फॉलोअर

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

पुस्तक परीक्षण - जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.'




जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.'


                                उसाच्या कांडक्यांनं पाठीमार मार देत आईनं शाळेला घातलं. पाठीवरच्या मारानं लेखकाचं पाटीवरचं शिक्षण सुरू झालं. अक्षरांच्या वळणापासून जीवनाच्या खऱ्या वळणाला इथूनच सुरुवात होते. घरचं आठरविश्व दारिद्र्य. बाप काहीसा विरक्ती  वृत्तीचा. बापाला कोणतंही व्यसन नसताना देखील संसारात लक्ष कमीच. त्यामुळे संसाराचा जास्त करून भार आईच्या खांद्यावरच. भौतिक सुखाच्या लोभापायी घर दुभंगणारी कोत्या वृत्तीची आत्ती आतून किती निष्ठूर असते, यावरून नाती जशी भासतात तशी असतातचं असे नाही, याचा प्रत्यय येतो. शेती-घराच्या वाटणीवरून भाऊबंदकीतला तिडा आणि मग वाटणीवरून सतत एकमेकाला भिडा. त्यातून हाणामारीपर्यंत उद्भवणारा तंटाबखेडा हा भाऊबंदकीतला कडवटपणा म्हणजे कुठंही जावे पळसाला पानं तीनंच, हे इथंही प्रकर्षाने दिसून येतं. गावात प्राथमिक शिक्षण सुरू असताना सकाळ संध्याकाळ शेरड-गुरं राखत शाळा शिकायची. लेखकाचे बालपण अगदी माती, नदीनाला, रानाशिवारात, झाडाझुडुपांच्या संगतीत गेले आहे. बालपणाच्या लहरी स्वभावामुळं विचलित होऊन शाळेकडे लक्ष कमी होतं. आणि मग सवंगड्यांसोबत दिवसभर हुंदडायचं, कुत्रं पळायचं, असा सारा उद्योग. परंतु वेळीच शिक्षकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे व मार्गदर्शनामुळे नव्याने शाळेची सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात शिक्षकांनी पाठ करून घेतलेली कुसुमाग्रजांची ‘कणाʼ ही कविता. खरंतर हीच कविता पुढे लेखकाच्या आयुष्याचा ‘कणाʼ होते. या कवितेपासूनच वक्तृत्व कलेचा पाया घातला जातो. बालपणापासून संघर्षाच्या तीव्र झळांचे चटके लेखकाला पदोपदी सहन करावे लागतात. शाळा शिकत पोटासाठी पडेल ती मोलमजुरीची कामे करावी लागतात.


दहावीला जेमतेम गुणांनी पास झाल्यानंतर गरिबीमुळे पुन्हा शिक्षणात खंड पडतो आणि मग MIDC मध्ये हेल्पर म्हणून तुटपुंज्या पगाराची नोकरी करावी लागते. पण यावेळी एक अनपेक्षितपणे अपघात होतो. आणि यात गुडघ्याला झालेली दुखापत. इथे कहाणी एक वेगळं वळण घेते. वाईटातून एकेकदा चांगलं घडतं त्या पद्धतीने या प्रसंगातून पुन्हा एकदा शिक्षण सुरू होतं. शिक्षण घेण्याच्या इच्छेला गावच्या काही प्रतिष्ठितांनी सांगितलेल्या सल्ल्याचं बळ मिळतं. मावळलेला उत्साह पुन्हा जागृत होतो. आणि पुढील शिक्षण कोल्हापूर येथील कॉलेजमध्ये सुरू होतं. गरिबीतून आलेला व शिक्षणात जेमतेम असलेला एक मुलगा इथे आल्यानंतर त्याच्यात झालेले बदल मात्र वाचकाला अवाक् करतात. लेखकाला अवगत असलेली मूळची भाषणकला या ठिकाणी चांगली बहरते. लेखकाला एक वेगळी ओळख निर्माण करून देते. कॉलेजमधील चांगले मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी प्रिय शिक्षक यांच्या सकारात्मक सहवासामुळे लेखकाच्या स्वभावात विलक्षण फरक पडतो. अभ्यास आणि मित्रपरिवार यांमध्ये लेखक रममाण होतो. अकरावीत असताना सुमन नावाच्या मुलीशी मैत्रीचे बंध जुळतात, पण यात प्रेमासारख्या भावनेला थारा न देता आईवडिलांच्या विश्वासास पात्र ठरण्याची आकांक्षा बाळगलेली सुमन मैत्रीतील पारदर्शीपणा राखते, हे प्रत्येक नितांतसुंदर मैत्रीसाठी आदर्श ठरणारा किस्सा आहे. पुढे बारावीत संज्ञा नावाच्या मुलीशी मैत्रीचे नाते जपत असताना अखेर लेखकाच्या प्रेमाची  संज्ञा स्पष्ट होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते व हळूहळू दोघेजण एकमेकांत गुंतत जातात. पण हे प्रेम निस्वार्थी, निकोप आणि विश्वासूपणाच्या आधारावर वास्तवाचे भान असणारे होते. त्यामुळे प्रेमाच्या भरात असतानाही दोघांचे अभ्यासाकडे मात्र बिलकुलही दुर्लक्ष होत नाही. कॉलेजमध्ये सेक्रेटरी पदाची झालेली निवडणूक आणि त्यात एका मताने झालेला पराभव. परंतु विजय झालेल्या मित्राने आपल्या विजयापेक्षा आपल्या मित्राच्या पराभवाने रडू कोसळावे, हे निरपेक्ष व जिंदादिल मित्राचे उदाहरण वेधक ठरते. रात्रीचा दिवस करून घेतलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर लेखक संरक्षणशास्त्र विषयात ९८ गुण घेऊन ७२% गुणांनी बारावीत उत्तीर्ण होतो. आणि एवढेच नाही तर एक सामान्य विद्यार्थी म्हणून आलेला विद्यार्थी मेन राजाराम कॉलेजचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करतो. लेखकाच्या यशाचा हा चढता आलेख प्रेरणादायी तसाच सुखावणारा वाटतो. दरम्यानच्या काळात वक्तृत्व कलेतून विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळत जाते. आणि अत्यंत अभिमान वाटावा असा प्रसंग म्हणजे जेंव्हा राजस्थान येथे एका कार्यक्रमात युवा वक्ता म्हणून हिंदीतून भाषण करण्याचा सुवर्णक्षण लेखकाच्या आयुष्यात येतो. 


शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगून डी.एड करण्याचं ठरतं, पण पहिल्या प्रवेश यादीत नसणारे नाव यामुळे पदरी आलेली निराशा आणि शेवटी मग निश्चित झालेला प्रवेश यामुळे झालेला आनंद. दरम्यानच्या काळातली हुरहूरता, अस्थिरता आणि दुःखावेग मनात काहूर माजवतो. पण शेवटी सुख आणि दुःख अशा भावनेच्या दोन भिन्न टोकांचं दर्शन होतं. डी.एड ला प्रवेश मिळवण्याचं पूर्ण केलेलं वचन संज्ञाला सांगण्यासाठी लेखकासह चौघे मित्र  सायकल ट्रेकिंगचा बहाणा करून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जातात. तो प्रसंग थक्क करतो. तिथे संज्ञाच्या घरच्या लोकांच्याकडून घरात एक व बाहेर दुसरीच मिळालेली वागणूक ही अनपेक्षित असते व तिथेच दोघांच्या प्रेमाच्या नात्याचा अंत होतो, ते दोघांच्या प्रेमभंगाचे दुःख मनाला असह्य करते. पुढे मात्र लेखकाच्या आयुष्यात वेगळेच वळण येते. संघर्ष आणखी बिकट बनतो. वडिलांना कुष्ठरोगाचे निदान होते व त्यानंतरची एकूणच परिस्थिती थक्क करणारी आहे. वडिलांचा हट्टी स्वभाव असल्याने बरी होणारी जखम वडिलांच्या बेजबाबदार वागण्यानं पुन्हा बळावणं, किंबहुना त्या जखमेतून अक्षरशः जंतू बाहेर पडतात, एकूणच तो प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो. आणि मग नाईलाजाने कुष्ठरोग्यांच्या दवाखान्यात त्यांना दाखल करावे लागतं. या रोगामुळे वडिलांची झालेली सैरभैर अवस्था, नातेवाईक लोकांच्याकडून वडिलांचा झालेला अपमान- उपहास मनाला विदीर्ण करतो. परंतु या काळात लेखकाने व आईने वडिलांची केलेली शुश्रूषा, घेतलेली काळजी, दिलेला आधार हे मुलग्याच्या कर्तव्यपालनाचं आदर्श उदाहरण वाटतं. हा रोग बरा होऊन शेवटी वडील त्या दवाखान्यातील कुष्ठरोग्यांची शुश्रूषा करण्यात रमतात, हे वाचून समाधान वाटते. 


मित्राचे औदार्य काय असू शकते, याचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे आधुनिक कृष्ण-सुदामा मैत्री. आजूबाजूच्या घरांत कालानुरूप बदल झाला आहे, जुनी कात टाकून नवीन घरं उभी राहिली आहेत. केवळ लेखकाचे वगळता. अशा वेळी उदय नावाचा मित्र घरी येतो आणि सरोज मी तुझं घर बांधून देणार आहे, ही प्रबळ इच्छा बोलून दाखवतो. अट एकच की शेवटपर्यंत याची वाच्यता कुठेही करायची नाही. मित्राचे हे वेडं धाडस होतं. याला कितीही विरोध केला तरी मित्र आपल्या निर्णयावर ठाम आणि काहीच दिवसांत या मित्राच्या धडपडीमुळे नवं घर उभा राहतं. शेवटी लेखक आपल्या मित्राचे पैसे परत करतो हा भाग वेगळा; पण एक मित्र आपल्या मित्रासाठी काय करू शकतो. मित्रत्वाची भावना किती उदात्त असते, हे यावरून कळते. हे वाचत असताना अशा मित्राला मनोमन सलाम करावासा वाटतो.


