फॉलोअर

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

---------------------------------------------------------------------------

प्रति,

प्रिय सहृदयी वचक...

             महोदय, मी किरण चव्हाण. लेखक विनाअनुदानितची संघर्षगाथा. आपल्या शिक्षणक्षेत्रातील एक विदारक सत्य व विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित असलेले 'विनाअनुदानित' या विषयावरील महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे...मी स्वतः एक विनाअनुदानित शिक्षक असून चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकारलेले आहे. पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हाच की, मी स्वतः विनाअनुदानित शिक्षक असल्याने तो संघर्ष, वेदना आणि दुःख याची मला जाणीव आहे.आणि या वेदनेला समाजाच्या संवेदनांची जोड मिळावी. तसेच हा संघर्ष समाजातील सर्व घटकापर्यंत जावा अर्थात आपल्यासारख्या संवेदनशील माणसांच्यापर्यंत पोहोचून आपल्या सारख्या सहृदयींचे बळ मिळावे हा हेतू आहे. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही खूपच प्रेरणादायी बाब आहे. आपणांसही विनंती आहे की आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक आवर्जून घ्यावे..नक्कीचं आपला सकारात्मक प्रतिसाद असेलच....धन्यवाद...!

आपलाच नम्र,

किरण चव्हाण.





---------------------------------------------------------------------------




                               " किरण चव्हाण हा कोल्हापूरचा विनाअनुदानित शाळेवर काम करणारा एक प्रतिभावंत शिक्षक त्याने विनाअनुदानित शाळेचा प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी अतिशय गांभीर्याने एक पुस्तक लिहिले. त्यात मंत्री,आमदार,शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना विनाअनुदानीतशी संबंधित अनेकांच्या मुलाखती आहेत. प्रत्यक्ष ही कुटुंबे कशी जगतात त्याची दर्दभरी कहाणी पानापानावर आहे.त्यांची आकडेवारी आत्तापर्यंत झालेले संघर्ष असे अत्यंत बारीकसारीक तपशील या पुस्तकात असल्याने त्याला संदर्भ मूल्य प्राप्त झाले आहे. नुकतेच हे पुस्तक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रसिद्ध झाले या  पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे, ती लिहिता येऊन या बांधवांशी यानिमित्ताने जोडता आले. या विनाअनुदानित शिक्षकांशी बोलताना खूप पोटात तूटते याचे कारण यांनी कोणताच संघर्ष करायचे बाकी ठेवले नाही  पण आपण त्यांच्यासाठी या प्रश्नावर संवेदना गमावलेल्या सरकार कडून काहीच मिळवून देऊ शकत नाही पण किमान हा प्रश्न समजावून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. किरण चव्हाण विनाअनुदानित शिक्षक असून स्वतःच्या खर्चाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे त्यामुळे विकत घेऊन आपण सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे. "


- हेरंब कुलकर्णी

       


 किरण चव्हाण यांचा मोबाईल नं / फोन पे/ गुगल पे - ८८०६७३७५२८.


---------------------------------------------------------------------------


विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.







महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विनाअनुदानितची संघर्ष गाथा पुस्तक सुपूर्द करून त्यांच्याशी चर्चा करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे सर






---------------------------------------------------------------------------



बाबा

"जगण्यातून जगण्याचा धडा शिकवणारा बाप नावाचा शिक्षक."

---------------------------------------------------------------------------

साहित्य क्षेत्रातील साहित्यिक मान्यवर.



ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे 



संत साहित्याचे गाढे अभ्यासक व नामवंत व्याख्याते इंद्रजीत देशमुख


ज्येष्ठ साहित्यिक लेखक दत्तात्रय पवार गुरुजी


ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सर


ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे.





ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्रीकांत नाईक सर




ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे

                  ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे



ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य जी.पी.माळी



साहित्यिक व कवी गोविंद पाटील


ज्येष्ठ साहित्यिक व कवी राजन कोनवडेकर



लोकमत कोल्हापूर आवृत्ती संपादक वसंत भोसले



लेखक बी.एम.हिर्डेकर सर





प्रसिद्ध कवी व  साहित्यक मा.श्री.प्रविण दवणे सर




ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ



ज्येष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे


                 ग्रामीण लेखक व व्याख्याते संजय खोचारे



जंगल अभ्यासक व लेखक दत्ता मोरसे

लेखल अनिरुद्ध गुरव

युवा व्याख्याते व लेखक प्रा. युवराज पाटील

ग्रामीण लेखक संतोष पाटील

      
कथाकथनकार जयवंत आवटे कुंडल

---------------------------------------------------------------------------


         शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर

भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील




आंतरभारती संस्थेचे संस्थापक सचिव मा. अनंत आजगावकर




शिवराज संकुल गडहिंग्लज अध्यक्ष किसनराव कुराडे




कागल तालुका सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष व पत्रकार अतुल जोशी

---------------------------------------------------------------------------

                           राजकिय क्षेत्रातील मान्यवर


पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर.



                     खासदार श्री. बाळु भाऊ धानोरकर 
                    आमदार सौ. प्रतिभाताई बाळू धानोरकर


जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील



जि.प. जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य उमेश आपटे

---------------------------------------------------------------------------

                             शिक्षण क्षेत्रातील मान्यवर



  माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.एकनाथ आंबोकर (जि.प.कोल्हापूर )


             प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.आशा उबाळे           मॅडम (जि.प.कोल्हापूर )

          शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी टी.शिर्के सर


उपशिक्षणाधिकारी मा.डी.एस.पोवार (जि.प.कोल्हापूर )


माजी शिक्षण उपसंचालक अधिकारी संपत गायकवाड सर


विस्तार अधिकारी मा.विश्वास सुतार 

औरंगाबाद जिल्हा वेतन अधीक्षक मा.बाळासाहेब पवार


  मा.सुरेश संकपाळ सर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ कोल्हापूर

---------------------------------------------------------------------------

इतर क्षेत्रातील मान्यवर

वकील


वकिली क्षेत्रातील कायदेअभ्यासक व नामवंत वकील ऍड.प्रशांत भावके 

डॉक्टर

डॉ. संभाजी जगताप.

पत्रकार

श्री. शालबिद्रे अवघडी

---------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुस्तकाचा केलेला सन्मान





विनाअनुदानितची संघरगाथा पुस्तकाच्या निमित्ताने सत्कार कार्यक्रम.



---------------------------------------------------------------------------

प्रसिद्ध साधना मासिकात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकावर आलेला लेख.





बातमी

Tv9 वर आलेली बातमी 











---------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पोहोचलेली विनाअनुदानितची संघर्षगाथा




---------------------------------------------------------------------------

           विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचत प्रतिक्रिया

कृपया खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर वाचा


'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- उत्तम कांबळे.             


'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.


दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल : नंदू साळोखे.

'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक. - राजेंद्र बामणे.

गुलामाला गुलामीची जाणीव  करून देणारे पुस्तक  - दिवाकर दुर्गे 

---------------------------------------------------------------------------

         फोनवरून आलेल्या संवादात्मक प्रतिक्रिया 

          कृपया खालील लिंक वर क्लिक करून ऐका

विनाअनुदानितची संघर्षगाथा अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याशी साधलेला सखोल व विश्लेषणात्मक संवाद 



शासनाने केलेल्या अन्यायाचा हा दस्ताऐवज - लेखक दत्तात्रय पवार (गुरुजी) 

ज्वलंत प्रश्नाला वाचनीय बनवणं सोपं नाही - प्रसिद्ध कथाकथानकार जयवंत आवटे (कुंडल) 

https://youtu.be/8S-a_d1amPE 


प्रश्न समाजासमोर जाणं गरजेचं होतं|धडपडणं म्हणजेचं आयुष्य - ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख.

https://youtu.be/OfgBeFFCMyE

---------------------------------------------------------------------------


      


                                   लेखक मनोगत


          विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.

                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८



विनाअनुदानितची संघर्षगाथा : पुस्तक मूल्य २५०/- 

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.




सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे पुस्तक - दिवाकर दुर्गे




गुलामाला गुलामीची जाणीव  करून देणारे पुस्तक  - दिवाकर दुर्गे 

   

                                  मी श्री .दिवाकर दुर्गे,गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम,नक्षलग्रस्त , आदिवासीबहुल ,विकासापासून ,आधुनिक झगमगाटापासून कोसोदूर अशा भागात सहायक शिक्षक म्हणून मागील 17 वर्षापासून सेवा देत आहे .

मी मागील काही दिवसापासून कायम विनाअनुदानित , विनाअनुदानित ,अंशत : अनुदानित अशा शाळांमधील शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. विशेषकरून गडचिरोली  जिल्हयातील विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या . कारण  हा माझ्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. मी अशा पुस्तकाच्या शोधातच होतो .व योगयोगाने यू -ट्यूबवर मा. किरण चव्हाण सर यांच्या ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री महोदय वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्याचा व्हिडीओ बघितला व लगेच श्री.किरण चव्हाण सरांशी संपर्क साधून पुस्तकाची मागणी केली .

मी ज्या शाळेत काम करतो त्या लोकमान्य टिळक विद्यालय ,गणपूर  रै. तालुका –चामोरशी ,जिल्हा- गडचिरोली येथील शिक्षकांनी राम वनवासाप्रमाणे 14 वर्ष विनाअनुदानित सेवा केलेली आहे. त्यामुळे  विनाअनूदानितांचा संघर्ष अगदी जवळून पाहीला आहे. मा.किरण चव्हाण सर यांचे पुस्तक हातात पडताच तेच चित्र पुनः जीवंत झाल्यासारखं वाटलं , जुने दिवस आठवले  व सहजच डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या .वाटत होतं  हे भोग आपल्याच नशिबी का आले आहेत, पण जस–जस एक एक पान वाचत गेलो, तस –तस यांच्यापुढे आपला संघर्ष काहीच नाही अस वाटलं .पण समाधान होत आपणही या संघर्षाचे भागीदार आहोत. 

खरोखरच चव्हाण सरांनी जी मांडणी ,क्रमबधता ,भाषाशैली , सहजता यांचा सुरेख संगम साधून विनाअनुदानितांचा संघर्ष म्हणजे   ‘ व्यक्ति जिवंत पेटत आहे ,स्वतःच्या सरणावर स्वतःची चिता जळत आहे.' असच चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होतं .वेदना विरहित समाज सुद्धा किती निष्ठुर पद्धतीने चेस्टा करतो, तसेच काही समाजहितेशी सुद्धा अगदी संकटात कशी मदत करतात, हे वाचताना मन हेलावून जात होत . 

