फॉलोअर

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता. - किरण चव्हाण.



 

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता.

                                  आजचा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन सुरू झाला. भल्या पहाटेच्या समयी मनपरिवर्तनाचा झालेला साक्षात्कार हा मला अचंबित करणारा होता. याला मानवी जीवनातील एक चमत्कृती म्हणूया की, एका दीर्घ चिंतनाचा जगण्याच्या अर्थाशी घातलेला मेळ म्हणूया. ते कसं ठरवावं.?  ही घटना सांगण्याच्या अगोदर अर्थातच माझ्या मानसिक आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागेल.किंबहुना मला ती परखडपणे व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. जगणं म्हणजे समुद्राच्या लाटेसारखं चढउतार घेत किनाऱ्याला लागत असतं. तसंच जगण्याच्या चढउतारात मध्येचं घुटमळत असलेला मी. जीवनातील अशा काही घडामोडींनी सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दुभंगलेल्या मनाची नकारात्मक अवस्था. पालापाचोळ्यासारख्या विस्कटून सैरभैर झालेल्या भावना. काही केल्या ताबा मिळवता येणार नाही इतकं मोकाट सुटलेलं मन. अधीर झालेल्या मनाला संयमाच्या कोणत्या धाग्याने करकचून बांधावं अशी केविलवाणी झालेली अवस्था. सद्सविवेक बुद्धीची हरपलेली शुद्ध. वरून जरी निर्मळ शांतता दिसली तरी अविचारीपणाचे असंख्य विखारी डंख मूकपणे सोसत असलेलं आतून कमालीचं अशांत मन. अशी एक प्रकारची मनाची वादळी अवस्था. मानवी मन म्हणजे चित्रविचित्र भावनांचा आणि विचार,अतिविचारांचा माजलेला कल्लोळचं असतो म्हणा. 

                              आज विजयादशमीची शाळेला सुट्टी असल्यामुळे संपूर्ण दिवस घरीच होतो. चांगला सणाचा भरला दिवस. याचा आनंद घ्यायचा राहू द्या बाजूलाच. माझं मन एका वेगळ्याच वादळाच्या कचाट्यात सापडल्यासारखं आपल्याच भोवतीने फिरत होतं. आजूबाजूच्या परिस्थितीपासून अनभिज्ञ असलेलं मन. एखादं चांगलं पुस्तक वाचावं, नाही तरी कुठे फिरायला जावं काहीच करू वाटेना. बरं मोबाइलवर काही चांगलं बघावं तरी तिथेही मन कुठंच रमत नव्हतं, नुसत्या विचारांच्या तंद्रीत धुदंपणे सगळा दिवस झोपून काढला झोप तरी कुठली लागतेय म्हणा लोळूनचं काढला..

                           अशी सगळी आदल्या दिवशीची पार्श्वभूमी. रोजच्या सवयीप्रमाणे आज भल्या पहाटे उठून सव्वा पाचला फिरावयास बाहेर पडलो. पहाटेच्या अगोदरचा काळाकुट्ट गडद अंधार आजूबाजूला पसरलेला,एकप्रकारची निरव शांतता, वातावरणातील बोचरा गारवा आणि मी रस्त्याने एकटाचं चालत असलेलो. मनात विचारांचा हल्लकल्लोळ माजलेला आणि मग या घालमेलीतून सुटका करण्यासाठी सवयीप्रमाणे स्वसंवाद साधत म्हणजे स्वतःशी संवाद करत पुढे चालणे सुरू होते. जगण्याच्या या वळणावर अति जटिल झालेले प्रश्न सोडवताना खरंच माझी दमछाक होत होती. याच चिंतनात डुबलो असताना बापाच्या जगण्याची तीव्रतेने आठवण झाली.  बापाच्या अस्तित्वाची किंमत मला जाणवत होती.

                          बाप..!  बाप असताना नाही तर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने अधिक कळतो. बाप असताना मला कळायचाच राहून गेला. आणि आता कळत असताना बाप जवळ नाही. बापाविना पोरका असलेला आजचा मी. डोळ्यांत, मनात आठवणीतला बाप घेऊन वास्तवात बापाविना जगतोय खरा पण क्षणाक्षणाला बाप आठवत राहतो, मनातल्या आठवणींच्या दाटीन गळ्यात हुंदका दाटत राहतो. 'बाप' या दोन अक्षरांच्या नावानं टचकन पाणी येतं याच्यापलिकडे आज माझ्या हातात बाप उरला नाही.  मूकपणे अश्रूं गाळण्याइतपत कशानेही बाप व्यक्त करता येत नाही.पण एक खरंय मेलेली माणसं जगासाठी दूर गेलेली असतात. पण जिवाभावाच्या माणसांच्या अधिक ती जवळ आलेली असतात. फरक एवढाच असतो. फक्त ती देहानं जरी नसली तरी त्यांच्या आठवणींच्या अस्तित्वाचा सुगंध मनाच्या कुपीत दरवळत असतो.प्रत्येक श्वासात,ध्यासात भरलेला असतो.

                        हे गुपित सहसा उघड करायला नको हवं होतं. तरीही ते का करतोय कुणास ठाऊक ? बापाला भेटण्याची, त्याच्याशी हितगुज करण्याची एक चांगली जागा मला सापडलीय. ती म्हणजे एकांत. बापाची आणि माझी भेट घालून देतो तो म्हणजे हा एकांत आणि सोबतचा हा काळामिट्ट अंधार. मी बेभान होऊन बोलत राहतो बापाशी. त्याच्यावाचून एकटेपणाच्या जाणिवेने आकांत मांडतो. त्या काळ्याकुट्ट अंधाराच्या पोटात बापाच्या ओढीनं रडत राहतो अंदाधुंद ओक्साबोक्शी. आणि शेवटी माझे अश्रू माझे मीच पुसून मनाची समजूत घालून त्या अंधारातून बाहेर पडतो आणि पुन्हा सामील होतो या झगमगीत दुनियेतील माणसांच्या गर्दीत. पुन्हा बापावीना ओसाड जीणं सुरू होतं. या अगोदर पुढे जाताना मागे बाप नावाचा आधार होता.जग जरी फिरून आलो तरी बापाजवळ मुक्काम होता. जगण्याच्या वाटेवर चालताना मागे बापपणाच्या ऊर्जेचा स्रोत होता. आता मागे वळून पाहिलं की बाप नाही. या जगण्याच्या प्रवाहात पुढे वाहवत जाताना मागे बाप नावाचे उगमस्थान नाही. 

                    बाळ पावलं टाकत असताना आई हळुवार हात सोडवून घेते कारण बाळांन स्वतःहून चालावं.  आता बापानं मला स्वतःच्या हिंमतीवर जगण्यासाठी सोडून दिलंय असं वाटतं. आणि मग जगण्याच्या या संघर्षात ती हिंमत सिद्ध करताना माझा कस लागतोय. मला भेटलेली चांगली, वाईट माणसं. मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी तर कधी  मनाला नकारात्मकतेच्या खाईत लोटणारी माणसं. आपला वापर करून घेणारी, गैरसमज पसरवून देणारी, सहनशिलतेचा अंत पाहणारी, अनादर करणारी, अशी कितीतरी माणसं. कधी दूरची  तर कधी जवळची माणसं देखील याला अपवाद ठरू शकत नाहीत. जीवापाड जपलेल्या,जीव लावलेल्या आपल्या प्रेमाच्या माणसांच्याकडूनही मनांवर आघात होत राहतात. खरं तर माणसाच्या उभारणीला आणि ढासळण्याला भोवतालच्या परिघातली माणसचं कारणीभूत असतात. जणू ही माणसं पचवण्यासाठीच जीवनातील शक्ती खर्च होतेय. पण या सर्वांना पुरून उरण्याची शक्ती देणारा बाप ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी अशी माणसं क्षुल्लक वाटतात. पण बापचं नसेल तर स्वतःलाचं क्षुल्लकपणाची तीव्र जाणीव होते. नुसत्या 'बाप' नावाच्या दोन अक्षरांचं पाठबळ काय असतं ना ? ते असं माणसांनी भरलेल्या जगात बापाविना एकटं पडल्यावर कळतं.

                    माणसांच्या गर्दीत अक्षरशः जीव गुदमरून जातो. जगण्याच्या या वास्तवतेला भिडताना मी कुठेतरी कमी पडण्याची सत्यता मला नाकारता येणार नाही. संपूर्ण शक्ती एकवटून जगण्याची ही लढाई पूर्णपणे ताकदीने लढावी असं वाटत नाही. मग मी खरंच दुबळा आहे का ? साध्या, सरळपणाने इथे जगताचं येणार नाही का.?  आणि खरंच जगण्याची ही लढाई शेवटपर्यंत मला लढता येईल का  ? जगण्याची हिंमत शेवटपर्यंत टिकवून ठेवता येईल का..? अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना आतल्याआत घुसमट होत राहते.

                    अशावेळी शेवटी बापच आठवत राहतो.  जो बाप ज्याला डोळ्याने धड दिसत नव्हतं. चालताना धडपडत जायचा,चाचपडत काम करायचा आणि कुटुंब चालवायचा तो माझा बाप पण कुठल्याही संकटाला झुकला नाही, वाकला नाही शेवटपर्यंत जगण्याचा हा संघर्ष चिवटपणे नी चिकाटीने पेलत राहिला. जो बाप ज्याला दृष्टी नव्हती पण ज्याने जगण्याला एक दृष्टिकोन दिला होता. कुठल्याही बाक्या कठीण प्रसंगात बापाचा असणारा करारी बाणा. जवळ काही नसताना जगण्याची ही लढाई न कुरकुरता स्वाभिमानाने लढत राहिला.ज्या बापाने स्वतःच्या जगण्यातून जगण्याचा असा धडा मला घालून दिला होता.