डी.एड चे शिक्षण करतानाच लेखक ग्रामीण पत्रकारितासुद्धा पूर्ण करतो. याचा पुढे खूप फायदा होतो. सकाळकडे बातमीदार म्हणून काम करू लागतो. समाजात घडणाऱ्या नानाविध चांगल्या वाईट घडामोडींचा वेध लेखक घेतो. अतिशय तळमळीने प्रामाणिकपणे आणि परखडपणे केलेल्या वार्तांकनांमुळे अल्पावधीतच एक नवी ओळख निर्माण होते. अंधारातलं वास्तव सत्य प्रकाशात आणण्याचा लेखक आटोकाट प्रयत्न करत असतो आणि त्यात तो यशस्वी होत जातो. यातून लोकांशी बरेवाईट संबध तयार होतात. लोकसंग्रह वाढतो. मोठ्या लोकांचा जवळून सबंध येतो. अन्याय, भ्रष्टाचार, अविवेकीपणा विरुद्ध लेखकाचे विचार बंड करतात व आपल्या लेखणीतून ते प्रकट करतात. कामाच्या वाढलेला विस्ताराचा परिणाम म्हणजे  डी.एड ला कमी गुण पडतात. कमी गुणांमुळे सरकारी शिक्षक भरतीतील संधी हुकते. त्यामुळे मग शेवटी नाईलाजाने विनाअनुदानित शाळेत अल्पमानधनावावर शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागते. अशाप्रकारे शिक्षक व बातमीदार असा दुहेरी प्रवास सुरू होतो. परिस्थितीशी झुंज सुरू असतेच. मनात नसतानाही घरच्यांच्या आग्रहावरून लग्न होतं आणि सुसंस्कृत, गुणी व सामंजस्य ‘शिल्पाʼ पत्नी म्हणून लेखकाच्या आयुष्यात येते. येथेच लेखकाच्या आयुष्याला एक आशादायी शिल्पकार वळण मिळते. विनाअनुदानित तत्वावरील अधांतरी नोकरीची शाश्वती न धरता स्पर्धा परीक्षा देण्याची महत्त्वाकांक्षा लेखकाच्या मनात बळावते. पण मुळात गणित विषय कच्चा. ही मुख्य अडसर. पण नेमकी गणित विषयात पत्नी वरचढ. त्यामुळे संसाराची गणितं जुळवताना गणित विषय पत्नीकडून शिकून घेऊन पक्का केला जातो. म्हणजे पत्नीसुद्धा आपली कशी गुरू होऊ शकते, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळते. पत्नीच्या खंबीर साथीने लेखक पुन्हा आव्हाने पेलण्यास सिद्ध होतो. आर्थिक परिस्थितीवरून होणाऱ्या सामाजिक-मानसिक अवहेलनेकडे दुर्लक्ष करत दोघेही आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात. बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी पती-पत्नी कोचिंग क्लास सुरू करतात. पण इकडे स्थिर नोकरीची आस लेखकाला लागून राहिलेली असते. त्यामुळे नोकरीच्या संधीची वाट पाहात असतो. आणि एक दिवस ती संधी येते. नोकरी संदर्भ वाचत असताना विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये नोकरभरतीची जाहीरात वाचण्यात येते. आणि सर्वशक्तीनिशी या पदासाठी लेखक प्रयत्न करतो. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी विशेष कष्ट घेतो. आणि नोकरीचं एक दिव्य कष्टाच्या बळावर पूर्ण करतो. २०११ साली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मधील नोकरीत लेखक रुजू होतो. संघर्षाची नवनवीन वळणे घेत सध्या इथपर्यंतच्या वळणावर लेखकाचं जीवन स्थिरावलेलं आहे.


हा एकंदरीत प्रवास वाचत असताना आपण लेखकाच्या भूमिकेत जातो. घडणाऱ्या प्रसंगांशी एकरूप होतो. लेखकाचे शब्दांकित अनुभव वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. अस्वस्थ करतात. वाचन करताना मनात भावनांचे आंदोलनं सुरू होते. काही प्रसंग अगदीच थक्क करणारे, मनाला भिडणारे किंबहूना वडिलांच्या अपमानाचे प्रसंग तर जिव्हारी लागणारे आहेत. 


आयुष्याच्या खडतर प्रवासात टाळता न येणारी वळणे असतात आणि त्या वळणावर आपल्याला स्वतःहून वळण घ्यावं लागतं. वळण घेताना नव्या वळणाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक वळणावर संघर्ष हा ठरलेला असतो. काट्याकुट्याने वाट भरलेली असते. ऊन, वारा, पाऊस झेलावा लागतो, अनपेक्षित वादळ येत असतात. एकप्रकारे परिस्थितीला आपण कसे तोंड देतो .जीवनाच्या या परीक्षेत आपण कसे उत्तीर्ण होतो, याला महत्व असते. जीवन-मरणाच्या मधल्या वाटेत लागणारं वळणच जीवन घडवत असतं. अशाच वळणांवर आधारित हे पुस्तक आहे. जीवनाच्या वाटेवरील चढउतार स्वीकारत सकारात्मकतेकडे जाणारे हे वळण आहे. अपयशाचं, अपमानाचं, संघर्षाचं यशात रूपांतर करणारं हे वळण आहे. वि.स.खांडेकरांच्या अमृतवेल पुस्तकात सांगितल्याप्रमाणे   " एखादं स्वप्नं पाहणं, फुलवणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपणं, पण दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यांरून रक्ताळलेल्या पावलांनी पुढे जात एखादं स्वप्नं पुन्हा पाहणं, फुलवणं व वास्तवात उतरवणं यामुळे मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो." या ओळी लेखक खऱ्या अर्थाने जगला आहे. जीवनातील प्रखर संघर्षामुळे आणि कष्टप्रद वळणाने शेवटी लेखकाच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. ज्या आईने उसाच्या कांडक्याने पाठीवर मार देत शिक्षणाच्या प्रवाहात आणून सोडलं त्या माउलीला हे पुस्तक वाचल्यानंतर कोणीही अभिमानाने सांगेल "माउली तुझं हे पोर चांगल्या वळणाला लागलं बरं का."

हे पुस्तक वाचून कुठे तरी वळचणीला धडपणारी पोरं खऱ्या अर्थाने वळणाला लागतील. फक्त एकदा त्यांनी हे पुस्तक हातात धरलं पाहिजे. मनापासून वाचलं पाहिजे. खरंतर आत्मचरित्र म्हटलं की, वयाच्या उत्तरार्धात पूर्वार्धापासून मांडलेला लेखाजोखा. असा प्रकार सर्वश्रुत आहे. पण असे कोणतेही बंध या पुस्तकाला लागू नाहीत. लेखकाने अगदी तरुण वयातचं आपल्या पूर्वार्धाच्या अस्वस्थ संघर्षाला वाचा फोडून साहित्यक्षेत्रात वळणच्या रूपाने एक अनोखी देण दिली आहे. तरुण, युवा, शिक्षित पिढीला संघर्षातून आपली वाट निर्माण करण्यासाठी नक्कीच हे पुस्तक मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. खासकरून राज्यातील अनेकवर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांनी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. कारण पगाराच्या आशेवर दिवस न कंठता नवीन वळण घेऊन आपली एक स्वतंत्र वेगळी वाट निर्माण करण्याचं उदाहरण हे पुस्तक घालून देतं. जीवनाच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना, हतबल झालेल्या जीवांना योग्य दिशा, ऊर्जा देणारे असे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे सरांच्या प्रस्तावनेतून लेखकाच्या पुस्तकाच्या अंतरंगाचे प्रतिबिंबित्व उमटलेले आहेच. तर मलपृष्ठावरील डॉ. राजा दीक्षित (अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) यांचा पुस्तकाविषयीचा सारांशरूपी अभिप्राय वाचकांस वाचनासाठी अभिप्रेत करतो. जीवनाच्या वाटेवरची अनपेक्षित वळणं समजून घ्यायची असतील, तर सरोजकुमार सदाशिव मिठारी यांचे वळण हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.


- किरण सुभाष चव्हाण.(कोल्हापूर)

मोबा- ८८०६७३७५२८.

पुस्तकासाठी संपर्क :


बुधवार, १३ एप्रिल, २०२२

बुक रीडिंग - डॉ सुनील कुमार लवटे डॉ नरेंद्र दाभोलकर अथव और जागर द्वारा संपादित

 

बुक रीडिंग - डॉ सुनील कुमार लवटे डॉ नरेंद्र दाभोलकर अथव और जागर द्वारा संपादित।


डॉ नरेंद्र दाभोलकर आठव और जागर एक ऐसी किताब है जो मन में विवेक पैदा करती है।

                                 यह एक ऐसी किताब है जिसे एक बैठक में पढ़ा जा सकता है। मैंने वरिष्ठ लेखक और विचारक डॉ. सुनील कुमार लवटे द्वारा संपादित डॉ. नरेंद्र दाभोलकर आठव और जागर नामक पुस्तक पढ़ी। कुछ ही महीनों के भीतर मासिक स्मृति जागर व्याख्यान कार्यक्रम शुरू किया गया। उस कार्यक्रम में पाँच व्याख्यानों का संग्रह प्रस्तुत एक पुस्तक है। इस पुस्तक में हमें उन महान लोगों के विचारों का सार पढ़ने को मिलता है जो सीधे जुड़े हुए थे और जिनके साथ काम किया था उन्हें। डा. दाभोलकर के कार्य योगदान, विचारधारा, व्यक्तित्व के विभिन्न पहलुओं का अनावरण करते हुए दाभोलकर एक व्यक्ति नहीं बल्कि एक विचार हैं।

                        डॉ। नरेंद्र दाभोलकर का काम उस काम के सामने की चुनौतियाँ, उनका यादगार व्यक्तित्व, साहित्य के क्षेत्र में उनकी उपलब्धियाँ। दाभोलकर, जो सुरेश भट और कुसुमराज जैसे दिग्गज कवियों द्वारा अपनी कविताओं के लिए जाने जाते हैं। वास्तविक अर्थों में, उन्होंने साधना पत्रिका को ऊर्जा दी और इसे विशाल उपभोग की एकमात्र पत्रिका बना दिया। उन्होंने दिखाया कि कैसे हम किसी भी क्षेत्र में अपनी लगन के बल पर ऊंचाइयों तक पहुंच सकते हैं।