संघर्षाच एक- एक पान वाचताना ते कित्येकदा परत परत वाचावसं वाटत होत . हा संघर्ष प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध , निष्ठुर प्रशासनाविरुद्ध ,अमानवतेविरुद्ध पुकारलेल बंड आहे, याची जागोजागी प्रचिती येत होती . जगाच्या इतिहासात 20-20 वर्ष सेवा देणे, काम करणे पण त्या मो बदल्यात काहीही न मिळता उलट आपलं सर्वस्व गमावून बसने जसे -आई,वडील,भाऊ ,बहीण,मुलगा ,मुलगी आणि स्वत : सुद्धा !  चव्हाण सरांनी जी संघर्षगाथा पुस्तक रूपाने सांगितलेली आहे ,मला वाटत हा  दुर्मिळातील दुर्मिळ संघर्ष आहे . परंतु या संघर्षाला पुस्तक रूपाने वाचकांसमोर आणून शासन, प्रशासन, व्यवस्था यांना नकीच विचार करायला भाग पाडणारी ताकद यामध्ये आहे , असे मला वाटते,देशाचे भविष्य घडविण्याऱ्या शिल्पकारांवर आलेली ही वेळ देश हितासाठी  चिंतनाचा विषय आहे. तसेच स्वत:  शिक्षकांसाठी सुद्धा चिंतनाचा विषय आहे.

“गुलामाला गुलामीची जाणीव करूण द्या ,म्हणजे तो बंड करूण उठेल ” हे  बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्रिवार सत्य आहेत. मा. चव्हाण सरांनी या संघर्षगाथेतून शिक्षकांना गुलामीची जाणीव करून दिलेली आहे. वेळ आहे ती पेटून उठण्याची ,व्यवस्था परिवर्तनाची,समतेची, न्याय हकांची , पूर्ण स्वातंत्र्याची ,बंधुतेची !

मा. चव्हाण सर .यापुढे ही आपल्या लेखणीची धार अशीच चमकत राहावी यासाठी खूप- खूप शुभेच्छा !!!

पुढील वाटचालीसाठी मंगल कामना ...........!!!





                                                                  




                               वाचक -

               श्री. दिवाकर ऋषि दुर्गे,सहा.शिक्षक 

मोबा -97635 82234                                                        लोकमान्य टिळक विद्यालय , गणपूर रै . ता- चामोरशी,जि –गडचिरोली - 442707

------------------------------------------------ 

विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.


शनिवार, २९ जानेवारी, २०२२

'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक. - राजेंद्र बामणे.


 'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक.


                      आदरणीय किरण चव्हाण सरांचे  विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचले आणि ...        

                       एखाद्या बसस्थानकावरती प्रवासी गावाला जाण्यासाठी सुरुवातीला बसची वाट एकटक नजरेने पहात उभी असतात. इतक्यात काही क्षणात बस फलाटवरती येऊन थांबते. बसच्या दरवाज्याजवळ गर्दी करून प्रवासी आत जाण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना आतही जातात काही बसतात,काही उभे राहतात. बस एकदम प्रवाशांनी भरते आणि सर्व प्रवाशांच्या तोंडून एकच वाक्य निघत असते.'ड्रायव्हरसाहेब' अर्थात या बसचा चालक कधी येऊन बस सुरु करतो आणि बस कधी एकदा मार्गस्थ होते.थोडक्यात बसचा चालक सुव्यवस्थित असेल त्याचसोबत सर्व काही सुरळीत आणि योग्य प्रमाणात असेल तर तो निश्चितच बस मार्गस्थ करतो. प्रवाशांना योग्य त्या ठिकाणी पोहोवतो आणि मोकळीक घेतो. आमच्या शिक्षण क्षेत्रांमध्येसुद्धा असेच आहे. विविध शाळांमध्ये अनेक विद्यार्थी उद्याच्या आकांक्षावरती चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. पण चालकाची भूमिका निभावणाऱ्या या शिक्षकांची व्यथा मात्र वेगळीच आहे.

                    आज अनेक ठिकाणी अनेक प्रश्नासाठी आंदोलने होतात, मोर्चे निघतात परंतु या सर्व गोष्टींचे रूपांतर आश्वासनांच्यामध्ये होते. परिणामी निष्कर्ष थोड्या अवधीनंतर निघतात. आज 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे पुस्तक केवळ पुस्तक नसून संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा संग्रहित करून संघर्षाच्या लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न हा आहे. तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण काहींची उभी हयात या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना तयार करण्यात गेली तो शिक्षक आजही पोटभर जेवू शकत नाही, तो उपाशी आहे हे पाहिल्यानंतर कळते.

                         विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचन,लेखन,श्रवण,भाषण कौशल्य या चौफेर कौशल्यांचा विकास झाला की सर्वांगीण विकास झाला असे संबोधले जाते. पण याच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या या विनाअनुदानित शिक्षकांचा मात्र केव्हा विकास होणार..?  हा प्रश्न निरुत्तरितचं आहे. आज अनेक डीएड, बीएड धारक उराशी अनेक स्वप्नं बाळगून ऐन तारुण्यात या पदव्या घेतात. आज ना उद्या आपल्याला नवी आशा दिसेल, आणि आपण उभारी घेऊ या समजुती पोटी कार्याला सुरुवात करतात. परंतु आजतागायत निराशा शिवाय काहीचं मिळालं नाही.

                      हे पुस्तक वाचताना बरेच प्रसंग वेदनामय आहेत हे जाणवून येते.शाळा सुटल्यानंतर इतरत्र अन्य कामे करणारे प्रसंग जर वाचले तर निश्चितच डोळ्यात पाणी येते. आणि यावरून निश्चितच सुदृढ पिढी निर्माण करणाऱ्या शिक्षकांची काय व्यथा म्हणायची. फक्त एक आशा..? 'हेही दिवस जातील' या उक्तीवर भरवसा ठेवून हे सर्व शिक्षक कार्यरत आहेत. 

               पुस्तकरूपाने ज्या करुणामय वेदना एकत्रित करून लढा देण्याचा आपला जो मानस आहे, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण अनेक ठिकाणी विनाअनुदानितांची आंदोलने होतात, मोर्चे निघतात,निवेदने देतात परंतु हे संग्रहित वेदनामय दुःखच आपल्याला अनुदान मिळण्यासाठी एक मोठे भांडवल ठरणार आहे.त्याचसोबत भविष्यात अनुदान मिळाल्यानंतर ते कसे मिळाले  सांगण्यासाठी हे कृतियुक्त पुस्तकाची आपल्याकडून निर्मिती झालेली आहे. त्याबद्दल सर्व विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रशासकीय कर्मचारी यांचे वतीने आपले मनःपूर्वक आभार मानतो. कारण बऱ्याच गोष्टी माणूस बोलून जातो व समोरच्या ऐकणाऱ्या माणसांच्या सर्वच काही लक्षात राहते असे नाही, कारण विस्मरण हे निश्चितच असते. परंतु एखाद्याची व्यथा सांगण्यासाठी,त्यांच्या भावना इतरत्र पोहोचवण्यासाठी आपण पुस्तक रुपाने  लेखनाची गाथा तयार करून जे सहअध्यायी यांचे प्रसंग मांडलेला आहात यावरून निश्चित या संघर्षातूनच अनुदान मिळण्यासाठी फारसा कालावधी लागणार नाही याची खात्री वाटते. कारण यामध्ये प्रसंग काय..? हे फक्त तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,काही राज्याबाहेरील सुद्धा प्रसंग आहेत. त्यामुळे आदर्शवत विचार घेऊन या विनाअनुदानित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे झालेला आहे. 

                       या पुस्तकातील अनेक लोकांनी सांगितलेले अनुभव, आई-वडिलांच्या आशा-अपेक्षा या सर्व गोष्टींचा विचार, ओवाळणीसाठी बहिणीकडे जाणारा भाऊ या सर्व कौटुंबिक नात्यांचा विचार केला तर इतर लोक कोठे आहेत आपण कोठे आहोत. वर्षानुवर्षे कार्यरत राहणाऱ्या लोकांना धडे पुढे जाता येत नाही आणि धड मागेही जाता येत नाही. दुसरा मार्गही निवडता येत नाही अशी सारी अवस्था आहे. शेवटी काय करावे..? हा प्रश्न निरुत्तरचं आहे पण सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे...'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' म्हणजे आज जरी आपली वाईट परिस्थिती असली तरी भविष्यात असे असणार नाही काव्यपंक्तीचा असा अर्थ आपल्या जगण्यात उतरेल हा आशावाद निर्माण करणारे हे पुस्तक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याचा सूर्य आपल्यासाठीचं उगवेल ही खात्री बाळगूया. या लेखक किरण चव्हाण यांच्या या पुस्तकाच्यारूपाने निश्चितच वेळ बदलेल,नवीन आशा निर्माण होईल व चांगले दिवस येतील हा आशावाद मनाशी बाळगून सर्वजण कार्यरत राहूया. लवकरच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तयार होते आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. आज अनेक सुधारित तंत्रज्ञानामध्ये वाचन संस्कृती जोपासून ही संघर्षगाथा पुन्हा दुसऱ्या आवृत्तीसाठी छपाई करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वाचकांचे, सर्वांचे मनस्वी आभार मानून मी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी शुभेच्छा देतो व थांबतो.

धन्यवाद...!


अध्यापक - श्री राजेंद्र पुंडलिक बामणे.मु.पो.अकोळ. ता.निपाणी. जि.बेळगांव. पिन कोड - ५९१२११ मोबा -०९७४१९४९५९२



विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.



बुधवार, २६ जानेवारी, २०२२

दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल : नंदू साळोखे | विनाअनुदानितची संघर्षगाथा- वाचक प्रतिक्रिया.

 



'दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल.'

                               लेखक मा.श्री किरण चव्हाण सर लिखीत  'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे पुस्तक वाचले आणि शासकीय धोरणांचे,निष्काळजीपणाचे काळेकुट्ट आभाळ भेदणारी दुःखाची किंकाळी कानात शिरून मेंदूला,हृदयाला छेद देवून गेली.इतकी विदारकता या पुस्तकाच्या पानापानांवर अश्रू गाळतांना दिसली. पुस्तकाचे प्रत्येक पान फडफडून आपल्या न्याय हक्कासाठी आक्रोश करत होते. आत्म्याच्या तळातून आलेला हा आक्रोश संबधित प्रशासकिय व्यवस्थेच्या काळजात कधीच शिरणार नाही, कारण विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या बाबतीत ही व्यवस्था नेहमीच सावत्र आईची भूमिका बजावत आलेली आहे.,तिला पान्हा फुटावा ही अपेक्षा तरी कशी बाळगावी...? एक वाक्य वाचनात आलं होत ," आपण अशा देशात राहतो जिथे दारूची दुकाने सरकारमान्य आहेत आणि शाळा विनाअनुदानित..." हे वाक्य शंभर टक्के खरं आहे...आपल्याला पुन्हा एकदा चिंतन करावे लागेल की देशाला, राष्ट्राला खरी गरज कशाची आहे. व्यसनाधीन तरूणाईची की उच्चशिक्षित संस्कारक्षम पिढीची. याचे उत्तर जर 'उच्चशिक्षित संस्कारक्षम पिढी ' असे असेल तर आपल्याला ती पिढी घडवणारा ' शिक्षक ' नावाचा घटक उपवाशी ठेवून चालणार नाही. आणि हे जेव्हा माय बाप सरकारच्या लक्षात येईल ( ? )तो सुदिन म्हणावा लागेल...!