                       आणि आज माझ्याकडे सर्व काही असून जगण्याच्या या लढाईत माझी एवढी हतबलता का व्हावी ? कशासाठी ?  आताच्या वेळेला बापाचं जगणं स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... बापाच्या नजरेतून स्वतःला पारखु लागलो. जणू बाप आज मला या अवस्थेत पाहतोय. माझ्या बापाला माझी अशी हतबल झालेली अवस्था पाहवेल ? नाही कदापि नाही.  असा लेक माझ्या बापाला पसंत नाही. संघर्ष,वादळं येणारचं आहेत पण त्याला हिंमतीने सामोरे जाण्याची तयारी ठेवणारा लेक या बापाला हवा आहे. .स्वतःच्या बदलाची कुठे तरी आतून तीव्र जाणीव होऊ लागली.

                         आता एक बाप नावाची अव्यक्त शक्ती माझ्या भोवतीने पिंगा घालत होती. बाप शरीराने माझ्याजवळ नाही पण त्याचे विचार,संस्कार आजही मला काहीतरी शिकवण देत होते. या गुरफटलेल्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मनातून उचंबळून बाहेर येत होते. बापाची मनातली प्रतिमा,त्याचे विचार आठवून फक्त एका वाक्याच्या प्रेरणेंने नुकतंच जीवन बदलून टाकणारं एक यशस्वी वळण मी घेतलं होतं. तेच वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवण करून देत होतं ते वाक्य होतं, "लेका रडायचं नाही आता लढायचं." 

                       आणि कालपर्यंत नकारात्मकतेच्या वादळात सापडलेलं माझं मन पुन्हा लढण्यासाठी सज्ज होऊ लागलं. मनातलं भिरभिरणार वादळ आता कुठे शांत होत होतं. शेवटी हेच खरं मनातल्या नकारात्मकतेला मनातून उलथून टाकण्याची तयारी मनातच करावी लागते. बाहेरून केलेल्या उपचारांचा परिणाम हा तत्काळ असू शकतो. आता अंधार नाहीसा होऊन नुकताच पहाटेचा उगम झालेला, चारी दिशा उजळलेल्या होत्या. अंधाऱ्यारात्रीनंतरचा उष:काल हा नकारात्मक अंधारानंतर निपजणारा सकारात्मक प्रकाश या बदलाच्या सत्याला दुजोरा देत होता. ज्या अशांत मनाने घराबाहेर पडलो त्याचं शांत प्रसन्न मनाने आता मी घराकडे परतत होतो.

                 आज शाळेत  दिवसभर करावयाच्या अध्यापनाची तयारी  म्हणून अभ्यासाला बसलो. प्रथम दहावीचंच पुस्तक हातात घेतलं. नियोजनाप्रमाणे आज युनिट 3.1 मधील If ही कविता मुलांना शिकवायची होती. आणि ती अभ्यासताना हा काय दुर्मिळ योगायोग म्हणायचा ?  अभ्यास करताना लक्षात आले की, युनायटेड किंगमडमधील नोबेल परिषोतिक विजेता महान लेखक,तत्वज्ञ रुडीयार्ड किपलिंग यांची If ही कविता म्हणजे एका बापाने आपल्या मुलाला कसं जगावं यासाठी केलेला बोध आहे. मी अगदी भारावून ती कविता अभ्यासत होतो. पहाटेचा प्रसंग आणि आताची ही कविता. ह्या विलक्षण योगायोगाने अक्षरशः मी थक्क झालो. या कवितेचा थोडक्यात संदर्भ असा. या कवितेच्या माध्यमातून बाप आपल्या मुलाला सांगतो आहे....

                      'जेव्हा तुझ्यावर सर्वजण रागावतील, तुला दोष देतील तेंव्हा तू तुझे डोके शांत ठेव. सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवतील त्यावेळी तुझा तुझ्यावर विश्वास असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वाट पहा. आणि वाट पाहताना थकून जाऊ नकोस.संयम राखून ठेव,तुझ्याविषयी कोणी असत्य बोललं,तुझ्याविषयी गैरसमज पसरवले  तरी तू शांत रहा. कुणी तुझा तिरस्कार करतील,अपमान करतील त्याचा तुझ्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नकोस, आनंदाने हुरळून जाऊ नको अथवा दुःखाने खचून जाऊ नको. स्थितप्रज्ञ रहा, तू कष्टाने मेहनतीने मिळालेली एखादी गोष्ट नष्ट झाली तरी तुझ्या क्षमतेनुसार तू त्याला नवीन आकार दे, ती गोष्ट नव्याने निर्माण कर. शत्रू असो अथवा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक कुणीही तुला दुखावले तर त्यांना समान वागणूक दे.वेळेचं मूल्य लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा तू जर सदुउपयोग केलास तर आणि तरंच हे जग तुझे असेल आणि इथली प्रत्येक वस्तू तुझी असेल. शेवटी तुला एक उत्तम आणि परिपूर्ण माणूस बनायचं आहे लक्षात असू दे. असा एका बापाकडून आपल्या मुलाला सकारात्मक महान संदेश देणारी ही कविता.'

            

                 पहाटेच्या अंधारात बापाच्या आठवणीतील सखोल चिंतनात मिळालेला सार जणू या कवितेतून प्रकट होत होता. खरंच मी आतून भारावून गेलो होतो.  ही कविता वर्गात मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवली. एका बापाचा संदेश मुलांपर्यंत पोहोचवणारा मी दुवा झालो. चार भिंतीच्या आत रुडीयार्ड किपलिंग यांची कविता मुलांना मी शिकवताना जीवनाचा आणि शिक्षणाचा कसा मेळ घातला गेला आहे हे माझ्याच अनुभवातून सिद्ध झाले होते. शिक्षण म्हणजे जीवनाचे प्रतिबिंब असते ते खरेच. शाळेबाहेरच्या जगात एक माणूस म्हणून मी जे काही अनुभवतोय,मी ज्या समस्यांना तोंड देत आहे.त्या समस्येचं निराकरण मला करून पुढे जावं लागतं. पण भविष्यात अशाच प्रसंगांना आपल्या विद्यार्थ्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे त्यावेळी तो आपली समस्या सोडवण्यासाठी समर्थ असला पाहिजे त्याची पूर्वतयारी म्हणून आपले शिक्षण हे आपल्या जीवनाच्या पैलूंना जोडले आहे याचे समाधान वाटले. किपलिंग जे ज्ञान कवितेच्या माध्यमातून मुलांना सांगू पाहतात अगदी याच ज्ञानाचा साक्षात्कार  भल्या पहाटे माझ्या बापाच्या प्रत्यक्ष जगण्याच्या स्मरणातून मला झालेला होता. यातला योगायोगाचा भाग सोडला तर आपले जीवन,समस्या,प्रश्न आणि त्याला मिळणारं उत्तर हे सारखंच असतं हे कळून येतं.

                           एकीकडे मला सोडून गेलेला शिक्षणाचा कसलाही गंध नसलेला माझा बाप. आणि दुसरीकडे नोबेल पारितोषिक प्राप्त महान लेखक रुडीयार्ड किपलिंग यांची if ही कविता. जेव्हा एका लेकाच्या भूमिकेतून मी ज्यावेळी या दोन्ही गोष्टींच्याकडे पाहतो त्यावेळी माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची ही कविता मला एकाच ठायी दिसते. दोघांच्यातील जगण्याचं तत्वज्ञान सारखंच होतं. फक्त फरक एवढाच की, किपलिंगने बापाचं सांगणं कवितेतून मांडलं आणि माझ्या बापानं ते स्वतःच्या जगण्यातून सांगितलं होतं. म्हणजे बापाच्या प्रत्यक्ष जगण्यातून मला ते कळालं होतं. शेवटी शिक्षण म्हणजे तरी काय.?  जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी अशी विद्या की जी, कुठल्या ग्रंथातून, कवितेतून व्यक्त होते तर कुणाच्या जगण्याच्या अनुभवातून. अशी जीवन जगण्याची विद्या आपल्या मुलाला सांगणारा प्रत्येक बाप हा आपल्या मुलांसाठी जितेजागते विद्यापीठ असतो शेवटी हेच खरं..!


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८







'आपल्याला या लेखाविषयी काय वाटते खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर लिहा.'

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.



आर्दाळ शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.


                       माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राथमिक शिक्षक डॉ.मारुती डेळेकर यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचसोबत एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांची भूमिका कशी असायला हवी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर शिक्षक व पालक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,अभ्यास, स्वयंअध्ययन याबाबत चर्चा झाली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक दशरथ अस्वले यांनी शिक्षक-पालक मेळाव्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले तर सुहास कोंडुसकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट....किरण चव्हाण


 वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट....


                       रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस परंतु  रविवारी आमच्या शाळेत ८ वी विद्यार्थ्यांचा सकाळी ८ ते १० या वेळेत NMMS चा तास ठेवला होता. माझ्या गावापासून शाळेचे अंतर १५-१६ कि.मी चे अंतर असल्याने सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावे लागले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तासाला सुरुवात झाली. पुढ्यात एकूण सात विद्यार्थींनी होत्या. बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्यास सुरू केला. एकेक संकल्पना सोडवत असताना वेळ कधी सरला कळला नाही. विद्यार्थ्यांनीही समरस होऊन बुद्धिमत्तेची उदाहरणे सोडवत होती. अशातच जवळपास साडे दहा वाजायला आले. मुलींना बाहेर सोडले. थोड्या वेळाने आत आल्या. तास संपण्याची वेळ संपून गेली होती. पण बुद्धीमतेची उदाहरणे सोडवण्याच्या उत्साहाने त्यांना कंटाळा आला नव्हता. आता घरी सोडायचं की पुढे तास घ्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्येचं आमचा दत्तराज नावाचा सातवीचा विद्यार्थी तो आपला अभ्यास करण्यासाठी वर्गात येऊन बसला होता. तो आठवीच्या विद्यार्थीनींना चिडवण्याच्या हेतूने बोलला,


 "सर आता तुम्हीं एवढ्या लांबुन आलाय घ्या की,अजून दोन तास ज्यादा. बघुया या मुली थांबत्यात का..? " दत्तराज आणि मुलींचं मुळातच पटत नव्हतं. एकमेकांच्या कळी काढण्यात दोघेही माहीर. आता मुलीही चिरडीला पडल्या आणि म्हणाल्या, 

"सर अजून दोन तास घ्यायचेच. पण आम्हांला आता घरी सोडा आम्हांला भुका लागल्यात. आम्हीं जेवून येतो. मग पुढचं शिकवा."