                       देश में मार्क्सवादी, गांधीवादी, हिंदुत्व, अम्बेडकरवादी विचारधारा जैसी विचारधाराएं हैं। समय के साथ वे कैसे प्रभावी ढंग से प्रवाहित होती हैं। इसका विस्तृत उपचार यहां पढ़ा जा सकता है। चर्च जो पूजा स्थल हुआ करते थे अब सांस्कृतिक केंद्र बन रहे हैं और यह बदलाव आज से 30 साल पहले शुरू हुआ था। और सवाल यह उठता है कि क्यों हाल ही में मंदिरों की संख्या में वृद्धि, स्कूलों की संख्या के बजाय जो अभी भी सामाजिक परिवर्तन का केंद्र हैं, हमारे लिए चिंता का विषय है।

                       नई पीढ़ी के मन में नरेंद्र दाभोलकर की यह समझ कि मानव जीवन की मान्यताओं, अंधविश्वासों, प्रथाओं और परंपराओं को तोड़कर एक तर्कसंगत, वैचारिक और वैज्ञानिक समाज का निर्माण करना चाहिए, तर्कसंगत जीवन को स्वीकार करना, विज्ञान को स्वीकार करना और जीवन के मूल्यों को स्वीकार करना चाहिए। सत्य की कसौटी पर, असामाजिक अंधविश्वासों से बचना, विचारधारा और ननिवा की भावना पैदा करने का कार्य अब उनके पीछे पुराने और बुद्धिमान लोगों के हाथ में है। और सही मायने में इस पुस्तक में महान हस्तियों द्वारा व्यक्त विचार ईमानदारी से उन विचारों को जागृत कर रहे हैं जो डॉ नरेंद्र दाभोलकर के विचारों की विरासत को अगली पीढ़ी तक पहुंचाएंगे।

                       कुल मिलाकर डॉ. नरेंद्र दाभोलकर की पुस्तक आठव और जागर को पढ़ते समय यह सोचने पर मजबूर हो जाता है कि जीवन के मूल्य क्या होने चाहिए, लक्ष्य क्या होना चाहिए, सिद्धांत क्या होना चाहिए। और गुप्त विवेक मन का निर्माण करता है।

                                                                     - किरण चव्हाण. 8806737528.

Book Test - This is what happened Rajaswini - Vijayalakshmi Devgoji.

 

Book Test - This is what happened Rajaswini - Vijayalakshmi Devgoji.


 Mrs. Vijayalakshmi Vijay Devgoji's book 'Ashi Ghadali Rajaswini' is a collection of cultured letters.


                                  Her parents, brothers, grandparents went to Rajasthan at an early age for Navodaya education and got the post of Indian Revenue Service (IRS) from UPSC on the strength of their studies. The present book contains a collection of letters written by grandfather and uncle. In the first section, there are letters written under this name by the mother who loves her child. The chariot of love, rites, and guidance has been carried through the letters of Madhulika. No matter how far your loved one is from you, words work to bridge the gap between two souls. What is in the letter written by mother to her beloved Leki ..? The essence of the whole life, The philosophy is hidden in it. In Leki's absence, she lives with her whole world in mind. And that's what she keeps saying in the letter. Sending a letter every week without fail is her motto. And she never breaks it.


                                       Mother writes a letter from Lanza district-Ratnagiri. Nature from Konkan sends rain, soil, water of Parhya, trees and wind to Rajasthan in a letter. The mother tries to express in words where she has gone, what she has done, what she has brought new, festivals and seasons. One by one, she writes in the letter. At the beginning of such a letter, the core of the letter is the culture. And the purpose of the letter is to make Madhulika realize the high goal. Strengthening the goal in her mind, mother Narendra Jadhav's father and we give the father's sentence in the book as a reference. That is, the innate qualities, intelligence, decisiveness, Seeing the repressive attitude, her goal is to become an IAS officer. And it is her parents and all her relatives who are trying to make her happy. 

                                    And so even though she is far away for the sake of education, she has been guided through her letters through letters. On the one hand, to increase the concentration of the mind, while reciting the Ramsrot and Atharvashirsha recitations, on the other hand, to increase the knowledge, the mother sends the questions and answers of the general knowledge through the letter. A mother who emphasizes the importance of evening masculinity is now rare. One of the features of this letter is that it conveys general knowledge questions. The mother suggests a meaningful poem, a summary essay, a list of books to read with reference to the books she has read, decides which books to give her during her visit, and basically Madhulika is fond of extra reading, poetry. While cultivating linguistics, she talks about the importance of Maiboli Marathi and also urges her mother to master English, how to speak and write English, how the village doctors, teachers or relatives appreciate Madhulika. And the mother easily achieves the goal of building self-confidence. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother instinctively seeks to increase Leki's enthusiasm and self-confidence by urging her to write, how the village doctors, teachers or relatives appreciate Madhulika, how she will become a successful and capable girl. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother instinctively seeks to increase Leki's enthusiasm and self-confidence by urging her to write, how the village doctors, teachers or relatives appreciate Madhulika, how she will become a successful and capable girl. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother consciously mentions in the letter how she will be a successful and capable girl, so that the mother can easily achieve the goal of increasing Leki's enthusiasm and self-confidence. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother consciously mentions in the letter how she is going to be a successful and capable girl. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality.

                                  If mother doesn't care about hair to nails then who cares ..? The mother should tell the mother how to take care of her hair, eating, sleeping, getting up. Every word flows from mother to mother. It turns out that this is a concern for a favorite item. There is always a comment to reply to her. But while doing all this, she is a mother. She has to give up her mother's temptation and throw away her stomach for education for her bright future. Without Leki, mother is insufficient. Her life is beautiful. She evokes the memory of Leki moment by moment and moment by moment. Only she lives with the body and her whole life is with Leki.

                               Dad's Letters to Madhulika In this section, there are letters written by Dad to his Leki. Baba says in one place, you two children are the source of our consciousness in this desolate life. In his letter to Baap Leki, Baap gives Lekki a comprehensive lesson on how to compete, how to maintain gratitude, how to maintain friendship, how to correct mistakes. While replying to Leki's letter, he compliments her. The father greets his darling Leki, who is far away, with the help of Madhuli, Chimani, Pillai. Appreciating her cleverness, my father says that my lake is the Krishna of my knowledge. In any case I.A. This goal of S. Vyach is firmly rooted in Leki. No matter how much he does, his father is also injured inside for Leki. Such art asks. If the letter does not come, he smiles and if it does, he is happy. Leki's coming letter is a sprinkling of joy over sadness. If the letter does not come, he smiles and if it does, he is happy. Leki's coming letter is a sprinkling of joy over sadness. If the letter does not come, he smiles and if it does, he is happy. Leki's coming letter is a sprinkling of joy over sadness.

                              The letters written by the brother to the sister are also similarly cultured. Your brother is firmly behind you in any crisis. Did you forget your sister? My brother's answer to this is that it would be the most impossible thing in the world. Along with the study, he is aware of his situation, the hardships of his parents. He has a good friend in his brother-in-law. Sister brother's strong love can be seen in the letters.

            The letters written by such grandparents and uncles are rich and prosperous. The mother of the young Madhulika says this in a letter to her when she comes to visit. You can smile while reading such a list of 'Aanaani'. Prakash realizes that this is what we used to say when we were that age. In her letter, she feels a sense of innocence, purity, meaningful words from a child. Feelings of guilt about the frugality of money, savings and money spent by mistake, honestly admitting your mistake and getting rid of it. The progress in studies, the success in essay writing, the appreciation of the teachers, with which Madhulika went there, does not detract from it in the slightest.

                This is the fruit of the rites in which the letters in the book presented in this way went on to make history in the true sense of the word. He was promoted to the post of IRS. This is how the revenue of Madhulika happens. Blessed are the parents who give birth to such gems. That is why it is called pure seeded fruit juicy gomati. This is an example of that. In the journey from the little honeymoon to today's revenue,

These sacramental letters are true witnesses in the journey of success. I mean, what letters do alchemy. This book shows how important the role of letters was in the formation of Madhulika which is at the peak of supreme success today. 


                    In today's age of social media, letters are kind of left behind. Today, we are connected through many social media like WhatsApp, Facebook, Twitter with a single click. The world of an artificial emotion is expanding day by day. Where there is only talk but there is no communication. These are shallow mediums that connect and express each other. Today, a huge treasure of knowledge is available on mobile, WhatsApp University. But I don't know what to take, how much to take and how to take it. Excessive use of mobiles is the cause of our own destruction. The letter, on the other hand, expresses natural feelings. The stomach descends from the fingers to the leaves. What can be said can be expressed precisely. Letters were a thread connecting two souls, a relationship. And the book shows what letters can do in today's age of social media. 

                      From this book, an ideal family of Devgoji family, love in relationship, harmony among all, culture, unity is to be taken by all. The correspondence in the book is introspective on how letters are used to communicate with distant relatives against the backdrop of the disappearance of communication between family members today. The layout of the letters, the combination of thoughts, emotions, language style, fluency keep the reader hooked. While reading each letter, the reader enters into that role. All of these letters are so expressive, meaningful and cultured that, Even the mind of the reader does not survive without an unintentional version. The longing for love is intense. Reading how much the moments of separation bother the mind, our mind also becomes restless, fluid. Sometimes the mind is full. The eyes are filled with tears. 

                      In fact, the feelings expressed in these letters are the feelings in the minds of each and every parent. Because if my parents could read and write, that's what they would have told me. Today, every parent has such a condition that he cannot speak with his mouth and cannot write with his hands. That is, the feelings of the mind cannot be conveyed to his mind accurately. Such parents should read this book carefully. In fact, they should read it to their children. Teachers should read this book and let the students read it. This book is written for me by my parents as well as students and children. The sentiments in this letter should be read with understanding. Thoughts in him should be brought into practice. After reading these letters, if yesterday's little madhulika today IR. If S is taking a leap to this post, then why can't you take a leap by reading these letters ..? Therefore, it is an important and informative book that every parent should read and collect by sensitive readers.

Uncle-in-law

Madhulika Devgoji-Kadam Akshay Kadam


- Kiran Subhash Chavan. (Kolhapur)

  8806737528.