            पुस्तक वाचतांना असे जाणवले की, गेली वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विनाअनुदानितच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले,लोटांगणं घातली पण सारे अयशस्वी झाले. याचे कारण माझे शिक्षक बांधव कुठे कमी पडले असे नाही तर, सत्तेवर असलेल्या कुठल्याच सरकारने आश्वासनापलिकडे त्यांच्या पदरी कांहीच टाकले नाही. फक्त आणि फक्त वेळकाढूपणा केल्याने ते यशस्वी होवू शकले नाहीत इतकचं...!

            'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' हा मुलमंत्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. संविधानाच्या माध्यमातून समता व बंधूता प्रस्थापित करून या महामानवाने लोकशाहीचं, लोकहिताचं, सर्वधर्म समभावाचं गणराज्य आपल्या हाती सुपूर्त केलं... शिक्षक बांधव शिकले, संघटीत झाले, टोकाचा संघर्षही केला. सत्याग्रहाने, संविधानिक मार्गाने आपल्या हक्कासाठी पदरही पसरला.,पण निर्ढावलेल्या सत्येपुढे सारे व्यर्थ गेले...बाबासाहेब, खरंच आज तुम्ही देहाने आमच्यात नाही हे बरेच झाले, असता तर इथली प्रशासकिय अवस्था पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावले असते..!

            या पुस्तकाचे लेखक किरण चव्हाण सर हे स्वतः गेल्या अनेक वर्षापासून एक विनाअनुदानित शिक्षक आहेत.त्यांनी गेली सहा वर्ष विनाअनुदानितच्या प्रश्नावर दिवस रात्र चिंतन मनन केले.अनेक समदुःखी शिक्षक बांधवांशी सखोल चर्चा केली. प्रत्येकाचीच आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती फारच वेदनादायक आणि विदारक होती.किरण चव्हाण सरांसारखा हळवा तितकाच संवेदनशील माणूस अंतर्बाह्य हेलावून व्याकुळ झाला. त्यांना पक्कं ठाऊक होतं, गेंड्डयाची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला संविधानिक पण वेगळ्या मार्गाने जागं केलं पाहीजे., कारण आतापर्यंत व्यवस्थेशी लढण्याची सर्व हत्यारे वापरून झाली होती.आता वेळ आली होती लेखणीची ताकद दाखविण्याची...

           दोन -तीन वर्षाच्या आर्थिक भुर्दंडासह अथक कष्टानंतर दुःखाची किंकाळी 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तक रूपाने बाहेर पडली. चव्हाण सरांनी या पुस्तकात शिक्षण मंत्र्यांपासून ते शिक्षण क्षेत्राशी निघडीत अशा सर्व घटकांची मते मांडली आहेत.विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या,भगिनींच्या वेदना प्रत्येक पानावर अश्रू गाळतांना दिसतात...या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणावर सविस्तर लिहायचं झाल्यास दुसरं एक पुस्तक तयार होईल. इतकी मुद्देसुद मांडणी,क्रमबधता, सनावळ्या, ओघवती भाषाशैली, सहजता आणि मुख्य म्हणजे विचार करण्यास परावृत्त करणारे ज्वलंत प्रश्न घेवून हे पुस्तक व्यवस्थेविरूध्द बंड करून न्याय हक्कासाठी लढण्यास सज्ज झाले आहे...

            माझे जिवलग मित्रबंधू मा.किरण चव्हाण सर माझ्यापेक्षा वयाने लहान व ज्ञानाने, प्रतिभेने मोठे. असं असूनही पुस्तक बांधणीवेळी ते माझ्याशी वेळोवेळी चर्चा करायचे. आपल्यासारख्याच समदुःखी शिक्षक बांधवांच्या, भगिनींच्या व्यथा, पगाराविना होणारी फरफट, उध्वस्त झालेले संसार, नैराश्यग्रस्त बांधवांनी केलेल्या आत्महत्या,त्यांच्यासह कुटुंबातील आजारपणांना तोंड देणे... अशा एक ना अनेक हृदय हेलावून टाकणाऱ्या विदारक घटना ते माझ्याशी मोठा भाऊ समजून सांगायचे. हक्काने आपले मन मोकळे करायचे...याच कालावधीत नोकरीत अस्थिर  असलेल्या मुलग्याचं दुःख काळजात साठवून  किरण सरांचे वडील देवाघरी निघून गेले. काय वेदना झाल्या असतील त्यांच्या आत्म्याला याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ज्या एकूलत्या मुलाला मोलमजुरी करून उच्चशिक्षित केलं, त्याला शिक्षक झालेलं स्वप्न पाहीलं, कष्टाचे चिज होवून आपला मुलगा आपले पांग फेडील, नशिबातील अठराविश्व दारिद्रयाच्या दलदलीतून बाहेर काढून म्हातारपणी सुखाचे चार दिवस दाखवील अशी अशा बाळगणं एक वडील म्हणून चुक होतं का..?

           जन्मदाता दारिद्रयातच देवाघरी गेला. ही खंत किरण सरांना काळजात सुईसारखी बोचू लागली. कांही कालावधीसाठी मुळातून खचूनही गेले, निराशेच्या गर्तेत बुडाले आणि स्वतःच सावरलेही, कारण आपल्या दुःखापेक्षाही इतर शिक्षक बांधवांची दुःखं मोठी आहेत याची त्यांना पुरेपुर जाणीव  होती. या प्रगल्भ जाणिवेतूनच स्क्रिन फुटक्या जुन्या मोबाईलमध्ये 'विनाअनुधानितची संघर्षगाथा ' या नावाची चळवळ जन्म घेत होती....

            मित्रहो, ही चळवळ किरण चव्हाण  या नावाच्या एका व्यक्तीची नसुन ती संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित बंधू-भगिनींची आहे...तिला अधिक व्यापक करणं ही आपली जबाबदारी आहे... किरण सरांनी दिशा दिली आहेच,आता एकीचे बळही दिसू द्या,कारण विनाअनुदानित शिक्षक वगळून जगाच्या पाठीवर असं कोणतही क्षेत्र नाही जिथं प्रामाणिकपणे काम केल्यास मोबदला मिळत नाही...

          'विनाअनुदानितची संघर्षगाथा ' हे केवळ पुस्तक नसून विनाअनुदानितची गेल्या वीस वर्षापासूनची भळभळती जखम आहे... शासनानं केलेल्या पापाचा हिशोब आहे...वाचकांनी हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून किरण चव्हाण सरांनी उभ्या केलेल्या चळवळीला अधिक बळ देवून व्यापक स्वरूप द्यावं.आशा करतो शासन दरबारी या पुस्तकाचा गांभिर्याने विचार होवून उपाशी शिक्षक बंधू भगिनींना त्यांच्या हक्काची भाकरी मिळेल...

धन्यवाद !


                - नंदू साळोखे

९५४५६९१५४१


ग्रामीण लेखक नंदू साळोखे

                         माझे गुरुबंधू आणि लेखक आदरणीय नंदू साळोखे .अकाली आलेल्या अपंगत्वामुळे गेली २४ वर्षे अंथरूणाला खिळून आहेत. शारीरिक वेदना असतानाही त्या सहन करत पुस्तक वाचून विनाअनुदानितच्या वेदनेवर आपल्या लेखणीतून फुंकर घालून मला व समस्त विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनींना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. त्यांनी पुस्तकावर दिलेल्या अनमोल अशा प्रतिक्रियेबद्दल मी हृदयपूर्वक त्यांचा आभारी आहे.


.


विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.


 खालील लिंकवर क्लिक करून लेखक नंदू साळोखे यांच्याविषयी अधिक माहिती वाचा.


मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

पुस्तक परिचय - आठवणीतली माणसं.


'आठवणीतली माणसं' ही समृद्ध माणसांच्या आठवणींची शिदोरी.'

                          आदरणीय गुरुवर्य प्रा.श्रीकांत नाईक सरांचे आठवणीतील माणसं हे पुस्तक वाचताना दाटीवाटीनं भरलेली साठवणीतल्या माणसांच्या आठवणी वाचून मनात अनेक भावनांची दाटीवाटी झाली. मनात काठोकाठ भरून पावलेल्या माणसांचा सारीपाट कागदावर मांडल्याशिवाय राहवेनाचं..! सरांच्या आयुष्यात अवतरलेला माणूस पानांवर उतरवताना तो प्रत्येक माणूस भावनांच्या ओलाव्यातील मायेचं प्रतीकचं जणू असं वाचताना वाटत होतं. स्वतःभोवतीच्या वलयातील आईवडील,गुरू,विद्यार्थी, सखा-सोबती,सहकारी अशा आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेकविध माणसांनी समृद्ध झालेला हा गोतावळा. गोतावळ्यातील  प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आणि जगण्याचा मागोवा आदरणीय नाईक सरांनी घेतलेला आहे.प्रत्येक माणूस आदर्श जीवन जगण्याचे एक उदाहरण आहे..नाईक सरांच्या बालपणीचा तो जुना काळ,ती मायेची माणसं. एकत्र कुटुंबातील प्रेम, सहवास आणि संस्कारयुक्त झालेली जडणघडण आणि या जडणघडणीत नात्याच्या प्रत्येक माणसांचं असणारं योगदान यावरून सरांच्या आजच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती येते तेंव्हा त्यामागे त्यांच्यावर बालपणापासून रुजलेल्या संस्कारांची ओळख वाचनातून होते. 

                    आईवरील प्रकरण वाचताना तर मनात अनेक भावनातरंग उठतात. मन मायेच्या ओलाव्यानं दाटून येतं. सुखावून जातं. एकत्र कुटुंबातील आईला कसं सगळ्या लेकरांना मायेनं वाढवावं ,जपावं  लागतं.घरातील सर्व माणसांचं जेऊन झाल्यानंतर आईला जेवायला १२ वाजायचे. या उदाहरणावरून एकत्र कुटुंबातील स्त्रीला संसाराच्या रहाट गाडग्यात झोकून द्यावं लागतं. हे यातून कळून येतं.