मला ही कौतुक वाटलं. एरव्ही मुलांना रविवारीची सुट्टी म्हणजे आपल्या हक्काचा आणि मुक्तपणे बागडण्याचा दिवस. असं असतानाही ही मुलं अभ्यासाला प्राधान्य देत होती.मुलींना जेवायला घरी सोडले. पण जाता जाता त्या प्रश्न करीत होत्या. 

"सर तुम्हीं कुठे जेवणार..?" 

तुम्हीं या जेवून माझं मी बघतो. असं म्हंटल्यावर सगळ्याजणी घरी गेल्या. मधल्या वेळेत पुढच्या घटकाची मी तयारी करू लागलो. तासभर असाच गेला. पुन्हा मुलींचा गलका बोलत चालत वर्गात हजर झाला. मात्र आल्या आल्या सगळ्याजणींचा एकच प्रश्न,

" सर तुम्हीं जेवलात का..? आणि कुठे जेवलात..? मी म्हणालो "माझा विचार तुम्हीं करू नका. चला पुढे आपण उदाहरणे सोडवायला सुरू करू " पण त्यावर मुलींचे काही समाधान झाले नाही. त्यात दत्तराजने अधिकच भर टाकली.

"सर तुम्हांला इथेच ठेऊन ह्या जेवून आल्यात . सर आता  तुम्हीं चला माझ्या घरी जेवायला." 

दत्तराज तर त्यांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हता. आता तर त्याने वर्मावर बोट ठेवले होते. 

ये तू गप्प बस तिथे ते आमचं आम्हीं बघून घेतो " सगळ्या मुलीं दत्तराजवर तुटुन पडत होत्या. मला त्यांची गंमत वाटत होती.

"सर तुम्हीं जेवला की नाही आम्हांला अगोदर सांगा..." मुलींचा एकच प्रश्न. आता काय बोलायचे पण मी ही गंमत करायची म्हणून सहजपणे बोलून गेलो. "अरे तुम्हीं जेवलात म्हणजे माझं पोट भरलं...आणि हो मला आता भूक नाही. मी घरी जाऊन जेवेण चला आपण पुढच्या घटकाला सुरवात करूया."

                  आणि फळ्यावर घटकाचे नाव लिहिले. पण मुली जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या. शिकण्यात त्यांचे मन नव्हते. मी त्यांना खुप समजावून सांगितले पण ऐकतील त्या मुली कुठल्या. त्याची अस्वस्थता अधिकच वाढत होती. त्यात शेवटीला बसलेली प्रीती तर अधिकचं अस्वस्थ आणि हिरमुसलेली दिसत होती. मुली नाईलाजाने शेवटी म्हणाल्या "निदान  सर आम्हीं दुकानातून तरी काही  आणतो." असा त्यांचा हट्ट. पण मी नाकारले. हा विषय बाजूला ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या हा माझा आग्रह पण त्या अस्वस्थतेतून मुलींचा शेवटी एक निग्रह ठरलाचं. काहीं तरी ठरवून अचानक प्रीती आणि कस्तुरी उठल्या आणि म्हणाल्या "सर आम्हीं काही मिनिटातचं बाहेर जाऊन येतो." 

मला माहिती होते मी अंदाज केला की, दुकानातून काही तरी आणण्याच्या उद्देशाने त्या म्हणत असाव्यात म्हणून मी सुरुवातीला नाहीचं म्हणालो. पण शेवटी मला त्यांचा हट्ट मोडवेना.  परवानगी देताच त्या बाहेर गेल्या. मी पुन्हा पुढच्या उदाहरणाकडे वळलो. किमान अर्धा पाऊनतास उलटला तरी यांचा पत्ता नाही. त्यांच्या अनुपस्थित पुढची उदाहरणे घ्यावी लागली.शेवटी दोघीही एकदम आल्या ते हातात एक पिशवी घेऊनचं. पिशवीत काय होते..? तर डबा. मी पुढे काय बोलणार..? सर आधी जेवून घ्या आणि मग शिकवा.


शेवटी मुलींनी आपले म्हणणे खरे केलेच. आता मला त्यांचं ऐकणंचं भाग होतं. शेवटी तिथेच बसलो. पिशवीत दोन डबे होते.डबे काढून टेबलवर ठेवले. डबा उघडला. एका डब्यात भाकरी व दुसऱ्यात भाजी. डब्यातली भाकरी तर अगदी गरमागरम. जणू नुकतीच तव्यातून काढली असावी अशी. भाकरीचा तुकडा मोडता मोडताचं मी प्रीतीला विचारलं. 

"प्रीती भाकरी गरम आहे. आता नुकतीच केलीय का.?" तिने हो म्हटले... 

मी न राहवून विचारलं "छान मऊसूत भाकरी आहे. कुणी बनवलीय भाकरी. ?" 

" सर मीच बनवली भाकरी." तिने उच्चारलेले हे वाक्य ऐकून मी निशब्दचं झालो. एवढी मऊसूत भाकरी एवढ्या लहान मुलीने बनवावी. एवढ्या लहान वयात मुलींना भाकरी करता येते याचं एकीकडे कौतुक होतं तर दुसरीकडे त्यांच्या निरागस संवेदनशीलपणाबद्दल समाधानही वाटत होते.

आम्हीं जेवलोय पण आमचे सर उपाशी आहेत म्हटल्यांवर माझ्या विद्यार्थींनीचं ते कासावीस होणं.  माझ्या लहानग्या विद्यार्थीनीनं घरी जाऊन, घाईगडबडीने चिमुकल्या हातांनी भाकरी थापून गरमागरम भाकरी माझ्यासाठी घेऊन येणं.माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. किती निर्मळ निरागस प्रेम म्हणायचं हे. काय बोलावे मी भारावून गेलो.खरंच त्यावेळी  त्या चिमुकल्यांच्यासमोर जे उरात दाटलं ते शब्दांत व्यक्त करता नाही आलं. 

किती काळजी,प्रेम वाहतात  ना मुलं..? हे भाग्य एका शिक्षकाच्याचं नशिबी असू शकतं. खरंच मला आतून वाटलं यालाच म्हणायचं भाग्य. ज्याचा मी वाटेकरी होतो. एक रुचकर चवीच्या भाकरीचा ढेकर देऊन मी तृप्त तर झालोच. पण माझ्या विद्यार्थ्यांची काळजी,प्रेम पाहून मी अंतःकरणातूनही तृप्त झालो. आता त्या अवीट गोडीच्या गरमागरम भाकरीची गोष्ट चिरंतन माझ्या समरणात राहील.


- किरण सुभाष चव्हाण.

८८०६७३७५२८.

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom.

 

er 15, 2022

Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom.


A novel that explores the life of Sugaran Paksha and looks into the world of birds: Calvin


                         A short novel 'Kalvin' written by Ramakrishna Magdoom based on bird life, which can be read while sitting, but the exact description of bird life is captivating. Sometimes people who shoot birds with a gun, today their lives are written in novels. This means that the novel testifies to how kind, sensitive and understanding human beings are to the world beyond their own existence. The struggle in the world of Bayaji and Baya, the son-in-law and Sugarni couple and the parties living with them, is presented in a flowing style. So far, novels related to human life have been read, but while reading this novel about bird life, there were many questions in the mind that how should the author have combined the nature of the novel with imagination and reality? But while reading at the beginning, we don't even know how we go from the isolated human world to the bird world in close proximity to nature. That is, the human mind is so extraordinary that just as water assumes the shape of a vessel, our mind can harmonize with any living being i.e. animal parts. While reading, we get in tune with that Sugaran Party, its ongoing struggle. The author takes Bayaji as the main character and presents his life and his surroundings very minutely. While reading the novel, every word had to become one with the nature and bird life. That nature, bushes, vines, grass becomes our surroundings. Even the eyes become green while reading. The bird of our mind also sits separately in the hanging skull of that Sugarni on the well. How is the inside of the shell, how is the nest inside, those sparrow chicks, the mind is immersed in that world of imagination. And it's the plot that forces those beliefs to be rejoicing. A mysterious mystery of bird life is more or less in everyone's mind. The solution to that enigmatic mystery lies in reading this novel. Every living thing on earth has a world. Reading such a novel gives an extraordinary experience of living, growing and growing. 

                      What is the human or the bird, how much he has to suffer while building his nest. Sugarni's head in particular is a subject of curiosity and admiration for us. Khopa is the focal point for Sugaran and Sugarani to come together as a couple. Then the sugar bird weaves the nest without any interruption to make its mate like its head. Sometimes due to natural calamities and sometimes due to human intervention, the nest is broken again and again but the bird weaves again and again without giving up. Sometimes on a tree, sometimes on an island, sometimes on the edge of a well, it changes its place in many places. And one day Sugarni comes to see that beautiful nest and if she likes it, she accepts it with the skull and then their life begins. The author has given an in-depth description of the daily life of hatching the eggs, protecting them and feeding them. The struggle in the daily life of the parties can be read here. We think how spontaneous the life of parties is. While enjoying the world of imagination, we easily think, If I was born, I would like to be a bird. But we have never experienced their life closely. How much struggle they have to face in their life too. Then apparently we can't get much closer to it beyond birdwatching. But after reading this novel, we realize how much we are separated from bird life. How close a person gets to the bird life and understands their world. Not only this, but with the power of our intellect, we can base our entire life on the power of our words. But we have never experienced their life closely. How much struggle they have to face in their life too. Then apparently we can't get much closer to it beyond birdwatching. But after reading this novel, we realize how much we are separated from bird life. How close a person gets to the bird life and understands their world. Not only this, but with the power of our intellect, we can base our entire life on the power of our words. But we have never experienced their life closely. How much struggle they have to face in their life too. Then apparently we can't get much closer to it beyond birdwatching. But after reading this novel, we realize how much we are separated from bird life. How close a person gets to the bird life and understands their world. Not only this, but with the power of our intellect, we can base our entire life on the power of our words.

                           The author's study of birdwatching is vast. The author has a close relationship with nature and its trees, leaves, flowers, fruits, vines, bushes and soil. Therefore, just as the sugar bird weaves its head with great effort by bringing each mate, he has shaped this beautiful novel with deep intimacy from each word. If you want to understand the bird world closely, you must read this novel. Let them tread the lofty heights of success in the same field of writing. May new writings be inspired by them and readers get to read them. All the best for his future writing endeavors with his novel Kalvin...!!