Book: That's what happened, Rajaswini
Pages: 217
Book Price: 160 / -

Contact for book - 
Mrs. Vijayalakshmi Vijay Devgoji.
Mob- 84463 75251

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

पुस्तक परीक्षण -अशी घडली राजस्विनी - विजयालक्ष्मी देवगोजी.


 'अशी घडली राजस्विनी' हे सौ.विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांचे पुस्तक म्हणजे संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा आहे.


                                  लहान वयात नवोदय शिक्षणाच्या निमित्ताने राजस्थान येथे गेलेल्या आणि अभ्यासाच्या जोरावर आईवडिलांच्या संस्कारावर यु.पी.एस.सी.मधून Indian Revenue Service (आय.आर.एस) पदाला गवसणी घातलेल्या आपल्या लाडक्या परीला  (राजस्विनीला) लहान असताना तिच्या आईवडिल,भाऊ,आजी-आजोबा व मामांनी लिहिलेल्या पत्रांचा समुच्चय प्रस्तुत पुस्तकात आहे. पहिल्या विभागात आईने आपल्या लेकीला प्रिय मधूल्यास या नावाने लिहिलेली पत्रं आहेत.व्याकुळ मायेनं ओतप्रोत भरलेल्या साद घातलेल्या मधूल्या शब्दांपासून पुढचा सगळा मायेच्या भावनेने ओथंबलेला शब्द प्रवास सुरू होतो. मधूलीकाच्या गोतावळ्यातील मायेचं,संस्कारांचं,मार्गदर्शनाचं शब्दरूपी प्रवासाचं सारथ्य पत्रांनी पार पाडलं आहे. आपल्या जिव्हाळ्याचं माणूस आपल्या पासून कितीही दूर असो दोन जीवांच्या अंतरास जोडण्याचं काम शब्द करतात. आईनं आपल्या लाडक्या लेकीला लिहीलेल्या पत्रात काय आहे..? आख्या जीवनाचं सार,तत्वज्ञान त्यात दडलेलं आहे.मायेनं,विरहाने,काळजीनं लेकीसाठी आसुसलेली ओथंबलेली आई पत्रातील प्रत्येक शब्दागणिक जाणवते. लेकीच्या अनुपस्थितीत तिचं सगळं भावविश्व मनात घेऊन जगते ती.आणि तेच ती पत्रात मांडत राहते.आठवड्यातून एक पत्र न चुकता पाठविणे हा तिचा शिरस्ता आहे.आणि यात ती कधीच खंड पाडत नाही.


                                       लांजा जि-रत्नागिरी येथून आई पत्र लिहिते.कोकणातील निसर्ग पाऊस,माती,परह्याचं पाणी,झाडं-वारा हे सारं पत्रातून राजस्थानला आपल्या लेकीला पाठवते.जे ती जगते, पाहते,वाचते अनुभवते ते ते सारं पत्रात मांडत राहते.घरात घडणारे प्रसंग,घडामोडी,कुठे गेले, काय केले नवीन काय आणले,सणवार, ऋतुमान जेवढं म्हणून काही सांगता येईल ते क्षण शब्दकणांतून मांडण्याचा आईचा यत्न असतो. मनकोपऱ्यातला एक नी एक भाव ती पत्रात टिपते. असा पत्राचा आरंभ करता करता पत्राचा मूळ गाभा हा संस्कारणाचा आहे. आणि पत्राचा उद्देश हा मधूलिकाला उच्चध्येयप्राप्तीची जाणीव करून देण्याचा आहे. तिच्या मनातील ध्येय दृढ करताना आई नरेंद्र जाधवांच्या आमचा बाप आणि आम्हीं पुस्तकातील बापाचं वाक्य संदर्भ म्हणून देते.आपण ज्या क्षेत्रात जायचं त्यात सगळ्यात सर्वोच्च उंचीला जायचं. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मधूलीकाचे उपजत गुण,बुद्धिमत्ता,निर्णयक्षमता,निग्रह वृत्ती हे पाहून तिचं ध्येय ठरलेलं आहे.ते म्हणजे आय.ए.एस व्हायचं. आणि त्या अनुषंगाने तिची जडणघडण करण्याचा ध्यास तिच्या आईवडिलांचा आणि साऱ्याच नातलगांचा आहे. 

                                    आणि म्हणून ती शिक्षणाच्या निमित्ताने जरी दूर असली तरी तिला तिच्या ध्येयाच्या वाटचालीत दिशा देण्याचे काम पत्रांच्या माध्यमातून केले आहे. एकीकडे मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी रामस्रोत व अथर्वशीर्ष पठण करण्याचे उपदेश पुन्हा पुन्हा करताना दुसरीकडे ज्ञानाचा विस्तार वाढवण्यासाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्नोत्तरे पत्रातून आई पाठवते. सायंकाळच्या शुभंकरोतीचे महत्व पटवून देणारी अशी आई आता दुर्मिळच. पत्रातून सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाठवणे हे एक या पत्रांतील विशेषत्व आहे. एखादी अर्थपूर्ण कविता,सारांश लेख पाठवणे,वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देऊन कोणती पुस्तकं वाचायची याची यादी आई सुचवते, तिच्या भेटीत तिला कोणती पुस्तके द्यावयाची ते ठरवते आणि मुळात मधूलीकाला अवांतर वाचनाची,कवितेची गोडी आहे.हा एका साहित्यिक आईचा लेकीवरील संस्काराचा प्रभावचं म्हणायचा.भाषाज्ञानाचे संस्कार करताना मायबोली मराठीचे महत्व ती सांगतेचं आणि इंग्रजीवरसुद्धा प्रभुत्व कसं मिळवावं,इंग्रजी बोलावं, लिहावं यासाठी आई उद्युक्त करते, गावाकडील डॉक्टरकाका,शिक्षक किंवा नातेवाईक मधूलीकाचे कौतुक कसे करतात,ती यशस्वी कर्तबगार मुलगी कशी होणार हे बोल आई जाणीवपूर्वक पत्रात नमूद करते यावरून लेकीचा उत्साह व आत्मविश्वास वाढीस लावण्याचा उद्देश आई सहजगत्या साधत असते. त्याचसोबत आपल्या नातेवाईकांना मैत्रिणींना सुद्धा पत्र लिहिण्यास सांगते यावरून नाती कशी जोडावीत, ती कशी जपावीत हा संस्कारदेखील आई नकळत आपल्या लेकीवर करत असते. अशा प्रत्येक संस्कारातून स्व ची ओळख घडवून का जगावं आणि कशासाठी जगावं..? हा वस्तुपाठ आई पत्रांतून घालून देते. इतरांहून आपलं वेगळं अस्तित्व, व्यक्तिमत्त्व निर्माण करून आपलं जगणं समृद्ध करता करता इतरांचं जगणं समृद्ध करण्याचा परमोच्च संस्कार पुस्तकातील सर्व पत्रांचा केंद्रबिंदू आहे.

                                  केसांपासून नखापर्यंतची काळजी आईला नाही तर मग कुणाला..? दूर कोसावरच्या लेकीची वेनीफणी,केसांची निगराणी कशी राखावी हे आईनंचं सांगावं,खाणंपिणं-झोपणं-उठणं साऱ्याची काळजी आई प्रत्येक शब्दांतून वाहते.पत्राचा शेवट करताना पप्पा,आई आबा,मोती , सायकल सगळे बरे आहेत.हे न विसरता नमूद करत असते म्हणजे आईला आपल्या मुलांच्या आवडीच्या वस्तूची ही काळजी असते हे कळते. तिची ख्यालीखुशाली कळण्यासाठी पत्रोत्तर दे अशी  टिपण्णी असतेच असते. पण हे सर्व करत असताना ती एक आई आहे. आईपणाच्या मोहमायेचा त्याग करून शिक्षणासाठी पोटच्या गोळ्याला  तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी दूर लोटावं लागलेलं आहे.अशावेळी  एक आई म्हणून दूरच्या लेकीसाठी काय असेल त्या आई मनाची अवस्था ? लेकीविना आई अपुरी आहे.तिचं आयुष्यं सूनं सूनं आहे. ती क्षणाक्षणाने आणि कणाकणाने लेकीच्या आठवणी मनात जागवते आहे.केवळ ती शरीराने जगते आणि तिचा संपूर्ण जीव लेकीपाशी आहे. लेकीच्या आठवणींनी आई व्याकुळ होतेय,झुरतेय रडतेय कासावीस होतेय एकेकदा लेकीचा विरह तिला सहन नाही होत एखाद्यावेळी लेकीचं पत्रोत्तर आलं नाही तर ती लटकेच रागावते,काहीशी चिडते पुन्हा पुढच्या पत्रात पत्रोत्तर देण्याची आठवण करून देते.या साऱ्यावरून आईच्या प्रेमाची काळजीची आणि अंतर्मनाची कल्पना कुणालाही येऊ शकते.पत्राचा आधार घेऊन तिच्या व्याकुळ जीवाचा पक्षी शब्दरूपाने झेप घेत लेकीकडे धाव घेतो लेकीचा ठाव घेतो.

                               मधूलिकाला पप्पाची पत्रे या विभागात बापानं आपल्या लेकीला लिहिलेली पत्रे आहेत.पप्पाची लाडकी चिमणी घरट्यातून दूर प्रदेशात शिक्षणासाठी गेलीय.जळी स्थळी नुसती लेकीची आठवण हृदयात भरून राहते. बाबा एके ठिकाणी म्हणतात आताच्या निरसवाण्या आयुष्यात तुम्ही दोन लेकरं आमच्या चैतन्याचा झरा आहात.आमच्या आयुष्याचं ध्येय तुम्हां दोघांना मोठं करणं त्यासाठी सर्वस्व पणाला लावणं यातच आहे. निकोप स्पर्धा कशी करावी, कृतज्ञता कशी जपावी मैत्री कशी निभवावी,चूक कशी सुधारावी अशा सर्वांगीण मूल्य संस्करांचा वस्तुपाठ बाप लेकीला पत्रातून घालून देतो. लेकीच्या पत्राला उत्तर देताना तिचं कोडकौतुक करतो.माझी लेक किती समजूतदार,शहाणी,गुणी आहे असा बाप लेकीला बोलून दाखवतो.तिच्यावरचा विश्वास वृद्धिंगत करत राहतो. बाप दूर असलेल्या आपल्या लाडक्या लेकीला मधूली,चिमणी,पिल्ल्या अशी अनिवार मायाळू साद पत्रातून घालतो.तिच्या हुशारपणाचं कौतुक करताना माझी लेक म्हणजे माझा ज्ञानाचा कृष्णचं आहेस असा बाप म्हणतो. कुठल्याही परिस्थितीत आय.ए. एस व्हायचचं हे ध्येय लेकीच्या ठायी घट्ट रुजवतो. कितीही केलं तरी बाप सुद्धा लेकीसाठी आतून घायाळ असतो.म्हणून लेकीच्या पत्रोत्तरासाठी आतुर असणारा बाप कामावरून सांजवेळी घरी परतल्यानंतर चौकशी करतो.माझ्या लेकीचं पत्ररुपी सांजपक्षी आलाय का हो..? अशी आर्त विचारणा करतो. पत्र आलं नसेल तर हिरमुसतो आणि आलं असेल तर आनंदाने वावरतो. लेकीचं येणार पत्र म्हणजे उदासवण्या दुःखावर उत्साही आनंदाचे होणारे सिंचनचं होय.