                         जवळपास ३२ माणसांचा लेखाजोगा  पुस्तकातून मांडला आहे.शाळेतील शिपाई कर्मचारी पासून संस्थापक,शिक्षक,विद्यार्थी ,सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील माणसांचा पसारा मांडताना सरांच्या आयुष्यात जी कोणी माणसं आली त्यांचे स्थान किती खोलवर रुजले आहे याची प्रचिती प्रत्त्येक पानांपानांवर येते.प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचा लाभलेला सहवास ,सहकार्य प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा या सर्वांगाने आपलं जगणं समृद्ध करत असते. जीवनातल्या वाटेवरती सहप्रवासी असणारी ती व्यक्ती जगण्याची प्रेरणा बनून जाते. आपल्या आठवणीतील माणसं ही अशीच काहीशी आहेत.आणि या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांच्याच जगण्याची प्रेरणा झालेल्या आहेत. पुस्तकात प्रत्येक व्यक्तीचे फक्त वर्णनात्मक लेखन नसून त्या व्यक्तीबद्दल अपार भावनात्मक,आत्मीयतापूर्वक लिहिलेले हे चांगुलपणाच्या गुणांचा समुच्चय असणारे आणि प्रत्येक आठवणींना भावनेची किनार असणारे हे भावनाप्रधान पुस्तक आहे.

                      प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दडलेलं असतं. ते अव्यक्त स्वरूपातील दिव्यत्व ,भव्यत्व आणि कर्तृत्व  शब्दरूपाने सरांनी सुबकपणे व्यक्त केलेलं आहे. लेखणीच्या माध्यमातून त्यांचे विविधांगी पैलू वाचकांच्या समोर आणलेलं आहे. पुस्तकात शिक्षण,समाजकार्याला वाहून घेतलेल्या अनेक माणसांचा धांडोळा घेतलेला आहे. आपले जीवननच आपल्या कार्याला समर्पित केलेली ही माणसं त्याग, समर्पण,आचार-विचार आणि संवेदनशीलता यांचा मोठा संदेश देऊन जातात. आदरणीय अनंत आजगावकर सरांच्या सारखी ऋषितुल्य माणसांचे कार्यकर्तृत्व समाजाप्रती असणारी तळमळ धडपड आणि आपल्या साधेपणातून ही माणसं किती मोठं कार्य करत राहिली. शाळा स्थापन करून परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे, घडवण्याचे, अनेक नवीन संसार उभा करण्याचे काम अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या हातून झालेले आहे. खरं तर त्यांचे शिष्य असलेल्या नाईक सरांनी अगदी सुक्ष्म प्रसंगातून त्यांच्याविषयी लिहून त्यांचा मोठेपणा ठळक केला आहे. 

                        नाईक सरांच्या मनात खोलवर रुजलेली आठवणीतील एकेक माणसं वाचताना ती माणसं कधी आपलीशी होऊन जातात कळत नाही.इतकी सहज ,सुलभ, सोपी भाषाशैली,भावनांचा ओलावा,सूक्ष्म प्रसंगवर्णन यावरून सरांच्या अफाट स्मरणशक्तीची आणि संवेदनशिलतेची जाणीव पानांपानांवर होते.मायेच्या, जिव्हाळ्याच्या नात्यांनी जोडलेलं,अतूट भावबंधनांनी सजलेलं धजलेलं समृद्ध आणि संपन्न माणसांचं गणगोत मांडणारं हे पुस्तक म्हणजे सरांच्या मनातील व्यक्त झालेलं व्यापक कुटूंबचं आहे. या पुस्तकातील एकेक माणूस म्हणजे जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा जिताजागता धडा आहे हे निश्चित. कारण माणसं कशी जगली, कशी जगतात त्यांचे आचार ,विचार कार्य,कर्तृत्व यांचा मेळ त्यांच्या जगण्यासोबत घालून दिला आहे. त्यावरून आपणही कसे जगावे ? हे शिकवणारे माणसांचे धडे असणारे हे पुस्तक आहे.आपण पुस्तक वाचतो पण माणसं वाचणं कशाला  म्हणतात ते हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं. आदरणीय नाईक सरांनी नुकतेच  अमृतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत तरीदेखील आज त्यांच्या या वयातील व्यक्तिनिरीक्षण,उत्साह,ऊर्जा आणि लिखाणामागची तळमळ अफाट आहे. 'आठवणीतील माणसं' हे पुस्तक म्हणजे पुरून उरणारी उरून पुरणारी समृद्ध माणसांच्या आठवणींची शिदोरी आहे...गुरुवर्य श्रीकांत नाईक सरांना निरोगी समृद्ध संपन्न दीर्घायुष्य लाभावे यां मनोकामनेसह पुस्तकाच्या पुढील वाटचालीस हृदयपूर्वक शुभेच्छा देतो...!

- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)

मोबा - ८८०६७३७५२८



आठवणीतील माणसं पुस्तकाचे लेखक : प्रा.श्रीकांत नाईक सर.








.

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

नदीवरचा देव - किरण चव्हाण.



 नदीवरचा देव

                                    एखाद्या बाईला कुठला त्रास आसला,लागीर लागलंय,अंगात येतंय असं काही झालं की तिला देवरश्याकडं नेलं जायचं. देवरशी मग त्या बाईला समोर बसवून सगळी चौकशी करायचा, काही प्रश्न विचारायचा. आणि मग अंगात काहीतरी संचारल्यासारखं सांगायचा, "हिच्या म्हायाराकडंनं त्रास हाय बघा.नदीवरचं दाखवतंय.यंदाला नव्या पाण्याला थोरल्या दिवाळीच्या आमावस्याला नदीवरच्या सातीआसरा करायला पायजे.तवा कुठं सरळ लागल." नदीवरच्या सातीआसरा म्हणजे जलदेवता. त्यांना शांत करायचा उपाय देवरशी सांगायचा. 

                                   आमच्या गावांतही असं देवरसपण बघणारा एक देवरशी व्हता.गावाच्या दक्षिणेला हमरस्त्याच्या खालच्या बगलला त्याचं घरं. त्यांची एक स्वतंत्र खोली होती.त्या खोलीत अनेक देवांनी गजबजून गेलेला भव्य गाभारा होता. एका कोपऱ्यात मोराची पिसं. त्या देव्हाऱ्याच्या बाजूला बसून देवरशीबुवा येणाऱ्या भक्ताच्या समस्या जाणून घेऊन निर्वाळा करायचे.एकदा असंच मी आमच्या भावकीतल्या दादाबरोबर त्यांच्या घरी गेलो होतो. आणि देवरशी बुवांच्या या खोलीत आलो.तिथं एका बाईला भूत लागलं म्हणून आणलेली.बराच उशीर ती घुमत होती.आणि अचानक ती बाई एकाएकी अशी काय किचाळली की, मी टाणक्यांन उडालोच.! तितनं त्येंची जेवण खोली कधी गाठली ते माझं मलाचं कळालं नाही.डोळ गच्च मिटलेलं.डोळ्यासमोर काळतांबडं दिसाय लागल्यालं..ज्याम घाबरलेलो..तवापासून  तिथं जायचं धाडस व्हायचं नाही.

                                    नदीवरच्या सातीआसरा करायच्या याला 'नदीवरचं' किंवा 'अंगावरचं' असा म्हणण्याचा प्रघात गावाकडं आहे.नदीवरचा देव करायचा म्हटलं की म्हायाराकडं येताना बाईसोबत तिचा नवरा नाही तर सासरा येत असे. येताना बाजारातून लागणारा सगळा बाजारहाट घेऊनचं यायचं. एक कोंबडा,काळी तलंग,परडी झुटींगचं सामान,नारळ, केळं,लिंबू खारका,हिरवी काकणं, घोंगड्याचा धडपा गुंडाळलेला टोणा,अगरबत्तीचं झाडं असं कायबाय बारीक मोठा बाजार उरकून पावणा माघारणीला घेऊन उन्हाचा रक व्हायला घरात हजर व्हायचा.आणि मग तिथून पुढं सगळी तयारी सुरू. दुपारच्यालाचं चुल पेटली जात असे.ढणढणीत पेटलेल्या चुलीवर घरात बायकांची जेवण करायची धांदल सुरू होत असे.नदीवरच्या देवाला सात मापट्याचा नाही तर सात चिपट्याचा कट ठरलेला असयचा..सात मापट्याचा कट म्हणजे सात मापटी तांदूळ आणि सात चिपट्याचा म्हणजे साडेतीन मापटी तांदूळ शिजवायचं. गव्हाच्या पिठाच्या सात लाटूऱ्या,सात दिव-मुटकं करायचं. आणि मग गल्ली घरातली जेवढी माणसं सांगितलीत तेवढं चपातीचं कडाप.बाजारातनं आणल्याला पायाला नाडी बांधल्याला कोंबडा तलंग एका बुट्टीखाली झापल्याला असायचा. बारकी पोरं ऱ्हा ऱ्हावुन नुसती त्या बुट्टीच्या जवळ जाऊन उघडून बघायचीत. "आरं ये उघडू नकासा गप बाहेर खेळा जावा की ..." अशी मोठी माणसं दटावायची. पण उघडू नको म्हटलं तरी कार्टी ती उघडून बघायचीचं.

                           सगळ्या गल्लीला अगोदर सांगितल्याल असायचंच पण सहजच वाटत गाठ पडल त्येला बोलायचं "रात्री जेवायला गा नदीवर..." किणीट पडायला नदीवर जायाची सगळी जोडणी सुरू व्हायची.आता उजेडाला बॅटऱ्या त्येनं हाईत पण त्यायेळला पयलं कंदील आणि मग नंतर बत्ती आली. बत्तीवाल्याला सगळ्यात आदी सांगितलं जायचं. कारण दुसरा कुणीतरी सांगून जायचा म्हणून खास त्याच्या घरला जाऊन सांगायचं "रात्री नदीवर बत्ती आणि जेवायला तुमीबी यायचं " त्याला गेळाभर रॉकेल न्हेउन द्यायला लागायचं.बत्तीत रॉकेल घालून तो बत्ती द्यायचा.बत्ती आणली की, बारक्या पोराला दुकानला पाठवून मेंटल आणायला लावायचं.त्ये शेंबूड वडतचं पळत पळत जायचं आणि एका हातातनं मेंटल घेऊन यायचं..त्यातला हुशार माणूस मग सोप्याला बसून बत्तीला मेंटल लावायचा. तिला पेटवायलाचं बराच वकोत जायचा. बारकी पोरं बत्तीच्या भोवतीनं घुपळा करून भूत बघितल्यासारख तिला कसं पेटवत्यात ते बघायचीत. उभ्या काचेचा गोलाकार कंडा. त्याच्यातल्या दोनचार काचा निघळून पडलेल्या असायच्या.त्यातनं पाखरं आत जायची, जळून मरून पडायची... मेंटल फुलत नाही तोवर बत्तीला हवा मारायची..एकदा का बत्ती सवन पेटली की, मग बाकीची जोडणी करायची.लाकडाच्या भाऱ्यातनं जेवणाला लागत्यात तेवढी लाकडं उपसून लाकडाचा कवळा तुरकाट्या असा बिंडा बांधून ठेवल्याला असायचा.