Jai Ho...! Good luck!!


Kiran Subhash Chavan.

8806737528

Contact for book:



Book - Calvin.

Author- Ramakrishna Magdoom

Publisher- Rava Publications, Kolhapur.

Pages-80

Contact Moba : +919420778963 

पुस्तक परिचय - कलविण लेखक - रामकृष्ण मगदूम.


सुगरण पक्षाच्या जीवनाचा वेध घेत पक्षी विश्वात डोकावणारी कादंबरी : कलविण


                         पक्षी जीवनावर आधारित रामकृष्ण मगदूम लिखित 'कलविण' ही छोटेखानी कादंबरी बसल्या बैठकीत वाचून होणारी मात्र चक्क पक्षी जीवनाचा टिपलेला अचूक वेध मनाला  खिळवून ठेवतो. कधी काळी बंदुकीने पाखरं टिपणारे लोकं ते आज त्यांच्या जीवनावर कादंबरी टिपली जाते. याचा अर्थ मानव किती सहृदयी,संवेदनशील आणि स्वतःच्या जगण्यापलीकडचे विश्व समजून घेणारा आहे याची साक्ष ही कादंबरी देते. बयाजी आणि बया या सुगरण आणि सुगरणी जोडप्याचा आणि त्यांच्यासह राहणाऱ्या पक्षांच्या संसारातील संघर्ष ओघवत्या शैलीत मांडलेला आहे. आत्तापर्यंत मानवी जीवनाशी संबंधित कादंबऱ्या वाचनात आल्या परंतु पक्षी जीवनातील ही कादंबरी वाचताना मनात अनेक प्रश्न होते की, कादंबरीचे स्वरूप कल्पकता आणि वास्तवता याचा मेळ लेखकाने कसा घातला असावा ?. पण सुरुवातीला वाचताना आपण अलगद पणे मानवी विश्वातून निसर्गाच्या सानिध्यात पक्षी विश्वात कसे जातो हे कळतही नाही. म्हणजे मानवी मन हे एवढे विलक्षण आहे की जसे पाणी एखाद्या भांड्याचा आकार  धारण करते तसे आपले मन हे कोणत्याही जीवाशी म्हणजे प्राणी पक्षांशी समरस होऊ शकते. वाचताना आपण त्या सुगरण पक्षाशी, त्याच्या चाललेल्या संघर्षाशी समरस होऊन जातो.                                      लेखक बयाजी हे मुख्य पात्र घेऊन त्याच्या जीवनाचा आणि त्यांच्या जगण्याचा भोवताल अत्यंत सूक्ष्मपणे मांडत जातो. कादंबरी वाचताना  प्रत्येक शब्दगणिक त्या निसर्गाशी आणि पक्षी जीवनाशी एकरूप व्हायला होते. तो निसर्ग ,झाडी झुडपे, वेली बेट ,गवत हाच आपला भोवताल बनून जातो. वाचताना अगदी डोळ्यांत हिरवाई दाटते. विहिरीवरच्या त्या सुगरणींच्या टांगलेल्या खोप्यात आपल्याही मनाचं पाखरू अलगद जाऊन बसतं. कसं असेल आतून खोपा, कसं बागडत असेल आतून ते घरटं, ती चिमणी पिल्लं मन अगदी त्या कल्पनाविश्वात रमून जातं. आणि त्या विश्वास रममाण होण्यास भाग पाडणारे असे कथानक आहे. पक्षी जीवनाचं एक रहस्यमय गूढ कमी अधिक प्रमाणात का असेना साऱ्यांच्याच मनात असतं. त्या गुढमय रहस्याची उकल ही कादंबरी वाचताना होते. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचा एक संसार असतो. त्यांचं राहणं, जगणं ,वाढण आणि वाढवणं याचा विलक्षण अनुभव येतो तो अशा कादंबरी वाचनातून. 

                      माणूस काय किंवा पक्षी काय त्याला आपलं घरटं उभा करताना किती कष्ट उपसावे लागतात. विशेषतः सुगरणीचा खोपा हा आपल्यासाठी कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय आहे. सुगरण आणि सुगरणी हे जोडपं एकत्र येण्यासाठी खोपा हे त्यांच्या जवळ येण्याचा केंद्रबिंदू आहे. मग आपल्या जोडीदाराणीला आपला खोपा आवडावा म्हणून सुगरण पक्षी अपार कष्टातून अव्याहतपणे ते घरटं विणत असतो. कधी नैसर्गिक संकट तर कधी मानवी हस्तक्षेत यातून ते घरटं पुन्हा पुन्हा मोडतं पण तो पक्षी हार न मानता पुन्हा पुन्हा विणतो. कधी झाडावर कधी बेटावर तर कधी विहिरीच्या काठावर अनेक ठिकाणी जागा बदलतो. आणि एक दिवस ते सुंदर घरटं पहायला सुगरणी येतात तिला आवडलं तर ती त्या खोप्यासह त्याला ही स्वीकारते आणि मग त्यांचा संसार सुरू होतो. अंडी उबवण, त्यातून पिल्लांचा जन्म त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना खाऊ पिऊ घालणं या त्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांचं चित्रण लेखकाने सखोलपणे मांडले आहे. पक्षांच्या रोजच्या जगण्यातील संघर्षाचा वेध या ठिकाणी वाचावयास मिळतो. आपल्याला वाटतं की, पक्षांचं जीवन किती स्वछदी आहे. कल्पना विश्वात रमताना आपण सहज म्हणून जातो की, मला जन्म मिळाला तर मला पक्षी व्हायला आवडेल. पण आपण कधीच त्यांचं जीवन जवळून अनुभवलेलं नसतं. त्यांच्याही जीवनात त्यांना किती संघर्ष करावा लागतो. एव्हाना वरवर आपण पक्षीनिरीक्षणा पलीकडे जास्त त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. पण ही कादंबरी वाचल्यानंतर जाणवतं की, आपण पक्षी जीवनापासून किती नामानिराळे आहोत. एखादी व्यक्ती पक्षी जीवनाच्या किती जवळ जाऊन त्यांचं विश्व समजावून घेते. इतकंच नाही तर आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांचं संपूर्ण जगणं आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर मांडू शकते.

                           लेखकाचा पक्षीनिरीक्षणाचा अभ्यास अफाट आहे. निसर्गाच्या सानिध्यातला वावर आणि तिथल्या झाडा, पाना, फुला, फळाशी,वेली,झुडुपाशी, मातीशी लेखकाचे एक घट्ट नाते आहे.  म्हणून तर सुगरण पक्षी जशी एकेक वीण आणून आपला खोपा मोठ्या कष्टातून विणतो तसेच एकेका शब्दांतून सखोल आत्मीयतेने त्यांनी ही सुंदर कादंबरी आकाराला आणली आहे.कादंबरी वाचल्यानंतर कळतं यामागे अनेक वर्षांची ही तपश्चर्या आहे. पक्षी विश्व जर आपल्याला जवळून समजावून घ्यायचं असेल तर अवश्य ही कादंबरी वाचली पाहिजे. अशीच लेखन प्रांतातील त्यांची भरारी उंच उंच यशशिखरे पादाक्रांत करो. त्यांच्या हातून नवनवे लेखन स्फुरत जावो आणि वाचकांना वाचायला मिळो. त्यांच्या कलविण या कादंबरीसह भावी लेखन वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...!!


जय हो...! मंगल हो..!!


किरण सुभाष चव्हाण.

८८०६७३७५२८

पुस्तकासाठी संपर्क :



पुस्तक - कलविण.

लेखक- रामकृष्ण मगदूम

प्रकाशक- रावा प्रकाशन,  कोल्हापूर.

पृष्ठे-८०

संपर्क मोबा :+919420778963 



शुक्रवार, ६ मे, २०२२

पुस्तक परीक्षण- महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे जीवनचरित्र उलघडणारे पुस्तक.- किरण चव्हाण.


महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे जीवनचरित्र उलघडणारे पुस्तक.

                    रग तांबड्या मातीची..झुंज वाघाची हे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेले सदानंद पुंडपाळ व पी ए पाटील या लेखक द्वयीनी लिहिलेलं पुस्तक आहे.जोशीलकरांच्या जन्मापासून आतापर्यंतच्या विस्तारित व भरगच्च कारकीर्दीला अत्यंत सूक्ष्मपणे शब्दांतून उजाळा दिला आहे.चंदगड तालुक्यातल्या किणी सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबातला पै.विष्णू जोशीलकर यांचा जन्म. एकत्र कुटुंबात आठ भावंडांच्या सान्निध्यात गेलेलं बालपण. आईवडील ज्येष्ठ भावंडांकडून,नातेवाईकांकडून मिळालेलं प्रेम,संस्कार, शाळेतील शिक्षक  यांचे मिळणारे मार्गदर्शन.लहान वयापासून कुस्तीचे असणारे वेड त्यात दोन थोरले बंधू तालमीत सरावाला जात असत ते पाहून कुस्तीविषयी निर्माण होत गेलेले आकर्षण.अशाप्रकारे गावच्या तालमीच्या लाल मातीत उद्याचा एक महान कुस्तीगीर आकार घेतो. लहान वयातच या पठ्ठ्याच्या अंगातली रग दिसून येते ती म्हणजे दहावीला असताना मोकळी बैलगाडी चाके न फिरता चाके घासत पुढे ओढण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन बाजी मारतो.

                        अवघ्या तेरा वर्षांचे असताना वडीलांच निधन होतं. पण थोरले बंधू कुमाणा आणि वहिनी लक्ष्मीबाई यांचे पुत्रवत प्रेम त्यांना मिळते."कुस्तीसाठी जमीन विकायला लागली तरी चाललं पण लहानग्या भावाला कुस्तीसाठी कुठे कमी पडायचं नाही.असा आपल्या लहानग्या भावासाठी थोरल्या बंधूचा असणारा निर्धार व जिद्द.. तर लक्ष्मीबाई वाहिनीचे आईचे प्रेम त्यांना मिळते.'धाकट्या' या प्रेमळ नावाने ते बोलवतात.एवढेच नव्हे तर वाहिनीचे  भाऊ सुद्धा अनेक गावांतून लोणी गोळा करून जोशीलकरांना  पाठवतात मायेच्या नात्याचे असे हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.पुतण्या पै.राजाराम तर सावलीसारखा जोशीलकरांना साथ देतो. सर्व कुटूंब त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या पाठीशी उभे राहते. 