                              भावाने बहिणीस लिहिलेली पत्रे देखील अशीच संस्कारसंपन्न अशी आहेत.पत्रातील शब्दांनी भाऊ बहिणीच्या नात्यातील स्नेह किती घट्ट,दाट व मधाळ आहे हे उमगते. कोणतेही संकट येऊ दे हा तुझा भाऊ खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे.हा थोर आधार भाऊ देत असतो. बहिणीला विसरला का रे..? यावर भावाचे उत्तर हे जगातली सर्वात अशक्य गोष्ट असेल असे आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या परिस्थितीचे,आईवडिलांच्या कष्टाचे भान करून देत असतो.भावामध्ये एक चांगला मित्र आहे.म्हणून आकर्षण या प्रकरणात  वाढत्या वयाच्या नैसर्गिक भावनेबद्दल मनमोकळेपणाने बोलणारा असा भाऊ क्वचितच असावा. बहीण भावांचं घट्ट प्रेम पत्रांतून व्यक्त होताना दिसतं.बहिणीच्या ध्येयप्रतीच्या वाटचालीत भावाने पत्ररूपाने  केलेलं मार्गदर्शनही मोलाचे आहे.

            अशीच आजी आजोबांनी, मामाने लिहिलेली पत्रं समृद्ध संपन्न अशीच आहेत.मधूलिकाने पत्रोत्तर लिहलेली पत्रे ही मनाचा वेध घेतात. लहानग्या वयाची मधूलिका आई भेटीला येताना हे आण ते आण म्हणून पत्रातून सांगते. अशी 'आणाआणीची' यादी वाचताना हसू येतं. आपण ही त्या वयाचे असताना हेच बोललो असतो हे प्रकर्षाने जाणवतं. तिच्या पत्रातून तो निरागसपणा,स्वच्छदीपणा बालमातून अवतीर्ण झालेल्या अर्थपूर्ण शब्दांची मांदियाळी मनाला भावते. पैशाची काटकसर,बचत आणि चुकून अनाठायी खर्च झालेल्या पैशाबद्दलची व्यक्त केलेली अपराधीपणाची भावना,प्रामाणिकपणे आपल्या चुकीची कबुली देऊन मोकळे होणे.अगदी कमी वयातला तिच्यातील शहाणपणा,समजूतदारपणा पत्रांतील शब्दागणिक समजून येतो. अभ्यासातली प्रगती,निबंधलेखनातील यश,शिक्षकांचे कौतुक जो ध्यास घेऊन मधूलिका तेथे गेली होती अगदी त्यात किंचितही ती कमी पडत नाही. शिक्षणातील तिची होणारी भरभराट तिचा आत्मविश्वास जिद्द चिकाटी निग्रह ठाम निर्णयक्षमता याचे दर्शन तिने लिहिलेल्या पत्रप्रपंचातुन होते.

                अशाप्रकारे प्रस्तुत पुस्तकातील पत्रांनी पुढे जाऊन जो खऱ्या अर्थाने इतिहास रचला तो म्हणजे हे यातील संस्कारांचे फळ आहे.आईबाबा,शिक्षक,भाऊ,आजीआजोबा, मामा यांनी मधूलीकाला दिलेल्या शिस्त,संस्कार ,आधार आणि तिच्या अभ्यासाच्या जोरावर यु.पी.एस.सी परीक्षा देऊन २०१९ साली आय.आर.एस पदावर आरूढ होते. अशाप्रकारे मधूलीकाची अशी ही राजस्विनी घडते. धन्य धन्य ते मातापिता ज्यांच्या पोटी अशी रत्न जन्माला येतात. म्हणूनचं म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्याचेच हे उदाहरण आहे. लहानग्या मधूलिकापासून आजच्या राजस्वनीपर्यंतच्या प्रवासातील,

यशाच्या वाटचालीत ही संस्कारशील पत्रं हे खरे साक्षीदार आहेत. म्हणजे पत्रं काय किमया करतात. आज सर्वोच्च यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या मधूलिकाच्या जडणघडणीत पत्रांची भूमिका किती महत्वाची होती.हे या पुस्तकातून कळून येते. 


                    आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रं हा प्रकारचं मागे पडला. आज व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा अनेक सोशल माध्यमातून वरून एका क्लिक वरून आपण जोडले जातोय. एक कृत्रिम भावनेचं जग दिवसेंदिवस विस्तारत चाललंय.जिथं फक्त बोलणं होतं पण संवाद नाही होत.जिथं शब्द पोहोचतात पण अर्थ पोहोचलेच असं नाही. एकमेकांना जोडणारी,व्यक्त होणारी ही उथळ माध्यमं आहेत.आज ज्ञानाचा प्रचंड खजिना मोबाईल,व्हाट्सएप युनिव्हर्सिटीवर उपलब्ध आहे. पण काय घ्यायचं,किती घ्यायचं व कसं घ्यायचं हे कळत नाही. मोबाईलचा अतिवापर हा आपल्याच नाशास कारणीभूत ठरतो आहे.  याउलट पत्रातून नैसर्गिक भावना व्यक्त होतात. पोटातलं बोटांतून अलगद पानांवर उतरतं. काय म्हणायचं ते नेमकेपणाने व्यक्त होता येते. पत्रं हा दोन जीवांना,नात्यांना जोडणारा धागा होता. आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात पत्रं काय करू शकतात हे पुस्तक दाखवून देतं. 

                      या पुस्तकातून देवगोजी कुटुंबाचा एक आदर्श कुटूंब,नात्यातील प्रेम,सर्वांच्यातील सुसंवाद, सुसंस्कार,एकोपा  हा साऱ्यांनी घेण्यासारखा आहे. आज घरातल्या माणसांतील संवाद नाहीसा होतोय या पार्श्वभूमीवर दूरच्या नातेवाईकांशी देखील पत्रांतून कसा संवाद साधला जातो या पुस्तकातील हा पत्रव्यवहार अंतर्मुख करतो.सर्वच व्यक्तींनी लिहिलेली पत्रांतील भाषा ही साधी सोपी व ओघवती आहे.मुळात विजयालक्ष्मी देवगोजी या ज्येष्ठ साहित्यिका असल्याने त्यांच्या साहित्यिक लेखनाची छाप शब्दांतून कळते. पत्रांची मांडणी,विचार भावना, यांची गुंफण,भाषाशैली, ओघवतेपणा वाचकाला खिळवून ठेवतो. प्रत्येक पत्र वाचताना वाचक त्या भूमिकेत शिरतो.आईबाबा ,भाऊ किंवा आजी आजोबा मामां यांनी पत्रात व्यक्त केलेल्या भावनेशी समरस व्हायला होते.भावनेच्या तरंग लहरीवर वाचक स्वार होऊन आपणही हेलकावे घेतो. यातली सर्वच पत्रं इतकी भावपूर्ण, अर्थपूर्ण आणि संस्कारशील आहेत की,वाचकाच्या मनाचे देखील नकळत संस्करण झाल्याशिवाय राहत नाही.मायेची ओढ घनदाट असते विरहाचे क्षण मनाला किती सतावतात हे वाचताना आपले मन सुद्धा बैचेन होते,द्रवते.जणू वाटते आपल्याच मायेचं एखादं माणूस दूर आहे असं वाटत राहतं. कधी मन भरून येते.डोळे अश्रूंनी ओथंबतात. 

                      खरंच या पत्रांतील व्यक्त झालेल्या भावना या प्रत्येक आईवडिलांच्या मनातल्या भावना आहेत.खरं तर मधूलिकाच्या आईवडिलांनी साऱ्याच आईवडिलांच्या मनातील भावभावनेला इथं व्यक्तरुप दिलंय. कारण माझ्या आईवडिलांना जर लिहिता वाचता आलं असतं तर त्यांनी हेच मला सांगितलं असतं. आज प्रत्येक आईवडिलांची अशी अवस्था आहे तोंड असून बोलता येत नाही आणि हात असुन लिहिता येत नाही.आणि आपलं लेकरू आपल्या पुढ्यात असुन त्याला जे सांगायचं आहे ते सांगता येत नाही. म्हणजे मनातील भाव नेमकेपणाने त्याच्या मनात उतरवता येत नाही. अशा आईवडिलांनी आवर्जून हे पुस्तक वाचलं पाहिजे.किंबहुना मुलांना पुढ्यात घेऊन वाचून दाखवलं पाहिजे.शिक्षकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे विद्यार्थ्यांना वाचावयास दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी व मुलांनी देखील हे पुस्तक म्हणजे माझ्याच आईवडिलांनी माझ्यासाठी लिहिलं आहे.या पत्रातील भावना या माझ्यासाठीच आहेत असं समजून वाचलं पाहिजे. त्याच्यातील विचार संस्कार आचरणात आणला पाहिजे. ही पत्रं वाचून जर कालची एक लहानगी मधूलिका आज आय.आर. एस या पदापर्यंत झेप घेत असेल तर ही पत्रं वाचून आपण ही अशी का नाही झेप घेऊ शकणार..? म्हणून प्रत्येक आईवडिलांनी मुलांनी संवेदनशील वाचकांनी वाचावेचं आणि संग्रही ठेवावे असे हे एक महत्त्वाचे मोलाचे संस्कारशील पुस्तक आहे.