                              ज्या बाईच्या अंगावरचं करायचं तिला पूर्वला पुढा करून बसायला लावायची. तिच्या आंगावनं  पायल्यांदा भाताची दुरडी उतरायची त्या दुरडीवर चपत्यांची थप्पी लावल्याली असायची.ती उतरून जबाबदार माणसाच्या हातात द्यायची कारण तिला परत खाली ठेवायची नाही. मग कोंबडा आणि तलंग उतरून घ्यायची..कोंबडा तलंग घ्यायला तर एकावरनं एक पोरं पुढं सरसायची. जेवणाची भांडी,रस्याचं डेचकं एकांन घ्यायचं त्या डेचक्यात डाव,वाट्या बारीक भांडी भरल्याली असायची. पाण्याची घागर एकाकडं,लाकडाचा बिंडा घ्यायला सहसा कुणी तयार व्हायचं नाही. मग कोण सांग काम्या हो नाम्या गरीब मनाचा साधा भोळा त्याच्याकडं ते काम..असा सगळा लवाजमा सामानसुमान घेऊन नदीच्या वाटला लागायचा. रात्र नुकतीच अवतरलेली असायची.

                                       बत्तीच्या उजेडात माणसं नदीच्या दिशेनं जायाची. मधी बत्ती आणि भोवतीनं माणसं.कुठल्या तरी एका पोराच्या हातात कोंबड दुसऱ्या पोराच्या हातात तलंग असायची.त्यावेळी आम्हांला कोंबडं नी तलंग घ्यायची लई हौस वाटायची. जाता जाता त्यासनी पोटाशेजारी दाबून धरायचं, त्यांचं आंग ऊबदार लागायचं. ते बी शांत बिलगून बसायचं..उगाचच त्यांच्या पाठीवरन हात फिरवायच लाड करू वाटायचं. मनात यायचं आता नदीवर गेलं की ह्यासनी कापणार मग त्यास्नी कसं व्हईल ?त्यांचा जीव कुठं जाईल ? अस विचार बालमनात यायचं.आणि नंतर त्यांच्यावर ताव मारताना मात्र हे ध्यानात ना मनात.सगळं विसरून गेलेलं असायचं.जाताना थोरली माणसं म्हणायची."पोरा कोंबडं सळ पक्कड नाही तर घोळ व्हईल." एकदा म्हणं असं झालं.... नदीकडं जाताना पोराच्या हातातन एकाएकी कोंबडं सुटलं पायाला बांधल्याली नाडी कवा अगोदरच ढिली झाली व्हती.कोंबड जसं रस्ताला लागलं तसं ते सरळ पळतच सुटलं तेच्या मागणं पाच सहा जण धरायला. आता गावतय व्हय हाताला ? गडयानी खूप आटापिटा केला खरं कोंबड काय तावडीत गावना..या कुपावरनं त्या कुपावर करत करत कोंबडं पार कुठल्या कुठं. झाली का पंचाईत आकिरला गावातल्या एका कोंबड्या विकणाऱ्या बाईकडनं नवीन कोंबडं विकत आणायची पाळी आली.आसला हा सगळा घोळ.

                                     देव करायला आलेल्या माणसांनी नदीच्या दोन्हीं आंगचा काठ फुलून गेल्याला असायचा.काळ्यामिट अंधारात सगळीकडे तांबड्या भडक पेटत्याल्या चुली.चाटचाट जळत्याला,लाकडं फुरफुरत्याला आवाज.भवतीन माणसांची गर्दी नुसती जत्रा भरल्यासारखी वाटायची. नदीवर आलं की गारठा जास्त जाणवायचा. नदीवर गेल की,चुल कुठं मांडायची या अंगाला काय त्या अंगाला इथनं सुरवात..कोण म्हणायचं, "नाही हीतं सपय जागा हीतच मांडुया." तवर कोण म्हणायचं, "आगा तिथं चला तिथंन पाणी आणलाय बरं पडतय.."

                             सर्वानुमते एकदाशी जागा ठरली की,सगळं सामान सुमान त्या जाग्याला उतरायचं... तीन दगडांची चूल मांडायची आजूबाजूचा पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या चुलीत कोंबून चूल पेटवायची.चुलीवर डेचकं ठेवायचं.तवर एकजण नदीतन पाणी आणून डेचक्यात वततो. इकडं पाणी हळूहळू तापायला सुरुवात होते. काहीजण मग नदीच्या काठाला जातात.काठावरचं गुंड बघून सात दगड घ्यायचं ते पाण्यानं धुवायचं.एका सपय जाग्याला खाऊची सात पानं मांडून त्यावर ते दगड ठेवायचे.या म्हणायच्या सातीआसरा.आणि त्याच्या बाजूला आठवा निराळा दगड त्यो म्हणायचा झुटींग. या झुटींगसमोर संग आणलेला कोंबडा पहिल्यांदा कापायचा आम्हांला त्यावेळी हे बघायचं औत्सुक्य असायचं. त्यामुळें आम्हीं त्या माणसांच्या मागणचं असायचो..पायात दोन्हीं पखं एक करून त्याच्यावर पाय ठेऊन त्याच्या उघड्या चोचीत थोडं पाणी घालतात आणि सारदिश्यान गळ्यावरनं खुरपं वडलं की धडापासून मुंडकं वेगळं. चोच उघडझाप करत्याल मुंडकं समोर ठेवायचं कोंबड्याची  पख फाडफाड व्हईत असायची.मुंडकं नसलेल्या मानंच्या गड्ड्यातनं लालभडक रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायच्या. हळूहळू ते गपगार व्हायचं... नंतर तलंगचीबी तीच तऱ्हा.नदीतलं  गोटं ताज्या रक्तानं रंगून जायाचं.रक्तानं शिपल्याल खुरपं एका हातात आणि पायाला धरून उलटं केल्याली कोंबडा नी तलंग मुंडक्यासहित घेऊन लोक वर यायचे. 

                           चुलीवरचं पाण्याचं डेचकं खाली उतरून आता उघड्या जाळावर त्यास्नी भाजायचं.पख जळताना खरपूस चिरमाट वास नाकाला यायचा. नदीच्या काठाला गारठा जोरात जाणवायचा.त्यामुळं जो तो चुलीला ढुंगाण लावून कुठं कांदा चिर..मटण चिर,कोण बाजूच्या काटक्या मोडून चुलीत घाल अशा निमतानं चूल धरायचा. चुलीत कोंबडयाची मुंडकी भाजायला टाकायची. प्रत्येकाची काय ना काय  काम ठरलेली असायची. रिकामी हाईत ती जायाची, फिरून यायची. कुठं याच्या चुलीला बस कुठं त्याच्या, तवर कोण आड्यावर जाऊन यायचा.कोण पलीकडच्या कापडयाच्या हॉटेलातलं फुटांण आणून रस्त्याकडला थंडीचं उगच दातांन कडूम कुडुंम करीत खायाचा.कुणाला तोपर्यंत परसाकडंचं व्हायचं. तोपर्यंत कुणाला खेकडी पकडायची लहर यायची. कुणाचं काय तर कुणाचं काय..? पण एक.काम करायला मागं आणि खायाला पुढं अशांची संख्या जास्तच.

                                                 परडी भरायचं काम जाणत्या थोरल्या किंवा म्हाताऱ्या माणसांकड असायचं. आमच्या वेळी आमचा किसनुआज्जा सपय जाग्याला बसून साती आसराची परडी भरायचा.परडीत तळाला भात घालून त्येजावर नारळ,नारळावर हिरवी काकणं, हळद कुंकू, भोवतीनं सात गव्हाच्या पिठाच्या लाटूऱ्या,त्यावर दिव-मुटकं,सात केळं,सात लिंबू ,सात खारका हे सगळं घालून झालं की,वाती लावायच्या....एक वर्षी म्हणं अशीचं परडी भरायला पांच जण,पाचीजणांनी दारू पिलेली."आगा नको तुम्ही परडी भरताव आम्हीं." बाकीची लोकं सांगित व्हते हां. पण कुणाचं ऐकतील तर खरं. परडी आम्हींचं भरणार हा त्यांचा हेका.कशीतरी परडी भरून झाली त्यावर दिवमुटक ठेवलं आता वाटी पेटवायच्या. काड्यापेटी घेतली..पण काडी वडली की वाऱ्यानं इजायची.काडी वडली की इजली...मग एकानं म्हणायचं, "आसं पेटवत्यात व्हय आन इकडं." पण त्यानं काडी वडली की इजली...दुसऱ्यानं म्हणायचं, "काय तू शाना काडी पेटवायची कशी आण इकडं दावतो"...त्यानं बी वडली की इजली. मग तिसऱ्यानं म्हणायचं "तुम्हीं दोघबी खूळ हाईसा आणा इकडं." त्यानं वडली की ती पण इजली. असा पाचजणांच्यात ह्यो खेळ सुरू झाला.पाच जणांच्यात फिरून फिरून शेवटी काड्यापेटीचं सपली पण वाती काय पेटल्या नाहीत. शेवटी थंडगार दिव्याची परडी पाच जणांनी उचलली. परडी हालत डुलत चालली नदीकडं.

                                           परडी भरायचं काम किसनुआज्जा बयाजवार करायचा.परडी भरली की,घरच्या मालकानं ती घेऊन नदीत सोडायला जायचं त्यावेळी त्याच्या भवतीन आम्हां पोरांचा घोळका असायचा.परडीतला नारळ कोण घेतंय याच्यासाठी ईर्षा लागायची..थोराड दांडग पोरगं पुढं पुढं करायचं...बारकी चिलीपिली  केळं  गावतील यासाठी धडपडायची. पाण्यात घुसलं की गार गारगीट पाणी ढेंगतनं वर चढायचं.वळवळ करत एखादा साप वर शिरावा तसं गार पाणी ढेंगतनं वर चड्डीत घुसायचं.थंडीनं काकडून जायला व्हायचं.परडी सोडून हात जोडपर्यंत पोरांना दम निघायचा नाही. परडी सोडायला लागलीच पोरं त्या परडीवर झडप घालायची.पेटत्याल दिव पाण्यात बुडवून इझुन जायाचं.परडीचा पोरांच्या धुमडीत कुस्कुरा व्हायचा. कुणा पोराच्या हाताला मग नारळ,कुणाच्या हाताला केळं तर कुणाच्या हाताला लिंबू गावायचं. त्या गार पाण्यातन सगळं घेऊन बाहेर यायचं. अंगावरच्या कपड्यांचा वल्लाचिखोल झाल्याला असायचा. ज्याला नारळ गावलाय त्याला इतका आनंद व्हायचा की जणू कोळ्यांनी सोडलेला सोन्याचा नारळ गावल्यासारा त्याच्या चेहऱ्यावर आविर्भाव असायचा. एकजागी बसून दगडाने नारळ फोडायचा आणि मग खोबरं पोरांच्यात वाटून खायचं. कुणाला केळं गावल्याली असायची केळं खायची.कुणाला लिंबू गावल्याल असायचं ते चड्डीच्या खिशात कोंबायच.जेवणाच्या वक्ती उपयोगाला यायचं.