                      गावातील दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी व कुस्तीसाठी जोशीलकर राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्तीनगरीत दाखल होतात.ज्या शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्राधान्य दिले,पैलवानांना आश्रय दिला. त्या कुस्तीगिरांच्या नगरीत हिंद केसरी गणपतराव आंदळकर सारख्या दिग्गज वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव सुरू होतो.पुढे अल्पावधीतच अनेक नामवंत मल्लांना धूळ चारत विजयाची लाल माती भाळावर लेवून विष्णू जोशीलकर एक नामवंत पैलवान म्हणून नावारूपाला येतात.आताचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे पाठबळ,प्रेरणा आणि आशीर्वाद त्यांना पूर्वीपासून लाभत आले आणि आजही त्यांचे कृपाछत्र जोशीलकरांच्यावर आहे. जिथे कुठे कुस्तीचे मैदान असेल तेंव्हा शाहू महाराज कुस्ती पहायला जात.एकदा कुस्ती जिंकल्यावर लाल मातीत मळलेल्या आपल्या पैलवानाला शाहू महाराज अभिमानाने मिठी मारतात हा प्रसंग वाचताना छाती अभिमानाने फुलून येते. पहाडी छाती, पिळदार बाहू, कसदार शरीर अशी भरगच्च शरीराची ठेवण असलेले पै.विष्णू जोशीलकर यांची कुस्तीतील प्रत्येक झुंज ही शर्थीची,कौशल्याची आणि अटीतटीची होती हे वाचताना कळून येते.कुस्ती हाच श्वास कुस्ती हाच ध्यास याप्रमाणे त्यांनी कुस्तीला वाहून घेतलेला हा पैलवान मनाने तितकाच संस्कारशील,शिस्तबद्ध आणि संयमी..घुटना डाव ही त्यांच्या कुस्तीतील खासियत. या घुटना डावाने अनेक नामवंत मल्लांना त्यांनी चितपट केले.

                      कोल्हापूर,पुणे,मुंबई,पंजाब  दिल्ली असा एकूणच त्यांच्या कुस्तीखेळाचा आलेख उंचावत जातो. जिल्हा ते राष्ट्रीय पातळीपर्यंत कुस्तीच्या खेळांतली त्यांची  चमकदार कामगिरी ही थक्क करणारी आहे.यशाचे दावेदार असणाऱ्या मल्लाशी बेधडकपणे झुंज देणारे अनेक प्रसंग वाचनात येतात.  कुस्तीच्या एका खेळात खांद्याला जबर दुखापत झाली असताना म्हणजे खांदा निखळला असताना वेदनाशामक औषधे घेऊन दिल्लीला कुस्ती खेळण्यासाठी रवाना होतात. ही कुस्ती म्हणजे त्यांच्या एकूणच संयमाची आणि जिद्दीची परीक्षा बघणारी होती. कारण खांद्याला दुखापत असताना देखील एका दिवसात चार काटा कुस्ती आणि सलग ९ वेळा कुस्ती खेळताना त्यांनी दिलेली झुंज थक्क करणारी आहे, तो प्रसंग वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.

                   मधल्या काळात थोरले बंधू कुमाणा व बहिणीचे लागोपाठ झालेले निधन आणि कुस्ती खेळात काहीवेळा आलेल्या अपयशामुळे काही वेळा अत्यंत निराशेचा काळही जीवनात येतो.ते वाचत असताना आपल्याही मनात अस्वस्थता निर्माण होते. उदास झालेले जोशीलकरांचे मन गावाकडे आपल्या नात्याकडे धाव घेते.घरच्यांचा व गुरूंचा मिळणारा मोठा आधार यामुळे पुन्हा नव्याने उभारी घेऊन नव्या जोमाने आखाड्यात उतरतात. यशापयशाची कडू गोड चाखत अथक प्रयत्नातून अखेर महाराष्ट्र केसरीचे जे उद्दिष्ट होते.अनेकवेळा त्या यशाने हुलकावणी दिली होती. अखेर १९८५ साली महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान सिद्धीस जातो. आणि कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर नावाचा इतिहास रचला जातो.चंदगड तालुक्यातील किणी सारख्या गावाचा डंखा देशात गाजतो. सर्वच स्तरातून कौतुकाचा, सन्मानाचा वर्षाव होत राहतो. पैलवनासाठी वेडे झालेले गांव जोशीलकरांची  बैलगाडीतून आनंदानं मिरवणूक काढते. अशाप्रकारे रंगतदार कुस्तीची अनेक मैदाने गाजवणाऱ्या पैलवानाची भरगच्च यशोगाथा पानापानांवर वाचायला मिळते.

                              वीज मंडळात नोकरी करत असताना देखील मंडळाच्या वतीने कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन महामंडळाला प्रतिष्ठा मिळवून देतात. कुस्ती मधून निवृत्त झाल्यानंतर आजदेखील नवीन पैलवनांना ते मार्गदर्शन करत आहेत.पुस्तकाच्या उत्तरार्धात त्यांच्या आजच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला आहे. राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.पतसंस्थेच्या चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळताना मालक नव्हे तर चालक म्हणून सर्वांच्या सहकार्यातून चांगली वाटचाल केली. हे सर्व करत असताना त्यांचा अभिनयकलेशी नाते जुळाले. 'तालीम' या चित्रपटात ही त्यांनी कुस्ती वस्तादाची भूमिका ताकदीने साकारली आहे तसेच काही मालिकेतही भूमिका केली आहे.  वयाच्या ५० व्या त्यांनी पदवी संपादन केली.म्हणजे शिकण्याची ही उर्मी आजच्या तरुणांच्या समोर एक उदाहरण आहे. शासन आणि संस्था यांच्या कडून अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

                     अशा एका गाव खेड्यात जन्माला आलेला पोर कुस्तीच्या जोरावर कशी गरुडझेप घेतो याचा लेखाजोखा अगदी पध्द्तीशिरपणे या पुस्तकात मांडण्यात आला आहे. जोशीलकरांच्या बालपणापासून आजमितीपर्यंतचा शब्दप्रवास वाचताना त्यांचा संपूर्ण जीवनपट वाचकांसमोर उलगडत जातो. पुस्तकाच्या शेवटी त्यांच्याविषयीं नातेवाईकांनी लिहलेल्या कविता मनाचा ठाव घेतात. ओघवत्या व सखोल मांडनीने त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. कुस्तीच्या आराखड्यातील एका पैलवानाची झुंज ही फक्त यश आणि अपयश यापुरती मर्यादित न राहता. ती अनेक अंगाने वाचकांसमोर येते. कुस्ती ही फक्त शक्तीचे प्रदर्शन नाही तर त्यातून कौशल्याचे, संयमाचे शक्तीचे आणि युक्तीचेही  दर्शन होत असते. एका कर्तृत्ववान पैलवानाच्या जीवनावर आधारलेले हे पुस्तक जीवनाच्या पटावर पराभवाने खचून जायचे नाही आणि यशाने हुरळून जायचे नाही तर संयमीपणाने,कौशल्याने आणि धैर्याने झुंज देत राहायचं हा महान बोध देऊन जाते.

                    खरंचं या दोन लेखक द्वयींनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. लेखनसामग्री गोळा करून असे जीवनचरित्र मांडणे ही सोपी गोष्ट नाही. त्या व्यक्तिमत्वाच्या जीवनाशी समरस होऊन लिहिताना लेखक स्वतः त्या भूमिकेत शिरला आहे. म्हणून तर वाचकाला ते वाचत असताना त्या व्यक्तीरेखेशी एकरूप होता येते. त्यांच्या लेखन कष्टाचे विशेष कौतुक आहे कारण, त्यांच्या अथक प्रयत्नामुळे  एखाद्या महान पैलवानाचे आत्मचरित्र,जीवनाचे अंतरंग, विविधांगी पैलू आणि कुस्तीच्या मैदानातील त्यांची प्रत्येक झुंज सर्वांसमोर आणून एक महत्वाचे काम केले आहे.या पुस्तकाशिवाय जोशीलकरांच्या एवढ्या सगळ्या उत्तुंग वाटचालीबद्दल संवेदनशील वाचक व समाज अनभिज्ञ राहिला असता. अत्यंत क्रमबद्ध आणि विस्तारित रुपात जीवनाचा सार वाचकाला वाचायला मिळतो.पुस्तकाला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांची सखोल,विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. प्रत्येक कुस्तीपट्टू,पैलवान, कुस्तीशौकीन किंबहुना सर्व वाचकांनी वाचायला हवे असे हे पुस्तक आहे. कारण कुस्तीच्या आखाड्यातील तांबड्या मातीतील एका वाघाची झुंज आपण शब्दागणिक अनुभवू शकतो तशीच जीवनाच्या आखड्यात कशी झुंज द्यावी हे ही यातून शिकू शकतो.



किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८.



पुस्तक - रग तांबड्या मातीची...झुंज वाघाची. 


पुस्तक मूल्य : २००/-

प्रकाशक - अक्षरदीप प्रकाशन 

पुस्तकासाठी संपर्क - सदानंद पुंडपाळ -+91 94049 68829

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

पुस्तक परीक्षण - जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.'




जीवनाच्या खडतर संघर्षातून सकारात्मक वाटचालीकडे घेतलेलं 'वळण.'