मामा-भाचरे

मधूलिका देवगोजी-कदम अक्षय कदम


- किरण सुभाष चव्हाण.(कोल्हापूर)

  ८८०६७३७५२८.






पुस्तक : अशी घडली राजस्विनी
पृष्ठे :२१७
पुस्तक मूल्य : १६०/-

पुस्तकासाठी संपर्क - 
सौ.विजयालक्ष्मी विजय देवगोजी.
मोबा- 84463 75251

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

वाचक प्रतिक्रिया - शिक्षण क्षेत्रातील विदारक सत्य विनाअनुदानितची संघर्षगाथा - प्रा.डॉ. संजीवनी शिरगुप्पे



शिक्षण क्षेत्रातील विदारक सत्य विनाअनुदानितची संघर्षगाथा - प्रा.डॉ. संजीवनी शिरगुप्पे.

                       ही लढाई आम्ही जिंकूच शंभर टक्के अनुदान हा आमचा हक्क मुखपृष्ठावर लाल व काळ्या रंगाच्या वापराने लक्ष वेधून घेणारे शीर्षकवजा शब्द दाखवतात शिक्षकांचा निर्धार किरण चव्हाण यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाद्वारे केलेली जनजागृती व विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथांना वाचा फोडण्याचे महत्वाचे काम केले आहे. शिक्षणक्षेत्रातील विचारवंत व कार्यकर्ता श्री. हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेचा शेवट या शब्दात केला आहे, एकाचवेळी बुद्धीने भावनेने लिहिलेली ही वेदनेची बखर आहे', यातच या पुस्तकाचे सार आलेले आहे. 

                            लेखक किरण चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये लिहिलेले आहे की या विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथेचं एकेक पान जोडत गेलो तर संघर्षाची गाथा होऊन जाईल', आणि खरंच ही संघर्षगाथा तयार झाली.विनाअनुदानित धोरण म्हणजे काय इथपासून सुरुवात झाली की आपल्याला कळतात या धोरणाचे झालेले दुष्परिणाम. एकेका शिक्षकाची होणारी होरपळ, दीर्घकाळ विनावेतन काम करताना कुटुंबाची झालेली होरपळ, सातत्याने आर्थिक विवंचनेत राहिल्याने झालेले मानसिक आघात, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची झालेली परवड, पोटापाण्यासाठी बाहेर मोलमजुरी करून, शेतात काम करुन शिकवण्याचे काम करणारे हतबल शिक्षक, ग्रामीण व शहरी दोन्ही भागात विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना भयंकरच आहेत. रक्षाबंधन व भाऊबीज या दोन सणांना बहिणीला साधी शंभर दोनशे रुपयांची साडी सुद्धा न देऊ शकणारे शिक्षक, बिनपगारी फुल अधिकारी म्हणून हिणवले जाणारे शिक्षक ... अशा कितीतरी वेदना, हुंकार पानोपानी वाचायला मिळतात.

विनाअनुदानित शिक्षकांची संघर्षगाथा अगदी सुसंगतपणे सगळ्या गोष्टींचा उलगडा करत जाते ते केवळ किरण चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण तसेच सोप्या व ओघवत्या भाषेमुळे. या संघर्षाच्या मुळापर्यंत घेऊन जाण्यात लेखक यशस्वी होतो.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात डिसले गुरुजींच्यासमोर विरोधाभास दाखविणारे एक पत्र अरविंद जगताप ( पत्रवाचन - सागर कारंडे) यांनी सादर केले होते. ज्या महाराष्ट्रात एक शिक्षक आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट शिक्षक ठरु शकतो, त्याच महाराष्ट्रात आज विनाअनुदानित शिक्षकांच्या वाट्याला किती निकृष्ट परिस्थिती आली आहे हे दाहक सत्य त्यांनी मांडले होते. संघटना व आंदोलनांनी हा प्रश्न सुटलेला नाही. एकीचे बळ दाखवूनच हा प्रश्न सुटू शकतो, हे लेखकाचे म्हणणे गांभीर्याने घेतले पाहिजे. यात संस्था व संस्थाचालकांची भूमिका ही सरंजाम पद्धतीची आहे. शिक्षकांची पिळवणूक ही वेठबिगारांपेक्षाही भयानक आहे. अर्थात काही संस्था व संस्थाचालक याला अपवाद आहेत. पण मुळात पदवीधरांची वाढती संख्या व नोकऱ्यांची घटती संख्या हा प्रश्न आणखीनच जटील बनवत आहे.

               महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना लेखकाने हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनाही हिंदीमध्ये पत्र लिहून विनाअनुदानित शिक्षकांची सद्यस्थिती विशद केली आहे. पण खाजगीकरणाकडे झुकलेले व अनेक ज्वलंत प्रश्नांवर उदासीनता दाखवणारे हे सरकार विनाअनुदानित शिक्षकांना न्याय देऊ शकेल असे दुरान्वयानेदेखील वाटत नाही.

                          लेखक व शिक्षक श्री. किरण चव्हाण यांचे अभिनंदन करायलाच हवे. या प्रश्नाचा त्यांनी सर्वांगिण आढावा घेतला आहे. कोणताही प्रश्न सुटू शकतो व तोडगा निघू शकतो यावर ठाम विश्वास असणाऱ्या लेखकाने घेताना या क्षेत्रातील विचारवंतांचे, नामवंतांचे विचार नोंदविले आहेत. सरकारने तातडीने पावले उचलून शैक्षणिक क्षेत्राची होणारी वाताहत थांबवण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. सरकारने संवेदनशीलता दाखवून हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. दोन पिढ्या घडविणार्या शिक्षकाचा आर्थिक प्रश्न जर सरकार सोडवू शकले तर ते नक्कीच अभिनंदनास पात्र ठरतील. समाज घडविणार्या शिक्षकांना न्याय व सन्मान देण्याची आज अत्यंत निकड आहे. समाजातील सगळ्याच घटकांनी हा संघर्ष आपलाच आहे असे मानून या संघर्षांत भाग घेतला पाहिजे. हा संघर्ष आपलाच आहे असे मानून या संघर्षाची धार वाढवायला हवी व सरकारला झुकवायला हवे. 

 प्रा.डॉ. संजीवनी शिरगुप्पे दौंड जि. पुणे

-----------------------------------------------------

विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.







सत्तापरिवर्तनाने प्रश्न सुटत नसेल तर सत्ताउच्चाटनाशिवाय पर्याय नाही. - किरण चव्हाण.| गजानन खैरे आंदोलन.



सत्तापरिवर्तनाने प्रश्न सुटत नसेल तर सत्ताउच्चाटनाशिवाय पर्याय नाही.         

                              महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांपासून विनाअनुदानितचा प्रश्न सतर पेटत आहे.पावणेदोनशे आंदोलने झाली,उपोषणे झाली.या काळात किती सरकारं सत्तेवर आली-गेली.पण कुणालाच हा प्रश्न मुळापासून सोडवता आला नाही.सत्तापरिवर्तन होऊन देखील मूळ प्रश्न सुटत नसतील तर यावर उपाय काय..?