                     तोपर्यंत इकडं चुलीवर रस्याला उकळी आल्याली असायची.खायच्या दमदार जाळानं रस्सा डेचक्यात  आतल्याआत गदादा हालायचा.उकळीला टाप यायची.तांबडाभडक रस्सा तयार झालेला असायचा. वाटीत एक चुरा, नकाडा रस्सा घेऊन आचारी घुटका घित चटणी मीठ हाय का व्यवस्थित बघायचा.सगळा मेकप झालाय म्हटल्यावर रस्सा खाली उतरला जायचा. रस्सा तयार झाला की कुणीतरी सांगायचं 

"जावा रं निवद दाखवून या जावा.." 

तवा निवदाला म्हणून मुंडक्याची आठवण व्हायची. मघाशी इंगळात मुंडकी भाजायला टाकल्याली असायची.ती शोधताना गावायची नाहीत.तिथंच ढुंगण लावून बसलेला इसम उगाच कटकीन इस्तू हालवून म्हणायचा,"आगा इथंच व्हती गेली कुठं..?"

दुसरा म्हणायचं "आता तूच मगाशी भाजत व्हतास जातील कुठं.."

"नाही गा मी इथं मी काढून इथंच ठेवली व्हती दगडावर."

"आसू दे घे आता."

तळं राखील तो पाणी चाखील दुसरं काय..?

                          घरचा मालक मग कटाची दुरडी घेऊन मगाच्या साती आसरा पूजल्याला जाग्याला येतो आणि मग पुजलेल्या सातीआसऱ्याला शाकाहारी निवद म्हणजे दुरडीचा निवद दाखवायचा.आणि बाजूच्या झुटींगला मांसाहारी निवद म्हणजे मटणाचा निवद.एका इस्तारीवर रस्सा सोडलेला पांढरा भात,बाजूला मटणाच्या ठेवलेल्या दोन चार फोडी,भाजलेली मुंडकी,उकडलेल्यालं अंडं,चिरमुर फुटाणं असा एकंदरीत त्याचा निवद. झुटींगच्यासमोर घोंगड्याचं धडपा जोडलेला खूळ खूळ वाजत्याला टोणा,अगरबत्तीचं झाड ठेवलं जायचं .निवद दावून लोक वर यायची.

                          निवद दाखवून आलं की मांडीला मांडी घासून पंगत बसायची.यात दोन शाकाहारी माणसं ठरलेली असायची. सगळ्या मांसाहार खाणाऱ्या लोकांत ही दोन माणसं पावण्यागत वाटायची.मांसाहार खाणं नाही काय नाही घरात गपगार जेऊन झोपायचं सोडून असल्या मरणाच्या थंडीत मिळमिळीत भात आमटी खायाला नदीवर यायची यास्नी कसली हौस कुणास ठाऊक. आताच्या सारख्या त्यावेळी प्लॅस्टिक वाट्या, कागदी पत्रावळ्या नव्हत्या. जेवायला बसताना रस्याला कुणी वाटका घ्यायचा,कोणी खोगला तर कोण बेल्ट घेऊन बसायचा.जागा तरी सपय नसायचीच. खायन मांडीला बारीक मोठं खडं बोचायचं. मधी बत्ती ठेवली जायची. सगळयापुढं इस्ताऱ्या मांडल्या जायच्या.मग पयल्यांदा दुरडीतल्या भाताच्या थप्पीला हात घातला जायचा.वाढणारा पाची बोटं त्यात रुतवून हातात जेवढा येईल तेवढा भाताचा गटका इस्तारीवर ठेवायचा.सगळ्याचा जीव मात्र रस्याच्या डेचक्यात आडीकल्याला असायचा. कुणीतरी डावंन मटणाचं दोन दोन चुरं, भाताच्या काठाला ठेवायचं.ते फक्त दोन दोनचं वाटणीला यायचं. माप वाटायचं 'धा' यावं.पण कोंबड्या दोन आणि माणसं वीस. कुणाला म्हणून पुरणार. नंतर वाटीत रस्सा वाढला जायचा..वाफाळलेला तांबडा भडक रस्सा बघून मन हारखून जायचं.

                               एक वर्षी म्हण आमच्या गल्लीतला देव व्हता. माणसं जेवायला बसली रस्सा वाढला.पायल्यांदा म्हण माग बघून पयला घास टाकायचा. तस आमचा तात्या मागं वळून घास टाकायला पुढं बेडकीन मारली उडी रस्यात. रस्सा इदाळला बेडकी गेली तळाला.तात्या सरळ झाला तवा त्येला संशय आल्याला,काय तरी भानगड झालीय.

त्यो आण्णाला म्हणाला.  "आगा आण्णा रस्यात काय तरी पडल्यासारख वाटतंय.तळाला काळबी दिसतंय."

आण्णा म्हणाला "आर काय नाही खा गप..मटणाचा तुकडा आसलं.."

पण इकडं तात्यांचा संशय अधिकच बाळावलेला.. त्यो बारीक नजरेनं निरखून बघत होता. तोपर्यंत बाकीच्याचं झुरक ऐकू येत व्हतं.बाकीच्यांची तोंडाला रस्याच्या वाट्या पण माझ्याच वाट्याला काय म्हणायचं ह्ये. असं मनातल्या मनात तात्या कळवळला . वाटीत अजिबात तुकडा बुडवू वाटना.. तोपर्यंत ताटलेली बेडकी फुगून आली की वरती.रस्यावर मस्तपैकी तरंगायला लागली.तात्याचा संशय खरा ठरला.  "रस्सा प्यालो असतो तर..?" यावर तात्या आता विचार करू लागला. बाकीची माणसं रस्यात बुडालेलं दात बाहेर काढून हसत व्हती. असली सगळी गंमत.

                                    रस्सा वाटीत आला की पहिला झुरका मारायचा.आणि मग बाकीची सुरवात..कुणीतरी मधन जेवण बनवणाऱ्याला दाद द्यायचा." एक नंबर..रस्सा लई झ्याक झालाय बघ." दारू पिऊन रस्सा प्यायला बसलेल्यांची तऱ्हा बघण्यासारखी असायची. झिंगत पेंगत रस्सा वढायची. रस्सा पिताना कुणी नाक गाळत..कुणाच्या नाकावर घाम गळत,कुणी टावलानं घाम पुसत..वाटीवर वाटी दणकून रस्सा प्यायचा.रस्याच्या झुरक्याचा फुरफर आवाज कानी पडायचा. रस्सा पिण्यातबी एक ईर्षा असायची. स्वतः कमी प्यायची पण दुसऱ्याला जास्त पिण्यासाठी प्रेरणा द्यायची. जसा सगळीकडं कोल्हापूरी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा फेमस तसा आमच्याकडं फेमस नदीवरचा हा रस्सा. काय बी म्हणा या रस्याची चव ती न्यारीच.

                             चपाती खाऊन झाली की,भाताचं आळं करायचं त्यात रस्सा वतायचा. भाताच्या तळातनं रस्सा घसरतीला पळायचा.चुकून कधी कधी शेजाऱ्याच्या मांडीखाली शिरायचा.अगदी यथेच्छ पुरेपूर ताव मारून माणसं एकेक करून उठायची. खरकाट्या हातानं खरकाटी इस्तारी उचलायची आणि शेजारच्या कुपाजवळ नाही तर घुसपाजवळ टाकायची. दोन चार कुत्री त्या इस्ताऱ्यास्नी झटत असायची. एक वर्षी तर आमचा नामुदा त्यावेळी जादाच पिला व्हता.झिंगतचं जेवला पंक्तीतन उठला आणि तसाच खरकाटा हात घेऊन घरला गेला.

                           वाढणारी माणसं शेवटीला बसायची.मग जेवल्याली माणसं त्यासनी वाढायची.बाकीची इकडं उरल्याली लाकडं चुलीत घालून मोठा धग करायचीत. मागणं पुढणं शेकायचं.कुणी दातात काडी घालून उगाचचं डीवचायचं.चेष्टा मस्करी चालायची.. कोण कसा रस्सा प्यायला,पिल्याला कसा बसून जेवला यावर चर्चा व्हायची..तवर कुणाला बिडी प्यायची तलप यायची. कुणाची हातावर तंबाखुची मळणी सुरू असायची..अशातच माग राहिल्याल्याचं एकदासं जेऊन व्हायचं. उरली सुरली भांडी गोळा करायची. रस्याचं डेचकं,खरकाटी भांडी नदीतन नुसती खदबळून आणायची. यांनी जेवायचं आणि भांडी बायकांनी धुवायची म्हणं. दुरडीत भात उरला आसल तर बाजूलाच उलटायचा.चटणी मीठ उरलं आसल तर तिथंच ठेवायचं उरल्याल काहीच घरला न्यायचं नाही अशी रितभात.सगळं आवरून झालं की चुलीत पाणी वतून चुल इझवायची.चुल थंडगार व्हायची.आणि मग भरल्या पोटानं बेतानं माणसं घरला परतायची.सकाळी नदीच्या काठावर जागोजागी काळठिक्कर पडलेल्या तीन दगडाच्या चुली दिसायच्या.रात्री नदीवर देव जेवायला आल्याल्या खाणाखुणा दिसायच्या.बाजूला उरलेल्या चटणी मिठाच्या पिशव्या पडलेल्या असायच्या.आमचा मांगाचा मारुतीमा येरवाळीचं नदीवर फेरफटका मारून त्या चटणी मिठाच्या पिशव्या गोळा करून घरला घेऊन यायचा.


- किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)

 ८८०६७३७५२८.


काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं.

कतई पटकेवाला आमचा किसनुआज्जा


शनिवार, ८ जानेवारी, २०२२

'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.

 


'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.

                       मला कुणी विचारले की आजची सर्वात वाईट व क्रूर गोष्ट कोणती..? "महाराष्ट्रातील विनाअनुदान शाळेतील शिक्षकांची..?"  मी क्षणात उत्तर देईल. मग ती सत्ता राबवणाऱ्यांना का वाटत नाही..? बांधकामातून निकामी झालेल्या दगडासारखे त्यांना हे शिक्षक वाटतात काय ? पंधरा, अठरा,वीस वर्षे उलटली अनेक एस.एस.सी एच. एस. सी च्या बॅचेस यांनी घडवल्या, खेड्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले ते या शाळामुळेच ना.!  इतकी वर्षे या शिक्षकांना रुपया पाहायला मिळाला नाही. विनामूल्य रक्त ओकताहेत पण याची लाज आहे का शासनाला.