                                उसाच्या कांडक्यांनं पाठीमार मार देत आईनं शाळेला घातलं. पाठीवरच्या मारानं लेखकाचं पाटीवरचं शिक्षण सुरू झालं. अक्षरांच्या वळणापासून जीवनाच्या खऱ्या वळणाला इथूनच सुरुवात होते. घरचं आठरविश्व दारिद्र्य. बाप काहीसा विरक्ती  वृत्तीचा. बापाला कोणतंही व्यसन नसताना देखील संसारात लक्ष कमीच. त्यामुळे संसाराचा जास्त करून भार आईच्या खांद्यावरच. भौतिक सुखाच्या लोभापायी घर दुभंगणारी कोत्या वृत्तीची आत्ती आतून किती निष्ठूर असते, यावरून नाती जशी भासतात तशी असतातचं असे नाही, याचा प्रत्यय येतो. शेती-घराच्या वाटणीवरून भाऊबंदकीतला तिडा आणि मग वाटणीवरून सतत एकमेकाला भिडा. त्यातून हाणामारीपर्यंत उद्भवणारा तंटाबखेडा हा भाऊबंदकीतला कडवटपणा म्हणजे कुठंही जावे पळसाला पानं तीनंच, हे इथंही प्रकर्षाने दिसून येतं. गावात प्राथमिक शिक्षण सुरू असताना सकाळ संध्याकाळ शेरड-गुरं राखत शाळा शिकायची. लेखकाचे बालपण अगदी माती, नदीनाला, रानाशिवारात, झाडाझुडुपांच्या संगतीत गेले आहे. बालपणाच्या लहरी स्वभावामुळं विचलित होऊन शाळेकडे लक्ष कमी होतं. आणि मग सवंगड्यांसोबत दिवसभर हुंदडायचं, कुत्रं पळायचं, असा सारा उद्योग. परंतु वेळीच शिक्षकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे व मार्गदर्शनामुळे नव्याने शाळेची सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात शिक्षकांनी पाठ करून घेतलेली कुसुमाग्रजांची ‘कणाʼ ही कविता. खरंतर हीच कविता पुढे लेखकाच्या आयुष्याचा ‘कणाʼ होते. या कवितेपासूनच वक्तृत्व कलेचा पाया घातला जातो. बालपणापासून संघर्षाच्या तीव्र झळांचे चटके लेखकाला पदोपदी सहन करावे लागतात. शाळा शिकत पोटासाठी पडेल ती मोलमजुरीची कामे करावी लागतात.


दहावीला जेमतेम गुणांनी पास झाल्यानंतर गरिबीमुळे पुन्हा शिक्षणात खंड पडतो आणि मग MIDC मध्ये हेल्पर म्हणून तुटपुंज्या पगाराची नोकरी करावी लागते. पण यावेळी एक अनपेक्षितपणे अपघात होतो. आणि यात गुडघ्याला झालेली दुखापत. इथे कहाणी एक वेगळं वळण घेते. वाईटातून एकेकदा चांगलं घडतं त्या पद्धतीने या प्रसंगातून पुन्हा एकदा शिक्षण सुरू होतं. शिक्षण घेण्याच्या इच्छेला गावच्या काही प्रतिष्ठितांनी सांगितलेल्या सल्ल्याचं बळ मिळतं. मावळलेला उत्साह पुन्हा जागृत होतो. आणि पुढील शिक्षण कोल्हापूर येथील कॉलेजमध्ये सुरू होतं. गरिबीतून आलेला व शिक्षणात जेमतेम असलेला एक मुलगा इथे आल्यानंतर त्याच्यात झालेले बदल मात्र वाचकाला अवाक् करतात. लेखकाला अवगत असलेली मूळची भाषणकला या ठिकाणी चांगली बहरते. लेखकाला एक वेगळी ओळख निर्माण करून देते. कॉलेजमधील चांगले मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी प्रिय शिक्षक यांच्या सकारात्मक सहवासामुळे लेखकाच्या स्वभावात विलक्षण फरक पडतो. अभ्यास आणि मित्रपरिवार यांमध्ये लेखक रममाण होतो. अकरावीत असताना सुमन नावाच्या मुलीशी मैत्रीचे बंध जुळतात, पण यात प्रेमासारख्या भावनेला थारा न देता आईवडिलांच्या विश्वासास पात्र ठरण्याची आकांक्षा बाळगलेली सुमन मैत्रीतील पारदर्शीपणा राखते, हे प्रत्येक नितांतसुंदर मैत्रीसाठी आदर्श ठरणारा किस्सा आहे. पुढे बारावीत संज्ञा नावाच्या मुलीशी मैत्रीचे नाते जपत असताना अखेर लेखकाच्या प्रेमाची  संज्ञा स्पष्ट होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते व हळूहळू दोघेजण एकमेकांत गुंतत जातात. पण हे प्रेम निस्वार्थी, निकोप आणि विश्वासूपणाच्या आधारावर वास्तवाचे भान असणारे होते. त्यामुळे प्रेमाच्या भरात असतानाही दोघांचे अभ्यासाकडे मात्र बिलकुलही दुर्लक्ष होत नाही. कॉलेजमध्ये सेक्रेटरी पदाची झालेली निवडणूक आणि त्यात एका मताने झालेला पराभव. परंतु विजय झालेल्या मित्राने आपल्या विजयापेक्षा आपल्या मित्राच्या पराभवाने रडू कोसळावे, हे निरपेक्ष व जिंदादिल मित्राचे उदाहरण वेधक ठरते. रात्रीचा दिवस करून घेतलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर लेखक संरक्षणशास्त्र विषयात ९८ गुण घेऊन ७२% गुणांनी बारावीत उत्तीर्ण होतो. आणि एवढेच नाही तर एक सामान्य विद्यार्थी म्हणून आलेला विद्यार्थी मेन राजाराम कॉलेजचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करतो. लेखकाच्या यशाचा हा चढता आलेख प्रेरणादायी तसाच सुखावणारा वाटतो. दरम्यानच्या काळात वक्तृत्व कलेतून विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळत जाते. आणि अत्यंत अभिमान वाटावा असा प्रसंग म्हणजे जेंव्हा राजस्थान येथे एका कार्यक्रमात युवा वक्ता म्हणून हिंदीतून भाषण करण्याचा सुवर्णक्षण लेखकाच्या आयुष्यात येतो. 


शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगून डी.एड करण्याचं ठरतं, पण पहिल्या प्रवेश यादीत नसणारे नाव यामुळे पदरी आलेली निराशा आणि शेवटी मग निश्चित झालेला प्रवेश यामुळे झालेला आनंद. दरम्यानच्या काळातली हुरहूरता, अस्थिरता आणि दुःखावेग मनात काहूर माजवतो. पण शेवटी सुख आणि दुःख अशा भावनेच्या दोन भिन्न टोकांचं दर्शन होतं. डी.एड ला प्रवेश मिळवण्याचं पूर्ण केलेलं वचन संज्ञाला सांगण्यासाठी लेखकासह चौघे मित्र  सायकल ट्रेकिंगचा बहाणा करून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जातात. तो प्रसंग थक्क करतो. तिथे संज्ञाच्या घरच्या लोकांच्याकडून घरात एक व बाहेर दुसरीच मिळालेली वागणूक ही अनपेक्षित असते व तिथेच दोघांच्या प्रेमाच्या नात्याचा अंत होतो, ते दोघांच्या प्रेमभंगाचे दुःख मनाला असह्य करते. पुढे मात्र लेखकाच्या आयुष्यात वेगळेच वळण येते. संघर्ष आणखी बिकट बनतो. वडिलांना कुष्ठरोगाचे निदान होते व त्यानंतरची एकूणच परिस्थिती थक्क करणारी आहे. वडिलांचा हट्टी स्वभाव असल्याने बरी होणारी जखम वडिलांच्या बेजबाबदार वागण्यानं पुन्हा बळावणं, किंबहुना त्या जखमेतून अक्षरशः जंतू बाहेर पडतात, एकूणच तो प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो. आणि मग नाईलाजाने कुष्ठरोग्यांच्या दवाखान्यात त्यांना दाखल करावे लागतं. या रोगामुळे वडिलांची झालेली सैरभैर अवस्था, नातेवाईक लोकांच्याकडून वडिलांचा झालेला अपमान- उपहास मनाला विदीर्ण करतो. परंतु या काळात लेखकाने व आईने वडिलांची केलेली शुश्रूषा, घेतलेली काळजी, दिलेला आधार हे मुलग्याच्या कर्तव्यपालनाचं आदर्श उदाहरण वाटतं. हा रोग बरा होऊन शेवटी वडील त्या दवाखान्यातील कुष्ठरोग्यांची शुश्रूषा करण्यात रमतात, हे वाचून समाधान वाटते. 


मित्राचे औदार्य काय असू शकते, याचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे आधुनिक कृष्ण-सुदामा मैत्री. आजूबाजूच्या घरांत कालानुरूप बदल झाला आहे, जुनी कात टाकून नवीन घरं उभी राहिली आहेत. केवळ लेखकाचे वगळता. अशा वेळी उदय नावाचा मित्र घरी येतो आणि सरोज मी तुझं घर बांधून देणार आहे, ही प्रबळ इच्छा बोलून दाखवतो. अट एकच की शेवटपर्यंत याची वाच्यता कुठेही करायची नाही. मित्राचे हे वेडं धाडस होतं. याला कितीही विरोध केला तरी मित्र आपल्या निर्णयावर ठाम आणि काहीच दिवसांत या मित्राच्या धडपडीमुळे नवं घर उभा राहतं. शेवटी लेखक आपल्या मित्राचे पैसे परत करतो हा भाग वेगळा; पण एक मित्र आपल्या मित्रासाठी काय करू शकतो. मित्रत्वाची भावना किती उदात्त असते, हे यावरून कळते. हे वाचत असताना अशा मित्राला मनोमन सलाम करावासा वाटतो.