                   गजानन खैरे नावाचा एक विनाअनुदानित शिक्षक गेल्या २० वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या आपल्या विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनींना हक्काचे अनुदान मिळावे या करिता औरंगाबाद येथील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अन्नत्याग उपोषण करीत आहेत. उपोषणाचा आजचा सातवा दिवस. तरी आजतागायत शासनाकडून याची किंचितदेखील दखल घेतली गेली नाही.शिक्षण खात्याच्या मंत्री असणाऱ्या वर्षाताई गायकवाड यांनासुद्धा साधे फोनवरून चौकशी करता आली नाही.सत्ताधारी असो वा विरोधक कोणीही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. सध्याचं आंदोलन हे पुन्हा एकदा  शासनाच्या अन्यायीपणाच्या  जळजळीत वास्तवाचं प्रतिनिधित्व आपल्यासमोर उभा करते आहे. गजानन खैरे यांना स्मशानभूमीतचं आंदोलन का करावे लागले ? त्यांनी जीवंतपणीच समशानाची वाट का धरली..? तर महाराष्ट्रातील आजच्या विनाअनुदानित शिक्षकांचं जीवन हे याच पद्धतीने मरणासन्न झालेले आहे. जीवंतपणीचं मरण त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. अनेक शिक्षकांनी या संघर्षाला त्रासून स्वतःहून ही वाट पत्करली आहे. कोणी ताणतणावातून अकाली या वाटेला जात आहेत.असा साधारण आकडा धरला तर आजपर्यंत २०० विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या आणि ताणतणावातून अकाली मृत्यूला कवटाळले आहे. म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्रात स्मशानभूमी म्हणजे विनाअनुदानित शिक्षकांच्या जीवनाचे  प्रतिक झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.अशाप्रकारे स्मशानात उपोषणाला बसलेल्या गजानन खैरे सरांच्या आंदोलनाची कसलीही दखल घेतली जात नाही.म्हणजे आजपर्यंत अशाच रीतीने बेदखल केलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या सोबत वागणाऱ्या शासनाच्या असंवेदनशीलपणाचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. म्हणजे एकीकडे विनाअनुदानित शिक्षकांचा संघर्ष कुठपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि दुसरीकडे शासन तरीदेखील अन्यायीपणाच्या भूमिकेवर ठाम आहे हेच पुन्हा एकदा या आंदोलनावरून स्पष्ट होते. मग प्रश्न असा पडतो की, या व्यवस्थेतल्या लोकांकडे न्याय मागायचा तरी कसा..? आणि या अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळणार तरी कसा व केंव्हा..? हा खूपच जटिल व अनुत्तरित प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर सध्या तरी कुणाकडेचं उत्तर नाही. महाराष्ट्रातील या हजारो विनाअनुदानित शिक्षक बांधवाचे जगणेच धोक्यात आले आहे. ज्यांच्या आधारावर आणि आशेवर आयुष्याची वीस वर्षे खर्ची घालून आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अध्यापन केले. त्यांना शासन अधांतरीच सोडत आहे. त्यांचा जगण्याचा हक्क डावलत आहे. राज्यकर्त्यांच्यामध्ये इतकी असंवेदनशीलता येते कुठून..?  ज्या प्रश्नांकरिता आपण यांना निवडून देतो मग सत्ता आल्यावर सोयीस्करपणे कसे काय त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. विरोधात असल्यावर प्रश्नांचे भांडवल करायचे आणि सत्तेत आल्यावर ते प्रश्नच विसरून जायचे. अशीच सर्व राज्यकर्त्यांची नीती आहे. महाराष्ट्रातले सध्याचे राजकारण इतके गढूळ आणि दूषित झाले आहे की,त्याचे गंभीर परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. आंदोलने,संप,उपोषणे करून देखील या सरकारकडून दखल घेतली जात नाही किंबहुना प्रश्न सोडवले जाऊ शकत नाही.इथल्या कर्मचारी वर्गाला आपल्या प्रश्नासाठी न्यायालयाचा आधार घ्यावा लागतो इतके हतबल झालेत लोक. एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर शेवटी न्यायालयाने तोडगा काढला हे ताजे उदाहरण आहे. म्हणजे आता लोकशाहीच्या मार्गाने आपल्या न्याय- हक्कासाठी लढा देऊन इथे न्याय मिळणारचं नाही ही शक्यता दाट होत चालली आहे. गांधीजींचा  लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने न्याय मिळण्याचा काळ गेला. आता लोकशाहीच्या कोणत्याच मार्गाने न्याय मिळणार नाही अशी व्यक्त होणारी चिंता निदान या महाराष्ट्रापुरती तरी किती भयावह आहे.यावरून आपले राज्यकर्ते किती मुजोर झालेत याची कल्पना येऊ शकते. मग आता यावर उपाय काय..? सत्ताधारी आपल्या सत्तेच्या धुंदीत आहेत. मुख्यमंत्री स्वतःच मुंबईत आमदारांना घरे देण्याची घोषणा करतात म्हणजे किती हास्यास्पद आहे. म्हणजे यांना सामान्य जनतेची घरे उभारण्यासाठी सत्तेत बसवले की आपलीच घरे भरण्यासाठी..? इथे सामान्य जनतेची घरे उजाड होतायत याचे भान यांना का नसावे ? दुसरीकडे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचे घोटाळे उघड करण्यात मश्गुल आहे. यांचे घोटाळे उघड करण्याच्या नादात सामान्य जनतेच्या प्रश्नांचाच घोटाळा होतोय हे विरोधी पक्षाच्या ध्यानात येतय कुठे. सत्ता केंद्रस्थानी ठेऊन दोन्हींकडील मंडळी आपआपसांत भांडत आहेत.पण या दोघांच्या भांडणात भरडत आहेत ते सामान्य लोक. जनतेच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करायचे कुणी..? आणि मग ते प्रश्न सोडवायचे कुणी..? असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे सत्तेतले स्वार्थाकडे, विरोधातले सत्तेकडे झुकलेले आणि जे ना सत्तेत ना विरोधात त्यांना कोणते मुद्दे घेऊन राजकारण करावे हे कळेनासे झालेले असे एकंदरीत महाराष्ट्राचे राजकारण भरकटलेले आहे.तिथे हे आम्हांला काय दिशा देणार..?

                         म्हणजे लोकांचे काहीही होवो सत्ता आम्हांला प्रिय. असच सगळं. सत्तेच्या मोहात आभाळाला टेकलेल्या या माणसांचे पाय जमिनीवर नाहीच. त्यामुळे तर मातीत जगणाऱ्या माणसांच्या वेदना यांना काय समजणार..? आज महाराष्ट्रातला शेतकरी,असंघटित कामगार,बेरोजगार, सरकारी कर्मचारी वर्ग असंतुष्ट आहे. सामान्य जनतेच्या मनात असंतोष आहे. आणि तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त होतोय. पण या सत्ताधीशांनी लोकशाहीचे मार्ग कमकुवत करून टाकले आहेत. व्यक्त होण्यापलीकडे काहीच होत नाही.त्यामुळे आताच्या हतबलतेपुढे  सत्ता परिवर्तनाची नाही तर सत्ता उच्चाटनाचीचं अत्यंत गरज वाटतेय. कारण सत्तेत असतानाच्या आणि नसतानाच्या दोघांच्याही भूमिका काही वेगळ्या नाहीत.सत्तेच्या हव्यासापोटी दोघांच्या भांडणात आता होऊ दे ना तिसऱ्याचाच लाभ. या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर बोलणाऱ्या आणि काम करणाऱ्या दिल्लीतल्या पक्षाची चर्चा इथल्या जनतेत जोर धरतेय. आपल्याच राज्यातील राज्यकर्त्यांना आपल्याच जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा विसर पडला असेल. आणि त्याचवेळी एखादा पक्ष सातत्याने त्याच मूलभूत प्रश्नांवर दुसऱ्या राज्यात आपली भूमिका बजावत असेल तर तो पक्ष जनतेला का जवळचा वाटू नये. आपले प्रश्न सोडवले जात नाहीत यात चूक त्यांची नाही चूक आपली आहे कारण आपण चुकीचे लोक प्रश्न सोडवण्यासाठी निवडलेत आणि म्हणून येणाऱ्या काळात ज्यांनी आपले प्रश्न मांडले नाहीत आणि शेवटी ज्यांनी आपले प्रश्न सोडवलेचं नाहीत यावर आपले एकच उत्तर असेल की ज्यांना आपले प्रश्न कळले नाहीत.त्यांना सत्तेत येऊ द्यायचे नाही.२० वर्षांपासून एखादा प्रश्न यांच्या हातून सुटत नसेल तर यांच्या हाती सत्ता देऊन काय उपयोग आणि म्हणून शेवटी आता आपल्या हातात आहे कुणाला स्वीकारायचे आणि कुणाला नाही.एखादा पक्ष जर दुसऱ्या एखाद्या राज्यात सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांच्यावर प्रामाणिकपणे काम करत असेल तर महाराष्ट्रातही त्याला स्वीकारायची वेळ लवकरचं आलेली आहे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नाही तर समूळ सत्ता उच्चाटनाशिवाय पर्याय नाही.


           - किरण सुभाष चव्हाण. (कोल्हापूर)

               ८८०६७३७५२८.

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..? - किरण चव्हाण.

 

महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..?

                               कुणी घर देता का रे घर ? भिंती वाचून, छपरा वाचून माणसांच्या मायेपासून ,देवाच्या दयेपासून वंचित आहे.कुणी घर देता का रे घर..?  महाराष्ट्रातल्या आमदारांची आज अशी अवस्था झाली आहे का..? आमदार इतके बेघर झालेत का.? म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत मोफत घरं बांधून देण्याची घोषणा करावी लागते. आता आमदार सुद्धा बेघरांच्या यादीत आले म्हणायचे ? मग दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबाना व बेघरांना मोफत घर हवे असेल तर त्यात आणखीन एक अट घालावी लागेल की आपण आमदार असायला हवे. म्हणजे हा विरोधाभासचं काही कळत नाही की आपला महाराष्ट्र इतका दयनीय झाला आहे की इतका समृद्ध,संपन्नशाली झाला आहे.की जो लोकप्रतिनिधीनाचं आता मोफत घरे बांधून देऊ शकतो.

                                 किती संतापजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. ज्या लोकांना आपण विकासाच्या मुद्यावर आपण  निवडून देतो ते लोक आपल्याच विकासाला प्राधान्य देत आहेत.तळे राखील तो पाणी चाखील याचा प्रत्यय जनतेला दाखवून देत आहेत.निवडणूकीच्या अगोदर स्वतःला सेवक म्हणवून घेणारे निवडून आल्यानंतर मात्र मालक कसे होतात याचे हे उदाहरण आहे. ज्या आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा करण्यात आली त्यांची सद्यस्थिती काय आहे यावर एक नजर टाकूया.सध्याच्या विधानसभेत २८८ पैकी २६४ आमदार (९३ टक्के) कोट्यधीश असून, गेल्या विधानसभेत २५३ आमदारांची (८८ टक्के) संपत्ती कोटींच्या घरात होती. विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांपैकी भाजपचे ९५ टक्के आमदार कोट्यधीश आहेत, तर शिवसेनेच्या ९३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८९ टक्के आणि काँग्रेसच्या तब्बल ९६ टक्के आमदार कोट्यवधींची संपत्ती बाळगून आहेत. २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांच्या स्वयंघोषित प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने आमदारांच्या संपत्तीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, यंदाच्या विधानसभेत तब्बल १८० आमदारांची संपत्ती ५ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असून, ६५ आमदारांची संपत्ती २ कोटी ते ५ कोटी रुपये, ३४ आमदारांची संपत्ती ५० लाख ते २ कोटी रुपये आहे. पक्षनिहाय विश्लेषणानुसार, भाजपच्या १०५ आमदारांपैकी १०० आमदार कोट्यधीश आहेत, तर शिवसेनेच्या ५५ पैकी ५१, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४७ आणि काँग्रेसच्या ४४ पैकी ४२ आमदारांकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. (संदर्भ दै महाराष्ट्र टाईम्स २७ ऑक्टोबर २०१९)

                                   एका महिन्याला आमदारांच्या पेन्शनवर सरकारला सहा कोटी रुपये खर्च करावे लागतात. सरकार आमदारांचे एवढे लाड का पूरवतेय कळत नाही.म्हणजे समाजाच्या विकासामध्ये त्यांचेच योगदान मोठे आहे का..? पाच वर्षांसाठी एकदा आमदार झालं की मग आयुष्यभर पेन्शन सुरू..दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ नंतर जुनी पेन्शन बंदचा निर्णय घेतला जातो.म्हणजे एकाबाजूला ३०-३५ वर्षें नोकरी करणाऱ्याची पेन्शन बंद आणि पाच वर्षे आमदार झालं की आयुष्यभराच्या पेन्शनची तरतूद करून ठेवली जाते.बरं आमदारांच्या पगार वाढीची विधयके चर्चेविना मंजूर होतात..आणि दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी असेल,एस.टी.कर्मचाऱ्याचे पगार, विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान,बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी वर्षानुवर्षे रस्त्यावरची लढाई लढावी लागते.या लोकांना मात्र यांना न्याय देता येत नाही.