                       याची म्हणजे या शिक्षकांची शोकांतिका किरण चव्हाण या भुदरगड तालुक्यातील शिक्षकाने 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तकातून मांडली आहे. या पुस्तकाला हेरंब कुलकर्णी या संवेदनशील लेखकाची प्रस्तावना आहे. 'अश्रूंनी लिहिलेली वेदनेची बखर' असे ते या पुस्तकाचे वर्णन करतात. हे पुस्तक वाचून कोणाच्या डोळ्यात पाणी (अश्रू) आले नाही तर त्याचे हृदय बिलकुल दगडाचे समजा असे. सत्ताधारी दगडांच्या राजवटी आल्या आणि गेल्या. मात्र त्यांना निदान मानवतेच्या भूमिकेतून सुद्धा बिलकुल दया आली नाही. आज आपण महिन्याला १०० कोटींच्या वसुलीच्या बातम्या वाचतो,मात्र १८ वर्षे बिनपगारी म्हणजे नेमके काय ?

या खोलात कोणी गेले नाही. पुस्तक केवळ भावनेने लिहिले नाही तर त्यात बुद्धीचाही मोठा वापर केला आहे. कसे जगले असतील हे शिक्षक ? कसे जगत आहेत हे शिक्षक !  यांचे तरुणपणीच कोचे गेलेले गाल,ऐन तारुण्यात म्हातारपणाच्या लकेरी, यांची पोकी पोकी झालेली शरीरं. या राज्यकर्त्यांना कशी दिसत नाहीत.  उद्योगपतीना कर्जमाफीसाठी पैसे आहेत मात्र या सरकारला विनाअनुदानित शिक्षकांना पाच-दहा हजार पगार द्यायला पैसे नाहीत. संध्याकाळी कमिशनचा हप्ता आला नाही तर यांना झोप येत नाही. या शिक्षकांनी कशी काढली असेल वर्षामागून वर्षे.!!

                         पुस्तकात रचनेपासून तपशीलापर्यंत लेखकाची प्रतिभा जागोजाग दिसते. मुळात विनाअनुदानित धोरणाची वाटचाल कशी झाली याची लेखक मिमांसा करून शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सावंत शिक्षक आमदार ना.गो.गाणार, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रतिनिधी खंडेराव जगदाळे यांच्या मुलाखती घेतात. तर विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना यात सोळा वेदनांचे उमाळे आहेत. वैतागून हे शिक्षक इच्छामरणाची परवानगी मागतात. 'स्वातंत्र्यदिनी एका शिक्षकाची आत्महत्या' हे प्रकरण थेट काळजाला भिडतं. या सोळा प्रकरणात ज्या व्यथा-वेदनांची कथा आपण वाचतो. तेव्हा निर्दयी शासनाच्या अन्यायाबद्दल तोंडात शिव्या येतात. हे शिक्षक असा काय गुन्हा करतात की, त्यांच्या गळ्यात शासनाने नरवेदना बांधाव्यात, असा प्रश्न पडतो.

                    'काळाने हिरावून घेतलेले विनाअनुदानित शिक्षक' व 'विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या' या दोन प्रकरणात या तणावातून मृत्यू झालेल्या ४७ शिक्षकांची यादीचं लेखक देतात, गलबलून जाते. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेल्या हत्याच आहेत, तर कळतील का हो अंतरीच्या भावना?यात लेखकाने फोडलेला आर्त हंबरडा वाचून काळजाचे पाणी पाणी होते. बाप म्हणतो लेकाचा पगार सुरू करा, लहानगा लेक म्हणतोय, 'बाबांचा पगार कधी सुरू होईल ?' लेखक म्हणतो 'आत्तापर्यंत आम्हाला सारे निर्दयी बाप भेटले तुम्ही आई व्हा ना !, आमच्यासाठी अनुदान द्या ना !' केवळ आमच्या कुटुंबाची खळगी भरण्याइतके ! या आर्त हंबरड्यानी दगडालाही पाझर फुटतील असे ते.

              महाराष्ट्रातील काही विचारवंतांचे याबाबत विचार एका प्रकरणात आहेत. डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणतात, 'अनिष्ट विनाअनुदानचे हे अरिष्ट आहे'. तर श्री.संपत गायकवाड शासनाला या बाबत गंभीर विचार करायला सुचवतात. तर शांताराम गजे कायम विनाअनुदान म्हणजे मरेपर्यंत विनाअनुदान काय ?असा खोचक प्रश्न विचारतात.प्रा. किसनराव कुराडे म्हणतात की, विनाअनुदान शिक्षण पद्धती ही एक नादान बाब आहे. अनिल बोरणार म्हणतात की, प्रलंबित म्हणजे कुठंवर प्रलंबित ? पुस्तकात इतरही प्रकरणे आहेत.

                  एकूणच खरं तर एका अनुदान नसलेल्या प्रतिभावंत लेखकाने लिहिलेले हे पुस्तक आहे.  उपाशी शिक्षकांचे उपाशी शिक्षकाने लिहिलेले हे पुस्तक आहे. असे म्हणतात की, कला-साहित्य याची निर्मिती भरल्या पोटातून होते. लेखक याला अपवाद ठरला आहे. शेवटी लेखक परिचयातील माहिती वाचून अचंबित व्हायला होते.जणू उकिरड्यावर पडलेलं रत्न. मी शेवटी अपेक्षा करतो की, शासनाने विनाविलंब या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्यावे व पापाचे वाटेकरी होणे थांबवावे.



 - शांताराम गजे

अकोले जि- अहमदनगर.

मोबा -९९७०७३०२५०


विनाअनुदानितची संघर्षगाथा.

पुस्तकासाठी संपर्क - 

किरण चव्हाण. -८८०६७३७५२८.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

श्री. अशोक चव्हाण यांचा डाक विभागाकडून सन्मान.

               


डाक सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री.अशोक राजाराम चव्हाण यांचा डाक विभागाकडून उचित सन्मान.

                   केंद्र सरकारच्या डाक विभागामध्ये 1991 पासून गेली 30 वर्षे कार्यरत असणारे व कर्तव्यनिष्ठ राहून प्रामाणिकपणे पोस्ट सेवा बजावणारे शांत,संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व,पांगिरे गावचे सुपुत्र आणि आमचे दादाश्री श्री. अशोक राजाराम चव्हाण यांना डाक विभागातल्या उत्कृष्ठ सेवा कामगिरीबद्दल 'Best Employee Of the year' या पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहेत.आपल्या सेवेला वाहून घेऊन एकनिष्ठपणे शांततेने आपले कार्य करीत राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.खरं तर आपल्या कामाशी एकरूप राहून तन्मयतेने काम करण्याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अशा उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेऊन त्यांचा झालेला सन्मान हा उचित असा आहेच, त्याचसोबत  सर्वांसाठी आदर्शवत असणारा व प्रेरणादायी ठरणारा आहे.आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.पुनश्च त्यांच्या यशस्वी गौरवास्पद कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा...         




बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...


 विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.



                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८.





पुस्तकासाठी संपर्क 

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

मदतीचा हात मायलेकीच्या निवाऱ्यासाठी


 

'मायलेकीसाठी निवारा उभा करूया संकल्पसिद्धीचे साक्षीदार होऊया.'


                                                   भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक येथे श्रीमती रेखा धोंडीराम परीट व प्रगती धोंडीराम परीट या दोघी मायलेकी राहतात. गल्लीतल्या एका वळणावरच्या कोपऱ्यात विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी मातीचे घर आहे.घराला कांबटाचं दार.आत जाताना वाकून जावं लागतं.हे घर म्हणजे दाटीवाटीचा खोपडाचं म्हणायचा.दोन चार लोकांना बसायलाही पुरेशी जागा नाही.. घरात पूर्ण अंधार प्रकाशाची सोय नाही.रात्रीचा दिवा लावावा म्हटलं तरी त्या दिव्यात रॉकेल कुठून आणणार..? कारण रॉकेल आणायचं तर रेशन कार्ड पाहिजे.एकंदरीत स्वतःच्या मालकी हक्काची जमीन नाही,राहतं घर ते ही नावावर नाही,मूळ कागदपत्रे नसल्याने रेशनकार्ड,आधारकार्ड (आईचे नाही) सारखी महत्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे गरिबीची वास्तवता कागदोपत्री सिद्ध होत नसल्याने शासनाच्या सोयीसुविधापासून आज वंचित रहावं लागत आहे.. 

                                         प्रगती धोंडीराम परीट सध्या दहावी मध्ये शिकते आहे. प्रगतीच्या आईला ऐन तारुण्यात वैधव्य आलं.प्रगतीच्या वडिलांचे निधन झाल्याने घराचा आधारवड हरपला आहे.एक मोठा भाऊ आहे पण गरिबीमुळं त्याला पाहुण्यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवलेलं आहे.साधी भोळी अशी प्रगतीची आई.परिस्थितीने रंजलेली गांजलेली.पोटाला दोन मुलं पोटाची खळगी भरायची की मुलांचे शिक्षण बघायचं परिस्थितीने पुरती खचून गेली आहे बिचारी.इतकी भीषण गरिबी असून त्यात कमी की काय म्हणून तिला फिट्सचा त्रास आहे.कधीही अचानक तिला फिट्स येते त्यामुळे हतबलतेशीवाय हातात काहीच नाही. यातून रोज दुसऱ्याच्या बांधा जाऊन कशीतरी दोन वेळच्या भुकेची तडजोड करून गुजराण करावीच लागते.शंभर रुपये मजुरीच्या जीवावर रोजच्या जगण्याला लागणाऱ्या गरजांची पूर्तता कशी होणार ? अशा गरिबीमुळे तर पोटचा श्रावणबाळ ह्या माऊलीला  दुसऱ्यांच्या हवाली सोपवावा लागला.जिथे रोजच्या जगण्याची मारामार आहे तिथे मुलांच्या शिक्षणाचा भार तिच्याने सोसवणारा नाही.तरीही आज अनंत अडचणीतून प्रगतीने आपले शिक्षण चालू ठेवले आहे.