डी.एड चे शिक्षण करतानाच लेखक ग्रामीण पत्रकारितासुद्धा पूर्ण करतो. याचा पुढे खूप फायदा होतो. सकाळकडे बातमीदार म्हणून काम करू लागतो. समाजात घडणाऱ्या नानाविध चांगल्या वाईट घडामोडींचा वेध लेखक घेतो. अतिशय तळमळीने प्रामाणिकपणे आणि परखडपणे केलेल्या वार्तांकनांमुळे अल्पावधीतच एक नवी ओळख निर्माण होते. अंधारातलं वास्तव सत्य प्रकाशात आणण्याचा लेखक आटोकाट प्रयत्न करत असतो आणि त्यात तो यशस्वी होत जातो. यातून लोकांशी बरेवाईट संबध तयार होतात. लोकसंग्रह वाढतो. मोठ्या लोकांचा जवळून सबंध येतो. अन्याय, भ्रष्टाचार, अविवेकीपणा विरुद्ध लेखकाचे विचार बंड करतात व आपल्या लेखणीतून ते प्रकट करतात. कामाच्या वाढलेला विस्ताराचा परिणाम म्हणजे  डी.एड ला कमी गुण पडतात. कमी गुणांमुळे सरकारी शिक्षक भरतीतील संधी हुकते. त्यामुळे मग शेवटी नाईलाजाने विनाअनुदानित शाळेत अल्पमानधनावावर शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागते. अशाप्रकारे शिक्षक व बातमीदार असा दुहेरी प्रवास सुरू होतो. परिस्थितीशी झुंज सुरू असतेच. मनात नसतानाही घरच्यांच्या आग्रहावरून लग्न होतं आणि सुसंस्कृत, गुणी व सामंजस्य ‘शिल्पाʼ पत्नी म्हणून लेखकाच्या आयुष्यात येते. येथेच लेखकाच्या आयुष्याला एक आशादायी शिल्पकार वळण मिळते. विनाअनुदानित तत्वावरील अधांतरी नोकरीची शाश्वती न धरता स्पर्धा परीक्षा देण्याची महत्त्वाकांक्षा लेखकाच्या मनात बळावते. पण मुळात गणित विषय कच्चा. ही मुख्य अडसर. पण नेमकी गणित विषयात पत्नी वरचढ. त्यामुळे संसाराची गणितं जुळवताना गणित विषय पत्नीकडून शिकून घेऊन पक्का केला जातो. म्हणजे पत्नीसुद्धा आपली कशी गुरू होऊ शकते, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळते. पत्नीच्या खंबीर साथीने लेखक पुन्हा आव्हाने पेलण्यास सिद्ध होतो. आर्थिक परिस्थितीवरून होणाऱ्या सामाजिक-मानसिक अवहेलनेकडे दुर्लक्ष करत दोघेही आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात. बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी पती-पत्नी कोचिंग क्लास सुरू करतात. पण इकडे स्थिर नोकरीची आस लेखकाला लागून राहिलेली असते. त्यामुळे नोकरीच्या संधीची वाट पाहात असतो. आणि एक दिवस ती संधी येते. नोकरी संदर्भ वाचत असताना विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये नोकरभरतीची जाहीरात वाचण्यात येते. आणि सर्वशक्तीनिशी या पदासाठी लेखक प्रयत्न करतो. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी विशेष कष्ट घेतो. आणि नोकरीचं एक दिव्य कष्टाच्या बळावर पूर्ण करतो. २०११ साली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मधील नोकरीत लेखक रुजू होतो. संघर्षाची नवनवीन वळणे घेत सध्या इथपर्यंतच्या वळणावर लेखकाचं जीवन स्थिरावलेलं आहे.


हा एकंदरीत प्रवास वाचत असताना आपण लेखकाच्या भूमिकेत जातो. घडणाऱ्या प्रसंगांशी एकरूप होतो. लेखकाचे शब्दांकित अनुभव वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. अस्वस्थ करतात. वाचन करताना मनात भावनांचे आंदोलनं सुरू होते. काही प्रसंग अगदीच थक्क करणारे, मनाला भिडणारे किंबहूना वडिलांच्या अपमानाचे प्रसंग तर जिव्हारी लागणारे आहेत. 


आयुष्याच्या खडतर प्रवासात टाळता न येणारी वळणे असतात आणि त्या वळणावर आपल्याला स्वतःहून वळण घ्यावं लागतं. वळण घेताना नव्या वळणाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक वळणावर संघर्ष हा ठरलेला असतो. काट्याकुट्याने वाट भरलेली असते. ऊन, वारा, पाऊस झेलावा लागतो, अनपेक्षित वादळ येत असतात. एकप्रकारे परिस्थितीला आपण कसे तोंड देतो .जीवनाच्या या परीक्षेत आपण कसे उत्तीर्ण होतो, याला महत्व असते. जीवन-मरणाच्या मधल्या वाटेत लागणारं वळणच जीवन घडवत असतं. अशाच वळणांवर आधारित हे पुस्तक आहे. जीवनाच्या वाटेवरील चढउतार स्वीकारत सकारात्मकतेकडे जाणारे हे वळण आहे. अपयशाचं, अपमानाचं, संघर्षाचं यशात रूपांतर करणारं हे वळण आहे. वि.स.खांडेकरांच्या अमृतवेल पुस्तकात सांगितल्याप्रमाणे   " एखादं स्वप्नं पाहणं, फुलवणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपणं, पण दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यांरून रक्ताळलेल्या पावलांनी पुढे जात एखादं स्वप्नं पुन्हा पाहणं, फुलवणं व वास्तवात उतरवणं यामुळे मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो." या ओळी लेखक खऱ्या अर्थाने जगला आहे. जीवनातील प्रखर संघर्षामुळे आणि कष्टप्रद वळणाने शेवटी लेखकाच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. ज्या आईने उसाच्या कांडक्याने पाठीवर मार देत शिक्षणाच्या प्रवाहात आणून सोडलं त्या माउलीला हे पुस्तक वाचल्यानंतर कोणीही अभिमानाने सांगेल "माउली तुझं हे पोर चांगल्या वळणाला लागलं बरं का."

हे पुस्तक वाचून कुठे तरी वळचणीला धडपणारी पोरं खऱ्या अर्थाने वळणाला लागतील. फक्त एकदा त्यांनी हे पुस्तक हातात धरलं पाहिजे. मनापासून वाचलं पाहिजे. खरंतर आत्मचरित्र म्हटलं की, वयाच्या उत्तरार्धात पूर्वार्धापासून मांडलेला लेखाजोखा. असा प्रकार सर्वश्रुत आहे. पण असे कोणतेही बंध या पुस्तकाला लागू नाहीत. लेखकाने अगदी तरुण वयातचं आपल्या पूर्वार्धाच्या अस्वस्थ संघर्षाला वाचा फोडून साहित्यक्षेत्रात वळणच्या रूपाने एक अनोखी देण दिली आहे. तरुण, युवा, शिक्षित पिढीला संघर्षातून आपली वाट निर्माण करण्यासाठी नक्कीच हे पुस्तक मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. खासकरून राज्यातील अनेकवर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांनी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. कारण पगाराच्या आशेवर दिवस न कंठता नवीन वळण घेऊन आपली एक स्वतंत्र वेगळी वाट निर्माण करण्याचं उदाहरण हे पुस्तक घालून देतं. जीवनाच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना, हतबल झालेल्या जीवांना योग्य दिशा, ऊर्जा देणारे असे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे सरांच्या प्रस्तावनेतून लेखकाच्या पुस्तकाच्या अंतरंगाचे प्रतिबिंबित्व उमटलेले आहेच. तर मलपृष्ठावरील डॉ. राजा दीक्षित (अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) यांचा पुस्तकाविषयीचा सारांशरूपी अभिप्राय वाचकांस वाचनासाठी अभिप्रेत करतो. जीवनाच्या वाटेवरची अनपेक्षित वळणं समजून घ्यायची असतील, तर सरोजकुमार सदाशिव मिठारी यांचे वळण हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.


- किरण सुभाष चव्हाण.(कोल्हापूर)

मोबा- ८८०६७३७५२८.

पुस्तकासाठी संपर्क :


बुधवार, १३ एप्रिल, २०२२

बुक रीडिंग - डॉ सुनील कुमार लवटे डॉ नरेंद्र दाभोलकर अथव और जागर द्वारा संपादित

 

बुक रीडिंग - डॉ सुनील कुमार लवटे डॉ नरेंद्र दाभोलकर अथव और जागर द्वारा संपादित।


डॉ नरेंद्र दाभोलकर आठव और जागर एक ऐसी किताब है जो मन में विवेक पैदा करती है।

                                 यह एक ऐसी किताब है जिसे एक बैठक में पढ़ा जा सकता है। मैंने वरिष्ठ लेखक और विचारक डॉ. सुनील कुमार लवटे द्वारा संपादित डॉ. नरेंद्र दाभोलकर आठव और जागर नामक पुस्तक पढ़ी। कुछ ही महीनों के भीतर मासिक स्मृति जागर व्याख्यान कार्यक्रम शुरू किया गया। उस कार्यक्रम में पाँच व्याख्यानों का संग्रह प्रस्तुत एक पुस्तक है। इस पुस्तक में हमें उन महान लोगों के विचारों का सार पढ़ने को मिलता है जो सीधे जुड़े हुए थे और जिनके साथ काम किया था उन्हें। डा. दाभोलकर के कार्य योगदान, विचारधारा, व्यक्तित्व के विभिन्न पहलुओं का अनावरण करते हुए दाभोलकर एक व्यक्ति नहीं बल्कि एक विचार हैं।

                        डॉ। नरेंद्र दाभोलकर का काम उस काम के सामने की चुनौतियाँ, उनका यादगार व्यक्तित्व, साहित्य के क्षेत्र में उनकी उपलब्धियाँ। दाभोलकर, जो सुरेश भट और कुसुमराज जैसे दिग्गज कवियों द्वारा अपनी कविताओं के लिए जाने जाते हैं। वास्तविक अर्थों में, उन्होंने साधना पत्रिका को ऊर्जा दी और इसे विशाल उपभोग की एकमात्र पत्रिका बना दिया। उन्होंने दिखाया कि कैसे हम किसी भी क्षेत्र में अपनी लगन के बल पर ऊंचाइयों तक पहुंच सकते हैं।

                       देश में मार्क्सवादी, गांधीवादी, हिंदुत्व, अम्बेडकरवादी विचारधारा जैसी विचारधाराएं हैं। समय के साथ वे कैसे प्रभावी ढंग से प्रवाहित होती हैं। इसका विस्तृत उपचार यहां पढ़ा जा सकता है। चर्च जो पूजा स्थल हुआ करते थे अब सांस्कृतिक केंद्र बन रहे हैं और यह बदलाव आज से 30 साल पहले शुरू हुआ था। और सवाल यह उठता है कि क्यों हाल ही में मंदिरों की संख्या में वृद्धि, स्कूलों की संख्या के बजाय जो अभी भी सामाजिक परिवर्तन का केंद्र हैं, हमारे लिए चिंता का विषय है।

