिक्षणाधिकारी म्हणून मला लाभला. 

" माझिया जातीचे मज भेटो कोणी.." या प्रमाणे माझी चिंता हरणारा, दुःख मागे सारणारा , माझ्या संघर्षाला न्याय देणारा माझा सुखकर्ता दुःख हरता माझा म्हणावा असा माणूस मला भेटला. अगदी जिव्हाळ्याने त्यांनी मला समजून उमजून घेतले. माझी परिस्थिती त्यांना ज्ञात झाली. माझा बदली प्रस्ताव दाखल झाला आणि आंबोकर साहेबांच्या स्वाक्षरीने मला मान्यता मिळाली..पण अजूनही काही विघ्ने पार करावयाची होती. बदली मान्यता मिळूनही शालार्थ आय डी मिळण्यासाठी पुन्हा अडचणी उभ्या राहिल्या. संघर्ष काही संपत नव्हता अखेरच्या काळात तर तो माझी सत्वपरिक्षाचं बघत होता. वर्ष सरत आले तरी पगार होत नव्हता. पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता असा एक पाठीराखा. तो पाठीराखा म्हणजे आंबोकर साहेब.

एकेकाळी त्या आयाबाया म्हणत होत्या. ते किती खरं होतं.."आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखी..."हा परमेश्वरचं बापाच्या माघारी एक बाप होऊन पाठराखण करीत होता. शालार्थ आय डी मिळेपर्यंत आंबोकर साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून हे काम करवून घेतले...आणि एके दुपारी डी.एस.पोवार साहेबांचा फोन आला. आणि ती आनंदाची सुवार्ता कानी पडली " किरण तुझे शालार्थ आय डी चे काम झाले." मन आनंदून गेले.घरात बातमी सांगताच साऱ्यांना आनंद झाला. सुटकेचा एक दीर्घ निश्वास टाकला. 

               संस्था अध्यक्ष आदरणीय श्री.हरिभाऊ पुंडपळ साहेब, सचिव श्री. सदानंद पुंडपाळ सर,संस्था संचालक श्री. शिवाजीराव पन्हाळकर सर, श्री. दशरथ अस्वले सर तसेच जि. प. कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी आदरणीय एकनाथ आंबोकर साहेब , शिक्षण उपसंचालक महेश चोथे साहेब, डी.एस.पोवार साहेब आणि शिक्षण निरीक्षक आर. जी. चौगले साहेब,मुख्याध्यापक शरद पाटील सर यांच्या योगदानातून अखेर माझ्या संघर्षगाथेचे यशोगाथेत रूपांतर झाले. 

               मी मागे म्हटलं ना..बाबा जाण्याच्या आणि माझी बदली होण्याच्या घटना किती जवळच्या आहेत. आणखीन एक म्हणजे बदली होऊनही पगार सुरू होण्यास  वर्षभर विलंब लागला आणि बाबा गेल्याच्या एका वर्षाने बदली आणि बरोबर दुसऱ्या वर्षी पगार सुरू होत आहे. 



हा पगार म्हणजे आमच्या सर्वांच्या आयुष्यात बारा वर्षांनी आलेला असा एक यशस्वी क्षण आहे..की डी.एड झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप शिक्षक होण्यासाठी झुंज दिली.. माझे बाबा, माझी आई..थोरली बहीण आक्का, जयश्री या सर्वांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला.आपलं कष्टाचं, त्यागाचं, संघर्षाचं समर्पण दिलं त्याचं फळ म्हणजे हा यशाचा क्षण आहे...आई बाबाने तर माझ्यासाठी आयुष्य वेचलंचं पण माझ्या बहिणीनी देखील माझ्यासाठीही खूप मोठा त्याग केला आहे. माझ्यासाठी लहान वयात हातात खुरप घेऊन अखंड राबणं त्यांच्या वाट्याला आलं.  आज त्यांच्या हातात असलेलं खुरपं ही त्या त्यागाची निशाणी आहे. 