                                   आज मायलेकी गरिबीशी लढत झगडत कसेतरी जीवन कंठत आहेत.एकवेळ उपाशी पोटी राहून हा लढा त्या लढतीलही.पण मूळ प्रश्न सध्या त्यांच्या निवाऱ्याचा, राहण्याचा आणि मुख्यत्वेकरून संरक्षणाचा आहे.आज छोटेखानी मातीच्या घराचा आसरा आणि रात्रीला त्या नाजूक कांबटाच्या दाराचा आडोसा.ही असुरक्षितता रात्रंदिवस त्यांच्या मनाला खात आहे.प्रत्येक रात्र तर वैऱ्याची असावी अशी परिस्थिती आहे रात्री लेक झोपते तेव्हा माय जागी असते आणि माय झोपते तेव्हा लेक जागी असते.याहून त्यांच्या असुरक्षिततेचं वेगळं उदाहरण द्यायला नको.

                                  आज दिवसाढवळ्या समाजात घडणाऱ्या महिला अत्याचाराची प्रकरणं आता वेगळी राहिली नाहीत.अशा पार्श्वभूमीवर ह्या मायलेकींचं अशा नाजूक घरात राहणं कितपत योग्य आहे ?घर म्हणजे प्रत्येकासाठी भलेही एक स्वप्न असेल पण त्यांच्यासाठी एक सुरक्षितता म्हणून छोटेखानी असेना का एका पक्क्या घराची अत्यंत आवश्यकता आहे. एक असे घर की त्यांना आसरा देईलचं त्याचसोबत त्यांना एक सुरक्षितता देईल किंबहुना रात्रीच्या वेळी त्या दोघींना एकमेकींच्या काळजीपोटी पहारा करावा लागणार नाही.

                              आणि म्हणून गुरुवर्य इंद्रजित देशमुख काकाजींच्या प्रेरणा आशीर्वादाने शिवम परिवाराने हा संकल्प केला आहे की, ह्या मायलेकींना शक्यतो लवकरात लवकर हक्काचा निवारा उभा करायचा.एक पक्के सुरक्षित असे घर त्यांच्याकरिता सकारायचे आहे. आणि हा संकल्प केवळ समाजातील संवेदनशील दानशूर दातृत्वातूनच सिद्धीस जाणार आहे. आज जसे गावागावांमध्ये देवावरच्या श्रद्धा भक्तीभावापोटी उदार अंतरकरणाने केलेल्या दानातून भव्यदिव्य सुशोभित मंदिरं उभा राहतात.त्याचप्रकारे माणसांवरच्या श्रद्धा, संवेदनशीलतेच्या भावनेतून आज कोलमडलेल्या माणसांची मंदिरं आज आपल्याला उभी करायची आहेत..ह्या उपक्रमाला समाजातील उदार अंतःकरणाच्या दानशूर संवेदनशील माणसांच्या पाठबळाची गरज आहे.खरं तर शिवम परिवाराने मायलेकीसाठी घर उभा करण्याचा संकल्प करून ज्या पवित्र कार्याचा पाया घातला आहे त्याचा कळस आपल्यासारख्या दानशूरवंतांच्या दातृत्वातूनच पूर्ण होणार आहे. तर चला आपापल्यापरीने ह्या उपक्रमास योगदान देऊन या संकल्पसिद्धीचे आपण साक्षीदार होऊया.


मदतीसाठी संपर्क -


सागर गुरव - ९१४६१४८९०४

सोमनाथ येरनाळकर - ९४२१४२३००७

सुहास सोरप - ८३२९९००८६० 

सुनिल पाटील - ९४२१२०१४६० 

दिगंबर किल्लेदार - ९४२१८२७०७०

राजेंद्र मगदूम - ९४२३२७९७२८.

---------------------------------------------------

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.

बुधवार, २८ जुलै, २०२१

"बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."


                  "बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."


                     आसमानी सरी बरसतात काळ बनून आणि अंदाधुंद तांडव करून जातोस मेघराजा.तुझ्या जीवावर प्रजा सुखात आनंदात नांदते...त्या प्रजेचं अतोनात हाल करून छळून..लुटून जातोस बिचाऱ्या.बा मेघराजा एवढा कसा काय रे निष्ठुर होतोस..? जो प्रेमानं धरणीमायेवर बरसावा तो असा कोपिष्ट होऊन का खवळवतो.बरसायला लागलास की बरसत राहतोस नुसता वेड्यासारखा.. तुझं तुलाही नाही भान रहात.व्यापून टाकतोस धरणीमायेच्या सर्वांगाला.तिच्या लेकरांनी तिच्या कुठल्या कुशीत लपून बसावं रे? जराही ठाव नाहीस देत. काय बोलावं आणि कुणापाशी बोलावं..? तुला वाईट तरी कसं म्हणावं..? तारणारा तूच आणि मारणाराही तूच.एका हातानं देणारा तूच अन दुसऱ्या हातानं असं काढून घेणाराही तूच.

                         तूच आहेस डोळ्यात प्राण आणून ज्याची आंम्ही वाट पाहतो...तू बरसायला लागलास की,आमच्या आनंदाला उधाण येतं.सुखस्वप्नं पहावी ती तुझ्या जीवावर.तुझ्या चांगुलपणावरच हा साऱ्या जीवांचा सुखाचा संसार.पण आज काय म्हणावं तुला..?.तुझ्याकडं आस लावून बसणाऱ्या लेकरांच्या वाट्याला हे कोणतं दुःख घेऊन आलास..वैऱ्यांन डाव साधावा तसा डाव साधतोस.सुखाची रास घेऊन बरसणारा तू अशी एकदम दुःखाची आरास कशी काय मांडून जातोस.                       महापुर येऊन जातो रे पण उर अजूनही भरून वाहतोय...रात्रंदिवस थैमान घालुन,वैऱ्यासारखा आक्रमण करून आमच्या सुखानं नांदणाऱ्या वस्तीत फक्त तांबडया पाण्याचं साम्राज्य पसरवतोस.एकवेळ अशी की,  देव पाण्यात घालून तुझी वाट बघायची,पण आज तूच देवाला पाण्यात घातलंस. देवळाच्या गाभाऱ्यातला आणि घराच्या देव्हाऱ्यातला देव आपल्या मिठीत घेतलास...आमच्या पेटत्या चुलीवरून पाणी फिरवलंस. राहतं घरटं पाण्यानं भरून गेलं.चार भिंतीच्या आत गंगामाई रहायला आली.

                          ऊनवारा,पाऊस पाणी झेलून आम्हांला जपणारी आमच्या कष्टाची घरं.आकंड पाण्यात बुडून मातीमोल होताना उघड्या डोळ्यांनी नाही रे पहावत..तान्ही बाळं, बाईमाणसं, म्हातारी-कोताऱ्या जीवांची होणारी हेळसांड नी हाल सांग फक्त उघड्या डोळ्यानी कशी पहायची रे....नात्यांच्या होणाऱ्या ताटातूटीची पुन्हा भेट घडेलं की नाही ठाऊक होतं.गोठ्यातल्या लेकुरवाळ्या जनांवारांची दावण रिकामी करताना ध्यायी आतल्या आत कितीदा रडते. 

तूच नाहीस अरे गावचा पाठीराखा डोंगरसुद्धा झडप घालतो आमच्या गावांवर.चिरडून टाकतो आपल्या उराखाली आमची माणसं.कुटूंबच्या कुटूंब गाडली जातात.नात्यांच्या आख्या गोतावळ्यावर माती सारली जाते.नेणत्या जीवापासून जाणत्या जिवांचा साऱ्या साऱ्यांचा चिखल होतो.गडप झालेल्या ढिगाऱ्याखालीचं त्यांना कायमची समाधी मिळते.त्या चिखलातुन तान्ह्या लेकराचा निपचित गोळा वर काढताना सांग तुला कस वाटतं.नात्यांची,कष्टाची सारी सारी धनदौलत पाण्यातून वाहून कुठल्या कुठं जाते.

                               समोरच्या कोसळणाऱ्या संकटाकडं फक्त शून्यातून बघण्यापलीकडं हातात काहीच उरत नाही.गळ्यात हुंदका दाटून कितीवेळा तरी डोळ्यांना महापूर येतो.सगळ्याच वाटा खुंटलेल्या...कुणी कुठं जायचं आणि कुठं रहायचं...काय खायचं..पुन्ह्यांदा कसं उभं रहायचं काही काहीच कळत नाही.डोळ्यादेखत गल्ली,गाव,शहरं महापुरान वेढलेल्या पाण्याच्या पोटात.आभाळातन टिपून बघितल तर दिसेल ती पुराच्या लाल पाण्यात बुडालेली आमची सुखानं गजबजून जाणारी नगरी.नेहमी रहदारीनं गजबजून गेलेल्या लांबरुंद वाटा तुडुंब भरलेल्या पाण्याच्या पोटात शिरलेल्या.

                                 वरनं कोसळणार आभाळ किती झेलायचं आणि खाली गळ्याला आलेल्या पाण्यात जगणं कुठं शोधायचं..?जगण्या मरण्याच्या मधल्या तीरावर सोडून जातोस तू मेघराजा.आता होत्याचं नव्हतं झालं...काही नाही उरलं...कष्टानं उभं केलेलं सारं मातीमोल झालं..शेतातलं उभं पीक जमीनदोस्त झालं...पुराच्या पाण्यात वाहून गेलं... नासुन गेलं...कुजून गेलं.पै न पै साठवून ठेवल्यालं सारं सारं काही वाहून गेलं.प्रपंच सारा उघड्यावर आला...राजाचा रंक झाला...घराच्या चारी भिंती चारी बाजूला झाल्या...डोक्यावरचं छप्पर गळून पडलं..आणि काही  उरल्या सुरल्या मोडक्या तोडक्या घरात नुसता चिखल साचून राहिला..तसाच मनाच्या तळाशीही साऱ्या भावनांचा...स्वप्नांचा झालेला चिखल....निव्वळ आक्रोश जगणं हिरावून घेतलेल्या आमच्या दुर्दैवी माणसांचा...दुःखाच्या आघाताने उरातून फुटलेली अनावर किंकाळी...आता ती कुणी कुणाला ऐकवावी आणि कुणी कुणाची ऐकावी.

        पण मेघराजा आज माणूसचं माणसाला वाचवतोय..दुःखातून सावरण्यासाठी इथे माणुसकीचा हात पुढे सरसावतोय...मोडून पडलेल्याना वर उठवून लढण्याचं बळ देतोय.आता मंदिरात देव नाही तो देवच रोज भेटायला येतोय इथे माणसांच्या रूपातून.माणसामधल्या देवाचं इथं रोज दर्शन होतंय..आता आमचं दुःखण,गाऱ्हाणं त्यांच्यासमोरच मांडतोय आम्हीं..बा मेघराजा.. महापूर येतो आणि पुन्हा ओसरतोही.पण लक्षात ठेव इथे माणसातल्या माणुसकीचा आणि प्रेमाचा जो महापूर आहे ना तो अखंड वाहतोय.तो कधीच ओसरत नाही.आणि ओसरणारही नाही.


            - किरण सुभाष चव्हाण. 

८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...