                                अगोदरचं आमदारांचे पगार व पेन्शन या मुद्द्यांवर जनतेत तीव्र नाराजी आहे.आणि आता कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना  घर बांधून देण्याची केलेली ही घोषणा..दिल्लीचे मुख्यमंत्री सभागृहात जनतेच्या प्रश्नांना हात घालतात. सामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न आरोग्य, शिक्षण,वीज या प्रश्नांवर बोलतात.आणि आमचे मुख्यमंत्री सभागृहात आमदारांना स्वतःचे घर बांधून देण्याची घोषणा करून सर्वपक्षीय आमदारांना खूश करण्याच्या नादात एकप्रकारे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. म्हणजे किती हा विरोधाभास. तुम्हांला तीन वरून चार,चार वरून पाच कोटी आमदार निधी वाढवता येतो, त्यांना वाहन घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देता येते, आमदारांच्या पी.ए चा पगार वाढवायला पैसे आहेत आणि एका बाजूला राज्यात शिक्षण घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. तरुणांना रोजगार नाही बेरोजगारांची संख्या वाढतेचं आहे.सुशिक्षित तरुणांच्या पिढ्यान पिढ्याची बरबादी होत आहे.शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव नाही तो गळफास घेऊन मरतोय,एस. टी. कर्मचारी संपावर जातोय,आत्महत्या करतोय,..विनाअनुदानित शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून विनापगार काम करतोय,उपाशी पोटी टाचा घासतोय त्याला अनुदान देत नाहीत,सरकारी कर्मचाऱ्यांची पेंशन बंद केली जातेय, गरीब निराधार लोकांना पेंशन वाढ करण्यासाठी या लोकांच्याकडे पैसे नाहीत...

                                 मंध्यतरी तरी अजबच निर्णय घेतला गेला बेघर लोकांना घर मंजूर करायचे असेल तर अशी अट घातली गेली की त्यांच्या घरामध्ये टी.व्ही,फ्रीज,गाडी या गोष्टी नसाव्यात.म्हणजे घर हवे असेल तर तुम्हीं आणखीन किती गरिब आहात सिद्ध करावे लागेल.पण कालच्या निर्णयानुसार त्यामध्ये ही पण अट लागू करावी लागेल की,आपल्याला सरकारकडून घर हवे असल्यास आपल्याला महाराष्ट्रातला आमदार व्हावे लागेल. हे आमदार सुद्धा न बोलून शहाणे आहेत.यांना कुठं बोलायचं आणि कुठं नाही हे चांगलं कळतं. एकमेकांचे घोटाळे,वाभाडे काढणारे,आक्रमक होणारे मात्र अशा निर्णयाच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत.विरोधी पक्षपण शांत. 'तेरी बी चूप मेरी बी चूप' असा एकही आमदार नाही..?(दुर्मिळ अपवाद वगळता) की,ज्यावेळी आमदारांच्या पगारात घसघशीत पगारवाढ केली जातेय..पेंशन वाढ केली जातेय त्यावेळी याचा विरोध करण्यासाठी हे आमदार पुढे येत नाहीत. आताच्या देखील निर्णयावर पुढे येऊन बोलण्याची धमक कोणताही आमदार दाखवणार नाही. माझ्या राज्यातली जनता अजूनही बेघर आहे,फुटपाथवर दिवस काढतेय त्यांना घर नाही. पहिल्यांदा त्यांना घर द्या आम्हांला नको.असं यांना का म्हणता येत नाही.

                         माझ्या देशातल्या गरीब जनतेला पुरेसे अंगभर वस्त्र नाही मिळत म्हणून महात्मा गांधीजी स्वतः खादी वापरत पुरेसे वस्त्र घालत नसत. देशाला नाही अवघ्या जगाला संवेदनशीलतेचा आदर्श देणाऱ्या या महामानवापासून आपल्या राज्यकर्त्यांनी काय आदर्श घेतला.? आपल्या राज्यात जनता बेघर असताना आपल्या घरांची सोय करणं हा  आदर्श आपण निर्माण करताय का.? दिवंगत आमदार श्री.गणपतराव देशमुख सारखे जनतेची खरी नस ओळखणारे आमदार होऊन गेले अशा आमदारांचा आदर्श आताचे आमदार का घेत नसावेत.

                     जो उपाशी त्याला खायला भाकर नाही आणि तुपाशी आहे,ज्याचं पोट भटलरलेलं त्याला मात्र पंचपक्वांनाचं ताट वाढून ठेवलं जातेय.रोजगार,विकास, शिक्षण,आरोग्य अशा मुद्यावर यांना निवडून द्यायचं आणि यांनी मात्र आपली सोय लावून घ्यायची.मुख्यमंत्री म्हणतात आता लोकांचं झालं लोकप्रतिनिधीचं काय..? तर त्यांच्यासाठी मुंबईत कायमची घरं बांधून देणार आहोत.आणि या निर्णयांवर सभागृहात टाळ्या वाजवून स्वागत केलं जातं.कोणीच याला विरोध करीत नाही. का कारण सगळ्यांच हित त्यात आहे.मग विरोधकांचा विरोध जिंकण्यासाठी मुख्यमंत्री यांना अशी घोषणा करावी लागते का..? असा प्रश्न उपस्थित होतो.हे आमदार म्हणे लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडतात,कल्याणासाठी धडपडतात, रात्रंदिवस समाजाच्या विकासाठी झटतात.पूर्णवेळ समाजाच्या राबतात. हे काम ते करतात म्हणून त्यांना आमदार निधी,भत्ते ,सोयी सवलती पेन्शन एवढं सगळं दिलं जातं. मग हे कमी पडतंय का म्हणून त्यांच्यासाठी आता मोफत घरं बांधून देण्याचा निर्णय घेतला जातो. ग्रामीण भागातील किंवा बेघरांना घर बांधून देण्यासाठी जास्तीत जास्त दीड लाख अनुदान मिळते ते ही वेळेवर नाही आणि दिले तर हप्त्याने देतात.आणि या आमदारांना मात्र मुंबईसारख्खा ठिकाणी घरं बांधून द्यायची म्हणजे एका घराचा खर्च किती असणार याची कल्पनाचं केलेली बरी. या सगळ्याचा भार शेवटी कोणावर..? जनतेवरचं ना.म्हणजे एवढा उपद्व्याप करायला जनतेनं यांना आमदार होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं का..? उलट .तुम्हीं पैसे घेऊन काम करता त्यामुळे जनतेला तुम्हांला बोलण्याचा आणि  विचारण्याचा हक्क आहे.तुम्हीं जनतेला जबाबदार आहात. तुमच्याएवढेच किंबहुना तुमच्याहून जास्त सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे तरुण युवक,कार्यकर्ते सामाजिक संस्था देखील समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करीत आहेत.ते ही टक्केवारी न घेता. स्वार्थ न साधता.तुमच्यापेक्षा देखील सरस आणि निस्वार्थपणे काम करणारी तरुणांची फौज समाजामध्ये आहे.त्यांचीही क्षमता आहे आमदार होण्याची देताय संधी त्यांना आमदार होण्याची..? नकोय त्यांना एवढी पेन्शन नको आहेत अशी घरं. शेवटी काय चूक तुमची नाही चूक आमची आहे की,आम्ही तुम्हाला निवडून दिलं.

                  समाजातल्या विचारवंत,साहित्यिक,पत्रकार अशा जागरूक लोकांनी सरकारच्या अशा निर्णयांवर सडकून टीका केली पाहिजे.जनतेला जागृत केलं पाहिजे, तरुणांना हे समजून सांगितलं पाहिजे.की काहीतरी चुकीचं घडतंय. आणि या चुकीला जबाबदार कोण आहेत. आणि मग कुठून ही चूक दुरुस्त केली पाहिजे.याचा विचार झाला पाहिजे.जनतेनं ही ठरवलं पाहिजे. की आपण निवडून दिलेलं सरकार हे कोणत्या दिशेनं काम करीत आहे. कुणासाठी काम करीत आहे. त्यात त्यांचं स्वहित आहे की जनहित आहे.त्यामुळे आता तरी सावध होऊया आपल्या धडावर आपले डोके असायला हवे.कोणी आपल्याला सांगण्यापेक्षा आपल्याला कळायला हवे की आता कोणाला निवडून द्यायचे..? आणि कोणाला घरी बसवायचे..? 

                            जनतेचा पैसा आहे,जनतेच्या कल्याणासाठी तो तुमच्या हाती सोपवला आहे. भूकलेल्याला भाकरी द्या,बेरोजगाराला रोजगार द्या,बेघरांना घर द्या अशा नीतीने काम करीत असाल तरचं तुम्हांला या पदावर राहण्याचा हक्क आहे.नाही तर कुंपणानं शेत खाल्ल तर विचारायचं कुणाला..? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण करून देऊ नका.. सभागृहात आमदारांना स्वतःची घरे बांधून देण्याची घोषणा करणाऱ्या आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा दिल्लीच्या सभागृहात वीज,शिक्षण आरोग्य अशा सामान्य जनतेच्या प्रश्नांवर बोलणारे दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्री मला जास्त जवळचे वाटतात. आणि जवळचे वाटतात याचं कारण त्यांनी जनतेची खरी नस ओळखली आहे. याचा अर्थ आम्हांला आप जवळचा वाटतो असा अर्थ घेऊ नका. पक्ष कोणता ही असो त्याला जनतेचा बाप होता आलं पाहिजे. 

                   जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आपण किती यशस्वी आहात याचे चिंतन करा.आणि मग आमदारांचे लाड किती पुरवायचे ते ठरवा.आमदारांना स्वतःची घरे बांधून देण्याचे निर्णय घेण्याअगोदर शंभर वेळा विचार करा. नाही तर या महाराष्ट्रातल्या असंख्य बेघरांचा आणि तुमच्या कामावर असमाधानी असलेल्या जनतेचा शाप तुमच्या घरांना लागल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जर जनहित बाजूला ठेऊन स्वहित साधायला गेलाच तर त्याच घरात कायम बसवण्याची ताकद जनतेत आहे हे लक्षात ठेवा.


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...