           आज मागे वळून पाहताना मी विचार करतो..बारा वर्षांत भलेही मला चार पैसे नाही कमवता आले, पण या काळात मला माझी म्हणणारी अनेक माणसे भेटली.. एकटा जीव मध्ये दादा कोंडके म्हणतात " मला या जन्मी पैसा, प्रसिद्धी, संपत्ती,प्रतिष्ठा खूप मिळाली पण माझी म्हणणारी माणसं मला मिळाली नाहीत पुढील जन्म मिळाला तर मला काही नको पण माझी म्हणणारी मला माणसं हवीत."  म्हणून पैसा किती कमावला यापेक्षा आपली म्हणणारी माणसं किती मिळाली याला मी नेहमी महत्व देत आलो. या माझ्या कठीण काळात मला माझ्या माणसांनी खूप आधार दिला..मला जपलं.. आणि हीच माझ्या या काळातली खरी कमाई आहे.तीच माझी खरी शाश्वत लाखमोलाची संपत्ती आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणाईत राहणेच पसंद करेन.

ज्या क्षणासाठी जगण्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला तो क्षण आज आला...एका तपाच्या प्रतीक्षेनंतर आणि कठोर संघर्षातून त्या क्षणाने आज आमच्या आयुष्यात पदार्पण केले आहे...ही सुवार्ता मला पहिल्यांदा सांगावीशी वाटेल ती माझ्या बाबाला..

 बाप सारखा विचारायचा कधी सुरू होणार पगार..? कधी सुरू होणार..?

आता ऐकायला येशील का रे..?

    "बाबा....पगार सुरू झाला ."

ऐकतोयस ना..? 

बाबा पगार सुरू झाला...

हेच ऐकायसाठी अधीर झालेला असायचास ना.

पण हे ऐकायच्या अगोदरच निघून गेलास...

बाबा पगार सुरू झाला..म्हणून साद घालून कुणाला रे मी आता आनंदून सांगायचं... 

कुणाच्या मिठीत माझा आनंद साजरा करायचा...

तुझ्या अंधारलेल्या डोळ्यांत मला आज दाटलेले दोन आनंदाश्रू बघायचे होते रे..

तुझ्या तोंडातून माझ्यासाठी दोन कौतुकाचे शब्द ऐकायचे होते.

बाबा आज तुला कडकडून मिठी मारायची होती ..

बाबा...

खूप पोरकं वाटतं रे तू गेल्यापासून... 

तू गेल्यापासून नुसता तुझ्या आठवणींनी दीनवाण्यासारखा फिरतो.

बाबा तुझ्या त्या दोन प्रश्नाची उत्तर तेंव्हा माझ्याकडे नव्हती मी निरुत्तर असायचो.

.. ती आज आहेत...

पण ती उत्तरं ऐकायला तू नाहीस.

गरिबीच्या वैराण वाळवंटात आई बाबा तुम्हीं हे रोपटं लागलात पण त्याच्या सावलीत बासायचं ,त्याची गोड फळं चाखायचं बाबा तुझ्यात भाग्यात नव्हतं.

                  आयुष्याच्या रणांगणावर अंधारल्या डोळ्यांनी काळोखाच्या खाईत स्वतःला लोटून देत शेवटपर्यंत बाप शर्थीने लढला .येणाऱ्या प्रत्येक संकटांना हिंमतीने तोंड देत राहिला. जगण्याची फार मोठी ईच्छाशक्ती मनात होती माझ्या बाबांची.. अजून जगायचं होतं..ही ईच्छा बाबांचे शेवटचे मरण मुख पाहताना मला स्पष्टपणे जाणवत होती. अखेर त्या जर्जर रोगांनी शरीरावर विजय मिळवला खरा..पण खंबीर मनाने, हिमतीने,जिद्दीने ,स्वाभिमानाने आणि कष्टाने आयुष्याशी दिलेली निकराची झुंज. त्या झुंजार बापानेच हा यशाचा पाया रचला.  म्हणून आज आमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आजचा क्षण आला...पगार सुरू झाला पण बाप निघून गेला. गड आला पण माझा सिंहचं निघून गेला..

- किरण सुभाष चव्हाण.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...