फॉलोअर

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार)




देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार) 

                                     आपल्या कामाची पावती एका पुस्तकाच्या पानावर जेव्हा छापून येते त्यापेक्षा अजून कुठला आनंद हवा.. तर असो मुद्दा हा आहे. लेखक किरण जी चव्हाण लिखित" विनाअनुदानितची संघर्षगाथा"  हे पुस्तक नुकतेच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे हस्ते प्रकाशित झाले. जे देशाचे भावी आधारस्तंभ घडवितात अशा शिक्षकांची विनाअनुदानितचे लेबल चिकटवून होत असलेली दैना या पुस्तक रुपाने जगासमोर आली. कारण असेच एक विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील सर यांचा जीवनपट लेखक किरणजींनी आपल्या संघर्ष गाथेत सविस्तर मांडलाही आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या त्यांची एक विद्यार्थिनी म्हणून पैशा अभावी त्यांच्या मरण यातना मी "ह्याची देही ह्याची डोळा" पाहिल्या आहेत ,अनुभवल्या आहेत.माझ्या जीवाची घालमेल तर तेव्हा झाली जेव्हा विनाअनुदानितच्या नावाखाली दहा वर्ष विनावेतन सेवा देऊन केवळ पैशा अभावी किडनी प्रत्यारोपण होत नसल्याने त्यांच्या पत्नी आपल्या बिनपगारी शिक्षक पतीला व सात वर्षाचा मुलगा पारस  आपल्या बापाला क्षणाक्षणाला मरतांना बघत होते. मी मात्र अवाक झाले. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार वारंवार येत होता की,आपल्या गुरूला वाचवण्यासाठी आपण काही करू शकतो का ? माझे मन मला स्वस्थ बसू देत नव्हते. कारण आव्हान खूप मोठे होते. एकीकडे  माझी केविलवाणी धडपड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी माझ्या महाविद्यालयातील माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना यासाठी तयार केले आणि दारोदारी, गल्लोगल्ली फिरून आम्ही एक-एक रुपयाची अक्षरशः भीक मागितली. महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्या देशात  देशाचे भावी आधारस्तंभ घडविणाऱ्या शिक्षकांना उपचाराअभावी मरणाची वेळ येते आणि त्याला वाचविण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना हातात झोळी घेऊन अक्षरशः दारोदारी भिक्षा मागावी लागते यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते.

                                 विनाअनुदानितच्या नावाखाली शासनाने या शिक्षकांना वर्षानुवर्ष वेठबिगारी सारखे राबवून घेतले.त्यांना व त्यांच्या परिवाराला हाल-अपेष्टा व मरण यातना सह वार्‍यावर सोडले आहे . लेखक किरण जींनी समाजासमोर या पुस्तक रुपाने एक धगधगतं दाहक वास्तव समाजासमोर मांडले आहे. त्यातून विनाअनुदानितच्या नावाखाली वर्षानुवर्ष विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र कार्य  करत आपल्या परिवारासह खितपत पडलेल्या शिक्षकाची खरी बाजू दाखवली आहे. या आभासी दुनियेत याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. मी आभारी आहे, कारण आपल्या कामाची पावती जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या पानावर  छापून येते. आमच्या सरांना वाचवण्यासाठी आम्ही जी धडपड केली त्याचे फलश्रुती म्हणून लेखक किरणजींनी माझा उल्लेख या संघर्षगाथेत केलेला आहे. तर असो, निदान आतातरी शासनाला जाग यावी यावी. किशोर पाटील सर यांची नियुक्ती त्यानंतर अॅप्रोवल या साऱ्या गोष्टी सुव्यवस्थित असून केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे फक्त वेतन निघत नाही.

                              त्यांनी या बाबतीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब  यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पण काही उपयोग आज पर्यंत झाला नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला नेहमी वाटे की, आपण शिक्षक व्हावं, परंतु मी स्वतः हा सारा थरार अनुभवला असल्यामुळे शिक्षक व्हावे हे डोक्यातून काढून टाकले आहे. आमचे शिक्षक किशोर पाटील सर यांची आज खूप मोठी दुर्दशा झाली आहे. महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आणि दुसरीकडे तेरा वर्षापासून विनावेतन अध्यापन. जे बोलायला आणि ऐकायलाही अवघड वाटते त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विनाअनुदानितच्या  नावाखाली राबणारे हे शिक्षक क्षणाक्षणाला घेत आहे.