                       नई पीढ़ी के मन में नरेंद्र दाभोलकर की यह समझ कि मानव जीवन की मान्यताओं, अंधविश्वासों, प्रथाओं और परंपराओं को तोड़कर एक तर्कसंगत, वैचारिक और वैज्ञानिक समाज का निर्माण करना चाहिए, तर्कसंगत जीवन को स्वीकार करना, विज्ञान को स्वीकार करना और जीवन के मूल्यों को स्वीकार करना चाहिए। सत्य की कसौटी पर, असामाजिक अंधविश्वासों से बचना, विचारधारा और ननिवा की भावना पैदा करने का कार्य अब उनके पीछे पुराने और बुद्धिमान लोगों के हाथ में है। और सही मायने में इस पुस्तक में महान हस्तियों द्वारा व्यक्त विचार ईमानदारी से उन विचारों को जागृत कर रहे हैं जो डॉ नरेंद्र दाभोलकर के विचारों की विरासत को अगली पीढ़ी तक पहुंचाएंगे।

                       कुल मिलाकर डॉ. नरेंद्र दाभोलकर की पुस्तक आठव और जागर को पढ़ते समय यह सोचने पर मजबूर हो जाता है कि जीवन के मूल्य क्या होने चाहिए, लक्ष्य क्या होना चाहिए, सिद्धांत क्या होना चाहिए। और गुप्त विवेक मन का निर्माण करता है।

                                                                     - किरण चव्हाण. 8806737528.

Book Test - This is what happened Rajaswini - Vijayalakshmi Devgoji.

 

Book Test - This is what happened Rajaswini - Vijayalakshmi Devgoji.


 Mrs. Vijayalakshmi Vijay Devgoji's book 'Ashi Ghadali Rajaswini' is a collection of cultured letters.


                                  Her parents, brothers, grandparents went to Rajasthan at an early age for Navodaya education and got the post of Indian Revenue Service (IRS) from UPSC on the strength of their studies. The present book contains a collection of letters written by grandfather and uncle. In the first section, there are letters written under this name by the mother who loves her child. The chariot of love, rites, and guidance has been carried through the letters of Madhulika. No matter how far your loved one is from you, words work to bridge the gap between two souls. What is in the letter written by mother to her beloved Leki ..? The essence of the whole life, The philosophy is hidden in it. In Leki's absence, she lives with her whole world in mind. And that's what she keeps saying in the letter. Sending a letter every week without fail is her motto. And she never breaks it.


                                       Mother writes a letter from Lanza district-Ratnagiri. Nature from Konkan sends rain, soil, water of Parhya, trees and wind to Rajasthan in a letter. The mother tries to express in words where she has gone, what she has done, what she has brought new, festivals and seasons. One by one, she writes in the letter. At the beginning of such a letter, the core of the letter is the culture. And the purpose of the letter is to make Madhulika realize the high goal. Strengthening the goal in her mind, mother Narendra Jadhav's father and we give the father's sentence in the book as a reference. That is, the innate qualities, intelligence, decisiveness, Seeing the repressive attitude, her goal is to become an IAS officer. And it is her parents and all her relatives who are trying to make her happy. 

                                    And so even though she is far away for the sake of education, she has been guided through her letters through letters. On the one hand, to increase the concentration of the mind, while reciting the Ramsrot and Atharvashirsha recitations, on the other hand, to increase the knowledge, the mother sends the questions and answers of the general knowledge through the letter. A mother who emphasizes the importance of evening masculinity is now rare. One of the features of this letter is that it conveys general knowledge questions. The mother suggests a meaningful poem, a summary essay, a list of books to read with reference to the books she has read, decides which books to give her during her visit, and basically Madhulika is fond of extra reading, poetry. While cultivating linguistics, she talks about the importance of Maiboli Marathi and also urges her mother to master English, how to speak and write English, how the village doctors, teachers or relatives appreciate Madhulika. And the mother easily achieves the goal of building self-confidence. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother instinctively seeks to increase Leki's enthusiasm and self-confidence by urging her to write, how the village doctors, teachers or relatives appreciate Madhulika, how she will become a successful and capable girl. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother instinctively seeks to increase Leki's enthusiasm and self-confidence by urging her to write, how the village doctors, teachers or relatives appreciate Madhulika, how she will become a successful and capable girl. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother consciously mentions in the letter how she will be a successful and capable girl, so that the mother can easily achieve the goal of increasing Leki's enthusiasm and self-confidence. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. The mother consciously mentions in the letter how she is going to be a successful and capable girl. At the same time, she asks her relatives to write letters to her friends as well. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality. Why should we live by introducing ourselves through each and every such rite and why should we live ..? The mother inserts this text through letters. The supreme rite of passage is the focal point of all the letters in the book, enriching the life of others by enriching our life by creating our separate existence and personality.

                                  If mother doesn't care about hair to nails then who cares ..? The mother should tell the mother how to take care of her hair, eating, sleeping, getting up. Every word flows from mother to mother. It turns out that this is a concern for a favorite item. There is always a comment to reply to her. But while doing all this, she is a mother. She has to give up her mother's temptation and throw away her stomach for education for her bright future. Without Leki, mother is insufficient. Her life is beautiful. She evokes the memory of Leki moment by moment and moment by moment. Only she lives with the body and her whole life is with Leki.

                               Dad's Letters to Madhulika In this section, there are letters written by Dad to his Leki. Baba says in one place, you two children are the source of our consciousness in this desolate life. In his letter to Baap Leki, Baap gives Lekki a comprehensive lesson on how to compete, how to maintain gratitude, how to maintain friendship, how to correct mistakes. While replying to Leki's letter, he compliments her. The father greets his darling Leki, who is far away, with the help of Madhuli, Chimani, Pillai. Appreciating her cleverness, my father says that my lake is the Krishna of my knowledge. In any case I.A. This goal of S. Vyach is firmly rooted in Leki. No matter how much he does, his father is also injured inside for Leki. Such art asks. If the letter does not come, he smiles and if it does, he is happy. Leki's coming letter is a sprinkling of joy over sadness. If the letter does not come, he smiles and if it does, he is happy. Leki's coming letter is a sprinkling of joy over sadness. If the letter does not come, he smiles and if it does, he is happy. Leki's coming letter is a sprinkling of joy over sadness.

                              The letters written by the brother to the sister are also similarly cultured. Your brother is firmly behind you in any crisis. Did you forget your sister? My brother's answer to this is that it would be the most impossible thing in the world. Along with the study, he is aware of his situation, the hardships of his parents. He has a good friend in his brother-in-law. Sister brother's strong love can be seen in the letters.

            The letters written by such grandparents and uncles are rich and prosperous. The mother of the young Madhulika says this in a letter to her when she comes to visit. You can smile while reading such a list of 'Aanaani'. Prakash realizes that this is what we used to say when we were that age. In her letter, she feels a sense of innocence, purity, meaningful words from a child. Feelings of guilt about the frugality of money, savings and money spent by mistake, honestly admitting your mistake and getting rid of it. The progress in studies, the success in essay writing, the appreciation of the teachers, with which Madhulika went there, does not detract from it in the slightest.

                This is the fruit of the rites in which the letters in the book presented in this way went on to make history in the true sense of the word. He was promoted to the post of IRS. This is how the revenue of Madhulika happens. Blessed are the parents who give birth to such gems. That is why it is called pure seeded fruit juicy gomati. This is an example of that. In the journey from the little honeymoon to today's revenue,

These sacramental letters are true witnesses in the journey of success. I mean, what letters do alchemy. This book shows how important the role of letters was in the formation of Madhulika which is at the peak of supreme success today. 


                    In today's age of social media, letters are kind of left behind. Today, we are connected through many social media like WhatsApp, Facebook, Twitter with a single click. The world of an artificial emotion is expanding day by day. Where there is only talk but there is no communication. These are shallow mediums that connect and express each other. Today, a huge treasure of knowledge is available on mobile, WhatsApp University. But I don't know what to take, how much to take and how to take it. Excessive use of mobiles is the cause of our own destruction. The letter, on the other hand, expresses natural feelings. The stomach descends from the fingers to the leaves. What can be said can be expressed precisely. Letters were a thread connecting two souls, a relationship. And the book shows what letters can do in today's age of social media. 

                      From this book, an ideal family of Devgoji family, love in relationship, harmony among all, culture, unity is to be taken by all. The correspondence in the book is introspective on how letters are used to communicate with distant relatives against the backdrop of the disappearance of communication between family members today. The layout of the letters, the combination of thoughts, emotions, language style, fluency keep the reader hooked. While reading each letter, the reader enters into that role. All of these letters are so expressive, meaningful and cultured that, Even the mind of the reader does not survive without an unintentional version. The longing for love is intense. Reading how much the moments of separation bother the mind, our mind also becomes restless, fluid. Sometimes the mind is full. The eyes are filled with tears. 

                      In fact, the feelings expressed in these letters are the feelings in the minds of each and every parent. Because if my parents could read and write, that's what they would have told me. Today, every parent has such a condition that he cannot speak with his mouth and cannot write with his hands. That is, the feelings of the mind cannot be conveyed to his mind accurately. Such parents should read this book carefully. In fact, they should read it to their children. Teachers should read this book and let the students read it. This book is written for me by my parents as well as students and children. The sentiments in this letter should be read with understanding. Thoughts in him should be brought into practice. After reading these letters, if yesterday's little madhulika today IR. If S is taking a leap to this post, then why can't you take a leap by reading these letters ..? Therefore, it is an important and informative book that every parent should read and collect by sensitive readers.

Uncle-in-law

Madhulika Devgoji-Kadam Akshay Kadam


- Kiran Subhash Chavan. (Kolhapur)

  8806737528.






Book: That's what happened, Rajaswini
Pages: 217
Book Price: 160 / -

Contact for book - 
Mrs. Vijayalakshmi Vijay Devgoji.
Mob- 84463 75251

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...