                          शेवटी मला शासनाला हेच सांगावेसे वाटते की, अजूनही वेळ गेलेली नाही जर देश खऱ्या अर्थाने बळकट करायचा असेल तर शिक्षकांची व त्यांच्या परिवाराची अवहेलना थांबवा.मी या संघर्षगाथेचे निर्माते किरणजींना धन्यवाद देऊ इच्छिते की, त्यांनी शिक्षकांच्या या व्यथा, वेदनांना शब्दबद्ध करून शिक्षकी पेशातल्या हे दाहक वास्तव जगासमोर आणले.

        धन्यवाद…!


      कु. रुचिता चौधरी

    अमळनेर, जि. जळगांव.



           कु.रुचिता चौधरी ही प्राध्यापक किशोर पाटील अमळनेर येथील विनाअनुदानित शिक्षकाची विद्यार्थिनी असून किशोर पाटील यांच्या  दोन्हीं किडन्या ज्यावेळी निकामी झाल्या. त्यावेळी या विद्यार्थिनींने आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने समाजातून निधी गोळा करून आपल्या गुरूंच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभा केली. विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या वाटचालीमध्ये ही त्यांचे योगदान लाभले आहे) 


विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.


गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

---------------------------------------------------------------------------

प्रति,

प्रिय सहृदयी वचक...

             महोदय, मी किरण चव्हाण. लेखक विनाअनुदानितची संघर्षगाथा. आपल्या शिक्षणक्षेत्रातील एक विदारक सत्य व विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित असलेले 'विनाअनुदानित' या विषयावरील महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे...मी स्वतः एक विनाअनुदानित शिक्षक असून चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकारलेले आहे. पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हाच की, मी स्वतः विनाअनुदानित शिक्षक असल्याने तो संघर्ष, वेदना आणि दुःख याची मला जाणीव आहे.आणि या वेदनेला समाजाच्या संवेदनांची जोड मिळावी. तसेच हा संघर्ष समाजातील सर्व घटकापर्यंत जावा अर्थात आपल्यासारख्या संवेदनशील माणसांच्यापर्यंत पोहोचून आपल्या सारख्या सहृदयींचे बळ मिळावे हा हेतू आहे. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही खूपच प्रेरणादायी बाब आहे. आपणांसही विनंती आहे की आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक आवर्जून घ्यावे..नक्कीचं आपला सकारात्मक प्रतिसाद असेलच....धन्यवाद...!

आपलाच नम्र,

किरण चव्हाण.





---------------------------------------------------------------------------




                               " किरण चव्हाण हा कोल्हापूरचा विनाअनुदानित शाळेवर काम करणारा एक प्रतिभावंत शिक्षक त्याने विनाअनुदानित शाळेचा प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी अतिशय गांभीर्याने एक पुस्तक लिहिले. त्यात मंत्री,आमदार,शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना विनाअनुदानीतशी संबंधित अनेकांच्या मुलाखती आहेत. प्रत्यक्ष ही कुटुंबे कशी जगतात त्याची दर्दभरी कहाणी पानापानावर आहे.त्यांची आकडेवारी आत्तापर्यंत झालेले संघर्ष असे अत्यंत बारीकसारीक तपशील या पुस्तकात असल्याने त्याला संदर्भ मूल्य प्राप्त झाले आहे. नुकतेच हे पुस्तक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रसिद्ध झाले या  पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे, ती लिहिता येऊन या बांधवांशी यानिमित्ताने जोडता आले. या विनाअनुदानित शिक्षकांशी बोलताना खूप पोटात तूटते याचे कारण यांनी कोणताच संघर्ष करायचे बाकी ठेवले नाही  पण आपण त्यांच्यासाठी या प्रश्नावर संवेदना गमावलेल्या सरकार कडून काहीच मिळवून देऊ शकत नाही पण किमान हा प्रश्न समजावून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. किरण चव्हाण विनाअनुदानित शिक्षक असून स्वतःच्या खर्चाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे त्यामुळे विकत घेऊन आपण सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे. "


- हेरंब कुलकर्णी

       


 किरण चव्हाण यांचा मोबाईल नं / फोन पे/ गुगल पे - ८८०६७३७५२८.


---------------------------------------------------------------------------


विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.







महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विनाअनुदानितची संघर्ष गाथा पुस्तक सुपूर्द करून त्यांच्याशी चर्चा करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे सर






---------------------------------------------------------------------------



बाबा

"जगण्यातून जगण्याचा धडा शिकवणारा बाप नावाचा शिक्षक."

---------------------------------------------------------------------------

साहित्य क्षेत्रातील साहित्यिक मान्यवर.



ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे 



संत साहित्याचे गाढे अभ्यासक व नामवंत व्याख्याते इंद्रजीत देशमुख


ज्येष्ठ साहित्यिक लेखक दत्तात्रय पवार गुरुजी


ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सर


ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे.





ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्रीकांत नाईक सर




ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे

                  ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे



ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य जी.पी.माळी



साहित्यिक व कवी गोविंद पाटील


ज्येष्ठ साहित्यिक व कवी राजन कोनवडेकर



लोकमत कोल्हापूर आवृत्ती संपादक वसंत भोसले



लेखक बी.एम.हिर्डेकर सर





प्रसिद्ध कवी व  साहित्यक मा.श्री.प्रविण दवणे सर




ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ



ज्येष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे


                 ग्रामीण लेखक व व्याख्याते संजय खोचारे



जंगल अभ्यासक व लेखक दत्ता मोरसे

लेखल अनिरुद्ध गुरव

युवा व्याख्याते व लेखक प्रा. युवराज पाटील

ग्रामीण लेखक संतोष पाटील

      
कथाकथनकार जयवंत आवटे कुंडल

---------------------------------------------------------------------------


         शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर

भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील




आंतरभारती संस्थेचे संस्थापक सचिव मा. अनंत आजगावकर




शिवराज संकुल गडहिंग्लज अध्यक्ष किसनराव कुराडे




कागल तालुका सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष व पत्रकार अतुल जोशी

---------------------------------------------------------------------------

                           राजकिय क्षेत्रातील मान्यवर


पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर.



                     खासदार श्री. बाळु भाऊ धानोरकर 
                    आमदार सौ. प्रतिभाताई बाळू धानोरकर


जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील



जि.प. जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य उमेश आपटे

---------------------------------------------------------------------------

                             शिक्षण क्षेत्रातील मान्यवर



  माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.एकनाथ आंबोकर (जि.प.कोल्हापूर )


             प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.आशा उबाळे           मॅडम (जि.प.कोल्हापूर )

          शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी टी.शिर्के सर


उपशिक्षणाधिकारी मा.डी.एस.पोवार (जि.प.कोल्हापूर )


माजी शिक्षण उपसंचालक अधिकारी संपत गायकवाड सर


विस्तार अधिकारी मा.विश्वास सुतार 

औरंगाबाद जिल्हा वेतन अधीक्षक मा.बाळासाहेब पवार


  मा.सुरेश संकपाळ सर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ कोल्हापूर

---------------------------------------------------------------------------

इतर क्षेत्रातील मान्यवर

वकील


वकिली क्षेत्रातील कायदेअभ्यासक व नामवंत वकील ऍड.प्रशांत भावके 

डॉक्टर

डॉ. संभाजी जगताप.

पत्रकार

श्री. शालबिद्रे अवघडी

---------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुस्तकाचा केलेला सन्मान





विनाअनुदानितची संघरगाथा पुस्तकाच्या निमित्ताने सत्कार कार्यक्रम.



---------------------------------------------------------------------------

प्रसिद्ध साधना मासिकात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकावर आलेला लेख.





बातमी

Tv9 वर आलेली बातमी 











---------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पोहोचलेली विनाअनुदानितची संघर्षगाथा




---------------------------------------------------------------------------

           विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचत प्रतिक्रिया

कृपया खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर वाचा


'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- उत्तम कांबळे.             


'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.


दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल : नंदू साळोखे.

'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक. - राजेंद्र बामणे.

गुलामाला गुलामीची जाणीव  करून देणारे पुस्तक  - दिवाकर दुर्गे 

---------------------------------------------------------------------------

         फोनवरून आलेल्या संवादात्मक प्रतिक्रिया 

          कृपया खालील लिंक वर क्लिक करून ऐका

विनाअनुदानितची संघर्षगाथा अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याशी साधलेला सखोल व विश्लेषणात्मक संवाद 



शासनाने केलेल्या अन्यायाचा हा दस्ताऐवज - लेखक दत्तात्रय पवार (गुरुजी) 

ज्वलंत प्रश्नाला वाचनीय बनवणं सोपं नाही - प्रसिद्ध कथाकथानकार जयवंत आवटे (कुंडल) 

https://youtu.be/8S-a_d1amPE 


प्रश्न समाजासमोर जाणं गरजेचं होतं|धडपडणं म्हणजेचं आयुष्य - ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख.

https://youtu.be/OfgBeFFCMyE

---------------------------------------------------------------------------


      


                                   लेखक मनोगत


          विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.

                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८



विनाअनुदानितची संघर्षगाथा : पुस्तक मूल्य २५०/- 

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.




माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...